Skip to main content

प्रकटन

आपण सगळेच अश्वत्थामे

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 14/07/2022 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.

सुंदर ते ध्यान

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 07/07/2022 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
ध्यास सावळ्या विठूचा मनी वाट पंढरीची चालावी चालावी... समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो.

महाराज की जय..

लेखक आजी यांनी सोमवार, 04/07/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र. एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?" तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत." मला काही कळलं नाही.

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

अलक - वारी

लेखक मालविका यांनी शनिवार, 02/07/2022 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
अलक १ भरपूर कष्टातून वर आलेला तो. लक्ष्मी आणि सरवस्ती दोघींचा वरदहस्त असलेला तो तरीही जरा अस्वस्थच असायचा. पाहिजे ते समाधान मिळेना. शेवटी कंटाळून मानसोपचार तज्ञ् गाठला. सगळं गाऱ्हाणं ऐकून झाल्यावर तज्ज्ञांनी हसून त्याला वारीला जायचा सल्ला दिला. त्याचा विश्वास बसेना तरीही त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी तो निघाला. त्या लाखो लोकांमधला एक झाला. त्यांच्यासारखाच पेहराव, त्यांच्यातच मिळून मिसळून वागताना तो स्वतःला विसरला. त्यांच्याबरोबर भजन म्हणत, अभंग गात त्यानेहि ताल धरला. इतर वारकर्यांबरोबर टाळ वाजवून नाचताना तो भान हरपला आणि मग त्याला जाणवलं. हेच तर हवं होत आपल्याला.

विनिपेग डायरीज-४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 20/06/2022 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग विनिपेग डायरीज विनिपेग डायरीज-२ विनिपेग डायरीज-३ टोरांटो ट्रिपचा शेवटचा दिवस मला अजूनही आठवतो.हॉप ऑन बसने दिवसभर शहरात फिरून आम्ही संध्याकाळी सी एन टॉवर बघितला आणि मग कॅब करून हॉटेलवर परत आलो.येताना रात्रीचे जेवण म्हणून एका ठिकाणी थांबून पिझ्झा खाल्ला. खरेतर माझा अंदाज चुकल्याने मी दोन मोठे पिझ्झा मागवले होते. पण कॅनडात प्रत्येक गोष्ट जरुरीपेक्षा मोठीच असते की काय कोण जाणे.

विनिपेग डायरीज-३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 10/06/2022 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा.... झाले असे की जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला तेव्हा सगळ्यांना असे वाटले की हे काहीतरी टेक्निकल फोन्स, इ पी बी एक्स मेंटेनन्स, व्हॉइस रेकॉर्डिंग अशा प्रकारचे काम आहे.

का ? का? का?

लेखक आजी यांनी गुरुवार, 09/06/2022 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा- १) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं.

‘पंजाब मेल’

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 04/06/2022 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.

शशक का चषक

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 03/06/2022 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक बिचारा....... "तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात, काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला", इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत. हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला. आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा. शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे. पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी. आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला.