Skip to main content

समाज

मराठी रंगभूमीवर शोककळा

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 24/12/2012 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
सरत्या वर्षात अजून काय काय पहावे लागणार आहे हे एक गुढच आहे. सकाळी सकाळी एक दु:खद बातमी कानावर आली. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व पेंडसे यांचा दीड वर्षीय चिरंजीव यांचे अपघाती निधन.... मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाकयाजवळ रात्री १२.०० च्या सुमारास समोरून येणार्र्या टेंम्पोचा ताबा जाउन डीव्हायडर पार करून तो टेंम्पो त्यांच्या गाडीवर येउन धडकला आणि पुढे काय झाले असेल याचा विचार करणेच खरेच कठीण होउन बसलेय...

खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 23/12/2012 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कडाक्याच्या थंडीतही सत्तर वर्षाची, अंगावर सुरकुत्या पडलेली आजी मंदिराच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या अनेक वर्षापासून ती नियमितपणे मंदिरात येत होती पण आज मात्र काठी सावरताना तिचे हात थरथरत होते, पायात एक विलक्षण असा शिणवटा आला होता. 'जन्म हि निसर्गाने दिलेली देणगी आहे. आयुष्याचे इप्सित ध्येय साध्य झाले कि त्या दिवसाची आठवण म्हणून वाढदिवस साजरा करावा' अशी तिची ठाम समजूत होती. ती आपल्या यशोशिखराच्या अगदी पायथ्याशी उभी होती व ईश्वराने साथ दिलीच तर आज ती आपला पहिला वाढदिवस साजरा करणार होती.

गोष्ट एका माणसाची - १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 21/12/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
|| ॐ || पावसाची रिपरिप अजुनही थोडी चालु होती . गेला आठवडाभर पाऊस काही ऐकायच नाव घेत नव्हता . सारे ओढे नाले अगदी भरभरुन नर्मदामाईला मिठी मारत होते . नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाचा खळखळाट इथे ही ऐकु येत होता . इतकया दुरवरही ...अगदी स्पष्ट ...त्यात आजच्या ह्या जराश्या उघडीपी मुळे जणु रातकिड्याना जागे केले होते अन तेही सुरात सुर मिळवायचा प्रयत्न करत होते त्याला शेजारच्या पिंपळपानांच्या सळसळीचीही सोबत होती . सार्‍यानाच जणु लय सापडली होती . हवे मध्ये प्रचंड गारवा भरुन राहिला होता. नुसताच गारवा नव्हे तर तिथेही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली होती . मातीचा, झाडांचा, पानांचा, गवतांचा,....

द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

लेखक पिंपातला उंदीर यांनी गुरुवार, 20/12/2012 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते.

वालक्या

लेखक वसईचे किल्लेदार यांनी बुधवार, 12/12/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी माझ्या बऱ्याच आठवणीत असणारा आमचा वालक्या... माझ्यापेक्षा साधारण 10-15 वर्षे मोठा असेल. नक्की सांगता येणार नाही. सर्वांसाठी फक्त वालक्याच. त्याच्याही नजरेत कधीही कुणासाठीही दुजाभाव दिसला नाही. कुणाच्याही खिजगणतीत नसणारे हे एक अजब रसायन. बहुधा देवाला दुर्लक्षून जन्मला असावा. त्यामुळेच ईतर कुणीही त्याच्याकडे फारसे लक्ष देतांना पहाण्यात आले नसावे. सकाळी सकाळी शाळेच्या समोर, रस्त्याकडेला हा उभा. अंगात काळसर, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि खाकी विजार. ती हि अर्धी. पायात चप्पल असल्याची कधी पहिलीच नाही. पाय सतत चालते, पण जागीच.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 11/12/2012 20:53 या दिवशी प्रकाशित केले.

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

(पुण्यनगरीच्या सौजन्याने)

बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

लेखक जहीर सय्यद यांनी मंगळवार, 11/12/2012 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे.