Skip to main content

मुक्तक

ओंगळ समस्त, आम्ही नंगे...

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 14/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेवर माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अ‍ॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्‍या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना.....

भेट तिची माझी

लेखक अरुंधती यांनी रविवार, 13/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून? मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले. आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे.

पावसाची कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 12/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मोगर्‍याचं पान सांगेल भिजताना आलेली मजा टपटपणार्‍या थेंबांतून पसरणारा गारवा, मग अनामिक थरथर ताजी उब उगत असताना निथळणारा प्रत्येक थेंब अंतस्थ हालचालींना साद देतोय शिरशिरणारा गारवा हलकेच घालतोय फुंकर ओलेत्या उबेवर फुलेच वेडावून गेलीयेत.. आता....सुगंध कोण थांबवणार ?

अवघा रंग एक झाला ......

लेखक झुम्बर यांनी शनिवार, 05/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सकाळ ...सुट्टीचा दिवस ...आरामात उठाव असा बेत मनाशी करताच होते ...तोच नेहमीच्या अलार्म पेक्षा जरा जास्तच मोठ्याने काहीतरी वाजू लागल थोड नॉर्मलला आल्यावर कळल त्या आवाजाच्या जनक खुद्द आईसाहेब होत्या .....

बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स....

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 05/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिगरः अर्थातच.. मकीने लिहिलेलं चाँद तनहा!!! रोज ऑफीसमध्ये होणारा तोच तो उशीर. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत मरमर करायची.. त्यानंतर माजिवाड्याला उतरून पुन्हा घरी जायचं अगदी जीवावर येतं.. एकदा का घराकडच्या रस्त्यावर वळलं की रहदारी तशी तुरळकच. कधी कधी तर साथ द्यायला कुत्रंही नसते.. रस्ता मस्त शांत असतो.. मधूनच गार हवेची झुळूक शरीराला गारवा देऊन जाते.. खरेतर हा रस्ता चालण्याचा खूप कंटाळा आलेला असतो.. दिवसभराचा शीण तर असतोच, त्यात कुणाला फोन करावा अशी वेळ पण नसते. अशा वेळेला कंटाळलेल्या जीवाला सोबत एकच....

I WANNA GROW UP ONCE AGAIN

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 04/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
office मधलं तेच रटाळ वातारण त्या deadlines आणि कामाचे डोंगर ... बाहेर उन्ह भकाभका आग ओकताय असा एकंदरीत माहोल अतिशय कंटाळवाणा ..... प्रचंड चीडचीड होत होती.... पण खरच इलाज नव्हता असाच कसाबसा दिवस सरकत होता आणि अचानक दुपारी थंड गारवा हवेत पसरायला लागला AC चे सगळे नियम धाब्यावर बसवून मी खिडकी उगडली आणि आहाहाहा ............. एक थंड हवेचा झोत गालाचे लाड करून गेला ...

चिंतू-३

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 28/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चिंतू-३ संध्याकाळी अंधेरीच्या रेल्वे स्टेशनावर उतरून जिना चढणार्‍या गर्दीत जिन्याच्या पायर्‍या दिसेनाश्या होतात, आणि एकेका पायरीने वर चढणार्‍या त्या गर्दीची डोकी, खालून, काळ्या लाटांसारखी हिंदकळताना दिसतात... ... मध्येच एका पायरीवर मात्र, या लाटा भोवयासारख्या दुभंगतात... घाईघाईने जिने चढणारी ती पावले, मधल्याच एका पायरीशी थबकतात, आणि बाजूला होऊन पुढे सरकतात. आपोआपच, त्या पायरीवर एक पोकळी तयार होते. आणि लाटेतले प्रत्येक डोके खाली वळते... ...

(किनारा )

लेखक चेतन यांनी बुधवार, 26/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (जरा सुधरा) प्रसवलेले काव्य विरलेली शब्द्झोळी अगम्य कल्पना आणि काहीशा फिरवलेल्या ओळी शब्दांचा खेळ यमकासाठी रुची ला गच्ची मुक्तछंदातला कवी कल्पनांचा थर लावी शब्दांच्या पुड्या सोडा- कुठेही कशाही जोडा अर्थ लावुन फिरवुन डोकं आक्रंदतोय वाचक बिचारा ..

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.