Skip to main content

समाज

२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

लेखक स्वानन्द यांनी शुक्रवार, 11/12/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो. तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला.

चौसष्ठ घरातला आनंद!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/12/2009 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ साली जागतिक विजेता बनून भारतीय बुद्धीबळाचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणारा आनंद विश्वनाथन हा ११ डिसेंबर ला वयाची ४० वर्षे पूर्ण करत आहे! आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो. २०१० साली होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/12/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.

तुमचीही कोणीतरी वाट पाहत आहे.....

लेखक भानस यांनी गुरुवार, 03/12/2009 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजी गेली तेव्हा मी अमेरिकेत होते. १३ जानेवारी,२००१-भोगीचा दिवस. सकाळी मुलगा आणि नवरा आपापले डबे घेऊन गेले. घरातले आवरत एकीकडे मी मेल पहात होते. सासूबाईंचा मेल होता. दुःखद निधन. मी घाईघाईने मेल पाहिला, " अरे देवा!!" आजी गेली होती. बराच वेळ मला काहीच समजत नव्हते. रडूही येत नव्हते. हे खरे आहे ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजही बसत नाही. मी आईला फोन लावला. आईने सांगितले की फारसा त्रास न होता आजी गेली. तीन-चार तास हॉस्पिटल मध्ये होती. बोलतही होती. अटॅक आला होता. डॉक्टरांनाच सांगत होती, मला काही कुठे दुखत नाही. लवकर घरी पाठवा. पुन्हा एक अटॅक आला आणि गेली. आजोबा गेले त्यावेळी मी तशी लहानच होते.

भोपाळ

लेखक विकास यांनी बुधवार, 02/12/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
* भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले.

तो, हा आणि मी

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 02/12/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मला त्याचे दर्शन दुर्मिळच झाले आहे...... गेल्या काही दिवसात तर तो दिसलाच नाही... कुठे गेला असेल तो??? आज काल का मला भेटत नाही??? आधी नेहमी माझ्या बाजूला उभा असायचा.... कधीही साथ न सोडणारा तो असा अचानक कुठे गेलाय???? दंगा घालतानाही त्याची साथ असायची, ऑफिसात काम करताना पण त्याची साथ असायची.... सर्व मित्रांसोबत असतानाही त्याचीच साथ असायची.... तो असताना कधीच कुठले काम करणे जिवावर आले नाही. सुखातही तो माझ्या सोबतीला व दुखा:तही तो माझा साथी!!!! काय झाले असेल त्याची माझी साथ सुटण्यासारखे...???? कदाचित हा दुसरा जो सध्या माझ्या साथीला असतो त्यामुळे असेल का?? कोण 'हा'???

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 01/12/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली. पुण्यात राहाणार्‍या आणि पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत काही चाड असणार्‍या जबाबदार नागरिकांनी यात भाग घ्यावा म्हणून हे लिखाण. www.savepunetraffic.com या संकेतस्थळावर जाऊन या मोहिमेचा भाग व्हा. मी नुकतेच या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे. सन्जोप राव

उष्टावण.....

लेखक भानस यांनी सोमवार, 30/11/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल हे रोजचेच झाले होते. दुपारचे चार वाजले नाहीत तोच पोटात भूक दंगा करू लागे. डब्यातल्या दोन पोळ्या कधीच्याच जिरून गेलेल्या. खाली कँटिनमध्येही चहा-कॉफी शिवाय काही मिळत नसे. तश्या आठ-दहा बरण्याही असत. चिवडा, चकल्या, पापड्य़ा, बिस्किटं असे उगाच चावायला काहीतरी. पण बरेचदा त्या बरण्यांच्या तळाशी गळलेले तेल त्यांच्या कालावधीची लांबी दाखवत असे. ते पाहिले की सुधाला मळमळायलाच लागे. बरे बाहेर जाऊन काहीतरी खावे तर सेक्शनमध्ये बोंब. अरे कुठे गेल्यात रे? बराच वेळ झाला. काय ऑफिस आहे का टाईमपास? आँ....... दहा मिनिटांच्यावर जर कोण कुठे गेले तर अर्धी सी.एल कापा म्हणजे चट ताळ्यावर येतील सगळे.