Skip to main content

राजकारण

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 06/10/2014 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला. खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

#मोदीइनअमेरीका

लेखक विकास यांनी मंगळवार, 30/09/2014 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
Modi in America सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥ उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ....

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 27/09/2014 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

मोझाम्बिकची निवडणूकः १

लेखक आतिवास यांनी शनिवार, 13/09/2014 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

दोन अश्रू आणि एक सलाम..!

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 15/08/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं, त्यांना कधीच विसरलो आहोत... त्यांच्या नावानं जे पुढारले, त्यांच्यावरच विसंबलो आहोत... 15 ऑगस्ट, 26 जानेवारी... मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील.. सुट्टी जर जोडून आली, तर फारच बहार आणतील... तीन-चार दिवस स्वातंत्र्याला, बघा कसं उधाण येईल.. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले, त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल... जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी, पुन्हा कशाला आठवायच्या..? असे जर म्हणत असाल, तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..? आपण करतो मौज-मजा, त्यांनी सांडलेल्या रक्तावर.. आपण उपभोगतो स्वातंत्र्य, त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर... देशासाठी मेले ते...

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 15/08/2014 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जिल्हा - पालघर

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 01/08/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे. Palghar District

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.