Skip to main content

विरंगुळा

माझी राधा- ६

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 12/05/2022 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला. मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते. मागील दुवा : http://misalpav.com/node/50097 बराच वेळ त्या फांदीवर बसून राहिलो. डोक्यातला राग जात नव्हत. मग मीच माझ्याशी बोलू लागलो. "बघ तुला आता कळेल कान्हा किती चांगला आहे ते. दहीदूध की काय एकटा खातो का.

माझी राधा - ५

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 06/05/2022 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चेहेर्‍यावरचे ते हसू तुझ्या चेहेर्‍यावरही पसरते. का कोण जाणे आपण दोघेही एकदम हसायला लागतो. आपल्याला कसला आनंद झाला आहे हे दोघानाही समजत नाही. समजण्यापलीकडची भावना. दोघांनाही एकाच वेळेस जाणवते. एक अलौकीक अनुभूती ,बासरीच्या स्वरांनी , त्या अनहद नादाने आपल्याला दिली.
मागील दुवा http://misalpav.com/node/50080 अनहद नादाची एक गम्मत असते. त्याला सुरू व्हायला कसलेही कारण लागत नाही. तुम्ही मनात विचार आणा , तो स्वतःहोऊन येतो.बोलवावे लागत नाही. कधीकधी तर तो मनातच वास्तव्य करतो.

सिलींडर वाला

लेखक नीलकंठ देशमुख यांनी मंगळवार, 03/05/2022 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडरवाला (सिलिंडर या कथेचा सिक्वेल) 'वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे .. त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे...'     गावातल्या त्या रस्त्यावरून जातायेता या गाण्याच्या ओळी अचानक मनात तरंगून जायच्या अन मोहरून जायला की काय म्हणतात तसं व्हायचं! 'भावनाओं को समझनेके' लिए एवढं पुरे असावे.त्या काळी म्हणजे सत्तरऐंशीच्य दशकात काय आणि आता काय ,प्रेम आणि जुनी गाणी यांचे नाते अतुट राहिले आहे.'प्रेमळांच्या' प्रेमग्रंथातील कुठल्याही प्रसंगी अनुरूप अशा गाण्याची वाणवा होणार नाही,याची मोठी काळजी भारतीय सिनेसृष्टीने घेतली आहे. आता गाण्यांतीलल तपशील अणि वस्तुस्थितीत बारीक सारीक फरक असायचे ते सो

वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

लेखक पाटिल यांनी शनिवार, 30/04/2022 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी असणार, हे ओघाने आलेच समजा. पण तेव्हा ती तशी नव्हती. ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते. अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती. कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल? तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल? नवीन मित्र चांगले मिळतील का?

माझी राधा - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/04/2022 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो चेहेरा दिसताच माझ्यात काहीतरी बदल होताना मला जाणवतोय. ते मोहक हसू माझ्या ही चेहेर्‍यावर पसरत जाते. मघा बासरी वाजवताना ऐकू आलेल्या पैंजणाच्या आवाजाची ओळख पटते मागील दुवा http://misalpav.com/node/49987 मी बासरी वाजवताना मुग्ध होऊन पहाणारा. हा चेहरा मी पहिल्यांदा पाहिला ते ही डोळ्यासमोर उभे रहाते. कदम्बाच्या झाडाला टेकून बासरी वाजवत होतो. त्या वेळेस रागदारी वगैरे काही असतं हेच माहीत नव्हते. बासरी वाजवत होतो. माझे लक्ष्य नव्हते. समोरच्या पायवाटेवरून काही गवळणी पाणी आणायला म्हणून निघाल्या होत्या. माझी बासरी ऐकून त्या काही काळ थांबल्या असतील.

प्रिय सचिन

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 24/04/2022 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सचिन, पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 16/04/2022 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.

प्रकाश...

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 14/04/2022 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता दिवाळीची सुट्टी संपली. पंधरा दिवस शेवरीच्या कापसासारखे भुर्रकन उडून गेले. नाहीतर शाळेतला एक तास एका दिवसासारखा, संपता संपत नाही. त्यात मधल्या सुट्टीनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा किचकट विषयांचा तास असेल तर जास्तच कंटाळा येणार. हातात घड्याळ नसल्यानं किती वाजलेत समजायचं नाही, म्हणून खिडकीतून वर्गात डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या किरणांची खूण ठेवायचा प्रयत्न केला, पण सूर्यमहाराज कधी वेळेवर नसायचे.

नाम बडे और..

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 13/04/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
नाम बडे और... 'वकीलीचा धंदा आता पयल्या सारखा राह्यला नाही.

फ्रेंच राष्ट्रपतींचा राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 08/04/2022 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते. सोळाव्या लुईकडे या राजवाड्याची मालकी आल्यावर येथे विशेष राजदुतांच्या निवासाची सोय करण्यात आली होती.