दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

लेखनप्रकार
प्रिय अदू. . . . काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . . अदू, गेल्या दोन वर्षभरामध्ये तुझ्यासोबत जीवन सार्थक करणारे असंख्य क्षण आले. एक एक दृश्य डोळ्यांपुढे जीवंत होतं.

का एवढे धप्पा धापा पोलिसांच्या मागे लागलेत लोक ?

लेखनविषय:
लेखनप्रकार
मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते ,कोणतेही वर्तमान पात्र उघड फक्त बलात्कार बातम्या ,जणू भारतात लोक दुसरे काही काम करतच नाहीत आता पण सध्या गणपतीभर पोलिसांना मारणेच चालू आहे ,ते पण दर वेळी नवीन MO आता माझा प्रश्न 2012 ला जेव्हा रजा अकॅडेमिच्या वेळी गर्भवती पोलीस कॉन्स्टेबल महिलाना मारहाण झाली ,हाच मीडिया आणि हेच पक्ष का गॅप होते ? मी राज ठाकरे यांचा पाठीराखा नाहीये पण फक्त त्यांनहीच आवाज उठवला होता सौजन्य सप्ताह पळून पण लोक पोलिसांबद्दल अढी बाळगून आहेत ,पण अचानक एवढा उद्रेक कसा ?

राऊ कादंबरीमधील एक प्रसंग

लेखनविषय:
लेखनप्रकार
राऊ कादंबरी परत एकदा वाचून संपवली. प्रत्येकवेळी ती मनाला वेगवेगळ्या प्रकारे भिडते. अनेकांनी अनेकदा त्यावर लिहिलं आहे. चर्चा देखील झाल्या आहेत. अलीकडे बाजीराव-मस्तानी सिनेमा देखील येऊन गेला. त्या काळात तर पेशवे... मराठा साम्राज्य... प्रेम... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच. म्हणून परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. त्यातील एक प्रसंग मनात खूप भिडला.. टोचला... जेव्हा मस्तानीला आपा पुणे सोडून जा सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

हॅमर कल्चर

लेखनविषय:
लेखनप्रकार
हॅमर कल्चर लेखक :- प्रभाकर नानावटी बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद. "पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?" "त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे." "पपा सांगा की ती गोष्ट मला" "विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला.

स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन

लेखनप्रकार
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत. हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे: सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे. त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची. हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा. आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून). आता वार्‍याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार.

गोखल्यांचे सीमोल्लंघन

लेखनविषय:
लेखनप्रकार
गोखल्यांचे सीमोल्लंघन गोखले टिळक रोडवरच्या महाराष्ट्र बँकेत होते. बाजीराव रोडला घर आणि दूर टिळक रोडला नोकरी... असं खूप मोठ्ठं सीमोल्लंघन गोखले दररोज करीत असत. आमचे वडिल हे गोखल्यांचे श्रद्धास्थान. आयुष्यातली कोणतीही छोटीमोठी गोष्ट त्यांच्याशी शेयर केल्याशिवाय गोखले रहात नसत. आमच्या वडिलांची दाद त्यांना महत्त्वाची वाटे.

गणपती उत्सव का इव्हेंट???...

लेखनविषय:
लेखनप्रकार
तीन दिवसां वर यिवुन ठेपलेल्या गणेश उत्सव हा महाराष्ट्र सह पुर्ण भारतत मोठया प्रमाणावर साजरा होतॊ. प्रदेशात राहणारे आपलेच भारतीय बांधव सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा करतात. गनपती म्हणजे महाराष्ट्रच आराध्य दैवत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळची आणि घरगुती गणपती बसवंयरीची जय्य्त तयारी चालु सुद्ध झाली. पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???...
Subscribe to विचार