सकाळी नेहेमीच्या लोकलने सायनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडताना नेहेमीप्रमाणे आपसुकच मागच्या खिशावर हात गेला. खिश्यातलं पाकीट जागच्या जागी असल्याची खात्री झाली आणि एक निश्वास सोडला. हुश्श .... चला आता संध्याकाळपर्यंत तरी काळजी नाही.... अगदी नेहेमीप्रमाणेच. नकळत एक सुस्काराही सोडला गेला....
अहं, म्हमद्या आता कधीच दिसणार नव्हता.
मी काही कुणी सराईत लेखकू नाही, त्यामुळे जे सांगायचय ते सरसकट सांगणार आहे. सांभाळुन घ्या. मी अंबरनाथला राहातो. रोज सकाळी सात वाजता घरातुन बाहेर पडायचे, लोकल पकडुन सायन गाठायचे.