Skip to main content

धोरण

भारतातील रस्ते-अपघात

लेखक केदार भिडे यांनी सोमवार, 25/04/2022 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात.

आङळे वाङळें साहित्य संमेलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

मिपाकर होता होता .....

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 13/04/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट, असाच फेसबुकवर चरत (पक्षी : ब्राउजिंग) होतो. अचानक एक चित्र दृष्टीस पडले. अतिशय साधे, काही मोजक्या रेषा. साधारणपणे सरळच. त्या रेखाटनातून दिसणारं सौंदर्य, साधणारा परिणाम, व्यक्त होणारा आशय मला अतिशय आवडला. अर्थात लाईक आणि कमेंट दिली. चित्रकाराचे नाव वाचले. श्रीनिवास कारखानीस. लक्षात राहील असे नाव. फेसबुक बघता बघता या नावाचा आणि चित्रांचा डोळे वेध घेऊ लागले. दिसले रेखाटन की त्याचा आस्वाद घेणे सुरू झाले. लाईक आणि कमेंट दिली जायचीच. मी त्यांच्या चित्रकलेचा चाहता होऊन गेलो. फेबु मेसेंजरवर त्यांच्याशी हॅलो हाय सुरू झाले.

पुण्यात मेट्रो धावू लागली!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/03/2022 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.

हे वाचा: शेष प्रश्न

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 15/03/2022 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

ऑपरेशन गंगा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/03/2022 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती.

पुर्वग्रह-आनंदाला ग्रहण

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 01/03/2022 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात‌. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत. जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".

गाव

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 20/12/2021 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

रस्ते

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 10/12/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

माणूस आणि पुस्तक

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 09/12/2021 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.