मी सध्या शांघाईला वास्तव्यास आहे. इथे ह्या वर्षी बाप्पांचे दर्शन होईल का नाही, बाप्पांची आरती कानावर पडेल का नाही, बाप्पांचा प्रसाद खायला मिळेल का नाही, ह्यासाठी गेले काही दिवस मन कासावीस होत होते. पण बाप्पांच्या कृपेने *श्री. आराध्ये ह्यांचे 'गणरायाचे आगमन निमंत्रण' बघून खूप आनंद झाला.
ठरल्या वेळेप्रमाणे काळ संध्याकाळी, आम्ही( मी, माझी पत्नी शीतल, माझा मित्र नीरज, आणि त्याची पत्नी निशा) चौघे श्री. आराध्ये ह्यांच्या घरी निघालो. घरी पोहोचल्यावर बाप्पांचे दर्शन झाले. शांघाईतले सजवलेले बाप्पा बघून मन भरून आले.