Skip to main content

जीवनमान

झोपलेले बर्फ

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 08/11/2013 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कोणत्याही संवादाचा पाया असतो समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे. काही व्यक्ती समोरच्याची मते आणि विचार दडपण्याचा प्रयत्न करतात. ते असे लोक असतात ज्यांना स्वत:ची मते आणि गृहीतके बदलण्यात स्वारस्य नसते, जी चुकीची असू शकतात. असे लोक एका खोट्या गृहीतकाच्या आधारे जगतात की ते नेहमी बरोबरच असतात आणि तेच नेहमी बरोबर असतात. असा व्यक्ती ज्याला समोरच्याचे ऐकायचेच नसते ते यासाठी की त्याला भीती वाटत असते की समोरच्याचे ऐकले तर त्यातले पूर्ण किंवा काही भाग स्वीकारावा लागेल आणि स्वत:च्या मनातल्या काही चुकीच्या गृहीतकांना धक्का बसेल.

आयुष्याचे चतकोर.....

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 07/11/2013 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पाश्चिमात्यांनी अर्थक्षेत्र चार भागात विभागले आहे
  • नोकरी (EMPLOYEE)
  • स्वयंरोजगारी (SELF EMPLOYED)
  • व्यवसाय (BUSINESS OWNER)
  • गुंतवणूकदार (INVESTOR)
आपण म्हणतो
  • उत्तम शेती
  • मध्यम व्यापार
  • कनिष्ठ नोकरी
म्हणजे गुंतवणूकदार हा दोन्ही ठिकाणी सर्वोत्तम मानला जातो आणि नोकरी करणारा कनिष्ठ. पण उत्तम असो कि कनिष्ठ आपल्यापैकी प्रत्येकजण आर्थिक सुरक्षेची इच्छा बाळगतो आणि आर्थिक स्वातंत्र्याची स्वप्न पाहतो .

निसर्गाला काही फरक पडत नाही!!!!!!!!!!!!!

लेखक वडापाव यांनी बुधवार, 06/11/2013 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती, कारण तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणीत राहून आपणही घाण होतो म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं आणि अक्कल भराभरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, शिशुवर्ग म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमवलेल्या अकलेचा एखाद-टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे, 'आपण जगायचं, दुस-याला मारायचं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!!

फुकणं वाईट, फुकाडे नव्हे.

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 05/11/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेझीताईंचा 'फुकाडे' हा लेख वाचला आणि त्यात त्यांनी समस्त फुकाड्यांना निर्बुद्ध ठरवून टाकल्याने त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या भूमिकेवरच फक्त चर्चा होताना दिसली. मुळात, 'फुकणं हे फुकणा-या माणसासाठी वाईट का? त्याबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असूनही लोक या व्यसनाकडे आकृष्ट का होतात? एकदा हे व्यसन त्यांना जडलं की ते सोडायची इच्छा त्यांना का होत नाही? ती झाली तरी सहजासहजी हे व्यसन का सुटत नाही?

दुिनया

लेखक sश्रिकान्त यांनी रविवार, 03/11/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सोनं पांघरुन बसल तर चामडही िवकत, चामडं पाघरुन सोनं िवकणार्याला आजकाल कोण िवचारतं? झगमगाटाची इथली दुिनया, चलती का नाम गाडी, गरीबदुबळ्याचं आयुष्यं मात्र कस्पटाची काडी स्वत: साठी जगणार्यांची बेपव्रई मस्ती, आत्याचारी प्रव्रुती मागे गरीबाची नालस्ती िवकासाचा ध्यास घेऊनी पाऊल चंद्रावरती, तरीही नांदत आहेच येथे खेकड्यांची प्रव्रुती कुठला देश? कसला वेश? कुठली नाती? कुठली माती? हेच िशकवून गेली का हो भारतीय संस्कंरुती?

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 29/10/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

(सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल?)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 29/10/2013 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
सणासुदीचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे घर आवराआवरीचं खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल? आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी नारळाची वगैरे झाडं लावा, मग झावळी खाली आल्यावर हीर काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि साफसफाईची आणि नीटनेटकेपणाची हाईट" वाटते मला! तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि चिखलटिपणी!

फटाकेमुक्त दिवाळी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 26/10/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी. फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात.

दिवाळीच्या निमित्ताने : वर्दीतला "तो" आणि आपण.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 26/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,एव्हाना सगळीकडे दिवाळी निमित्त धामधूम सुरु झाली असेल....नवीन खरेदी,फराळाची तयारी,छान छान बेत अशा उत्साह वातावरणात ओसंडून वाहतोय....एरवी महागाईने कंबरडे मोडलेले असले तरी ह्या दिवसात माणसं जमेल तशी हौसमौज करून घेतातच. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गणल्या जाणाऱ्या वर्गात तर दिवाळी हे मोठेच प्रस्थ असते.

ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध मन्ना डे अर्थात मन्नादा कालवश !

लेखक psajid यांनी गुरुवार, 24/10/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध गायक मन्ना डे अर्थात मन्नादा यांनी आज पहाटे बंगळूरू येथे अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ होते. शास्त्रीय बाजातील गीत गायन ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट होते. हिन्दी, भोजपुरी, मल्याळम, मराठी इत्यादी भाषांमध्ये त्यांनी जवळपास साडे तीन ते चार हजार गीत गायली आहेत. मुकेश, मो. रफी किशोरकुमार यांच्या काळात ही आपली वेगळी गायकी त्यांनी रसिकप्रिय केली.