Skip to main content

जीवनमान

कांदे पोहे … एक अनुभव…

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी शुक्रवार, 29/11/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना.... आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला....

THANK YOU शेतकरी दादा!

लेखक रामबाण यांनी बुधवार, 27/11/2013 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे; असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today? असं तिथं विचारलं जातं.

सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 24/11/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे चढेवाडी, जातिवंत प्रतिनिधीकडून: देशातल्या पहिल्या आणि एकमेव सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे काल मौजे चढेवाडी येथे भव्य उद्घाटन झाले. आपल्या म्हशींच्या पोटी जातिवंत अवलादी पैदा व्हाव्यात म्हणून व्याकुळ झालेल्या पंचक्रोशीतल्या शेतकर्‍यांना यामुळे फार मोठा आधार मिळाला आहे असे मानले जाते. हे केंद्र उभारले जाईल असे माननीय खासदार श्री. गोरक्षनाथ गोर्‍हे यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अशारितीने पूर्ण करून आपल्या समाजसेवेच्या व्रताचे उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे असे चढेवाडीचे सरपंच माननीय श्री. सखाराम दामोदर चढे यांनी आवर्जून सांगितले.

२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 22/11/2013 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील. १. कंटाळा २. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे) ३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना पण या तिन्ही कारणांचं समाधान करणारी व्यायामाची एक पद्धती आहे. जिला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. इथे सर्किट म्हणजे व्यायामप्रकारांची एकामागोमाग केलेली जोडणी. ४ ते ५ मोजके व्यायामप्रकार घेऊन ते एकामागोमाग ठराविक वेळ, किंवा ठराविक वेळा केले जातात आणि असं ठराविक वेळ/ठराविक वेळा केलं जातं.

हझल

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/11/2013 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता हा पोळपाट हाती तोही फुटेल आता पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी लोटांगणाविना ना पर्याय काय आता प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . . .
काव्यरस

पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?

लेखक रामबाण यांनी बुधवार, 20/11/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं. आता पद्म पुरस्कारांवरुन पुन्हा चर्चा सुरु आहे. पुरस्कार मिळालेले दिग्गज पद्मरत्न, या पुरस्कारांसाठी आपल्या घरच्यांचीच कशी शिफारस करतात वगैरे बातम्या सुरु झाल्या.

शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर

लेखक रामबाण यांनी शनिवार, 16/11/2013 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
निवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता… त्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज… दोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं..

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय "कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून. "दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे. आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ? मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला.

नवे व्यवसाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 14/11/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.