Skip to main content

कथा

डुक्करताप, मी अन घबराट

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 16/08/2009 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला. "इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 15/08/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
"जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते." अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती.मला त्यांच्या कविता फारच आवडतात.

ध्यास... एक वेड

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
You've got to find what you love - Steve Jobs ------------------------------------------------------------------------ परवा इंटरनेटवर Heinz Stucke बद्दल वाचलं.. एकदम वेडा माणुस आहे हा.. हा मुळचा Germany चा.. वयाच्या २० व्या वर्षी सायकल घेऊन जग बघण्या साठी घरातून बाहेर पडला.. आज पर्यंत ५४५००० कि.मी. सायकल चालवलीय आणि १९३ देश भटकलाय.. घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडं एक सायकल, थोडेफार कपडे आणि फारच थोडे पैंसे होते.. त्याच्या फिरण्याला त्याच्या बाबांचा विरोध होता, त्यामुळं त्याला बाबां कडुन पैश्याची मदत मिळाली नाही आणि त्याला ती नकोच होती..

संगीतप्रेमी विरेन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/08/2009 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो." कुणी तरी म्हटलंय, "जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं." हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश आहे.

शामी कबाब!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 06/08/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ट्रिंग, ट्रींग...", बरोब्बर सव्वापाच वाजता त्याचा फोन वाजला.... त्याने बरोब्बर ओळखलं की हा तिचा फोन! गेल्या वीस वर्षांचा पायंडा!!! ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी हा तिचा ठरलेला फोन.... "हॅलो", त्याने फोन उचलला..... "हे बघ, आता मी घरी जायला निघतेय १०-१५ मिनिटांत", तिचा हुकमी आवाज "ओके, मी पण तितक्यातच निघतोय. काय आणायचंय का? आज काय करायचंय?", त्याची नेहमीची चौकशी... इतक्या वर्षांची ठरलेली सवय! तिने थेट घरी जायचं आणि त्याने जे काही आणायचं असेल ते घेऊन मग घरी यायचं!!!! "नाही, काही आणायचं नाही आज!

वेदना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 06/08/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपनाबाजारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, "वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो." जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.

महाबळेश्वर ते कास... चालत...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 05/08/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार!!! मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना... यशदीप: पश्या...

पाडव्याची साडी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 03/08/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेतील पत्रांचा परीचयः मोहनराव आणि विणाताई : मध्यमवयीन .४७ ते ५० दरम्यानचं वय. संजय आणि निलू : मुलगा आणि सून जनरल :पैचान कौन? तशी घराघरात घडणारी कथा .पण निसर्गाला थोडसं गृहीत धरण्याची चूक कोण करत नाही ? वयाचा आडपडदा निसर्ग ठेवत नाही हे खरं एक छोटीशी चूक किती मोठं रूप धारण करते हे सांगणारी कथा. या कथेतील डी&सी चा अर्थ गूगलवर बघावा.----------------------------------------- मोहनराव : हे आक्रीतच.