नाती गोती
मानवी संबंधांचे जाळे समजणे किती क्लिष्ट असते नाही! चहुकडे विणलेल्या संबधांच्या बरोबर मध्यभागी माणूस स्वत: मी-पण सुरक्षीत ठेवायला पहातो. ह्या ’मी’ भोवती अनेक वर्तुळे तो बनवतो. आई वडील, पत्नी, मुले ह्यांची वर्तुळे. इतर कुटुंबीय, नातेवाईक, शेजारपाजार, मोहल्ला, व्यापार-नोकरी निमित्य जोडलेले, समभाषिक, समविचारी...... हजारो वर्तुळांचे जाळे ह्या ’मी’ला घेरून टाकते. एका वर्तुळामधल्या स्पंदनांचा कधी दुसऱ्या वर्तुळांवर चांगला---वाईट परिणाम देखील होत असतो. मग त्यातून मोह, मत्सर, स्पर्धा अशा अनेक समस्या निर्माण होतात.