Skip to main content

कविता

ते दिवस आता कुठे

लेखक अरूण म्हात्रे यांनी बुधवार, 03/08/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी ही सावली भेटायची... त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची पावसाला पेच होता,ह्या सरी वळवू कुठे चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची कैक वाटा चाललो,पण विसरलो पोचायचे नेमक्या वळणातूनी ही पावले परतायची गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

संततधार

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/08/2011 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात
काव्यरस

अर्धवट राहिलेलं प्रेम

लेखक प्रिया ब यांनी रविवार, 31/07/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावना तुझ्या पर्यंत कधी पोचल्याच नाहीत न व्यक्त केलेलं ते प्रेम तुला कधी जाणवलच नाही अस्पष्ट मारलेली तुला हाक कधी ऐकू आलीच नाही मनाने केलेला स्पर्श तुला कधी भासलाच नाही मैत्रीच्या पुढे जावं अशी मनोमन प्रार्थना करत होते पण तुला दुखवायचं नव्हतं म्हणून मागे सरत होते तुला सांगण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न मी केले मला नीट सांगता आलं नाही आणि तुलाही कधी नाही हे कळले तुझ्या जीवनात येईल कुणीतरी नवी नसेल माझ्या मनात तिच्याबद्दल अढी नाही करणार मी तिचा हेवा पण एक सामान्य मुलगी म्हणून एवढंच म्हणेन "हे सगळं स्वीकार करायची शक्ती दे मला देवा!!!" भवतालचं सगळंच वातावरण उदास वाटत आहे आपले एकत्र असलेले

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/07/2011 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ|| सकाळीच उठले मी अजाणतेपणी काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी पोट नाही भरले जरी न्याहरी केली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१|| पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी भरलेलं ताट आले समोर दुपारी किती खावे किती नको झाले त्यावेळी कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२|| कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला संध्यासमय जवळ हा आला पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३|| - पाषाणभेद (दगडफो
काव्यरस

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस

घर पहावं बांधून

लेखक प्रिया ब यांनी शुक्रवार, 29/07/2011 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
सहा आकडी वार्षिक पगार पाहून पालक भलतेच खूष झाले होते.. "द्रुष्ट काढा हो पोरची" असे आजीचे उद्गार आले होते. "मोठ्या शहरात दादा आपला व्हावा settle हेच होतं माझ्या मनात आता मस्त घर घेतलं की येतील मुलिंचे profiles आपल्या दारात" 'घर शोधो' मोहिम आमची जोरात सुरू झाली. 'घर पहावं बांधून' ह्या म्हणीची प्रचिती तेव्हा मला आली. "Sir swimming pool, club house, Security, Capsule lift एकदम कसं ऐटीत IT, त्या मानाने rate नहिये फार" त्याच्या downpayment ची figure बघूनच अंगात कापरं भरलं आणि पडलो होतो गार.. "ना मी करोडपती ना कुठला संस्थानिक...

आयुष्य कडेवर घेतो

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 29/07/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य कडेवर घेतो झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो गारठल्या पंखामधी, आशा जागवतो सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो अभयता पेरताना, रुजलेली फुलताना फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो                                

हातामधी घे तू जरा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/07/2011 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हातामधी घे तू जरा
हातामधी घे तू जरा गरमागरम तेल खालून वरून अंगाला माझ्या चोळ ||धृ|| कामाला मी निघतो डबा घेवून सकाळी तवाच सुरू होते ग माझी पहीली पाळी उभं राहून लेथमशीन मी चालवतो हातोड्यानं लोखंडावर दणके मी देतो कष्टाचं काम आहे हे सारं; नाही काही खायची भेळ ||१|| दुसर्‍या पाळीनं ग माझी लयी व्हती दैना उन्हातान्हाचा दिस हा जाता जाईना कामगाराचं जीनं हाय लयी बेकार राब राब राबवूनी घेई सुपरवायझर त्याच्यासंग चाले आमचा उंदरामांजराचा खेळ ||२|| तिसरी पाळी तर लयीच महाग आसती मी तिकडे कामात अन तू झोपून र्‍हाती तळमळ तळ

मैत्री

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 28/07/2011 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जन्मापासूनच ठरलेली असतात असंख्य नाती ही तुझी मावशी, हे तुझे काका, ही आजी, ती मामी .. पण पुढे आपण होऊन एक नातं निर्माण करतो जेव्हा घराच्या चौकटीतून बाहेर पडतो अनेक जण आपल्या परिचयात येतात, बरेच जण आपल्याला भेटतात , त्यातले पुशकळसे ओळखीचे राहतात आणि काहीच जीवाभावाचे होतात हे नातं असतं 'मैत्रीचं' - निरपेक्ष, निखळ अशी सख्या नात्यां इतकीच वाटते ती हवी हवीशी न सांगता आपल्या सुख दु:खात साथ देणारे अडी अडचणीत आपल्या पाठीशी उभे राहणारे हक्काने आपल्या चुकांवर रागावणारे आपल्या यशात आनंदाने सहभागी होणारे ... ह्यात कधीच नसतो द्वेश, ना दुस्वास, ना लोभ असतं फक्त प्रेम, आपलेपणा आणि एकमेका

आई बाबा

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 28/07/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा .. शाळेत पैसे द्यायचे आहेत .. जाणार आहे दोन दिवस सहल!!" "अरे वा... देतो नक्की पर्वा .. खूप कर रे धमाल.. " "आणि मला promise केली होती ना बाहुली आणि भातुकली" "म्हणजे काय!! घेणारच आहे गं छ्कुली .." "झकास पास झाला की घेणार आहे दादाला Hero Honda CD आधी पासूनच ठरवलं ... होत आहे mature एक जुनी FD .. आणि पंचविसाव्या लग्नाच्या वाढदिवशी घेऊया तुमच्या आईला साखळी सोन्याची" "छे!!