Skip to main content

समाज

को. ऑप. गणेशोत्सव

लेखक चेतन माने यांनी शनिवार, 15/09/2012 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट ची दुपार झाली होती. सगळे सोसायटीच्या आवारातून ऑफीस कडे चालले होते. "चला रे बसुया " च्या पाच सहा हाका आल्या आणि सगळे निघाले. "काय रे साला नुसती फालतुगिरी आहे ही दरवर्षीची मीटिंग म्हणजे" , मी. "अरे यार जाऊन बसुया तर सही" रमेश. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला आणि आणखी तो सोसायटीचा असला तर मीटिंग नावाची औपचारिकता झालीच पाहिजे . बरेच जण न जाणे का पण मीटिंग साठी खूपच उत्साही असतात . हि असली मंडळी फक्त मीटिंग साठीच उत्सुक असतात कामासाठी नाही! आणि अश्याच बर्याच जणांच्या एकापेक्षा एक फालतू आयडिया ऐकणे म्हणजे मीटिंग!! माझी आपली नकार घंटा सुरूच होती पण मित्रांबरोबर जाऊन बसावच लागलं.

कविता वाचण्याआधी एक क्षणभर मौन : एमनुएल ओर्तीज

लेखक Kavita Mahajan यांनी शनिवार, 08/09/2012 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी माझी विनंती आहे की आपण सगळे एक क्षणभर मौन पाळूया अकरा सप्टेंबर रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन इथं मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ आणि त्यानंतर अजून एक क्षणभराचं मौन त्या सगळ्यांसाठी ज्यांना तपासाच्या कारणास्तव सतावलं गेलं कैद केलं गेलं जे हरवून गेले ज्यांना यातना देण्यात आल्या ज्यांच्यावर बलात्कार झाले.

ट्रफिकची भेळ

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/09/2012 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आतुन बाहेर पाहू म्हणता काचेवर धुक्याचा खेळ बाहेर कशी मजबुत झालिये वहानांची पुरति भेळ पावसाचं पाणी भेळेवरती वाढवू पाहातय तिचा भाव त्यातच मधे बाइकवाला जणू फिरे पातेल्यात डाव पुढे एक छोटी गाडी गाडिवरती रांगडी घोडी ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा वाट देती तिला थोडी इतक्यात तिथे एक काकु घरी पहाती फोन टाकु मागून काका म्हणती त्यांना तू चालव मी देतो टेकू मी कडेला गाडीमध्ये पार्किंग करुन बसलोय मस्त बाहेर छान भेळ जमतीये मजेमजेनी करतोय फस्त रोज त्याच तिकिटावरती चालु होतो तोच खेळ उद्या या तुंम्ही सुद्धा दोघे मिळुन खाउ भेळ ...
काव्यरस

एक डोक्यातला किडा

लेखक अस्वस्थामा यांनी सोमवार, 03/09/2012 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा कधी कधी थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं. हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात. परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात..

ट्रेनच्या प्रवासामधील मधील एक विचीत्र अनुभव

लेखक शुचि यांनी रविवार, 02/09/2012 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
जिंक्स यांचा "अतर्क्य" हा अनुभवात्मक लेख आत्ताच वाचला. खरोखर विचीत्र म्हणावा असा अनुभव आहे. माझा असाच एक अनुभव सांगू इच्छिते - मी मुंबईच्या लोकल ट्रेनने मुलुंडला चालले होते. वेळ ऑफीस सुटल्यानंतरची असल्याने अतोनात गर्दी होती. अर्थातच मी लेडीज डब्यात होते. पण यावेळेस गर्दीचा रेटा भीषण होता इतका की मला वाटले कोणाचा तरी चेंगरून, गुदमरून मृत्यू होईल या गर्दीत . मुलुंड जवळ येऊ लगले तशी मी दाराकडे सरकून जवळजवळ दारातच उभी राहीले की उतरता यावे. एका हाताने पर्स धरलेली तर दुसरा हात बारवर अगदी रोवलेला. बाहेरची हवा खात जीव मुठीत धरुन उभी होते आणि कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवायला सुरुवात केली.

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.

'श्वान'दार जिंदगी

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 28/08/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची वेळ! सगळीकडे स्मशान शांतता! नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्ते ओले आहेत. रस्त्यावर लावलेले पिवळे दिवे प्रखर प्रकाशाचा पसारा मांडून बसले आहेत. ओल्या रस्त्यांवर तो प्रकाश सांडून रस्ते पण पिवळे भासतायेत. हवेत गारवा आहे. मोठमोठाल्या इमारती उभ्या उभ्याच डुलक्या घेत आहेत. झाडे निवांत झालेला हा सगळा पसारा बघत उसासे टाकत उभी आहेत. मी हळू-हळू चालत माझ्या इमारतीकडे चालत जातोय. फक्त माझ्या बुटांचा आवाज! इतक्यात समोर काहीतरी शुभ्र पांढरे हलतांना दिसते. माझी पाचावर धारण बसते. वेग कमी होतो. डोळे बारीक करून मी त्या अंधारलेल्या प्रकाशात खोल बघतो.

अमेरिका , महाराष्ट्र आणि परप्रांतीय

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/08/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र आणि अमेरिका दोन्ही मध्ये सध्या परप्रांतीय , त्यांचे आक्रमण आणि लोकल माणसाचा रोजगार याविषयी बरीच चर्चा चालू असते. सहज गंमत म्हणून त्यामध्ये काही साम्य आहे ते बघितले तर मला खालील मुद्दे सापडले. मुद्दे गंमत म्हणून आहेत आणि ते खालील छोट्या गृहीतका वरून काढले आहेत .

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

लेखक पैसा यांनी शनिवार, 25/08/2012 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती

लेखक रमताराम यांनी शनिवार, 25/08/2012 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एकदोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात.