चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी
“कसले काय हों! काहीतरी फुकटात पदरात पाडून घ्यायचे असेल दुसरे काय?”, घारुअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.
“नाहीतर काय, कर्जमाफी हवी असेल दुसरे काय?”, नारुतात्या घारुअण्णांची री ओढत.
“नारुतात्या, घारुअण्णा एक आपले फक्त संध्यानंद वाचतात, आता तुम्हीही सध्या संध्यानंद लावलात की काय?”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.
“का ब्वॉ?”, नारुतात्या.
“अहो! फक्त कर्जमाफीसाठी काहीही झालेले नाही, पेपर वाचला नाहीत का?”, इति बारामतीकर.
वाचने
1908
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
हे काय सोकाजीनानांचं विश्लेषन आपल्याला पटलं नाय बुवा. त्यांनी आज चाय पाजली नाय तरी पण हरकत नाय!!
पण ते जाऊ द्या, आम्हाला वेगळेच प्रश्न पडलेत...
१. सध्या महाराष्ट्रात शेतकीमंत्री नेमलेला आहे का नाही?
२. असेल तर हे सगळं रामायण घडलं तेंव्हा ते कुठे होते?
३. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी शेतकीमंत्र्यांकडे जायचं सोडून हे शेतकरी मुख्यमंत्र्यांनाच डायरेक भेटायला मागतात याच्या शेतकीमंत्र्यांच्या मनाला किती बरे वेदना झाल्या असतील? (हे म्हंजे आपली अडचण सोडवून घेण्यासाठी प्रशासकांना तसंच सोडून डायरेक नीलकांताला फोन लावण्यासारखं आहे!)
४. शेतकर्यांनी आपल्या आंदोलनाची पूर्वसूचना देऊन मुख्यमंत्र्यांची रितसर अपॉईंटमेंट घेतली होत का? की महाराष्ट्राच्या भल्यामोठ्या आणि प्रगत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चार लोकं चौकात आंदोलन करतात, आणि ते शेतकरी आहेत, म्हणून हातातला कामधंदा सोडून तिथे धावत जाऊन गळाभेट घ्यावी अशी काहीशी अपेक्षा होती?
आपला शहरी चाकरमानी,
डांबिसकाका
अहो पिडांकाका,
तरीही शेवटी त्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर 30 मिनिटे का होईना पण चर्चेसाठी दिली, जनाची नाहीतरी मनाची लाज वाटून, हेही नसे थोडके!शेवटी सोकाजीनाना तेच तर म्हणालेत की :) -(पिडांकाकांबरोबर चहा प्यायची इच्छा असलेला) सोकाजी
इतरत्र केलेल्या वाचनावरून आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला होता असं दिसतंय तेंव्हा मुद्दा #४ मागे घेत आहे. (तरीही वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्या घरावर हल्लाबोल करायची जरूर नव्हती असंच वाटतं) अहो, हुतात्मा चौकात किंवा आझाद मैदानात रोजच कुठली ना कुठली निदर्शनं चालू असतात. प्रत्येकाला साक्षात मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यायचा म्हणजे त्यांना अशक्य आहे हो!)
-(पिडांकाकांबरोबर चहा प्यायची इच्छा असलेला) सोकाजीसेम हियर! पुढल्या वेळेस आलो की नक्की मैफिल जमवू. तो चहा जर 'मॅनहॅटन टी' असेल तर जास्त चांगलं!!! काय म्हणता? :)
In reply to ओके! by पिवळा डांबिस
तो चहा जर 'मॅनहॅटन टी' असेल तर जास्त चांगलं!!!आहाहा... मग काय हो, त्यातल्या स्कॉच आणि बर्बन व्हिस्कीहून पिवळेच की :) -(सगळ्या प्रकारचे चहा आवडणारा) सोकाजी
काय पण टायमिंग साधलाय लेखाला ... १२-१२-१२
तरिबि आमि तेच म्हणनार :
राजकारणापलीकडे विचार करणारा नेता!
लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
नेहमीप्रमाणेच चावडीवर गप्पा छानच रंगल्या आहेत.
पण या वेळचा संदेश मला अधिक भावलाय...
जनाची नाहीतरी मनाची लाज वाटून,यांना मनाची कुठली आलीय लाज? :( नानांशी सहमत. पण सरकारने दिलेली अतिमुल्यवान ३० मिनिटे काय टाकणारेत बळीच्या पदरात कुणास ठाऊक? आहेच नाहीतर आभाळाकडे नजर परत. :(
असहमत!