Skip to main content

कविता

वात्रटिका- अभियान स्वच्छता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 08/11/2014 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला आधी शुभ्र वस्त्र धारण करावे एक डिझाईनर झाडू आणावे मग मिडीयाला बोलवावे स्मायली फोटो चमकावे. रस्त्यावरी कचरा पसरविला तोची झाडून स्वच्छ केला असा स्वच्छता अभियानाचा नेत्यांनी बोऱ्या वाजविला.

अजुनी बसून आहे

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 07/11/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट..
काव्यरस

एक उदास कंटाळवाना चेहरा

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 07/11/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पाने गळू लागलीत झाडांची हवा वाहत असते नको तितक्या वेगाने थरथरत राहतात त्याच्या खिडकीवरचे पडदे दरवाजा बंद असला तरी हवा टकटकत बसते दारावर एक उदास वातावरण झपाटून टाकते मनाला बाहेर प्रकाश असून अंधारून गेलेला दिवसा देखील कानांना येत राहतो रातकिड्यांचा आवाज उगाचच एखादं पाखरू वळचणीला एखादं पान गळणा-या फांदीवर घट्ट बसून रुतलेलं काळ्या काळ्या फांदीच्या बोटाना धरून बसलेलं आवळून टाकलाय गळा आपल्या निष्टुर हातानी तरीही तो स्वताला ढकलीत रहातो पर्णहीन झाडाची पायवाट अंगावर शिरशिरी नि नाक झडून गेल्याचा भास तळे शुभ्र एक उदास तवंग त्याच्या अंगावर मृत होताना ताठरून जाते जसे एक

दर्शनता!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/11/2014 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही, कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही! काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे! भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!! काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी, कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी. धडा कधी हा संपत नाही कैसे
काव्यरस

बरळप्रहरी..

लेखक गवि यांनी बुधवार, 05/11/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/11/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा

चांदणी

लेखक सुर्या गार्डी यांनी मंगळवार, 04/11/2014 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... बघेल सारं जग आपल्याकडे याची तमा कशाला बाळगायची... चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची... चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची... तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची... कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
काव्यरस

आजोबा...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 03/11/2014 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजोबा जर कागद असते तर त्यानं त्यांची नाव केली असती आजोबा जर डोंगर असते तर त्याने खोल उडी घेतली असती आजोबा अंगणात उभे असले की त्याला चक्क झाड वाटतात हाताच्या फांदीला लोंबकाळलं की आजोबा चक्क झोका होतात झोका घेताना तो कधीच घाबरत नाही डोळे मिचकावून बघितले की भीती कसली वाटत नाही …. आजोबा काही काम करताना करतो त्यांचं लक्ष विचलित घुसळतो अंग नि अंग हलकेच घुसतो मिठीत .... आजोबांना वाटून जाते तो .म्हणजे .. मी आहे ...? का … मी म्हणजे…. तो आहे .....?? मग फुटून जातो मायेचा पाझर आजोबांच्या काळजातून .... आणि आजोबा बघू लागतात मायेच्या पाझरणा-या झ-याला आपल्याच रक्तातून …!! प्रकाश

गजरा

लेखक सुर्या गार्डी यांनी रविवार, 02/11/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाजूक रेशीमगाठीनी फुला फुलां ना गुंफिले होते तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते ।। ठाऊक त्यांना आयुष्य त्यांचे क्षण भंगूर होते परी केसांवरी तुझ्या झुलायचे भाग्य थोर होते ।। भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले तुझ्यासवे फिरायचे ते दिवस फुलांच्या गजर्‍याचे होते । नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी सौदर्य तुझं खूलवायची । नशिबाला ही ते उशीरा कळले फुल होउनी फुलायचे होते गजर्‍यात गुंफूनी झुलायचे होते आयूष्यच माझे गजर्‍यात गुंफायचे होते ।। »» सु

तसे देव मोकळेच असतात..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 28/10/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देव एकटेच असतात काल सहज त्याची आठवण आली तिला आणि ती अशी येथे दूर ...दूरदेशी आणले तिने जुजबी देव नाही असे नाही लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी सोबत विठ्ठल रुखमाई आणि शंकराची पिंड त्याच्या समोर नंदी तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत नाही असे नाही रात्रीच्या अंधारात त्याना दिसणार मात्र काहीच नाही कालच कशी कुणास ठाऊक आभाळातील ढग बघून तीही उदास ,खिन्न आणि आली आठवण देवाची दिसून गेले उदास देवघर किती दिवस प्रसाद सोडा किती महिन्यात त्याना कोणी आंघोळ देखील घातली नाही कसे करमत असेन त्यांना..?