मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

नेणिवेला जाणिवेने छेदता...

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे? या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा? ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता

काय लिहावे तुझ्याचसाठी...

शब्दबम्बाळ ·
लेखनविषय:
काय लिहावे तुझ्याचसाठी, मी घेऊन कागद तयार आहे असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे! असेच होते हरेक वेळी, लिहायचे तर बरेच असते चंद्र, तारे, नदी, कालवे सामावयाचे सारेच असते! पण जशी लेखणी येते हाती, कुणास ठाऊक कोठे जाती कागद राहतो तसाच कोरा अन शब्दही मजला सोडून जाती मग राहतो मीच एकटा, पण सोबत करते तुझी आठवण आठवणींच्या राज्यामधुनी तुझ्याच प्रेमाची साठवण मग मिठीत घेईन म्हणतो तुजला, पण अंतर मधले फार आहे हृदयापर्यंत पोहोचायासाठी, सध्या शब्दांचाच आधार आहे दडी मारुनी बसले कोठे, मी इथे लाचार आहे असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!

एक्सपायरी डेट.

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
रेशमी साड्यांच्या बासनात मोरपिशी साडीच्या घडीत अलगद ठेवलेलं, ते पत्र.. तिथून बाहेर नाही काढत कधी हलकेच चाचपडते अधूनमधून त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे... त्यातला शब्दंशब्द पाठ आहे लिहून खोडलेला , पाण्याने पुसटलेला... किती मिनतवा-या. हट्ट, रुसवे फुगवे काय अन् काय हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी.. आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र... तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव (ते तेव्हांही खटकलेलं थोडं) एका अधमु-या नात्याची एकमेव खूण.. का कोण जाणे पण आज अचानक वाटलं, हर रिश्ते की एक उमर होती है तशी, पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?

काही कविता अशा..तर काही तशा! - भाग २

पद्मावति ·
लेखनविषय:
काही कविता अशा..तर काही तशा...भाग १ काही कविता स्वप्नात जगतात, हलकेच हसतात, प्रेमात पडतात... काही कविता पटकन समजतात, चालीत बसतात आणि लयीत गातात! काही कविता शब्दांचे पोकळ डोलारे, बिन मूर्त्यांचे देव्हारे असतात भावनांचे उगाच कढ आणि ढसढसा ग्लिसरिनचे अश्रू सांडतात! काही कविता उन्मुक्त अवखळ आपल्याच मस्तीत तर काही नाकासमोर चालणार्या..

|| विठ्ठल अभंग ||

वैभवदातार ·
लेखनविषय:
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मी लिहिलेला अभंग ... विठ्ठला रे विठुराया रे पूजितो मी तुला चातुर्मास समाप्त आजि आलो दर्शनाला ||धृ || सावळे सुंदर रूप गोजिरे पाहतो मी डोळा विटेवरी उभा हात कटेवरी तुळशीहार गळा ||१ || दामाजीसाठी तू महार होसी जनाबाई चे दळण दळसी तुकारामांच्या गाथा तू तारिसी संत सज्जनांचे रक्षण करिसी ||२ || कार्तिकी एकादशी वारी येई भक्त मंडळींना दर्शनाची घाई पांडुरंगा तुझी अर्धांगी रखुमाई विठुमाऊली तू जगाची आई ||३ || चंद्रभागा तरी स्नान जे करिती त्यांची सर्व दुःखे पापे नष्ट होती षड्रिपूंपासूनि मुक्त ते होती टाळ मृदुंगांचा गजर करिती ||४|| अठ्ठावीस युगे उभा विटेवरी दु

तू!

OBAMA80 ·
प्रथम तुज पाहता क्षणी काळजाचा ठोका चुकला प्रीतीच्या रंगात रंगूनी जीव माझा भुलला न दिसता तू जीव होई कासावीस दिसता क्षणी तू फिरे अंगावरी मोरपीस टाकावा तू प्रेमळ कटाक्ष लाभावा तुझा सहवास रहावीस तू मजसमीप हीच या मनीची आस जवळी असता तुला एकटक पहावस वाटत डोळ्यात माझ्या तुला साठवून घ्यावस वाटत मोहक तुझ्या हास्यान होई जगाचे विस्मरण मधाळ त्या शब्दांनी गळूनी पडे माझे मीपण तुझ्याविना रित माझे जीवन अपूर्ण भासे आयुष्याचे ईक्वेशन माझ्या आयुष्यात तुझ असण करील परिपूर्ण माझ जगण कविता ह

उजाडताना उल्कांचे व्रण

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले

आंबराई

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
ये साजणी आंबराईतल्या आडापाशी आतुरल्या भेटाया दोन जीवांच्या वेशी सांगू नकोस सखीला आपुलं गुपित होईल गावभर बोभाटा विसरून रीत किती दिस झालं होईना नजरेच्या गाठीभेटी बघाया तुला केली झाडांवर राघू मैनांनी दाटी बगळ्यांनी बांधल्या नभात शुभ्र कमानी वाहणाऱ्या ओढ्यतले जरासे थबकले पाणी ये चुकवून आडवाटेचे खट्याळ डोळे घुमू लागली काळजात एकांताची मुकी वादळे

जरी अज्ञात देशाचा

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
जरी अज्ञात देशाचा किनारा गाठला होता तरी वारा शिडामधला जरा खंतावला होता दूरवरचे दिवे तिथले झळाळून पेटले होते तरी अंधार हटवादी जरा रेंगाळला होता वितळत्या चंद्रबिंबाने दशदिशा भारल्या होत्या तरी त्या चांदरातीचा कवडसा गोठला होता