Skip to main content

कविता

एक चिऊ, गोजिरवाणी..

लेखक वेणू यांनी शनिवार, 10/08/2013 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुळशीपाशी, लावता पणती एक, अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल हातात बाहुली आणि जाईचे फूल... अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला, "पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?" तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी, "अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी, अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं, तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं" ना कळते तिजला, परि हलविते मान, बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण, ही तिला भरविते काय पहा हे ध्यान, म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!" बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी, तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी.. मग पावडर खोटे, तिट टिळाही देते ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते म्ह

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 10/08/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती,नजरेत कुणा विरक्ती, नजरेत कुणा मोका,नजरेत कुणा धोका , नजरेत कुणा वासना ,नजरेत कुणा कामना , नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती, नजरेत कुणा संस्कार ,नजरेत कुणा दुत्कार , नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत दिसे व्यथा ,नजरेत दिसे कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान
काव्यरस

शिमगा

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 10/08/2013 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे आवेग भावनांचा माया उतून वाहे अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा वारा थके जरासा अंगी उलाल लाही श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला आतंक सोसलेला शिमगा सुभान देही ………………अज्ञात
काव्यरस

घाबरगुंडी

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 08/08/2013 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला?
काव्यरस

शत'शब्द शोधिताना...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 07/08/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्द कथा हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे?

काळा-गोरा

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 06/08/2013 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
काळा-गोरा गोऱ्या रंगाचे फार कौतुक; काळा रंग तितकासा कधी कुणाला आवडत नाही, या आवड-निवडीला कंटाळून; वैतागून काळा रंग गोऱ्या रंगाला काय म्हणतो .......

सद्गदीत

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 05/08/2013 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच खुणावे मज कोणी अंतरी सुरस श्रावण गाणी मन सुप्त कहाणी एकेरी व्यापल्या साचल्या आठवणी प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी आकार निराकारात खुळा भिरभिर घरभर ही चाचपणी आनंद कधी विरहात भरे सद्गदीत द्वय हृदय पापणी ……………… अज्ञात
काव्यरस

या साध्या घरात माझ्या

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 05/08/2013 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
या घरात माझ्या, काही न आलिशान साधेच खोपटाचे, सारवलेले छान ll १ ll नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll नाहीत भिंती भक्कम, घुमणे वाऱ्याचे चाले निवारा नसता किडा-मुंगी, त्यास आपले समजलेले ll ३ ll पावसाळ्यात बरसुनी तो, घरास नाहवून जातो उन्हाळ्यात तोही घरास, असा तावून सुलाखून जातो ll ४ ll बैठेच स्वयंपाक चाले, नाही सोयी नव्या पूर्ण चुलीवर भाजलेले, आगळेच अन्न ब्रह्मपूर्ण ll ५ ll नाहीत विजेऱ्या दिवे, रात्रीस किर्र अंधार असतो देवाजवळ मिणमिणणारा, हर कोपरा उजाळत असतो ll ६ ll नाही फार बगीचा, नाही फार वनश्री ती मोजकीच फुले अन्, तुळस वृंदावनी ती

मरण झाले स्वस्त

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 04/08/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥ महागाईचा आलेख किती वर गेला कसे जगावे देवा सांग तुच मला गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥ कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥ बाँब स्फोट घातपात येथे घडतात निष्पाप लोक त्यात बळी पडतात काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥ दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥ पुर आणि भुकंपाने होई नुक्सान रिलीफ फंडामध्ये जमा करतात धन टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...॥५॥ ................बी.डी.वायळ

पाऊस एक चिंतन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 03/08/2013 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.
काव्यरस