Skip to main content

कविता

उणीव...

लेखक अभिषेक९ यांनी मंगळवार, 26/07/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
कायम touch मध्ये असूनही संवाद कुठे तरी हरवलेला आहे... कायम कट्ट्यावर log -in असूनही विषयाचा नेहमीचं वानवा आहे.. कायम available असूनही जवळ कोणीच नाही... सारखे profile visit करूनही सारे अनभिज्ञच आहे... टेक-क्रांती होऊनही मानवी उत्क्रांती अजूनही अनुत्तरीतच आहे...

क्रांतितै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 26/07/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

दोन कविता

लेखक अरूण म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मज ठाऊक नव्हते दार कोणते तुझ्या घराचे उन्हे वेचण्यासाठी.... मी खूप श्रमाने दिवस फोडूनी असाच येतो लटकत भटकत उन्ह होउनी तुझ्या घराच्या काठी...... ________________________________ तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी की स्वतःबरोबर आकाश रितं करणारा हा पाऊस सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय ! काहीच आठवत नाही--- ----इतकंच लख्ख जाणवतं की कुठूनतरी वीज कोसळली नि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं ...... (या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत.

आसूड

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 23/07/2011 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाही भय लाज सारे सत्तातूर देशाचा विचार कवडीमोल लोभालोभ सारा सत्तेचिये पायी आपापल्या सोयी लाघव भावे आज वाटे त्यांसी ब्रम्हांड ठेंगणे टेकीता ढुंगणे खुर्चीवरी सुखाचिया राशी त्यांच्यांच पायाशी मग जनतेशी काय पुसावे? मतीमंद झाला आज बुद्धीवंत नाही बलवंत कोणीच येथे उठ माझ्या लेका आता नको चुका नाहीतर भिका मागशील हातामध्ये घेरे सत्तेचा आसुड भडव्यांच्या ओढ पाठीवरी हिच माझी इच्छा पुरी कर बाबा देशाचा या ताबा तुझे हाती ..!!!

दोन कविता ... श्री. महानोर

लेखक शरद यांनी शनिवार, 23/07/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन कविता .. श्री. महानोर. आज श्री महानोर यांच्या दोन कविता एकदम घेत आहे. एक कवी म्हणून ही निवड नव्हे तर एकच कवी दोन निरनिराळ्या व्यथा कशा उलगडवून सांगतो ते पहाण्याकरिता. पहिली व्यथा आहे एका खेडेगावातल्या मध्यमवयीन स्त्रीची. दुसरी आहे वृद्ध आईवडिलांची; ते खेडेगावातील असतील वा शहरातील, भारतातील वा अन्य कुठल्याही देशातील. या दृष्टीने दुसरी कविता/व्यथा जास्त व्यापक, जागतीक आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ते खरे आहे कां ? ते तर बघूच.

शिल्लकेला जीव जर का आणखी

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 21/07/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्लकेला जीव जर का आणखी - - - - - शिल्लकेला जीव जर का आणखी ढंग जगण्याचा ठरवला आणखी - उष्णता नरकामध्ये ती काय-शी जाळ दुखर्‍या अंतरीचा आणखी - रागरुसवे खूप त्यांचे पाहिले आज त्यावर कळस झाला आणखी - का निरोप्या पत्र देता निरखतो? तोंडचा संदेश का बा आणखी?

सुख

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 21/07/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
विचारलच कधी कुणाला "कशात वाटतं सुख?" वेग वेगळ्या वयात बदल्ली गेलेली सुखाची व्याख्या अशीच असतील... जेव्हा पाहुणे आल्यामुळे टाळला जातो आईचा मार गणितात पैकीच्या पैकी मिळाल्याबद्दल होतात बाबांकडून लाड जेव्हा तापामुळे मारता येते शाळेला बुट्टी थंड हवेच्या ठिकाणी जातो, लागते उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा आईला घेतो पहिल्या पगाराची सुंदर साडी आणि बाबांना सांगतो शिकायला चार चाकी गाडी जेव्हा मिळतो onsite chance,होतं कामाचं appreciation होणार्या जोडीदारा बरोबर बघू लागतो भविष्याची स्वप्न आपलं छोटसं नवीन घर सजवण्यात दोन्ही कडील नाती जपण्यात मुलांना चांगलं शिकवून त्यांना वाढवण्यात एक दिवस तरी मैत्रीणींबरोबर भ

किती सजवू मी माझं मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/07/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला मन रिंगण घाली तूला ||धृ|| आरसा समोर उभी राहून वेणी घातली गजरा माळून फुले सुगंधी डोई शोभती भुलली मी त्या गंधाला ||१|| नयनांची दोन दले हालती हाती कांकणे किणकिणती कर्णभुषणे शोभती कानी रत्नमाळा हलती गळा ||२|| सुवर्णकांचन सुगंधदर्वळ आनंदाचे फुलले परिमळ उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी पांघरले शुभ्र शरीरा ||३|| शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले मजसमीप हर्षाचे वारे वाहीले लवकरी येवूनी मिठीत घेवून साजरे कर धुंद क्षणांना ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस