मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिळू जाउनि इंग्रजी सागराला

वेल्लाभट ·

In reply to by माहितगार

वेल्लाभट 24/11/2015 - 11:47
विश्वास मराठीप्रेमाने देण्यापेक्षा, पालकांनी द्यायला हवा. एकमेकांनी एकमेकांना द्यायला हवा. पुढे मोठं झाल्यावर स्वतःच स्वतःला द्यायला हवा.

In reply to by वेल्लाभट

माहितगार 24/11/2015 - 14:21
'म्हणजे नेमके काय ?' ते व्यावहारीक दृष्ट्या व्यक्त न करता येण्यात तर गोची होत नाहीए ना ? नुसत्या म्हणण्याने विश्वास निर्माण होताना दिसत नाहीए नाही तर या धागा लेखास प्रयोजन राहीले नसते म्हणजे विश्वास निर्माण करण्यात व्यावहारीक दृष्ट्या कुठेतरी काही तरी कमी पडते आहे अशी रास्त शंका वाटते.

माध्यमावर फारसं काही अवलंबून नसतं हो! ते पोरांवर अवलंबून असतं.... पोरगं जर हुशार असेल तर माध्यम मराठी असो, हिंदी असो, वा इंग्रजी, ते झळकून उठतंच! आणि ते पोरगं जर ढ ढगातलं असेल तर तुम्ही त्याला अगदी जेकेमध्ये घाला, काऽऽही फरक पडत नाही... हां, आता जर पोराला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला इंग्रजी माध्यमात घालणं माझ्या मते चांगलं. म्हणजे मग त्याची अकरावी, बारावी आणि फर्स्ट इयर जरा सुसह्य होतात!!! पोरांना काय सोपं पडेल याकडे आईबापांनी लक्ष द्यावं. आईबापांचे स्वतःचे दुराभिमान फाट्यावर मारून!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:09
तुमची गल्लत झालेली दिसते. नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच. आणि तरीही हे एकदा वाचाच. http://www.unesco.org/new/en/education/themes/strengthening-education-systems/languages-in-education/multilingual-education/ http://www.unesco.org/education/education_today/ed_today6.pdf http://unesdoc.unesco.org/images/0012/001297/129728e.pdf http://unesdoc.unesco.org/images/0016/001611/161121e.pdf

In reply to by वेल्लाभट

तुमची गल्लत झालेली दिसते.
असं? काय नेमकी गल्लत झाली ते सांगा बॉ!
नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच.
विचार करूनच सांगतोय, आपल्या मुला-मुलींचं भविष्य महत्वाचं की इंग्रजीव्यतिरिक्त माध्यमाचा आग्रह महत्वाचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मात्र व्हर्नाक्युलर माध्यम घेतल्यावर सायन्सला गेलेल्या मुलांचा अकरावी/बारावीमध्ये पिट्ट्या पडतो हे सत्य आहे...
आणि तरीही हे एकदा वाचाच.
युनेस्कोच्या लिंका देऊन तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांत काही साध्य होत नाही हो! १. मुळात विद्यार्थी हुशार हवा, बहुसंख्य तसे नसतात. २. हूशार विद्यार्थ्याला माध्यम कोणतंही असलं तरी यशस्वी करियर करण्यात फारसा अडथळा येत नाही. ३. सायन्सकडे कल असल्यास इंग्रजी माध्यम असल्यास जास्त सोपं पडतं हे माझे मुद्दे. आता करा प्रतिवाद.

In reply to by पिवळा डांबिस

मी तुमच्याशी उगाच हा वादासाठी वाद म्हणून घालत नाहिये. तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. (कॉमर्स/ आर्ट्सची काय परिस्थीती आहे ते मला माहिती नाही म्हणून त्याविषयी काही बोलू शकत नाही) बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते. म्हणून हा चर्चाप्रपंच!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:51
तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
काही अंशी यात तथ्य असलं तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुलगा हुशार असेल तर it does not trouble him much. तो/ती चटकन आत्मसात करतात. टेक्निकल टर्म्स फक्त बदलतात, बाकी इंग्रजी त्याला येत असतंच. आम्ही सोसलं तुम्ही सोसा... असा विचार कुठलाही सुजाण पालक करणार नाही. इंग्रजीत टाकू हा विचार जसा मुलाच्या भल्यासाठी करतात तसाच मराठीत टाकू हाही भल्यासाठीच केलेला विचार आहे. पण भलं नक्की कशात आहे हा प्रश्न आहे.

In reply to by पिवळा डांबिस

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 12:56
बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते.
दुसरे कारण असते की नाही हे माहित नाही पण बहुतांश वेळा पहिले कारण नक्कीच असते. मी पण त्याच सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी खूप काही दिले हे पण नक्कीच. तरीही नव्या काळाची पावले लक्षात घेऊन शाळेने योग्य निर्णय घेतला असे मला वाटते. तो निर्णय घेतला नसता तर काही वर्षांनी शाळा बंद झाली असती अशी भिती वाटते.तसे झाले असते तर अजून वाईट वाटले असते. मला वाटते की शाळेच्या माध्यमापेक्षा विचार कसा करायचा, प्रश्न कसे विचारायचे इत्यादी गोष्टी, ज्याला शिक्षणपध्दती म्हणता येईल ती अधिक महत्वाची आहे.मी शाळेत असताना ही शिक्षणपध्दती भलतीच उच्च दर्जाची होती हे नक्कीच. ती शिक्षणपध्दती तशीच ठेवली किंबहुना आणखी चांगली केली की झाले. मग शाळेचे माध्यम ही दुय्यम गोष्ट आहे. (माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही जास्त शिक्षणसंस्थांचा विद्यार्थी म्हणून राहिलेला आणि त्या अनेक संस्थांपैकी केवळ दोन संस्थांनी खरोखरची व्हॅल्यू अ‍ॅडिशन केली असे मानणारा आणि त्या दोन संस्थांपैकी सरस्वती सेकंडरी स्कूल ही एक आहे असे मानणारा आणि शाळा अजूनही मिस करणारा) ट्रुमन

In reply to by पिवळा डांबिस

sagarpdy 24/11/2015 - 12:12
पोरगं बालवाडीत असताना कसं समजावं हो त्याला कि सायन्स कशाशी खातात ते ? आवड-बिवड नंतरची गोष्ट ! आणि काही फरक पडत नाही भाषा बदलाने. इंग्रजी माध्यमातून येउन ११ वि थोडी सोपी जाते हे खरं, पण पुढे फार फरक पडत नाही.

In reply to by मोगा

वेल्लाभट 24/11/2015 - 12:20
ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली. म्हणून त्यावर लिहिलं.

In reply to by वेल्लाभट

महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली.
ही गोष्ट महत्वाची तर आहेच! पण का? तुम्ही त्या शाळेच्या संचालकांना विचारून पाहिलंत का? काय म्हणतात ते?

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:40
तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो होतो. त्या आधीही जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली होती. तरीही निर्णय झाला शाळेचा. मग बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पालकांना, तिथे गेलो. तिथे त्यांनी जे प्रतिवाद केले ते धाग्यात दिलेत ना! 'वृथा अभिमान, उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी'

In reply to by वेल्लाभट

उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी
कारण प्रत्येक मराठी/भारतीयाला आपला मुलगा/मुलगी इंजिनियरच व्हायला हवा/वी असते ना! :) सुतार, शिक्षक, वार्ताहर वगैरे व्हायला कितीजणांना चालेल? पूर्वी डॉक्टर चालायचं पण आता एमडी होउनही प्रॅक्टिस करण्यातल्या अडचणी दिसल्यापासून ते ही थंडावलंय!!! मला कधीकधी प्रश्न पडतो की वर्षानुवर्ष इतके इंजिनियर्स काढूनही भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं केविलवाणं का? :)

राही 24/11/2015 - 12:37
ही एक लाट असते. कदाचित तात्पुरती, कदाचित टिकाऊ. व्यावहारिक फायदा जेव्हा उरणार नाही तेव्हा ती आपोआप विरून जाईल. मागणी तसा पुरवठा हा नियम आजच्या मार्केट-ड्रिवन समाजव्यवहाराला लागू आहे. त्यातून शिक्षणक्षेत्र कसे सुटेल? आणि वैचारिक आक्रमणाऐवजी वैचारिक मंथन, घुसळण हे शब्द जास्त योग्य वाटतात. भाषा 'हाय लेवल' वाटते याचा अर्थ ग्रांथिक भाषेची व्यवहारभाषेपासून फारकत होते आहे. व्यवहारभाषा ग्रांथिक भाषेला ढकलू पाहाते आहे. आज जर सर्वसामान्य व्यवहाराचे, क्रियाप्रक्रियांचे रूप बदलले असेल तर हे बदल अभिव्यक्त करणारी भाषासुद्धा बदलेलच. संस्कृतीच्या प्रत्येक बदलटप्प्यावर भाषा बदलते. कृषिसंस्कृतीतून यांत्रिक आणि आता डिजिटल संस्कृतीत येताना फार मोठी भाषिक उलथापालथ होणारच. भारतीय द्वीपकल्पात शहरीकरण किंवा सिटीज़ (सिटीस्टेट्स- हा थोडासा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, तरीही) तीन टप्प्यांत झाले असे साधारणपणे म्हणतात. १)हडाप्पन काळ २) ई.स.पू.६००-क्रिस्तोत्तर ३०० (नंद-मौर्य-नाग-शिशुनाग-शुंग-कुशाण-क्षत्रप-गुप्त-सातवाहन-वाकाटक)- हा प्रदीर्घ काळ होता आणि या दरम्यान कितीतरी संस्कृतीबदल, भाषाबदल झाले.३)मुघल ते वसाहतकाळ आणि नंतर. काळाच्या या प्रदीर्घ पटावर भारतीयांच्या राहाण्यासहाण्यात, बोलण्याचालण्यात, वावरण्यात किती बदल झाले असतील याची कल्पनाही अशक्य आहे. नवे व्यवहार अभिव्यक्त करण्यासाठी प्रचलित भाषा कमी पडत असेल तर तिची जागा नव्या संकल्पना आणि त्यांना साजेसे शब्द असलेली भाषा घेणारच. महाराष्ट्र हा भूभाग राहाणार आहे ना? त्यात वसणारे ते महाराष्ट्रीय असणार आहेत ना? मग हे महाराष्ट्रीय जी भाषा बोलतील ती मराठीच असेल. फक्त ती सध्याच्या मराठीसारखी नसेल. कदाचित इंग्लिशमिश्रित असेल, पण अधिक अर्थवाही, अधिक समृद्ध असेल. आणखी एक छोटासा मुद्दा: लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून? मागणी/क्रेझ्/ट्रेंड या महापुराला अडवण्यात अर्थ नसतो. एकदा लोंढा वाहून गेला, की कालान्तराने उरतो तो निवळशंख शांत इतिहासप्रवाह. आपल्याच गतीने वाहाणारा आणि मधल्या प्रलयाची, नासधुशीची आठवणही न ठेवणारा. किंवा केवळ स्मरणरंजनात्मक खुणा ठेवणारा. बाकी सरस्वती शाळेविषयीचे आपले पोटतिडिकीतून आलेले निवेदन आपल्या जागी रास्त आहे. त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.

In reply to by राही

वेल्लाभट 24/11/2015 - 13:53
लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून?
ती तशीही होतेच की इंग्रजीतून शिकल्यावर. सवय म्हणजे सतत बोलण्याची नव्हे. माझं उदाहरण देतो, मी आणि माझा मित्र आमच्या पालकांचा सल्ला मनावर घेऊन संध्याकाळी ठराविक वेळी इंग्रजीत बोलत असू. मुद्दाम. त्याने बोलायची सवय लागली, भीती गेली. अशातच इंग्रजी गाणी, पिक्चर इत्यादींची ओळख झाली. आमच्या एका क्लासच्या बाईंनी मुद्दाम आम्हा विद्यार्थ्यांना बोलवून घरी व्हीसीआर वर इंग्रजी पिक्चर दाखवला होता मला आठवतं. बेन हर पिक्चर होता. त्यामुळे, सवय लावणं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे असे एफर्ट्स घेतले तर फायदा होतो.

गामा पैलवान 24/11/2015 - 13:07
वेल्लाभट, इंग्रजी माध्यम म्हणजे यशाचा हमखास मार्ग असं समीकरण जनतेच्या मनात निर्माण झालं आहे. आपण मराठीप्रेमींना हे मोडीत काढायचंय. इंग्रजीच्या तुलनेने मराठी कुठेही कमी नाही. मराठी माध्यमांतून शिकणाऱ्यांना इंग्रजी बोलण्याचा (हो, फक्त बोलण्याचा) सराव होईल असा काही उपक्रम सुरू करता येईल का? उदाहरणार्थ बोली इंग्रजीचा तास घेणे, इंग्रजी सिनेमा पाहणे, इत्यादि? थोडं अवांतर : तुम्ही सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी आहात हे वाचून आनंद झाला. मी त्या शाळेचा विद्यार्थी नव्हतो, मात्र त्या शाळेशी बऱ्याच सुखद आठवणी निगडीत आहेत. (नाही, त्या शाळेतल्या एकाही पोरींवर लाईन मारलेली नाही.) शैक्षणिक जगाशी संबंधित आठवणी आहेत. या शाळेस इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेसे वाटणे हे क्लेशदायी आहे. आ.न., -गा.पै.

'फाड फाड इंग्रजी बोलणं म्हणजे हुशार माणूस' ह्या गैरसमजातून इंग्रजी माध्यमांनी आपल्याकडे मुळ धरले आहे. मातृभाषेच्या माध्यमातून शिकताना एक दोन विषय इंग्रजीत असावेत असे मला वाटते. जसे, विज्ञान, गणित आणि इंग्रजी इ.इ.इ. बाकी विषय मातृभाषेतच शिकावे/शिकवावे. इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलेही इंग्रजी भाषेत काय तारे तोडतात हेही पाहिले आहे. सगळेच तसे नसतात तरी इंग्रजी माध्यमाचा सर्वांनाच फायदा होतो हा गैरसमज नसावा म्हणून. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये. आपले मराठी पालकच मातृभाषेबद्दल उदासिन दिसून येतात. गुजराथी, दाक्षिणात्य मातृभाषाभिमानी आढळतात. मातृभाषेबद्दलचे प्रेम पालकांनीच आपापल्या पाल्यांना लावले पाहिजे. त्या करीता आधी त्यांना मातृभाषेबद्दल नितांत प्रेम असणे आवश्यक आहे. मराठी बोलणे, वाचणे, ऐकणे हे घरातूनच घडले पाहिजे. पण चित्र तसे दिसत नाही. एखाद्या पाहुण्याने मराठीतून नांव विचारल्यावर मुले फक्त आपले नांव सांगतात. पण 'आडनांव काय?' विचारल्यावर बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आपल्या मुलाला विचार करायला वेळ न देता आई लगेच सांगते, 'अरे! सरनेम सांग अंकलना.' असे त्याला सांगून पाहूण्यांसमोर मुलाची आणि आपली 'लाज(?)' सांभाळायचा प्रयत्न आई करते. दोन सख्ख्या मराठी बहिणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलतात आणि आई म्हणते 'अरे! नाही कळत त्यांना मराठी'. काय बोलणार? मुळात आईवडिलांनाच मातृभाषेची आस नसते आणि मुलांनी इंग्रजीतून केलेल्या संभाषणाचा अभिमान वाटतो. मी मराठीतूनच शिकलो. इंग्रजी एक विषय होता. पण इंग्र॑जी भाषेचा पास होण्याइतपतच अभ्यास केला आणि बोलण्याचा, लिहीण्याचा, वाचण्याचा सराव केला नाही त्याने थोडे नुकसान नक्कीच झाले. पण तो सराव केला तर इंग्रजी माध्यमाची गरज कोणालाच भासू नये. पण आजही, इंग्रजी माध्यंमातून शिकलेल्या माझ्या अनेक मित्रांपेक्षा इंग्रजी संभाषणात, लेखनात मी मागे नाही. कांहीच्या तर चार पाऊले पुढेच आहे. मराठी वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. इंग्रजी माध्यमाचा अनुभव नसल्याकारणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणपद्धतीवर आणि व्यक्तिमत्व विकासावर (भाषे व्यतिरिक्त) भाष्य करू शकत नाही. येत्या २०-२२ वर्षात काळ कसा बदलणार आहे ह्याचा अंदाज येत नसल्यामुळे बहुसंख्य पालक मुलांच्या शिक्षणाबाबत, माध्यमाबाबत जोखिम उचलू इच्छित नसतात. कदाचित, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे (आणि इंग्रजी भाषेचा सराव न केल्याने) त्यांना इंग्रजी संभाषणाबाबत अडचणी येत असाव्यात किंवा तितकासा आत्मविश्वास वाटत नसावा. त्यामुळे आपण मातृभाषेत शिकलो ह्याचे वैषम्य न वाटताही जरा न्यूनगंड नक्कीच वाटत असावा. त्यामुळे अशी 'चूक' ते मुलांच्या बाबतीत करू इच्छित नसावेत.

