Skip to main content

विचार

महेश्वरचा किल्ला: अहिल्याबाई होळकरांचे मूळ दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावरः कुणी वाचवू शकेल का?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 16/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या फेब्रुवारीत अहिल्याबाईंच्या महेश्वरास गेलो होतो. अतिशय सुंदर जागा. नर्मदाकाठी किल्ल्यावर अहिल्याबाईंचा वाडा जसाच्या तसा जतन केलेला आहे. मी अनेक वर्षांपूर्वी इथे गेलेलो असताना ज्या स्थितीत किल्ला व गाव होते, जवळ जवळ तसेच अजून असल्याचे पाहून बरे वाटले. मात्र पूर्वी किल्ल्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या अहिल्याबाईं च्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर व सज्जात जाता यायचे, तिथे आता प्रवेश प्रतिबंधित आहे.

सांगे वडिलांची कीर्ती.....

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 16/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ.

कौतुक

लेखक Pearl यांनी मंगळवार, 15/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक ... एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख. आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो. मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

दादा, तुस्सी ग्रेट थे!

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 09/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत.

According To Accordion

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 08/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त होतं ते Accordion या जादुई वाद्याच्या १८३व्या वाढदिवसाचं... मा.चौराकाकांच्या मुळे मी व मोदक (दिनांक ६ मे रोजी) या एका अभूतपूर्व कार्यक्रमाचे सह-भागी होऊ शकलो...होय सहभागीच..!

मनाची कवाडे बंद करु नका...

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा) ................................................................................................................................. आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्‍यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात.

उपासाचा किस...(घेतला का कधी?)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 07/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ मनाशी मी हाच विचार करत होतो की उपासाला नेमका हा किस कसा चालतो..? उपासाला जड असे काहिच खायचे नसते..म्हणे! मग हे कसे चालते..? बारश्याला तेराव्याचे गाणे? खिचडी काय..नी..किस काय? हलके थोडेच असतात..होय? माणसे कशी शोधुन काढतात उपवासालाच सुखाची सोय? उपवसाला शास्त्रात म्हणे निराहार ही संज्ञा आहे पण लोक केवढा किस काढतात की पाहुन वाटतं..काय हे..? खिचडी काय...नी थालपिठं काय सगळं जडच खातात तर काहि दुसरं टोक गाठणारे पाणी पिऊन उपाशी रहातात. तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो... ज्याची त्याची अवड..! मी म्हणतो,,बा धर्मा.. आता तुझ्या अस्थी सावड धर्म ही अफूची गोळी हे वचन आज मला पटलं आणी त्यांना