भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर
सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार
विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक
दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको
भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही
भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको
लोकांना दे सोडून नि, सोड त्यांच्या विचारांना
ते काय विचार करतात, याशी तुझे कर्तव्य नाही
तुझ्याबद्दल कितीही चुकीचे विचार असतील त्यांचे
पण स्वतःला चांगले ओळखणारा, तुझ्याशिवाय दुसरा कोण
लोकांच्या मनाचा ताबा घेण, अवघड निश्चितच असेल
पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण, किती बर कठीण असेल
वेळ ही दवा आहे , प्रत्येक दु:खासाठी प्रत्येकाच्या
घड