संदीप डांगे 24/11/2015 - 13:55
ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. पण निमित्तकारणे आपण लेख टाकलात, म्हणून ठिक आहे. 'सरस्वती' ही आम्ही ठाण्यात राहिलो असतो तर एकमेव निवड असती. शाळा असली तरी व्यावसायिक संस्था असल्याने बंद पडण्यापेक्षा काळानुसार बदलणे परिहार्य आहे. कुठल्याही संस्थेचा एकदा मोठा डोलारा झाला की फक्त तत्त्व आणि ध्येयांवर अवलंबून राहून टिकून राहणे होत नाही. काही व्यावसायिक तडजोडी स्विकाराव्याच लागतात. सरस्वती आपले वेगळेपण जपूनच इंग्रजी माध्यम सुरू करत असेल तर स्वागतच आहे. मराठी माध्यमांत शिकायला असणार्‍या पाल्यांच्या पालकांना, प्रवाहासोबत वाहत नसल्याने, सामाजिक दबाव-अपमान-कुत्सित बोलणे सहन करावे लागते, प्रत्येक पालकास हे सहन करणे शक्य होत नाही. त्यामुळे सरस्वतीने हा निर्णय घेतला असावा. युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे. प्राथमिक शिक्षणाला पोटापाण्याच्या कारणापर्यंत ताणणे इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करणार्‍यांना योग्य वाटते. ह्याच मानसिकतेतुन सहा महिन्याच्या मुलांनाही शाळेत टाकण्याच्या हालचाली सुरु असतात. गर्भसंस्कार हे त्याच्याही पुढचे पाऊल. बाकी, प्रत्येक पालक आपल्या पाल्याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र असला तरी सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे असोच.

In reply to by संदीप डांगे

वेल्लाभट 24/11/2015 - 14:10
युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे.
अनुमोदन. मुद्दा फक्त मराठीचा नाहीच आहे मुळी; पण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत म्हणून मराठी. अस्मिता वगैरे राजकीय शब्द झालेत आता.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 13:57
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं.
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये
पेठकर काका - समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? मला खरंच काही कळत नाही . आपण मराठीत शिकलो, मुले इंग्लिश मधे शिकली आणि मराठी पण बोलतात. कदाचित त्यांची मुले इंग्लिश मधे शिकतील आणि मराटीत अजिबात बोलणार नाहीत. ठीक आहे ना. बदल तर होतच असतो. हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 24/11/2015 - 14:14
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही.
ठीक आहे मग. राहिलं! तुम्ही शास्त्रीय पुरावा तपासा; किंवा ज्या संस्थेने हा विचार मांडलाय, (युनेस्को) त्या संस्थेशी संपर्क साधा, विचारा. मी त्या संस्थेची विश्वासार्हता लक्षात घेऊन त्याकडे बघतो. आणि माझी मतं आहेत ती वेगळी; केवळ युनेस्को म्हणते म्हणून लगेच मीही, अशातला भाग नाही.

In reply to by प्रसाद१९७१

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 14:17
हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते.
अशी मनोवृत्ती असलेले लोक प्रचंड डोक्यात जातात राव.
फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?
सहमत आहे

In reply to by प्रसाद१९७१

>>>>समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? काहीच हरकत नाही. देऊ या की बळी. त्यात काय मोठं. अजून कांही पिढ्यांनंतर, शेजारची बाई सुंदर आणि श्रीमंत आहे, सध्या तिलाच सगळे भाव देत आहेत तर आपल्या आईला सोडून तिलाच आई म्हणूया नं. असाही विचार पुढे येईल, काय सांगावे. तेव्हाही काही फरक पडणार नाहीच. >>>> "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. पण असे म्हणणार्‍यांची मते विचारातच का घ्यावीत? तशी ते जबरदस्ती तर करीत नाहीत नं? हसून सोडून द्यावं, राहू दे की त्यांना त्यांच्याच जुनाट काळात खितपत. मी तर म्हणतो अशा जुन्या खोडांना मिसळपाव ह्या संस्थळावरच बंदी घालावी. आणि त्यांचे सद्स्यत्वच रद्द करुन टाकावे म्हणजे ते आपल्या मतांची पिंक इथे टाकू शकणार नाहीत. पाहा जमलं तर. नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? होsss! आवडतं की. जुन्या गाण्यांचे प्रोग्रॅम किती तरी हाऊसफुल्ल असतात. कॉलेज कुमारही जुन्या गाण्यांमध्ये रमतात. (मला तेव्हढा मोठा मुलगा आहे. तो आणि त्याचे मित्र ऐकतात राजकपूरची, देवानंदची गाणी) शिवाय, मनाला रुचेल असे नविन कांही जमत नसल्यामुळे, फ्यूजनच्या नांवाखाली, पुन्हा जुन्या जुन्या गाण्यांनाच 'नविन' म्हणून (थोडे इंग्रजी मिसळून) सादर केले जाते. सर्व तरूणाई त्यावर थिरकताना रोज रोज टिव्हीवर दिसतंच असतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:04
पेठकर काका - स्पेसिफिकली तुमच्या कडुन हे अपेक्षीत नव्हते. तुमच्या सारख्या चाकोरी सोडुन झेप घेऊन कर्तृत्व दाखवणार्‍या माणसानी असे म्हणणे खरोखर च अपेक्षीत नव्हते.

In reply to by प्रसाद१९७१

'हे' म्हणजे काय? कांही चुकीचे बोललो आहे का? माझ्या मूळ प्रतिसादात मी म्हंटले आहेच मराठी शाळेत वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. चाकोरी बाहेर पडण्याचे मूळ ह्या व्यक्तिमत्व विकासाच्या पायाभरणीत आहे. जे मला मराठी शाळेतूनच मिळाले आहे. शिवाय माझ्या सातवी पास (मराठी माध्यम) आईने सतत मागे धोशा लावून सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून, नाटकांमधून भाग घेण्यास भाग पाडण्याच्या संस्कारांमध्ये आहे. असो तो सर्वस्वी वेगळा विषय आहे. इंग्रजी माध्यमांच्या विरोधात मी नाही. पण मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातल्यावर त्यांच्या पालकांवर दुहेरी जबाबदारी येते. इंग्रजी भाषेतून मुलांचा अभ्यास घेणे, त्यांची भाषा (इंग्रजी) शुद्ध आणि ओघवती राखणे आणि त्याच बरोबर मराठी भाषेबद्दलही त्यांच्या मनांत प्रेम रुजविणे. मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर मुलांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास घेणे आणि इंग्रजी संभाषण कलाही त्यांना आत्मसात करायला लावणे ही जबाबदारीही येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

राही 24/11/2015 - 15:10
जुने वाईट ठरत नाही तर ते कालबाह्य ठरते. जुन्या गाण्यांचा एखादा कार्यक्रम हाउस फुल ठरतात पण जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? आणि बळी वगैरे जात असतो असे म्हणायचे झाले तर तो भाषेच्या एतत्कालीन रूपाचा जात असतो. भाषेचा नाही.

In reply to by राही

>>>>जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? आजच्या पिढीला जुने संगित आवडते का? ह्या प्रश्नावर ते माझे उत्तर आहे. त्यामुळे त्यांनाही ते आवडते इतका त्याचा मर्यादित अर्थ आहे. तुमचा प्रश्न वारंवारीतेचा आहे. त्यावर, पूर्वीच्या काळाच्या मानाने, आता करमणूकीचे एव्हढे पर्याय उपलब्ध आहेत की असे कार्यक्रम वारंवार होऊ लागले तर तेव्हढी गर्दी नक्कीच जमणार नाही. पण ही परिस्थिती नव्या संगिताचीही आहे. नवे संगित जरी वरचेवर कार्यक्रमातून सादर केले तरी गर्दी होणार नाही. >>>>पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? मॅटीनी शोज हे कॉलेजच्या वेळात॑ कॉलेज कुमारांना आकर्षित करण्यासाठी केले जात. थिएटर रिकामे ठेवण्याऐवजी एक शो ठेवून कॉलेजकुमार-कुमारींचा मोठा वर्ग आकर्षित करायचा ही व्यावसायिक गणितं असतात. रेग्यूलर शोजला आधुनिक चलनी चित्रपट जे कोणी पाहिलेले नसल्याने जास्त गर्दी खेचतात आणि मॅटीनीला जिथे नोकरी/व्यवसाया मुळे कुटुंब वत्सल प्रेक्षक येत नाही पर्यायाने थिएटर रिकामे जाते. अशा वेळी कॉलेज कुमार/कुमारी. जे कॉलेजच्या वेळात, कॉलेजचे तास बुडवून, विविध कारणांसाठी थिएटर जवळ करतात. घरच्यांना वाटते आपला बाबा/बाबी कॉलेजला गेली आहे. सो सेफ. १२ ते ३ ला मिश्र गर्दी असते. कॉलेज कुमारही असतात आणि श्रमिक वर्गही असतो. इथे तिकीट रेट जास्त असतो. मॅटीनीला निव्वळ कॉलेज कुमार असल्याने त्यांच्या पॉकेटमनीमधे बसेल असे रेट असतात आणि म्हणूनच जुने चित्रपट दाखविले जातात जे चित्रपट लायब्ररी/डिस्ट्रिब्यूटर कडून 'स्वस्तात' मिळतात. ही सर्व व्यावसायिक गणितं आहेत.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 14:00
खरा धोका हिंदी कडुन आहे. हल्ली च्या कॉस्मो युगामुळे पहिली- दुसरीतली मुले एकमेकांशी हिंदीतुन बोलताना बघितली आहेत. हिंदी तर अतिशय भंकस भाषा आहे मराठीच्या तुलनेत सर्वच बाबतीत. त्यापेक्षा इंग्रजी बोललेले बरे. ( किंवा तामिळ )

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:16
एका भाषेचा अभिमान हा असा दुस-या भाषेला भंकस वगैरे म्हणूनच दाखवता येतो हे माहित नव्हतं. कुठलीही भाषा भंकस किंवा हिणकस नसते.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 14:35
एक काम करा बघू . कबीर , रहिम यांच्या दोह्या पासून हिंदी वाचन सुरु करा . मग पुढे मैथिली शरण गुप्त, सहानी , बच्चन इत्यादी वाचा पाहू . टिप : मी हिंदी पुस्तके जास्ती वाचली नाहीत . एक भाषा म्हणून शाळेत आणि नंतर हिंदी महासभेच्या परीक्षा, एवढ्या साठी लागेल ती पुस्तके आणि त्यात येणाऱ्या कथा / कविता वाचलेत . पण एवढ्या कमी वाचनातून हि हिंदी कुठे हि भंकस वाटली नाही . उलट अतिशय सुंदर भाषा वाटली

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:09
मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" वगैरे लिहीले आहे. मला इतकेच दाखवायचे होते की एकाला जे आवडेल ते दुसर्‍याला आवडेल असे नाही. कोणाला इंग्लिश मधुन मुलांना शिकवावेसे वाटले तर शिकवू दे की. कोणाला नाही वाटले तर नको. उगाच मातृभाषेचा अभिमान वगैरे कशाला? कोणाला इंग्रजी मधे शिकुन प्रगती होइल असे वाटत असेल तर वाटू दे की. आपण व्हॅल्यु जजमेंट का करायचे? यनावाला तेच तर करतात ना, मग त्यांना तरी का हसायचे. इथे आपण जिथे जन्मलो तो देश सोडुन दुसरी कडे जातो, तर मातृभाषेचे काय विषेश.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 15:22
एकाला जे आवडेल ते दुसर्याला नाहीच आवडणार. किंवा कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत . पण म्हणून इंग्रजीमधूनच प्रगती होईल हा मुद्दा हि बरोबर ठरत नाही न ? किंवा तुम्ही म्हणता तसं, मला जर हे वाटत असेल कि मराठी /कन्नड / उर्दू किंवा जी काही तुमची आवडीची प्रादेशिक/ राज्यभाषा असेल त्यातून शिकून प्रगती होईल तर त्यात हि चूक काय ? त्याचं व्हॅल्यु जजमेंट का करायचे आपण ? बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:29
बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .
मला वाटते लोक इंग्रजी माध्यमात जातात ते सुद्धा पुढे पैसे मिळवणे सोप्पे जावे म्हणुन.
कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत .
मी ही तेच म्हणतोय. त्याचा भावनिक मुद्दा बनवायची गरज नाही मातृभाषा वगैरे शब्द वापरुन, हेच सांगतोय

हेच सगळं २-३ दा बोलुन झालंय ना..? नाही म्हणजे एका शाळेने इंग्रजी माध्यम सुरु केले ह्यासाठी परत मुळातुन मराठी की इंग्रजी ह्या मुद्द्यावर चर्चा का करावी? तुम्ही तुमच्या लेखात मांडलेले मुद्देच जवळपास सगळ्या चर्चांंमध्ये आले होते. फायनली ज्याला जे योग्य वाटतं तो ते स्वतःच्या पाल्याबाबत करतो. इथे चर्चा करुन कुणाचंही मत बदलेलं नव्हतं. प्रत्येक जण गिगाबायटी प्रतिसाद देऊन आपलीच बाजु योग्य हेच शेवटपर्यंत बोलत राहिला. परत तेच करण्यात नक्की काय हशील? असो.. इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.

सूड 24/11/2015 - 14:35
हेच सगळं सारखं लिहून काय उपयोग वेल्लाकाका? थोडा शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर? आपण शाळांतून शिकून बाहेर पडलो, आपल्याला चारी ठाव सगळं आहे. मराठी माध्यम आहे म्हणताना पोरं येत नसली तर शिक्षकांच्या पोटापाण्याचं काय हो? आपण लाख सांगू शाळा चालू ठेवा, पोटाला चिमटा पडला की अभिमान चुलीवर शिजवता येत नाही हो!! त्यापेक्षा आपल्या परीने जे जमेल ते करावं. काय सांगावं इंग्रजी बोलणार्‍यांत जास्तीची मेजॉरिटी झाल्यावर मग परत मराठीप्रेमाचे उमाळे येतील? तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू आणि नंतर ह्या इंग्रजाळलेल्या पोरांच्या मराठी शिकवण्या घेऊ, काय म्हणता? =))

खटपट्या 24/11/2015 - 14:38
आपण काही ग्रुहीतके मनातुन काढून टाकली पाहीजेत. १) इंग्रजी शाळेत गेला म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलता येते, हा पहीला गैरसमज. माझे बरेच मित्र आहेत जे इंग्रजी शाळेत शिकूनही इंग्रजीतुन बोलताना अडखळतात. २)मराठी शाळेत शिकला म्हणजे इंग्रजीतून फाडफाड बोलताच येणार नाही, हा दुसरा गैरसमज. बरेच मराठी माध्यमातुन शिकलेले मित्र इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा शुध्द आणि फाडफाड इंग्रजी बोलतात. ३)इंग्रजी बोलता येते म्हणजे हुशार, हा तिसरा गैरसमज. माझा मामेभाउ इंग्रजी माध्यमातून शिकला. घरी इंग्रजीचा अजीबात गंध नसल्यामुळे कींवा अन्य काही कारणामुळे आता कोणत्याच भाषेत स्वतःला व्यक्त करु शकत नाही. बाकी लहानपणापासून सरस्वती शाळेतील मुलांशी स्पर्धा करत असल्यामुळे मला त्या शाळेबद्दल खूप आदर होता. त्यामुळे या शाळेने हा निर्णय घेतला हे कळल्यावर थोडी हळहळ वाटली. पण आता शाळा पुढे चालवण्यासाठी पुरेशी मुलेच येत नसतील तर संचालक तरी काय करणार? असो.

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:43
माझे दोन पैसे - मी माहीममध्ये आणि डोंबिवलीत वाढलो. पहिली ते चौथी माहीम आणि मग पाचवी ते दहावी डोंबिवलीत. माझ्या दोन्ही शाळा - लोकमान्य विद्यामंदिर, माहीम आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या मी शिकत असताना आपापल्या भागातल्या अनुक्रमे चांगल्या आणि अग्रगण्य शाळा म्हणून प्रसिद्ध होत्या. पण दोन्हीही शाळांमधल्या माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही स्वतःच्या मुलांना आपल्याच शाळेत घातलेलं नाही. जे तिथून स्थलांतरित झाले त्यांचं सोडा. जे अजूनही तिथेच राहात आहेत - माहीम आणि डोंबिवली इथे - त्यांनी कोणीही आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं नाही आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा - शाळांचा दर्जा खालावलाय असं उत्तर मिळालं. याचा एक अर्थ हा आहे की लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ती एक सेवा म्हणून बघण्याकडे कल आहे आणि जर आम्ही पैसे मोजले आहेत तर आम्हाला या-या गोष्टी मिळायलाच पाहिजेत ही अपेक्षा आहे. दुर्दैवाने मराठी शाळा या अपेक्षेला उतरु शकलेल्या नाहीत किंवा मग त्या या अपेक्षांना उतरणार नाहीत अशी काही कारणाने लोकांची धारणा झालेली आहे. माझ्या भागात बालमोहन विद्यामंदिरासारखी अत्यंत प्रसिद्ध आणि गाजलेली शाळा आहे. त्यांनीही इंग्रजी माध्यम सुरु केलं. त्याला आता अनेक वर्षं झाली. बालमोहनचे अनेक विद्यार्थी माझ्या भागात राहतात. त्यातल्या अनेकांनी आपल्या मुलांना बालमोहनमध्येच घातलेलं आहे पण इंग्रजी माध्यमात. आणि का या प्रश्नाला तेच उत्तर. दर्जा खालावलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता. एक व्यावहारिक सत्य----> "डोंबोली एम.आय.डी.सी.तला वडेवाला, कुठल्याही प्रकारे वरकमाई नसलेल्या, सामान्य पगारदार माणसापेक्षा (कंपनीतले सी.ई.ओ., प्रेसीडेंट वगैरे) कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतो." ज्याच्या बरोबर व्यवहार करायचे आहेत, मग ते आय.टी. फिल्ड मधले क्लायंट असो वा नाट्यगृहातले प्रेक्षक, त्यांची भाषा आत्मसात करता आली आणि तुमचे कार्यशैली (ह्या "कार्यशैली" वर एखादी जिलबी पाडावी का?) जर सर्वोत्तम असेल तर, ह्या जगात कुठल्याही माणसाला, स्वतःची भाकरी स्वतः कमवायला त्रास होत नाही.

