मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

हॅरी पॉटर - भाग सहा

nishapari ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जेम्स आणि लिलीची हत्या झाली तेव्हा पीटरने विश्वासघात केला ही गोष्ट सिरियसच्या लक्षात आली . जेम्सवर त्याचं भावापेक्षाही अधिक प्रेम होतं . तो संतप्त अवस्थेत पीटरला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यामागे गेला . त्यांची गाठ अनेक मगल लोक असलेल्या रस्त्यावर पडली . मात्र सिरियसपेक्षा पीटर चपळ ठरला . " तू लिली आणि जेम्सचा विश्वासघात केलास " असं मोठ्याने ओरडून पीटरने एक मोठा जादुई स्फोट घडवून आणला , या स्फोटात 12 मगल लोक मृत्युमुखी पडले . याचवेळी आपलं एक बोट पीटरने कापलं आणि क्षणार्धात उंदराच्या रुपात परिवर्तीत होऊन तिथून पळून गेला .

सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

सरनौबत ·
लेखनप्रकार
महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला. ‘खानावळ’ ह्या नावाला अजिबात न शोभणारी स्वछता आणि टापटीप दिसत होती.

दिवस तुझे ते ऐकायचे....

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. अशातच मिपावर ‘ प्युअरसोतम - ला – देस्पांद’ हा धागा वाचनात आला. त्यात पुलंच्या आपल्याला आवडलेल्या वाक्यांची नोंद वाचकांनी केलेली आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

साहित्य संपादक ·
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

काही नाजूक स्वप्नं...

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा सहज टीव्ही चाळता चाळता एका चॅनलवर 'कुछ कुछ होता हैं' दिसला. बास्केटबॉल कोर्टवर राहुल आणि अंजलीची बालिश अशी भांडणे सुरु होती. थोडा वेळ बघत बसलो. हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता आणि तुफान चालला होता. गाणी सगळी हिट्ट झाली होती. मनात विचार आला. हा चित्रपट जर आता आला असता तर चालला असता का? सध्याच्या तरुण प्रेक्षकांची आवड आमुलाग्र बदलली आहे. आमच्यासाठी मात्र हा चित्रपट एक स्वप्न होते. त्या साली मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होतो. 'कुछ कुछ...' मध्ये स्वपनवत वाटू नये असे काहीच नव्हते.

लाजणे

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
. प्रेमातला लाजणे हा सर्वात सुंदर भाग आहे, नजर खाली झुकवणे, गाल आरक्त होणे, चेहरा ओंजळीत लपवणे, डोळे झाकून घेणे, ओढणीने चेहरा लपवणे किंवा तोंड वळवून पाठमोरे बसणे .. एक ना अनेक प्रकार प्रेमातला तो लज्जा भाव खूप रोमँटिक असतो हे सगळं नसतं तर प्रेम अगदी शुष्क व नीरस झालं असतं .. कवीने म्हटलंच आहे जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! भावना व्यक्त तर कराव्याश्या वाटतात पण लज्जेने डोळ्यास ड

नारळीकर आणि अत्रे - त्यांच्याच पुस्तकातून...

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या दोन-तीन महिन्यात दोन चांगली मराठी पुस्तके वाचली. अतिशय आवडली. दोन अतिशय प्रतिभावंत मराठी दिग्गजांची ही पुस्तके वाचून मी खूप प्रभावित झालो. काही ठळक बाबी या ठिकाणी मांडाव्यात म्हणून लिहायला बसलो. चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचले. जयंत नारळीकर हा किती अफाट माणूस आहे हे या पुस्तकातून कळते. या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बनारस, केंब्रिज, मुंबई, आणि पुणे या चार शहरांमध्ये व्यतीत केलेला काळ उभा केलेला आहे. नारळीकरांचे वडील आणि दोन मामा रँग्लर होते.

पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले मेगॅ-क्रॉसवर्ड सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे: ‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’ ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि जाम अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण.

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

नाखु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर***** जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला. त्यात मुलायमसिंग, लालूप्रसाद यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हेगडे,शरद यादव यांचे धोरणी दूरदृष्टी मनसुबे याचा परिपाक म्हणून देवेगौडा यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही. अगदी तसेच कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले (पंतप्रधान होतीलच म्हणून) अश्या फारसं उपद्रवमूल्य नसलेल्या व्यक्तीला (फक्त कॉंग्रेस ला एकनिष्ठ राहिले आहेत हा बोनस गुण) मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. आता हे माहीत असलेलेच तपशील पुन्हा