प्रकटन
मिपाजाल -सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड
विप्र मास्तरांना मिपाजालवर येउन साधारण चार महिने झाले होते. तेवढ्यात त्याना ठाणे मिपा कट्ट्याचे आमंत्रण मिळाले. मिपाच्या मालकांना व इतर विभुतींना भेटायला मिळणार हे बघून त्यांचा आनंद त्यांच्या ब्लॉकमध्ये मावेना.
मास्तर मिपाजालावर क्रिप्टीझम चे बादशाह म्हणुन प्रसिद्ध झाले होते. त्यांनी शिक्षण ह्या रुक्ष विषयाला सोडून वेगळेच विशय हाताळायला सुरु केल्याने मिपा सद्स्य रामदास त्यांच्यावर नाराज झाले. मास्तर पण आपला हट्ट सोडेना. म्हणून रामदासानी स्वःत ती जबाबदारी उचलली. "पीक लुटून नेले, केव्हा नेले, किती वेळा नेले" अशा कविता करणारे रामदास सध्या "मराठी मुले सी.ई.टी.
याद्या
3525
""कालचक्र""
रम्य एक संध्या
कोमल गंधार,
कुसुंबी किनार
क्षितिजाला...
तेजस्वी रवीची
किरणे सोनेरी,
लाली गालावरी
संध्येच्या का !?!
मुग्ध प्रियतमा
संध्या ती आरक्त,
का 'रवी' आसक्त
'निशे'वरी !
दुखावली 'संध्या'
हळवा गंधार,
का क्षितिजापार
गेला सखा.....
हवेत गारवा
नभी चंद्र तारे,
मादक इशारे
निशेचेही...
आसुसला 'रवी'
निशेच्या छायेला,
कौमुदी कायेला
चंद्र साक्ष...
मिठीत 'रवी'च्या
'निशा'ही उन्मुक्त,
प्रकाश अव्यक्त
अंधारला...
मेघाचा मल्हार,
कित्येक प्रहर,
प्रणय कहर,
आसमंत.....
पहाट भैरवी
तिमिर छेदून,
गगन भेदून,
झंकारली.
लेखनविषय:
याद्या
6428
कधीच नाही
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही
त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही
डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही
जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही
जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही
जयश्री अंबासकर
लेखनविषय:
याद्या
4782
Taxonomy upgrade extras
डोरियन ग्रे
डोरियन ग्रे
"बिग बॉस मधून एकाचे पलायन"
कॅमेराच्या झगझगाटात
प्रश्नांची सरबत्त्ती..
सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत
तिथेच
आशाळभूतपणे उभी असणारी
झिपर्या केसाची,
पोट खपाटीला गेलेली मुले ..
कुणालाच दिसली नाहीत?
नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा
आणि बघण्याचा हट्ट
वाढतोच आहे...
एक कॅमेराचा झोत गेला की
मागे उरलेल्या अंधारात
अनेक जण सामावतात....
अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात
निवडक काहींना कधी कळणार?
कधी कळणार आम्हालाही?
की ..
लेखनविषय:
याद्या
3499
Taxonomy upgrade extras
सकाळचा "च्य़ा "
"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. ..
नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... "
"अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...."
"आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले.
" सक्काळच्या पारीचा "च्या" कसा पाइजी ठाव हाय का तुला?" आणि आबा चहाच्या वर्णात बुडाले...
याद्या
16477
माझ्यातल्या कवीला सूचना.... (माझ्या पुरत्याच इतरांनी राग मानू नये )
नाद सोड यमकाचा लेका, वजन विचारा देशील का ?
पुरे शब्दांची कारागिरी, अन आतुन येई ते लिहीशिल का ?
मुखड्याच्या दो शब्दांची, दोरी तू ओढसी किती ?
शब्दांचे भरताडच होते, भाव दाटला त्यात किती ?
सुखे बैसुनी गादीवरती, कविता जन्मा येत नसे !
पांघरुन वेदनेचे जगणे, दु:खाचे लागेल उसे !
-- आपला दळण छाप
लहरी सागर
लेखनविषय:
याद्या
1429
Taxonomy upgrade extras
पाठीराखा (ही नवीन कविता आहे)
पाठीराखा
हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर
आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर
कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो
शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो
विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते
त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते
विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते
मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते
पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले
भौतिकतेचे तामस मनातूनी सरले
आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल
प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
याद्या
3734
उद्याचे आकाश -सीईटी साठी सराव परीक्षा प्रकल्प.
बरेच दिवस मी आणि विनायक प्रभू अनेक शैक्षणीक विषयांवर आणि एकूण स्पर्धात्मक परीक्षांबद्दल चर्चा करत होतो. काही दिवसानंतर चर्चेचा रोख हळूहळू शहरी आणि ग्रामीण या फरकाकडे वळला. आर्थीक परीस्थीती आणि व्यावसायीक कोर्सेसला ऍडमिशन याची पण चर्चा झाली .सीईटीच्या परीक्षेतील यश ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्याची पण चर्चा झाली.
सर्वसाधारणपणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील यशापयशाचे टप्पे ठरवतात.
दहावीला चांगले गुण मिळाले तर अकरावीला चांगल्या ज्युनीअरकॉलेज ला प्रवेश .
ग्रामीण भागात हा फरक नाही कारण मार्क चांगले किंवा वाईट कॉलेज जवळजवळ तेच असते.
आता, शहरात हा फरक आहे.
याद्या
8470
मिसळपाव