नीलमोहर 24/11/2015 - 15:14
इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.
- १००% सहमत. "मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही" - घरातून, पालकांकडून व्यवस्थित लक्ष दिले गेले तर मुले या दोन्ही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून. १०वी पर्यंतचे शिक्षण मराठीत, नंतर अचानक पुढील उच्च शिक्षण इंग्रजीतून घेणे त्यांना कठिण जाते, सर्वच लोक काही अतिहुशार नसतात. हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते. इंग्रजी आता जागतिक भाषा आहे आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे, त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे. माध्यम कोणतेही असो.. शिकणं, स्वतःला घडवणं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. अजून खूप काही लिहीता येईल पण... पुन्हा पुन्हा त्याच त्या चर्चांवर गिगाबायटी प्रतिसाद टाईपण्याचे कष्ट घेणार्‍या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं.

In reply to by नीलमोहर

वेल्लाभट 24/11/2015 - 15:38
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.
का? आणि हे आपल्याइथेच होतं की इतर इंग्रजेतर भाषिक देशातही होतं?
इंग्रजी आता जागतिक भाषा आहे
हे आपण जितक्या ठामपणे सांगतो, मानतो, आपल्या मुलांची शिक्षणपद्धतीही बदलतो, तितक्या ठामपणे इतर इंग्रजेतर भाषिक देश म्हणतात का?
आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,
माध्यम बदलायला हवंच का? त्या भाषेचे शिक्षण घेऊनही पुरेसं असतं असं नाही वाटत का?
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.
त्यात कमीपणा नाही वाटत; कमीपणा मातृभाषेतून शिकण्यात वाटतो. असो. पुन्हा तीच चर्चा मलाही करायची नाही. पण जसं तुम्हाला गिगाबायटी प्रतिसादकांचं कौतुक वाटतं, तशीच मला 'बाहेरच्या जगात (हे जग तुमच्या घराच्या उंबरठ्यापासून सुरू होतं) इंग्रजी बोलावच लागतं' असं म्हणणा-यांची फार मजा वाटते.

In reply to by नीलमोहर

मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही हे वाक्य नक्की कोणत्या प्रतिसादात आलंय ते माहित नाहीये पण हा सुर नेहमीच लागतो. ह्यावर एक प्रश्न आहे की मराठी माध्यमात शिकणार्‍यांना खरंच मराठी साहित्या बाबत ज्ञान असते का? मी किमान माझ्या वर्गातली अर्धी मुलं उभी करु शकते ज्यांना मराठी साहित्य, व्याकरण ह्याबद्दल काहिही माहिती नाही. बोलताना सुद्धा "मी आली.. मी गेली" ... साधी गोष्ट आहे हो.. माझा इंग्रजी शाळेत जाणारा ३.५ वर्षाचा मुलगा उत्तम मराठी बोलतो आणि कालच "दिल की तपिश" गुणगुणत होता. (तो "सायलेंट हो जा वरना मै व्हॉयलेंट हो जाऊंगा" सुद्धा ऐकवतो..) कोण शिकवतं हे? घरात आपण कसे बोलतो, काय बोलतो ह्यावर खुप काही अवलंबुन आहे. सगळंच कसं शाळेच्या माध्यमावर अवलंबुन असेल? छे बुवा... परत माझी पण गाडी त्याच लायनीवर आली.. खरंय नीमो.. पुन्हा पुन्हा काय तेच बोलायचं?

In reply to by नीलमोहर

संदीप डांगे 24/11/2015 - 15:52
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.
याबद्दल काही विदा? पुरावा? कारण आत्ता २०१० ते २०१५ ह्या काळात जे विद्यार्थी मुलाखती देत असतील त्यांचे प्राथमिक शिक्षण अंदाजे १९९० ते १९९५ यादरम्यान सुरू झाले असावे, तेव्हा इंग्रजी शाळांचे स्तोम अजिबात नव्हते. तेव्हा कॉन्वेंट तुरळक होत्या. इंग्रजीचेही स्तोम माजले नव्हते. इंग्रजीचे स्तोम माजायला साधारण १९९५ सालानंतर सुरुवात झाली. ९१ च्या नीतीबदलानंतर ग्लोबलायझेशनची लाट आली. वायटूकेमुळे मुलं भराभर परदेशात गेली, परदेशातून आयटीचे बूम भारतात आले त्यांना सर्वप्रांतीय, सर्वभाषिक कामगारांना एकत्र काम करणे सोयीचे जावे म्हणून इंग्रजी संवादकौशल्य उत्तम असलेल्यांना निवडले जाऊ लागले. ह्यासर्व कारणामुळे इंग्रजी आवश्यक असा समज सर्वत्र पसरला. २००० सालानंतर मराठी शाळेत मुलांना टाकणारे झपाट्याने कमी झालेत. इंग्लिश स्पीकींगचे बूमही २००० सालानंतर प्रचंड फोफावले. 'आम्हाला इंग्रजी शाळेत का टाकले नाही' हा प्रश्न विचारू शकणारी पीढी आधीच नोकर्‍यांमधे आहे, भविष्यात जी विचारू शकेल ती इंग्रजी शाळेत आहे. त्यामुळे पालकांच्या नावाने ओरडणारे विद्यार्थी नक्की कोठे आहेत याचे कुतूहल आहे. माझे निरिक्षण असे आहे अशी भीती आताच्या बहुसंख्य (पिरातैंना वगळून) पालकांच्याच मनात आहे म्हणून ह्या भीतीलाच ते इंग्रजी शाळेत टाकण्यासाठीचे कारण, ढाल म्हणून वापरतात. तसंच प्रत्यक्ष अनुभवानुसार माझ्या अकोल्यातल्या (मुंबईच्या तुलनेने मागास) शाळेतले साठ टक्के वर्गबंधू मोठ्मोठ्या कंपन्यांमधे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सर्वांचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे, खरंच कोण पालकांना ओरडतंय हा प्रश्न पडलाय.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:19
भाषेला ताकद द्या पैश्याची आणि कर्तृत्वाची, म्हणजे अमराठी लोक पण शिकू लागतील मराठी. पेठकर काकांच्या हॉटेल मधले नोकर १० वाक्य तरी मराठी शिकतीलच ना. असे आरक्षण देऊन पुढे जाता येत नाही.

