Skip to main content

समाज

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .

उद्रेक भीषण स्फोटाचा

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११) -- पण भावनांचा कधी होणार मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत). प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ? स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी !

बाप्पा मोरया रे

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन हो माथा....(असली गाणी ऐकायला मिळाली की समजावं बाप्पा येतोय हो लवकरच) गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता". (सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.) मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत.

लोकल पारायण

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा. मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या. मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं.

संधिप्रकाश आणि सांजवेळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 27/10/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातल्या २४ तासात आपण काय काय करत असतो......पोटापाण्याच्या सोयीसाठी नोकरी....विद्यार्थीदशेत शिक्षण.....माणूस तोच असला तरी प्रत्येक क्षणाला त्याचे रूप बदलत असते.

शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यातील भाषण

लेखक yeda यांनी शनिवार, 27/10/2012 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यात CD वर झालेलं भाषण ऐकलं . http://www.dailymotion.com/video/xularp_bal-thackeray-speech-at-shivsen… मनात कित्त्येक विचार आले.

वेळ नाही.........

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/10/2012 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेजण नेहमी म्हणत असतो की खूप काही करायचं आहे पण वेळ नाही....कधीतरी विस्कटलेला कप्पा आवरायचाय पण वेळ नाही.....खूप दिवस कुणा मित्राला अथवा नातेवाईकाला फोन करायचाय पण वेळ नाही.........जर आपल्याकडे कशालाच वेळ नाही तर मग आपल्या आयुष्यातला वेळ नक्की जातो तरी कुठे? कधीतरी मी या गोष्टीचा विचार करतो....अगदी मनापासून वाटतंय की मला अजूनही याचे उत्तर सापडलेले नाही....... वेळ नसणे म्हणजे नक्की काय? खरच आपल्याकडे सवड नसते की आपणच एखादी गोष्ट न करण्यासाठी शोधलेली ती एक लंगडी सबब आहे? समजा आपण खरच आपल्याला वेळ नाही असे मानू पण मग आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतोच ना?

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 23/10/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा. परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?" "माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात." "हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?" "जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये!

टेंन्शन...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/10/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...! देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं... की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं... पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही... समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही? सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय???

आपण सारे झिंगु ....

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 14/10/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म निपाणीचा. आमचे मुळ गांव संकेश्वर. निपाणी जवळच. म्हंजे बेळगांव जिल्ह्यातच. शिक्षण निपाणीत. मोठा भाऊ इंजिनियरिंग पर्यंत सगळे शिक्षण निपाणी आणि बेळगाव मध्ये शिकला. तो आता पुण्यात असतो. लहान भाऊ दहावी पर्यंत कर्नाटकात शिकला. घरापासून पाच सात किलोमीटरवर महाराष्ट्राची हद्द सुरु होते त्या अर्जुनी गावाजवळ महाराष्ट्रातले कॉलेज आहे. तिथे त्याने अकराव्वी बारावी केली. पुढे सांगली आणि पुणे. आता तो बंगळूरू मध्ये स्थाईक. मी सातवी पर्यंत कर्नाटकातल्या शाळेत. मित्र अर्जुनीच्या म्हंजे महाराष्ट्रातल्या शाळेत गेले म्हणुन तिथे गेलो. पुढे इंजीयारिंग महाराष्ट्रात.