Skip to main content

प्रकटन

या पसाऱ्याचं काय करावं?

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 27/09/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली. दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत.

उंदरांची शर्यत -२

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 25/09/2019 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
उंदरांची शर्यत (RAT RACE) -२ उंदरांची शर्यत -२ मी विक्रांत वर असताना (१९९०) माझा एक मित्र लेफ्टनंट कमांडर नरेश राणा (हा हॅरियर या लढाऊ विमानाचा वरिष्ठ वैमानिक आणि प्रशिक्षक होता.) याने मला एक प्रकाशचित्र दाखवले. त्यात एकाच फ्रेम मध्ये तीन विमाने होती. सर्वात पुढे मिराज २०००, मध्ये हॅरियर ( ज्यात हा स्वतः होता) आणि सर्वात शेवटी HPT ३२ हे पुढे पंखा असलेले (प्रोपेलर) विमान होते. हा फोटो पाहून मी त्याला आश्चर्याने विचारले कि हा फोटो कसा काढला ( तेंव्हा फोटोशॉप हा शब्द फारच क्वचित कुणी ऐकला असेल).

पाभेचा चहा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/09/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पूर्वी नव्हते. पूर्वी आपल्याकडे चहा नव्हताच.  लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

ऑब्जेक्षनेबल..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/09/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो. आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?! पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्‍यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे.

ती लेस्बिअन आहे?

लेखक राजे १०७ यांनी रविवार, 22/09/2019 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत. माझंही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळाली. माझे क्लासमेट उच्च पदांवर वेगवेगळ्या खात्यात क्लास थ्री पासून ते सुपर क्लास वन अधिकारी बनले होते. मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करत होतो. सोबतच शेजारच्या गावचा माझा बॅचमेट व जवळचा मित्र नोकरी करत होता. अगोदर वेगळ्या जिल्ह्यात नोकऱ्या करून एकाच तालुक्यात बदलून आलो होतो. मित्र जिल्ह्याच्या ठिकाणी रहात होता व मी माझ्या हेड क्वार्टर ला रहात होतो. एकमेकांच्या घरी जाणे येणे होत होते. आमचं मुळ गाव दूसऱ्या जिल्ह्यात होते व नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात करत होतो.

भंडारदरा

लेखक vcdatrange यांनी रविवार, 22/09/2019 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
भंडारदराला जेव्हा कधी जाणं झालयं प्रत्येकवेळी काहीतरी नविन विषय वळवळतो डोक्यात. मागे प्रवरा मेडिकल ट्रस्ट करिता आदिवासी आरोग्याच्या उपक्रमांची आखणी, नियोजन केले होते. त्यातले एक प्रोडक्ट होते "मोटारसायकल अॅम्ब्युलन्स". अहमदनगर जिल्ह्यात, विशेषत: भंडारदरा धरणक्षेत्रातील काही दुर्गम, अतिदुर्गम गावं जेथे रस्तेच काय पण पायवाटाही नाहीत, अशा ठिकाणच्या नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या जीवावरचे संकट टळावे, या हेतूने या मोबाईल रुग्णवाहिका प्रस्तावित केली.

तुझं माझं जमेना...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/09/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे. पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी...

मास्तरांची जिरवली!

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 20/09/2019 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी सातवीत होतो. माझं हायस्कूल तालुक्यातील उत्तम नावाजलेले होते. अतिशय शिस्तप्रिय आणि मुलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्राचार्य आम्हाला लाभले होते. सहकार सम्राट, साखर सम्राटाची संस्था असली तरी भ्रष्टाचार, पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करणं वगैरे गोष्टी तेव्हा अजिबात नव्हत्या. केवळ गुणवत्ता हाच निकष होता. प्राचार्यांच्या कावळ्याच्या नजरेतून एकही चूकीची गोष्ट सुटत नव्हती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व शिक्षक वर्ग तळमळीने काम करत होते. अशातच एक नवीन शिक्षक आम्हाला चित्रकलेला आले. त्यांचं नाव भैलुमे असे होते. ठेंगणी मुर्ती. आडवं पसरलेलं शरीर.

खेड्यातली विहीर, दहीहंडी आणि मोनालिसा!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 19/09/2019 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुइक . . . . पुइक चक्क एका शुक्रवारी संध्याकाळी खुद्द कोरेगाव पार्कच्या पाचव्या गल्लीत पार्किंगला जागा मिळाल्याच्या आनंदात मी विजयोन्मादाने २-२ वेळा बटण दाबून गाडी लॉक केली. आज त्या जगन्नियंत्याची माझ्यावर कृपादृष्टी आहे... आज मुझे कोई नहीं रोक सकता.... हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा,डळमळू दे तारे .... मला काही फरक पडणार नव्हता... साक्षात नॉर्थ मेन रोडवर पार्किंग! माझ्या चालण्यात आपोआपच एक रुबाब आला....spring in the stride वगैरे जे म्हणतात ते हेच असावं. त्याच धुंदीत, झोकात, कैफात चालत असतानाच समोरून एक ओळखीचा चेहरा येताना दिसला. मन अचानक २५ वर्षं मागे गेलं.

FLAME

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 18/09/2019 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं. मी पण उजीवर (उज्वला) लाईन मारणं सोडून दिले. गुडघ्याला मात्र राजाचा लयी राग आला. एक दिवस गुडघ्यानं मला एक पोरगी दाखवली. म्हणला हिला मी पटवणारच. पोरगी धिप्पाड , भरलेली व जवान होती. मोठ्या खानदानी घरातली वाटत होती.