कविता
उणीव...
कायम touch मध्ये असूनही
संवाद कुठे तरी हरवलेला आहे...
कायम कट्ट्यावर log -in असूनही
विषयाचा नेहमीचं वानवा आहे..
कायम available असूनही
जवळ कोणीच नाही...
सारखे profile visit करूनही
सारे अनभिज्ञच आहे...
टेक-क्रांती होऊनही
मानवी उत्क्रांती अजूनही अनुत्तरीतच आहे...
लेखनविषय:
याद्या
1078
क्रांतितै चे अभिनंदन
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे.
दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.
याद्या
11327
दोन कविता
मज ठाऊक नव्हते
दार कोणते
तुझ्या घराचे
उन्हे वेचण्यासाठी....
मी खूप श्रमाने
दिवस फोडूनी
असाच येतो
लटकत भटकत
उन्ह होउनी
तुझ्या घराच्या काठी......
________________________________
तू पहिल्यांदा भेटलीस
ते दिवसच पावसाळी
की स्वतःबरोबर
आकाश रितं करणारा
हा पाऊस सोबत घेऊन यायची
तुझी जुनी सवय !
काहीच आठवत नाही---
----इतकंच लख्ख जाणवतं
की
कुठूनतरी वीज कोसळली
नि
पागोळ्यांबरोबर खेळण्याचं
माझं वय
जळून गेलं ......
(या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत.
लेखनविषय:
याद्या
1600
आसूड
नाही भय लाज
सारे सत्तातूर
देशाचा विचार
कवडीमोल
लोभालोभ सारा
सत्तेचिये पायी
आपापल्या सोयी
लाघव भावे
आज वाटे त्यांसी
ब्रम्हांड ठेंगणे
टेकीता ढुंगणे
खुर्चीवरी
सुखाचिया राशी
त्यांच्यांच पायाशी
मग जनतेशी
काय पुसावे?
मतीमंद झाला
आज बुद्धीवंत
नाही बलवंत
कोणीच येथे
उठ माझ्या लेका
आता नको चुका
नाहीतर भिका
मागशील
हातामध्ये घेरे
सत्तेचा आसुड
भडव्यांच्या ओढ
पाठीवरी
हिच माझी इच्छा
पुरी कर बाबा
देशाचा या ताबा
तुझे हाती ..!!!
लेखनविषय:
याद्या
1582
दोन कविता ... श्री. महानोर
दोन कविता .. श्री. महानोर.
आज श्री महानोर यांच्या दोन कविता एकदम घेत आहे. एक कवी म्हणून ही निवड नव्हे तर एकच कवी दोन निरनिराळ्या व्यथा कशा उलगडवून सांगतो ते पहाण्याकरिता. पहिली व्यथा आहे एका खेडेगावातल्या मध्यमवयीन स्त्रीची. दुसरी आहे वृद्ध आईवडिलांची; ते खेडेगावातील असतील वा शहरातील, भारतातील वा अन्य कुठल्याही देशातील. या दृष्टीने दुसरी कविता/व्यथा जास्त व्यापक, जागतीक आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ते खरे आहे कां ? ते तर बघूच.
याद्या
2158
सुख
विचारलच कधी कुणाला "कशात वाटतं सुख?"
वेग वेगळ्या वयात बदल्ली गेलेली सुखाची व्याख्या अशीच असतील...
जेव्हा पाहुणे आल्यामुळे टाळला जातो आईचा मार
गणितात पैकीच्या पैकी मिळाल्याबद्दल होतात बाबांकडून लाड
जेव्हा तापामुळे मारता येते शाळेला बुट्टी
थंड हवेच्या ठिकाणी जातो, लागते उन्हाळ्याची सुट्टी
जेव्हा आईला घेतो पहिल्या पगाराची सुंदर साडी
आणि बाबांना सांगतो शिकायला चार चाकी गाडी
जेव्हा मिळतो onsite chance,होतं कामाचं appreciation
होणार्या जोडीदारा बरोबर बघू लागतो भविष्याची स्वप्न
आपलं छोटसं नवीन घर सजवण्यात
दोन्ही कडील नाती जपण्यात
मुलांना चांगलं शिकवून त्यांना वाढवण्यात
एक दिवस तरी मैत्रीणींबरोबर भ
लेखनविषय:
याद्या
1482
किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला
मन रिंगण घाली तूला ||धृ||
आरसा समोर उभी राहून
वेणी घातली गजरा माळून
फुले सुगंधी डोई शोभती
भुलली मी त्या गंधाला ||१||
नयनांची दोन दले हालती
हाती कांकणे किणकिणती
कर्णभुषणे शोभती कानी
रत्नमाळा हलती गळा ||२||
सुवर्णकांचन सुगंधदर्वळ
आनंदाचे फुलले परिमळ
उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी
पांघरले शुभ्र शरीरा ||३||
शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले
मजसमीप हर्षाचे वारे वाहीले
लवकरी येवूनी मिठीत घेवून
साजरे कर धुंद क्षणांना ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
लेखनविषय:
याद्या
2185
काव्यरस
मिसळपाव