Skip to main content

कथा

सूड - भाग २ (कथा संपूर्ण )

लेखक सागर यांनी गुरुवार, 27/08/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार रसिक वाचकहो, माझ्या "सूड्"कथेचा दुसरा भाग देण्यास थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. पहिल्या भागाला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मी कथानकात मूळ ढाचा न बदलता थोडेफार फेरबदल केले आहेत, ते कितपत यशस्वी झाले आहेत ते वाचकांवरच सोपवतो. माझ्या "सूड" या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग देताना आनंद होत आहे. तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाची अपेक्षा आहे.

अशीच एक गोष्ट...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 26/08/2009 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाल्या आपल्याच तंद्रीत बिडी ओढत बांधावरुन घराकडं चालला होता. वेळेची आणि आजुबाजूला काय चाल्लयं ह्याची त्याला अजीबात जाणीव नव्हती. तितक्यात मागून आवाज आला... "अरे ये भाल्या! थांब जरा... मी पण येतो". मग दोघे सोबतच चालू लागले... "बिडी दे रे" सोबतचा म्हणाला... भाल्यानं त्याला बिडी दिली... सोबतचा "झकास... ३० नबंर!!!... हीच ओढतो मी रोज..." इकडच्या्-तिकडच्या गप्पा मारत दोघे चालत होते... तितक्यात..."बिडी दे रे" सोबतचा परत म्हणाला... ती पण संपली... परत सोबतच्यानं बिडी मागीतली... भाल्या मात्र अजून पहिलीच बिडी ओढत होता... त्याला बिडी दिली आणि भाल्या जरा दचकलाच...

आयुर्वृद्धितीतली सुंदरता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/08/2009 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची.तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. मला म्हणाली, "तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस." "पण तू इतकी खराब कशी झालीस?. असं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली, "अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार?" मी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच

आणि मा़झी जात सुटली

लेखक कालिन्दि मुधोळ्कर यांनी सोमवार, 24/08/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा: ही कथा आहे; जितकी असायची तितकी खरी आहे आणि तितकीच काल्पनिक. "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... " ह्या संघाच्या प्रार्थनेने मला जाग येई. घराशेजाराच्या पटांगणातली कवायत एव्हाना संपलेली असे. आत्या, आजी, आई कामात गर्क असत. उठल्या उठल्या मी आमच्या तगरीच्या झाडाजवळ जाउन बसे. झाडाच्या कुण्डाजवळ मुंग्यांची रांग, मातीतली अधून-मधून दिसणारी पिवळी पानं ह्याच्याकडे मी भान हरपून पाहत असे. पटांगणातून आता प्रतिज्ञा ऐकू येई. 'जय हिंद'. मग खाड-खाड-खडाड. ब्राम्हणवस्तीमधे आमचं ऐसपैस घर होतं आणि प्रीती गोरे नावाच्या ज़रा आगाऊ, बडबड्या मुलीचं जसं असतं तसच माझं बालपण होतं.

शुक्रवारची कहाणी .....

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 21/08/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार....... अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता वार्.....विकांताची सुरवात करणारा असा हा दिवस.... तर अशा या शुक्रवारची कहाणी काय आहे महितिय??? .......वाचा खाली.... एक आटपाट नगर होतं.......(हो हो...एकदम डान्रावांच्या सजावटी सरखं..........) तिथं खूप कंपन्या होत्या बहुतेक सगळ्या आय टी वाल्या....त्यात सगळे नगरवासी काम करायचे.... अशाच एका कंपनीत एक 'क्ष' कामाला होता...हा क्ष एकदम हरहुन्नरी . कायम कमात मग्न असायचा....दर २ महिन्यांनी एक तरी बक्षीस पक्कं असायचं..

अतुलचा भयगंड

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 21/08/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत. "ह्याचं पुढे कसं होणार?" ही त्यांची नेहमीचीच काळजी. मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो, "जसा तो मोठा होईल तसा सुधारेल" अतुलच्या वडीलांना हे ऐकून बरं वाटायचं.मला म्हणायचे, "तुमचं म्हणणं बरोबर आहे.मी उगीचच काळजी करीत असतो.सर्व अंगावर पडल्यावर त्याला जबाबदारीने वागावं लागेल." इतर मुलांच्याबरोबरी

सूड - भाग १ (कथा )

लेखक सागर यांनी गुरुवार, 20/08/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर पहिला भाग टंकून खूप दिवस झाले होते. पण कथा पूर्ण होण्याचा योग लवकर येत नाही असे लक्षात येताच पहिला भाग वाचकांसाठी देत आहे. दुसरा आणि अंतिम भाग लवकरच देईन. नमस्कार रसिक वाचकहो, भाग २ येथे पहा संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.

जीवधन आणि नाणेघाट...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 18/08/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा चौघांचा (मी, यशदीप, शिऱ्या आणि सम्या) जीवधनला जायचा बेत पक्का झाला. एका शनीवारी पुण्याहून जून्नरला पोचलो तेव्हा सकाळचे ९.३० वाजले होते. घाटघरला जाणारी बस लागली होती पण सुटायला अजून जरा वेळ होता. मग बसस्टँडच्या जवळच मिसळपाव आणि चहा उरकून बस मधे बसलो. बस सुरु झाली आणि थोड्याच वेळात चावंड किल्ल्याला फेरी घालून पुढे निघाली. आता दोन्ही बाजूला नुसते उघडे-बोडके डोंगर दिसत होते. डोंगर म्हणजे नुसता काळा कातळ आणि त्याच्या तळात थोडी झाडी. जरा वेगळ्याच जगात घुसल्या सारखं वाटू लागलं. साधारण १ तासात घाटघरला पोचलो.

स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

लेखक मन यांनी मंगळवार, 18/08/2009 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपुन मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती. वातावरण नेहमीचं ऑगस्टचं ...श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह. वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह.

या सुखानो या!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 17/08/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.