हल्ला बोल
ढेकणाधिपतींनी घसा खाकरला आणि सभा सुरु केली.
________________________________________________________
मिपाच्या २ र्या वर्धापन दिनानिमित्त तात्या अभ्यंकरांनी 'मिपा विश्वसंमेलन 'भरवायचे ठरवले. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता.
निवासित अनिवासित सर्व सद्स्य संमेलनाला येणार होते. तात्यांनी कौल घेतला. विश्वसंमेलन पुण्याला करायचे ठरवले. सामिष, आमिष व शाकाहारी मेन्यु ठरला. हॉटेल बुकींग क्लार्क शी संभाषण करताना खुर्चीतल्या ढेकणाला ही बातमी कळाली. मंदीमुळे गेले २ वर्षे ह्या हॉटेल मधे 'पेस्ट कंट्रोल' झाले नव्हेते. तात्याना बघताच ढेकुण खुष झाला. येत्या मेजवानीची खबर त्याने सर्व ढेकुण समाजाला पोचवली.
मिसळपाव