Skip to main content

कविता

प्रवाही

लेखक आतिवास यांनी शनिवार, 04/10/2014 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचा रेटा सोसून काही मागे उभेच आहे; पाचोळ्यातून हलके हलके जीवनरसही वहात आहे; जे झाले, ते गेले आता, मागे वळून पाहता काही नाही; तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही!

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 01/10/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….
काव्यरस

भय इथले संपत नाही (दोन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 01/10/2014 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय.

भय इथले संपत नाही (एक)

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 30/09/2014 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28992 ------------------ कवितेतून नक्की काय म्हणायचंय ते ग्रेस स्वत: कधीही सांगणार नाही. तो फक्त जीवाला सैरभैर करणारी त्याची कविता तुमच्यासमोर ठेवेल आणि प्रत्येक वेळी ती, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी असेल. हरेक रसिकाला ती कवितेत, स्वत:चा अर्थ शोधायला भाग पाडेल. आणि ग्रेसच्या कवितेचं वेगळेपण हेच, की समजत नाही म्हणून तुम्ही तिला अंतर देऊ शकणार नाही. एखाद्या विलोभनीय आणि दुष्प्राप्य कामिनीसारखी ती तुम्हाला सतत घेरुन राहील.

AN ODE TO मिसळपाव ! प्रथम पुष्प

लेखक मारवा यांनी सोमवार, 29/09/2014 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळप्रेमींनो !मनोगतींनो ! उपक्रमींनो ! वातानुकुलीत अक्षरींनो ! सर्वसंस्थळसंचारी आंतरजालीय फ़ुलपाखरांनो ! साक्षेपी सात्विक सेन्सॉरी कर्तरीकर्म कुशल संपादकांनो ! किंचीत पक्षपाती आयडीवलयांकीत-स्तिमीत संपादकांनो ! खरया खुरया खोट्या नाट्या भल्या बुरया आयडींनो त्यांच्या डुआयडींनो ! त्यामागील दुर्देवी देवराई निवासींनो ! माहीती जमवुन जमवुन घोळुन रंगवुन माहीतीच्या महामार्गावर माहीतीचा उच्छाद मांडणारया माहीतगारांनो ! स्व-रचित ललित मुग्ध “पुल”कीत गोड गोड लयीत “ललित” लिहत लिहत लेखणी लाल करणारया ललित लेखकांनो!
काव्यरस

दसरा

लेखक लाडू यांनी सोमवार, 29/09/2014 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल राती आकाशात, चांद दिसला हासरा कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा, आला दसरा दसरा परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्‍याचा मान, देती सोन्याचेहि पान! नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान! येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा, सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा! आला दसरा दसरा
काव्यरस

कुणी जाल का सांगाल का

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 27/09/2014 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार.

आयुष्य म्हणजे....

लेखक चेतन677 यांनी शुक्रवार, 19/09/2014 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
"आयुष्य म्हणजे काय असते, आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष... जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा, आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात, काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजण शेवटपर्यंत साथ देतात... आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 18/09/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा
काव्यरस

तीनों बन्दर बापू के (रसग्रहण)

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/09/2014 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
बापू के भी ताऊ निकले तीनों बन्दर बापू के! सरल सूत्र उलझाऊ निकले तीनों बन्दर बापू के! सचमुच जीवनदानी निकले तीनों बन्दर बापू के! ग्यानी निकले, ध्यानी निकले तीनों बन्दर बापू के! जल-थल-गगन-बिहारी निकले तीनों बन्दर बापू के! लीला के गिरधारी निकले तीनों बन्दर बापू के! सर्वोदय के नटवरलाल फैला दुनिया भर में जाल अभी जियेंगे ये सौ साल ढाई घर घोड़े की चाल मत पूछो तुम इनका हाल सर्वोदय के नटवरलाल लम्बी उमर मिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! दिल की कली खिली है, ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! बूढ़े हैं फिर भी जवान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर बापू के! परम चतुर हैं, अति सुजान हैं ख़ुश हैं तीनों बन्दर