Skip to main content

राजकारण

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 10/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

पत्रकार ब्रॅडली...

लेखक विकास यांनी गुरुवार, 23/10/2014 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन पोस्टच्या एकेकाळच्या कार्यकारी संपादकाचे, बेन ब्रॅडलीचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या बायकोने मध्यंतरी गुपित फोडले त्यानुसार ब्रॅडलींना काही वर्षे अल्जायमर झालेला होता ज्यामुळे त्यांची स्मृती लयाला गेली होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०च्या सुरवातीस वॉशिंग्टन पोस्टने जे काही केले त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या स्मृती आजही अमेरीकन माध्यमात जाग्या असलेल्या दिसल्या. बेन ब्रॅडली हे मुळचे बॉस्टनचे.

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

लेखक जीएस यांनी मंगळवार, 21/10/2014 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे. आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते. कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत.

नागोबा डुलाया लागला...

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 20/10/2014 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक मित्र. घराणं पूर्वापार काँग्रेसी. घराच्या भिंतीवर नेहरु, इंदिरा गांधी याच्या तसबिरी. घरातल्या मोठ्या माणसांची नावे संजय राजीव अशी तर मुलांची नावे राहुल प्रियांका अशी. मी एवढ्यात या मित्राला फोन केला. त्याचे घराणे पिढ्यानपिढ्या काँग्रेसनिष्ठ. आजोबा सरपंच. याचे वडिल काँग्रेसकडून आमदार. बंधू काँग्रेसकडून आमदार. पुढे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकता येत नाही असं ध्यानात आल्यावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली पण मोदीलाटेत वाहून गेले. आता याने आपल्या पत्नीला भाजपाकडून उभे केले. ती आमदार बनली. आता हे लोक आम्हाला जम्मू-काश्मीर, कलम ३७०, अखंड हिंदूस्थान याबद्दल सांगणार का ?

ते दोघ

लेखक पिंपातला उंदीर यांनी सोमवार, 20/10/2014 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
विदयार्थी दशेत असताना 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी एका प्री पोल सर्व्हे मध्ये भाग घेतला होता . त्यावेळेस अमरावती लोकसभा मतदार संघात पण काही चकरा कराव्या लागल्या होत्या . शिवसेनेचे अनंत गुढे आणि लोकशाही आघाडीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती . त्यावेळेस कोणी एक बच्चु कडू अस विचित्र नाव असणारा कोणी एक पोरगेला उमेदवार पण अपक्ष म्हणून उभा होता . या दिग्गजांच्या लढतीमध्ये पोरांचं टोळक घेऊन फिरणारा आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा आर्थिक परिस्थिती यथातथाच असणारा हा पोरगा काय करणार असाच एकूण सूर होता .

लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

लेखक माहितगार यांनी रविवार, 19/10/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि ! कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी लागली कुणाला कुणाची उचकी कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ?

ज्याचे त्याला कळले

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिलेदार धारातीर्थी बालेकिल्ले ढळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले तरातरा निघालेले पुन्हा मागे वळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले बेघर होतील आता जे पंधरा वर्ष रुळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले पीळ बघूया जाईल का सुंभ मात्र जळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले शुभ्र कपड्यांमागचे रंग खरे उजळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले आहे नव्याची आशा संकट परी ना टळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले मतदाराचे कौतुक की कर्तव्य त्याला कळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले - अ ज ओक

मोझाम्बिकची निवडणूक: २

लेखक आतिवास यांनी सोमवार, 13/10/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ 5 सप्टेंबर रोजी झालेल्या 'शांती करारा'बद्दल लिहायचं होतं खरं; पण काही कारणांनी ते जमलं नाही. आता त्याबद्दल लिहायचं तर बराच उशिर झालाय. आता निवडणूक झाल्यावर त्याबद्दल कदाचित लिहिता येईल - म्हणजे या कराराचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम झाला हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे; आणि दुसरं म्हणजे निवडणूक झाल्यावर हा 'शांती करार' टिकेल की पुन्हा एका नव्या संघर्षाची सुरुवात होईल ते पाहायला हवं. मी आधीच्या लेखात लिहिल्यानुसार इथं लोक 'पक्षाला' किती मतं मिळतात ते महत्त्वाचं आहे.

मतदान करा...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 13/10/2014 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
.

मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.

.

निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...

(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ?????

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 12/10/2014 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही) ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही.