Skip to main content

मुक्तक

एकदा, `रान' पेटलं...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 01/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक कवी, म्हणाला, मलापण `पद्मश्री' हवी... आणि `रान' उठलं. वयोमानामुळे भान सुटलं, म्हणालं. तू `जनस्थान' मिळव, नाही तर `ज्ञानपीठ' मिळव. तुझा राजकारणाशी संबंध काय? `मातोश्री'चा शेजारी, एवढाच ना तुझा पत्ता? पावसाच्या नावानं धो-धो कविता पाडल्यास, म्हणून `रानाशी नातं' नाही जुळत... त्यासाठी, रानकळा सोसाव्या लागतात. रानातल्या एअर कंडिशन्ड घरात, हुरड्याची कणसं चाखवत, `जाणत्या राजा'ला रानाचं कवतिक ऐकवावं लागतं... राजकारणाचं बोट धरून रानातल्या कविता कॊंक्रीटच्या जंगलात दिमाखात फिरू लागल्या, की पद्मश्री मागून चालत येते... तुझ्या इमारतीच्या टीचभर अंगणात, आहे असं, माझ्यासारखं रान?

तीन झुरळांचं शुभेच्छापत्र!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 31/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रीण एक हरहुन्नरी कलावंत आहे. तिच्याचसारखी तिची पाच वर्षांची मुलगीदेखील मनस्वी, कलासंपन्न व आनंदी स्वभावाची आहे. मैत्रिणीला नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबविण्यात, त्यांना आकार देण्यात समाधान मिळते. तिची लेक तिच्यापेक्षा कलेत एक पाऊल पुढेच आहे. खेळकर, दंगेखोर, खट्याळ, कल्पक आणि मनस्वी!! आजूबाजूच्या जगाचे तरल निरीक्षण तिच्या चित्रांत पाहायला मिळते. पण त्याविषयी बोलायची तिची तयारी नसते बरं का! तुम्ही तिला त्या चित्राबद्दल विचारलंत की ती तुमच्या हातून सटकून पसार होते. परवा ह्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला.

दरवळ!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 31/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कॉम्प्युटरमधला `ई-मेल'चा `इनबॉक्स' भरून वाहू लागला, की, नको असलेले काही ई-मेल `डिलीट' करून टाकावे लागतात. मग ते पुरते पुसले जातात. पुन्हा उघडू म्हटलं, तरी सापडत नाहीत. कालांतराने, मेलबॉक्स पुन्हा वाहू लागतो, आणि पुन्हा तेच करावं लागतं... नको असलेले मेल पुसून टाकणं ! जेव्हढं हवं, तेव्हढंच मेमरीमध्ये `सेव्ह' करून ठेवायची सोय कॉम्प्युटरमध्ये करताना, माणसाचा मेंदूच विज्ञानाच्या डोळ्यासमोर असावा... पण मेंदूची बातच अलग असते... तिथल्या `आठवणींच्या कप्प्या'तली, कुठलीच गोष्ट `डिलीट' होत नाही, आणि पुसलीही जात नाही...

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 30/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय.... अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली. एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं.... नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी!

लाभले दुर्भाग्य आम्हास...

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 30/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.'' ...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून! वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च!

स्वर्गसुख

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 26/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
व.पुं.नी “पार्टनर” मधे स्वर्गसुखाची व्याख्या इतकी सुरेख सांगितलीये ना…!! “ज्यावेळी, जिथे, जे हवं… ते, त्या वेळी….. तिथे मिळणं म्हणजे “स्वर्ग“! पण त्यावेळी ते न मिळणं म्हणजे “नरक” असेल का ? नाही…. कदाचित ही व्याख्या फार हार्श होईल नरकाची. हवी ती गोष्ट न मिळणं म्हणजे अगदीच काही नरक नाही. कदाचित त्याला “समझोता ” असं थोडंसं बरं नाव देता येईल. त्या वेळेशी मनाने केलेला समझोता. असे समझोते बरेच करावे लागतात आयुष्यात. पण मनासारखी नोकरी, बायको, घर, संतती, संपत्ती…… सगळं काही मिळणं म्हणजे स्वर्ग नक्कीच नाही. कितीतरी अशा गोष्टी असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत. त्या फक्त त्या वेळी हव्या असतात.

पहिलं प्रेमपत्र

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 24/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं..... मनात खूप धाकधूक वाटत होती.... छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची! काय करणार?

उन्हाळ्याची तयारी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 22/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते. म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्‍या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे. कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!

सांगू काय, सांगू काय?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
( "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील विडंबनात्मक कवीता वाचावी. वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि‌. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल. दैनंदिन जीवनातील, राजकारणातील विविध ठिकाणी विरोधाभास दिसतो, त्यावर उपहासात्मक कविता मी लिहीली आहे.) एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ? सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? एवढी छोटी, एवढी छोटी की, रॅंपवर चालतांना गळून जाय.... सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
काव्यरस

दत्तकविधान-१०

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 13/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वी त्याला कशी स्वीकारणार, हा आमच्यापुढे मोठा प्रश्‍न होता. तिची घरातली एकट्याची सद्दी संपेल, तिच्या कौतुकात, लाडांत वाटेकरी आल्यानं ती बिथरेल, टोकाची प्रतिक्रिया देईल अशी आम्हाला शंका होती. तिनं हा प्रश्‍न तिच्या निरागसपणानं आणि मनस्वितेनं चुटकीसरशी सोडवून टाकला आणि आम्हाला तोंडघशी पाडलं. आपल्याला भाऊ मिळाल्याचा केवढा आनंद झाला होता तिला! "त्याला आणायला आपण हॉस्पिटलमध्ये कसं गेलो नाही, आईला तिथे का ठेवावं लागलं नाही,' वगैरे कुठलेही प्रश्‍न तिला पडले नाहीत. किंबहुना, पडले असले, तरी तिला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. तिला खेळायला एक हक्काचं बाळ मिळालं होतं, बस्स!