Skip to main content

समाज

पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 04/07/2011 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence." -Kurt Goldstein इतिहासातील काही घटना त्या इतिहासाचा भाग असलेल्या शहरावर, प्रांतावर किंवा समाजावर एक ठळक, दूरगामी असा परिणाम करत असतांना दिसतात. अशा काही ऐतिहासिक घटनांनी एखाद्या प्रांताचा इतिहास आणि भूगोलही कायमसाठी बदलून गेला असण्याची उदाहरणे जगभर आहेत. अशीच एक अकल्पित आपत्ती आजच्या पुणे शहरावर बरोब्बर ५० वर्षापुर्वी ओढवली होती. १२ जुलै २०११ हा पानशेतच्या प्रलयाचा पन्नासावा स्मृतीदिन आहे.

हानामी (花見) : साकुरा

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 02/07/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
हानामी (花見) : साकुरा हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ. वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी शुक्रवार, 01/07/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रतिष्ठित लोकाच्या समोर स्वतःच्या आईच्या थोबाडीत मारल्याचा बदला स्वतःचा जीव देवून चुकवावा लागला. ह्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल.१९७५ ला लावण्यात आलेल्या आणीबाणीत आणि त्यानंतर निवडणुकीत हरल्याने पत्कराव्या लागणाऱ्या नामुष्कीमुळे ज्याची भूमिका अर्थात विवादास्पद होती त्याचा बळी जाणे हे काही तितकेसे मुश्कील नव्हते. ३० जून १९८० ला स्वतःच्या ऑफिस वरून विमान उडवून नेताना सफदरजंग विमानतळाच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून विमान अपघात ग्रस्त झाले.ज्याच्या साठी फिल्डिंग लावली गेली होती त्यासकट सक्सेना नावाचा कॅप्टन फुकट बळी गेला. विशेष म्हणजे आईला मेलेल

हेज्यायची कटकट...

लेखक भारी समर्थ यांनी बुधवार, 29/06/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबास

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 27/06/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही.