Skip to main content

समाज

बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

लेखक जहीर सय्यद यांनी मंगळवार, 11/12/2012 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे.

आस्थेचे बंध

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 05/12/2012 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल. हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल?

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही

सचिनचे क्रिकेट

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 30/11/2012 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी मिपावर नव्हतो.............. हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले. सचिनने संदीप पाटिलला केलेला फोन, त्यावर तो काय बोलला असेल ह्याच्या अटकळी ह्या वाहिन्या लावीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात सुद्धा मोठाल्या बातम्या आल्या होत्या.

बाळाराम-बुवा

लेखक इरसाल यांनी शुक्रवार, 30/11/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"गुरुजी, तुमच्या पोराला गणित येत काय हो" ? असा प्रश्न विचारुन मला रिंगणात घ्यायचा प्रयत्न करणारे बुवा हे आमचे शेजारी. शिक्षण ६/७ वी पर्यंत झालेले. त्यांना हो हे उत्तर मिळाले की विचारायचे सहा सहा ढुंगणाला ढुंगण सांग किती ? त्यावेळेस काही वर्षांपुर्वीच वडिलांची बदली त्या गावात झाली होती. त्यामुळे आम्ही नवेच होतो गावाला आणी असणार्‍या शेजार्‍यांना सुद्धा. बुवांचे वय साधारण २७/२८ असावे.

चावडीवरच्या गप्पा - स्मारक

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 29/11/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत. “ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्‍यावर आणत. “हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला.

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 29/11/2012 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

थरथरता वृध्द हात...!

लेखक उदय ४२ यांनी सोमवार, 26/11/2012 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीदाराच्या कारकिर्दीत काही प्रसंग मोठे विचित्र असतात. म्हणजे कितीही अलिप्त राहून बातमी द्यायची म्हटली, तरी तसे करताच येत नाही. बातमी आनंदाची असेल,तर आपल्यालाही आनंद होतो, दु:खाची असेल, तर ती देताना दु:ख होतेच! बाळासाहेबांच्या निधनाची बातमी अशीच! ती लिहीताना खूप वाईट वाटत होते. बातमी तशी अनपेक्षित नव्हती. कधी ना कधी या घटनेचे वृत्तांकन करणे नशिबी येणार आहे, याचा अंदाज साऱ्याच पत्रकारांना आला होता. विशेषत: गेले काही महिने बाळासाहेबांच्या तब्येतीत जे चढ-उतार झाले, त्यामुळे आता काहीही होऊ शकते, याची कल्पना आली होती.