Skip to main content

प्रकटन

मन न

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 11/06/2021 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला??

तेजस्विनी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 07/06/2021 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
"सर तेजू" सब ठीक है बा? "हो. तुम्हाला वेळ आहे ना?" कुछ तो कांड जरुर है, थांब एका ठिकाणी बसुन घेतो. "दादा आला होता. २५ हजाराचा कॅमेरा देउन गेला. मी पारंपारिक पद्धतीने पाया पडले. खुपच इमोशनल झाला.अगदी कनफेशनल मोड मध्ये. कारण नसताना रायवलरीत वर्षे फुकट गेली, वगैरे वगैरे. एवढा मोठा बदल? काय जादू केलीस? "त्याला आई ने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते आणि आईच्या विरोधात जायची हिंमत नव्हती. कधी नव्हे तो माझ्याशी बोलला. मी समोरून नकार येइल अशी व्यवस्था केली. खलनायकी?

आईच तर आहे..!

लेखक पाटिल यांनी शनिवार, 05/06/2021 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते, असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..! आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं.. आणि काही दिवस तो विस्कटून जातो..! मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे... एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी.. विचारपूस करावी सगळ्यांची... स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे.. पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी... काळजी करू नकोस..

हा 'मी' नाही, आपण आहोत.

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 03/06/2021 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?" ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

शहर सोडताना..

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 28/05/2021 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांत जास्त काय वाईट? सवय..! जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची बारची वाईन शॉपींची पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची.. शहर सोडताना अवघड जातं मग शहर काही वाईट नसतं.. पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू आणि कळतं की आता जावं लागेल.. निरवानिरव करावी लागते मग दूधवाला गॅसवाला पेपरवाला आवराआवर बांधाबांध भांडी गाद्या चादरी पडदे कपडे बॅगा सगळंच.. बडवायजरच्या साचलेल्या कॅन्सची विल्हेवाट ॲशट्रेचा कधी नव्हे तो मोकळा श्वास रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं नाही नाही म्हणता म्हणता काय काय जमवलेलं असतं ह्या डायऱ्याही संध्याकाळी नदीत सोडून दिलेल्

वामकुक्षी की जाम कुक्षी?

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुपारी झोपावे की जागे राहावे हा प्रश्न आम्हाला करोना पर्वात रोज पडत आहे. या निशा सर्व भूतानां तस्याम् जागर्ति संयमी! असे भगवंत गीतेच्या कुठच्याश्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात म्हणतात. (येथे त्या अध्यायाचा आणि श्लोकाचा क्रमांक शोधून काढून तो येथे लिहून, आम्हाला भगवद्गीतेचे किती सखोल ज्ञान आहे हे वाचकांना वरवर दाखवून छाप पाडण्याचा मोह होत होता. परंतु आम्ही पडलो कमालीचे विनम्र आणि प्रामाणिक! त्यामुळे तसे केले नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी! लोभ असावा!!) जेव्हा सामान्य भूत मात्रांची रात्र असते (आणि ते झोपलेले असतात) तेव्हा संयमी जागा असतो असा त्याचा भावार्थ आहे.

शाप

लेखक पाटिल यांनी सोमवार, 24/05/2021 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया अन-इन्स्टॉल कर सगळं गच्च भरून गेलंय डोकं अजून किती कोंबशील वाचू नकोस काही अर्थ नसतो त्यात पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट मग स्वतःला कवटाळ व्हायचं ते होईल भेंचो कायकू डरताय ? साधी हुरहूर तर आहे तिला डरण्याचं वय आहे का हे? संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर, भय इथले संपत नाही वगैरे.. मग पाठोपाठ आत्मकरुणेचा महापूर मोठमोठ्ठे लोंढे येतायत दुथडी.. झेपणार नाही तुला.. पळ.. शेपूट घाल नेहमीसारखा गटांगळ्या खा ओरड..

कट्टे कसे असावेत .. ? एक दृष्टीकोन

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 23/05/2021 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर सुमारे ९ वर्षे आहे .या दरम्यान काही कट्टे झाले त्यात मी सामील होतो. मी मुळातच व्यक्तिपूजक वा मूर्तिपूजक नसल्याने मी मिपावर तसे खरडवही ,खरडफळा असे वापरून माझा दरबार तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. सबब कट्टा असल्यावर " आहे कसा आननी ? " अशी मला काही उत्सुकता कुणाबद्दल नसे. तसेच माझ्या प्रोफाईल मध्ये माझे नावासकट आवडी व नावडी सुद्धा स्पष्टपणे लिहिले होते .माझ्या लेखनातून माझे व्यक्तित्व लोकांना पुसटपणे कळले असेल इतकाच तो काय स्वार्थ मी साधलेला आहे. मिपावर प्रथमपुरुषी एकवचनी काही लिहिलेले लोकांना फारसे आवडत नाही असा माझा अभ्यास आहे ! " मी बोटीवर होतो तेंव्हा !