Skip to main content

मुक्तक

माझ्या कवितेची शाई

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 16/03/2017 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेची शाई आहे अजब मिश्रण भस्म अधुऱ्या स्वप्नांचे त्यात अश्रुंचे शिंपण कधी माझ्या कवितेचा शब्द निनादे आभाळी कधी धरती विंधतो कधी गुंजतो पाताळी कवितेची ओळ माझ्या कधी फुलांनी वाकते कधी बोलता बोलता गहनाशी झोंबी घेते माझ्या कवितेत जेव्हा फुंकीन मी प्राण नवा तेव्हा तुम्हा रसिकांचा पाठीवरी हात हवा
काव्यरस

नवीन नियमावली

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/03/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रशासनातर्फे नवीन नियमावली जारी करण्यात येत आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी. काही अडचण, शंका असल्यास या धाग्यावर चर्चा करावी. बदलत्या काळात टिकून रहायचं असेल, प्रगती साधायची असेल तर बदल आवश्यक असतात. आजकाल सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, जुन्या कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. म्हणून आपणहीआपल्या जुनाट कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करत आहोत. १. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मरासिम

लेखक मिडास यांनी सोमवार, 13/03/2017 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला. कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे.

तुम्हाला कुणाचा हेवा वाटतो का?

लेखक इना यांनी शुक्रवार, 10/03/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हेवा, मत्सर, असूया. च्यायला आम्ही इतकं घासून पण उपयोग नाही, कुणालाही पाठवतात साले ऑनसाईट किंवा त्याला कसं प्रमोशन मिळालं माझ्यानंतर येऊन!? मला सगळ्या गोष्टी मिळवायला कष्ट करावंच लागतं! पण त्याला किंवा तिला किती सहज मिळते प्रत्येक गोष्ट! घर, गाडी वर्षा दोन वर्षात लगेच फॉरेनच्या ट्रिप! इथं मी साधं मुळशी नाहीतर खडकवासल्याला जाऊया म्हणलं तरी नाक मुरडतात! माझ्या बहुतेक हातालाच चव नाही, तिनं काहीही कसंही केलं तरी ते चांगलंच होतं. मी मोठी/मोठा असून मला घरात कुणी विचारत नाही! सगळे निर्णय लहान भाऊ/बहीण/जावेच्या हातात! कसलं भारी सरप्राईज गिफ्ट दिलं तिच्या नवऱ्यानं/ त्याच्या बायकोनं!

आदिप्रश्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
धगधगे कोटी सूर्यांचे स्थंडिल अहर्निश जेथे का अनादि ब्रह्माण्डाचे लघुरूप जन्मते तेथे ? अणुगर्भ कोरुनी बघता जी अवघड कोडी सुटती त्या पल्याड पाहू जाता का शून्य येतसे हाती ? का अंत असे ज्ञेयाला की ज्ञान तोकडे ठरते की सीमा अज्ञेयाची अज्ञात प्रदेशी वसते ?
काव्यरस

आवाज: स्त्रीमुक्तीचा

लेखक सचिन तालकोकुलवार यांनी बुधवार, 08/03/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावे लागत आहे. हि अत्यंत खेदाची बाब आहे. स्त्रियांच्या या स्तिथीमागे हजारो वर्षांपासूनची गुलामगिरीची परंपरा आहे. खरे तर जेव्हा महिलांना आर्थिक व्यवहारातून वगळण्यात आले व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नाकारण्यात आले तेव्हापासून महिला पुरुषांवर अवलंबित ठेवून पुरुषसत्तेचे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले व निर्णय घेण्याचे हक्क पुरुषांना मिळाला.

भिल्ल भारत: शेवटचा भाग

लेखक मिडास यांनी सोमवार, 06/03/2017 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे.

मी ....अब्जशीर्ष

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 03/03/2017 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी ....अब्जशीर्ष मानवता मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात मीच गुणगुणते बदलांची बीजाक्षरे जी दुमदुमतात महामंत्र होऊन आसमंतात ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते भुगा होण्याआधी लोळण घेतात मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा कैकदा मरून प्रतिकूलांना पुरून मीच उरते पुनःपुन्हा अब्जशीर्ष. अजिंक्य. रंग,वंश,लिंग या पलीकडची म्हणून मला हिणवू नकोस दिव्यत्वाच्या शोधात स्वतःला शिणवू नकोस.
काव्यरस

#हॅशटॅग#

लेखक चिनार यांनी मंगळवार, 28/02/2017 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
"भाऊ..तुले एक विचारू का?" "विचार ना बे." "तू फेसबुक वर हायस नं?" "हो मंग..माया पोस्टा नं फोटो दिसत नाय का तुले?" "अन टिवटर वर?" "टिवटर नाय बे ट्विटर." "हा तेच ते" "बरं मंग?' "ते फेसबुक नं टिवटरवर, दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काय असतेत?" "काय?" "अरं ते असते ना..दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काढून त्याच्यासमोर लिहितेत सारे?" "काय बोलून ऱ्हायला बे?" हातावर आकृती काढून…..# "हे पाय असं असते ते?" "हा...ह्याला हॅशटॅग म्हन्तेत?" "काय म्हन्तेत?" "हॅशटॅग..हॅशटॅग." "म्हंजे काय पन?" "मले काय मालूम बे?" "अबे मंग त्वां कायले लिहितं?

भिल्ल भारत

लेखक मिडास यांनी सोमवार, 27/02/2017 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.