मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

प्रिय मैत्रीण

मालविका ·
प्रिय मैत्रीण, थोड्या उशिराच पत्र लिहितेय. पण याआधी तू पण बिझी असशील. कोणी ना कोणी तुला भेटायला येत असेल,सारखे फोन चालू असतील. कदाचित एका क्षणी तुला हे नकोस झालं असेल. मला कल्पना आहे. मीही त्यातून गेलेय. म्हणूनच या गदारोळात तुला हाक नाही मारली. सावकाश नि मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला आवडेल मला. वरती मायना लिहताना पटकन मैत्रीण म्हटलं तुला. खरं सांगू का?, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हा अगदी बरोबरीच्या मैत्रिणीसारखीच वाटलीस मला. वयाचं अंतर चांगलंच आहे आपल्यात. पण पहिल्याच भेटीत तू मला नावाने हाक मारायला सांगितलिस. तेव्हाच जवळची वाटलीस.

शेवटची इच्छा

सुबोध खरे ·
कर्नल सतिश मिश्रा हे लष्कराच्या विमंडळात वैमानिक होते त्यांनी लिहिलेल्या एका (सत्य) कथेचा स्वैर अनुवाद शेवटची इच्छा आम्ही आमच्या तळावरून रुटीन ट्रेनिंग सोर्टीला निघालो होतो तेंव्हा मध्येच जेव्हा एलसी( प्रत्यक्ष ताबा रेषेवर) पोस्टकडे एक जखमी झालेल्या सैनिकाला (कॅस इव्हॅक) घेऊन जाण्यासाठी रेडिओ कॉल आला. तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेला तो तळ गाठला आणि लँडिंग करताना दिसणारे दृश्य असे होते. सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती .. चिंता, राग, भावनाकल्लोळ इ दिसत होते. शीख सैनिकांच्या तुकडीने त्यांच्या एका कनिष्ठ सैनिकाला घेरलेले होते.

कवीचा मृत्यू आणि इतर..

पाटिल ·
एक ऑनलाईन शोकसभा.. फार चांगला होता मनमिळावू कष्टाळू एकांतप्रिय होता कोऑपरेटीव्ह नेचरचा होता हसतमुख होता कविता पण लिहायचा मला त्यातलं एवढं कळत नाही पण चांगल्याच असतील.. पाठवत असायचा इकडे तिकडे पण छापायचेच नाहीत हो कुणी लोकांना किंमत कळली नाही त्याची आता कोण पाठवणार मला कविता..! एका ग्रुपवर कळलं सकाळी वाचून धक्का बसला मग लगेच बाकीच्या ग्रुपवर सगळ्यांना कळवलं सगळ्यांना धक्का बसला शाळेतल्या मित्रांना धक्का बसला कॉलेजच्या मित्रांना धक्का बसला जुन्या कलीग्जना पण धक्का बसला धक्का सगळ्यांना घरच्या घरीच बसला कुणाला बेडवर लोळताना बसला कुणाला दाढी करताना करताना बसला कुणाला पेपर चाळताना बसला ह

सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

मदनबाण ·
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही.

असं नको.. तसं लिही..

पाटिल ·
नाही.. नाही.. ही सगळी वाक्यं म्हणजे खाणीतनं आत्ताच फोडून काढलेल्या दगडांसारखी टोकदार आणि खुनशी झाली आहेत.. समजा ह्यातलं एकेक वाक्य हातात घेऊन भिरकावून दिलं तर उगाच डोकं-बिकं फुटायचं कुणाचंतरी.. आणि तुझ्या मागं लचांड लागायचं.. त्यातून तू एक नंबरचा पेद्रट मनुष्य असल्यामुळे तुला लचांड वगैरे नकोच असणार ! आणि 'मनुष्य' म्हटल्यावर इकडं तिकडं चमकून बघू नकोस.. 'मनुष्य' म्हणजे माणूस..! होमो सेपियन सेपियन..! असो.. आता एक काम कर... ह्याची धार थोडी मऊ कर... एकेका वाक्यावर हात फिरवून बघ... भिऊ नकोस.. तूच लिहिलंयस ते..आपलाच हात आपल्याला लागत नाही... एकेका शब्दाकडे नीट बघ... पॉलिश कर..

तेव्हापासून..

पाटिल ·
'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..! उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..! हे बरं नाही.. हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय..

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

मनो ·
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग २: फुटबॉल (पूर्ण)

शेखरमोघे ·
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत  मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित होते  आणि म्हणून त्याबद्दल  बरेच कांही  लिहिण्याचा संकल्प  ही मालिका सुरू करताना सोडला होता.   या आधीचे काही लिखाण केल्यानंतर वैयक्तिक जीवनांत  अनपेक्षितपणे सुरु झालेल्या आणि चालूच असलेल्या वादळामुळे हा संकल्प मधेच सोडून द्यावा लागत आहे.

मन न

फुंटी ·
मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला??