Skip to main content

प्रकटन

जॉय मुखर्जींना विनम्र अभिवादन..!

लेखक कॉमन मॅन यांनी शनिवार, 10/03/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अतिशय आवडते सिनेकलावंत जॉय मुखर्जी यांना काल देवाज्ञा झाली. १९६० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांतून चांगली कामे केली. त्यांना गाणीही खूप छान मिळाली. त्यांच्यावर आणि साधनावर चित्रित झालेले 'आप यू ही अगर हमसे मिलते रहे..' हे खूप छान गाणे आत्ता आम्हाला या निमित्ताने आठवत आहे. जॉय मुखर्जींच्या आत्म्यास सद्गती मिळावी, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.. -- कॉमॅ.

एकात एक...

लेखक गवि यांनी बुधवार, 07/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..

कबुतर...

लेखक मदनबाण यांनी रविवार, 04/03/2012 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी हा पक्षी आपल्या ( पक्षी:- माझ्या) लयं म्हणजी लयं डोक्यात जातो बघा ! का ? कसं हाय बघा, ते रस्त्यावरच्या मोकाट कुत्तरड्यां नंतर माझ्या साखर झोपेचे पार खोबरं करण्याचा मोलाचा वाटा ही मंडळी उचलत्यात ! च्यामायला ! नाय तांबड फुटल आकाशा मंदी तर् ह्यांच हुं हुं हुं हे असल इचित्र ओरडनं चालु व्हतं बघा ! बाकीचे पक्षी कसं गोड गात्यात... पर ह्यो काय इचित्रच आवाज काढतो ! पार डोक्याची ( हे हे हे समजलचं असलं तुम्हासनी ! ;)करुन टाकतो. कुत्र्यांन नंतर माणसांच्या वातावरणाशी जुळवुन घेणारी ही जमात...ज्या पशु पक्षांना जमले नाही त्यांची संख्या कमी झाली,म्हणजी चिमनी,कावले... पर ह्याची प्रजा अमाप वाढली !

बोंबाबोंब...

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 02/03/2012 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20863 हा धागा.. खरं तर ह्यावर प्रतिक्रीया देवून थांबणार होतो, पण "अंगापेक्षा बोंगा जड" होईल म्हणून म्हटलं वेगळा धागाच काढूया.. (त्यातल्या रणजितजींच्या प्रतिसादावरुन शिर्षक सुचलंय. "अभ्यासु" टायपातलं आणि विषयाशी फारसं निगडीत नाही, त्यासाठी सॉरी बॉस.. ;-)) ************************************************************** माझ्या मेघालयावरच्या लेखावर प्रतिक्रीया देणार्‍या काही जणांनी इथल्या जेवण-खाणाबद्दल विचारलं होतं. आसामप्रमाणेच इथेही मुख्य खाद्य म्हणजे भात.. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे नसतात.

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

अमृतानुभव

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 01/03/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशित) स्प्रिंग फेस्टचा पहिला दिवस. सकाळपासूनच विविध वर्कशॉप्सची रेलचेल होती. सकाळी काही कुठे गेलो नव्हतो; पण संध्याकाळी मात्र "अनुभव"(फ्युजन संगीत मैफल) ला जायचेच असे ठरवले होते. दुपारी कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो. कॉन्सर्टला पंडित विश्वमोहन भट येणार असल्याने त्याला माझ्या लेखी विशेष महत्त्व होते. संध्याकाळी ५ वाजता असणारी कॉन्सर्ट ६ वाजता चालू झाली. प्रचंड मोठ्ठी रांग बघून मला आत जायला मिळेल की नाही याची चिंता लागली होती. रांगेतच एक मित्र गाठ पडल्याने रांगेत मध्येच घुसणे शक्य झाले.

मला ईश्वर भेटला ....!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला ईश्वर भेटला ! कोपऱ्यावरचा बनिया नव्हे हो..! खराखुरा ईश्वर ! कसा ते ऐकायचंय ? अगदी अलीकडची आठवण म्हटली तर गेल्या आठवड्यातली गोष्ट. कामवाल्या सरूच्या ३ वर्षाच्या नातवाला बाळदमा आहे. ‘रातसारी खोकतोय हो पोर ताई !’ सरू म्हणत होती ‘औशीदबी लागू पडना.’ घरात एक सितोपलादी चुर्णाची बाटली होती. तिला दिली अन सकाळ संध्याकाळ पाव चमचा गरम पाण्यातून द्यायला सांगितलं. ४ दिवसांनी हसऱ्या चेहऱ्याने सरू सांगत आली ‘ताई, खोकला पार बंद झाला वो नातवाचा ! लई चांगलं औशीद दिलासा बगा .’ तेव्हा तिच्या हसऱ्या डोळ्यात मला ईश्वर भेटला ....! विनू माझ्या मुलाचा शाळूसोबती मित्र. चौथीनंतर शाळा बदललेल्या पण मैत्री कायम.