राजकारण
आमचाही पाउस.....
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
अणुयुद्ध (शतशब्दकथा)
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट..
रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !!
त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त..
युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !!
केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात...
जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !!
अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी...
बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !!
आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता...
त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !!
कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता..
पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !!
क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त
काव्यरस
मध्य लटपटीत
मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंडाला अस्मितेच्या कोंदणात बसवून राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 19 जून 1966 या दिवशी मुंबईत जन्मलेल्या शिवसेनेनं आता सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याच्यावरचा अन्याय या भोवती फिरणारी शिवसेना मराठी माणसांच्या मनात तर आहे. पण दुर्दैवानं ती त्या प्रमाणात राजकारणात दिसते का याचा विचार होणं आवश्यक आहे.
एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे, शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे.
भारतीय वकील, 'स्वराज' पुर्वीचे आणि नंतरचे !
नास्तीक नावाच्या हिंदी चित्रपटात कवी प्रदीप यांच एक गाण आहे...
मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश
भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.
आळी मिळी गुप चिळी!
आळी मिळी गुप चिळी!
तू पेटव चिता,
त्यावर मी भाजतो पोळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू शोध साधू,
त्याना मी देतो सुळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू बनव शत्रू,
त्याना मी देतो हाळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू लागल्यासारखे कर,
मी ठोकतो आरोळी..
आळी मिळी गुप चिळी!
अर्धे शतक माझे
आता आली तुझी खेळी..
आळी मिळी गुप चिळी!
मी नागवलेच आहे,
आता तू फेडशील ती वेगळी..
काव्यरस
७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.
बाटली आणि दारू.....
खर्या आयडीने बोलता येईना
मनातले गरळ ओकता येईना...
डुआयडीने आता सगळे....
"स्कोअर सेटल" करू.....!!
उपद्र्व हा अनंत काळचा...
मिपाबरोबर कायम रहायचा...
घरात चारच माणसे आणि...
दारात चारशे चपला सारू.....
नव्या आयडीच्या बाटलीत भरली
शिळ्या विचारांची जुनीच दारु....
त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही...
मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !!
आडून आडून सगळे करिती हल्ला...
भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला....
एकटा दुकटा कोणी लागता हाती....
चला त्याला आडवे करू !!
मिसळपाव