दर्शन भारत मातेचे (भाग २)
मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन पुण्याला वळसा घालून शिक्रापूर मार्गे अहमदनगर-बीड असा आमचा प्रवास सुरु झाला. अद्यापपर्यंत दृतगतीमार्गावर दोनवेळेला टोल भरला होता. पण वाचलेल्या वेळामुळे अन हा महामर्ग नसताना पूर्वीच्या मार्गावर अनेकदा तासन तास घालवल्याच्या आठवणी विसरलेल्या नसल्याने हा टोल भरताना काही वाटले नाही.
पुढे पुण्याच्या वळणरस्त्यावर असताना बंधू म्हणाला, "अण्णा, पुढच्या वळणावर काही तरी गडबड असणार आहे". मी चमकलोच.
"तुझा अध्यात्मातला अभ्यास चांगला आहे. पण तुला भविष्य कधिपासून कळायला लागले?" मी प्रश्न टाकला. तसे आम्ही त्या वळणापर्यंत पोचलो होतो. आणि काय आश्चर्य तेथे एक अपघात झालेला होता.
याद्या
6460
मिसळपाव