Skip to main content

कविता

(रगेल पावट्याचे मनोगत)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 16/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

राखी.

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 15/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला, काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा. रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा.. आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा.. "तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी, ती राखी!

कविता: बिबट्याचे मनोगत

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 14/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस भरपूर पर्यटनाची मज नाही सोस माणसा सोबत संघर्षात नाही मौज भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही नाशिक पाहण्यात तर मला रस नाही माणसं भेटण्याचा मला आनंद नाही हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा वनक्षेत्र खालावले साखळी तुटली आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल शोधतो स्वतःला, जिथे उत्साह सापडेल शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे.
काव्यरस

३३ कोटींची मुक्ती

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 13/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांबरोबर हॉटेलात मनसोक्त हादडंपट्टी करताना, रस्त्यात उभी अतिशय कृश अशी सवत्स धेनु, आमच्याकडे, आमच्या खाण्याकडे बघताना दिसली.

वाळूचे विरहगीत

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 07/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
।। वाळूचे विरहगीत ।। उन्हात चमके साज रुपेरी, खेचत नेई ओढ ना टळे। पसरुनी चमचम धरतीवरती, पाहुनी रात्री चांदही चळे। उधाण घेऊनी नायक येई, भिजवुनी जाई अंगही बळे। राग न यावा यात तिलाही, सरसर लाटेमागुनी पळे । अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी, निरोपांचे शंखशिंपले । जीव मोहरे येता भरती, युगायुगांचा नवस फळे। सुना किनारा होता ओहोटी, मुकी वेदना गात्रं छळे । सोडुनी जाई घाव जिव्हारी, त्या लाटांना हे न कळे । वाहत येई गाळ सुगंधी, ज्या वासाचे तिस लळे । खेळ मांडला पृथ्वीवरती, खेळणी वाळू सागर सगळे । रित्या नद्या होत तरीही, गोड होई खारे सगळे । अजाण सागर याच रहस्यी, वाळूमधुनी विरह ओघळे । पाय आपले जात रु

सुंदरसा तो पाऊस यावा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 07/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदरसा तो पाऊस यावा -------------------------- सुंदरसा तो पाऊस यावा भिजून जावी सारी धरती या मातीचा दरवळ व्हावा इंद्रधनु उमटावे वरती अशा धुंद त्या वातावरणी तुझी नि माझी भेट व्हावी त्या समयाची होऊन करणी नजर हृद्गते थेट व्हावी गुपित काही नच उरावे पण ते दोघांनाच कळावे मिटवून मग सारे पुरावे जगापासून दूर पळावे ----------------------- बिपीन

चार थेंब

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
चार थेंबांत संपेल मग पाऊस तो काय, चार शब्दांत मावेल, मग माणसाचं मन ते काय, संपलाही असता तो, जर प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं, मावलेही असते ते, जर प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं, पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ? -अभिजीत
काव्यरस

मर्लिन मन्रो....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 05/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire ५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही...
काव्यरस

श्रावण आला गं सखे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 04/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आला गं सखे ---------------------------- श्रावण आला गं सखे माहेराची सय आली हाती जरी किती कामं त्या साऱ्याला लय आली परसात एक आड अंगणात किती झाडं त्या झोक्यांची याद आली प्रेमळ गं भाऊराया वहिनी करिते माया भेटायची इच्छा झाली देवासमान गं पिता देवासमान गं माता पानं गळायला आली आताच जायला हवं त्यांना पहायला हवं चिंता इथे भय घाली ------------------------ बिपीन

कृष्णछबी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 03/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णास एकदा कृष्ण सापडेना, दर्पणी पाहता छबी दिसेना, प्रकाशी चालता सावली दिसेना, उरला फक्त शरीराचा भास, मनाचाही थांग लागेना, "पाहिले का मज कोणी?" पुसे असा तो भक्तांना, "देवा, नित नवी लीला आपली, आम्हांस काही कळेना." बसला मग ध्यानास तो, वृत्तींचा लय काही होईना, तिन्ही लोकी निरोप धाडियेलें, देव गण गंधर्वांसही काही समजेना, एके पहाटे दिसे स्वप्नात तो स्वतःला, " तुझा तुझ्यावर हक्क नसे, हे तुला कसे उमजेना? तुझे अस्तित्व भक्तांच्या कणांकणांत, तिकडे मीरा न उरली तिच्यात, इकडे तुला तूच गमेना, मीरा होई कृष्णमय, इथे तुझ्यातला तू मावेना, भक्तांमध्ये देव हरतो,जिरतो, उरतो एक संपूर्ण भक्त, तिथेच पूर्तता तुझ्य