Skip to main content

प्रकटन

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

मना घडवी संस्कार !

लेखक यशोधन वर्तक यांनी सोमवार, 27/02/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले.

आवारगी .....

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी ! कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!! गुलाम आली ने ही गझल गायली आणि आवारगी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली . आवारगी याची व्याख्या या ठिकाणी उनाडपणा ...म्हणजे राज कपूर च्या भाषेत " आवारा हु " अशी नाही. आवारगी याचा उर्दूतील खरा अर्थ म्हणजे मनाची संभ्रमित अवस्था. आज राज कपूरच्या नातवाचा म्हणजे रणबीर कपूरचा " रॉकस्टार " सिनेमा मी स्वाती आणि आदित्य तिघंच पाहत होतो. रणबीर ने रंगवलेला जॉर्डन बघत असताना कॉलेज च्या दिवसांची आठवण आली.

कालाय तस्मै नम:

लेखक यकु यांनी शुक्रवार, 24/02/2012 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही.

गुन्हेगारीचे राजकीयकरण ....

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमत वाहिनी वर प्रसारित झालेल्या " आजचा सवाल " या कार्यक्रमात ...राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर चर्चा झाली. राजकीय पक्षाचे प्रमुख आणि जबाबदार पदाधिकारी गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे का देतात नेते आणि उमेदवार गुंडांची मदत का घेतात किंवा घेतात की नाही ? असा साधारण चर्चेचा विषय होता . ही चर्चा बघताना आणि ऐकताना ..." सिंघम " सिनेमा बघताना जितकी करमणूक झाली नाही तेवढी करमणूक झाली. अनेक पक्षांचे नेते येवून गुंडांना निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल त्याची उपाययोजना करण्याच्या गप्पा मारत होते.

मुक्तछंद

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी खूप दिवसांनी "खट्टा मीठ " सिनेमातील " थोडा है थोडे की जरुरत है " गाणे लागले होते......आधी खूप वेळा हे गाणे ऐकले होते पण आज मूड जरा वेगळा होता....जरा विचारात पडलो ...नेमकं काय सांगायचं आहे गीतकाराला या गाण्यातून... हा विचार मनात आला ....... आपल्या रोजच्या जगण्याचे जणू प्रतिबिंब यातून डोकावते आहे ........बघा ना.....

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

लेखक मालोजीराव यांनी रविवार, 19/02/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली.

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 18/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.

सुदर्शन पटनायक

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 17/02/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
वाळू! केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!

" ....आभास.... "

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 16/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ... हळुवार येशील आयुष्यात ...अस कधी वाटलच नव्हत .. मनाच्याही मनातल सांगशील असही कधी वाटल नव्हत .. स्पर्शाची भाषा ..सहवासाच जग ..मला कधी अनुभवायला मिळेल असही कधी वाटल नव्हत ... पण तू आलास आयुष्यात असाच अगदी हळुवार ..पावलांचा आवाजही न करता ..... बर्याच दा मागे वळून पाहिलं ..पण तू कधी दिसायचास ..तर कधी ओझरता तुझा भास व्हायचा .. मला कळायचच नाही ..मला नक्की कशाचा भास होतोय ..तुझा कि तुझ्या श्वासांचा .. सतत चाहूल लागायची कि चालताना बोलताना .तू माझ्या जवळ आहेस .. तुझ्या पावलांवर माझ पावूल पडतंय ..तुझ्या चेहेर्यावर माझी सावली पडतेय ..तुझ्या पापण्यात माझी आठवण साठ्तेय .... पण खरच तुझा म