जेव्हा एखाद्या भाषेच्या वापराने भौतिक प्रगती (आर्थिक फायदा, सामाजिक पत, एकंदरीत उंचावलेला जीवनाचा स्तर, इ) होते ती भाषा लोक जबरदस्ती न करताही, किंबहुना विनातक्रार कष्ट करूनही, स्विकारतात हे जागतिक व सार्वकालीक सत्य आहे. हे शक्य न झाल्यास, जबरदस्तीने अथवा नुसत्या कळकळीने आजवर कोणतीही भाषा वाढलेली नाही. बाकी भाषिक अस्मिता वगैरे शब्द नुसते (बर्‍याचदा राजकारण करण्यासाठीच) बोलायला कामी येतात... भाषेच्या उत्कर्षाला त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असाच इतिहास आहे.

पैसा 24/11/2015 - 22:41
गोव्यात रस्त्यावर शाली विकणार्‍या आणि मासे विकणार्‍या बाया पण कामचलाऊ इंग्लिस बोलतात. देसी लोकांकडेच नव्हे तर फारेनर लोकांकडे. एखाद्या भाषेत बोलणे हा कम्युनिकेशनची आवश्यकता आणि सवय याचा भाग आहे. तुम्ही कोणत्या माध्यमात शिकलात आणि काय शिकलात, का शाळेत गेलाच नाहीत यावर खरे तर काहीच अवलंबून नसते. हां, आम्ही दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली पोरे अकरावीला कॉन्व्हेंटशिक्षित इंग्रजी माध्यमाच्या पोरांबरोबर एकत्र आलो, तेव्हा मास्तर लोक त्या कान्व्हेंटवाल्यांच्या ग्रामरवरून त्यांचा सतत उद्धार करायचे हे आठवते आहे. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत घेतले नसेल तर त्या पोरांना कोणतीच भाषा चांगली नीट अशी येत नाही असे मला तेव्हापासून वाटते. विशेषतः दुसर्‍या भाषांच्याबाबत पाहिले तर घरात मराठी बोलत असताना हिंदी किंवा संस्कृत मराठी माध्यमात समजून घेणे सोपे जाईल, तेवढे इंग्लिश माध्यमात समजणार नाही. एवढे बोलून मी खाली बसते. जयहिंद. (अवांतरः सरस्वती सेकंडरीवाल्यांनी मराठीच्या तुकड्या कमी करून इंग्रजी सुरू केल्यात का? तर जरूर ओरड करायला हरकत नाही. पण त्या जास्तीच्या सुरू केल्या असतील तर तो केवळ व्यापारी निर्णय समजून दुर्लक्ष करावे.)

In reply to by पैसा

वेल्लाभट 24/11/2015 - 22:56
मराठी शाळा चालू ठेवून इंग्रजी सुरू होते आहे. पण त्याचे खरे परिणाम तेंव्हा कळतील जेंव्हा सुमारे ६०००० प्रतिवर्ष फी भरलेल्या सीबीएसई वाल्यांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य दिलं जाईल, आणि मराठी माध्यमातील मुलांना मागे ठेवलं जाईल. ही केवळ माझी भीती आहे. असं होईल असं मी म्हणत नाही; न होवो. पण जर झालं तर मात्र मराठी माध्यमातील पालकांसाठी, मुलांसाठी ते वाईट ठरेल.

pacificready 24/11/2015 - 23:36
ओक काका, तुमचा यूनेस्को बाबतचा मुद्दा आधी मातृभाषेत ज्ञान आत्मसात करावं, तसं करण्यासाठी मातृभाषेत मिळालेलं ज्ञान लवकर आत्मसात होतं असा आहे ना? यामागचं कारण आपल्याला त्या भाषेतल्या संज्ञा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, त्या संज्ञा समजून घेण्यापूर्वी आधी शब्द समजावून घ्या नंतर त्याला visualise करा मग ते समजेल असं काही मातृभाषेत शब्द उच्चारल्याबरोबर करावं लागत नाही (कारण आपल्या स्मृतिपटलावर तो दिसतो) असं काही आहे ना? बाकी भाषा हे व्यक्त होण्याचं एक माध्यम असल्यानं एका मर्यादेपर्यन्त महत्त्व आहेच नि त्याची मर्यादा ओळखण्याचं महत्वही समजून घेतलं गेलं पाहिजे.

In reply to by pacificready

मोगा 25/11/2015 - 07:16
मूळ्ज्ञान जर इंग्रजीतच शिकावे लागेल. लिव्हर , स्प्लीन हे मूळ इंग्रजी भाशीतच शिकावे लागेल. त्याचे मुद्दाम यकृत , प्लीहा करुन त्याच इंग्रजी पुस्तकाचे मराठी रुपांतर करुन ती मराठी बोजड करुन विकास कस होईल?

रेवती 25/11/2015 - 00:06
शाळेनं मराठी माध्यमच ठेवावं की इंग्रजी माध्यम सुरु करावं हा व्यावसायिक निर्णय आहे म्हणून त्यात पडायचे नाही पण इंग्रजी संभाषणाबाबत एका पालकांनी त्यांच्या मुलीबाबत केलेला प्रयोग हे एक उदाहरण माझ्याच वर्गात होते. ती मराठी शाळेत आमच्याबरोबर शिकायची. आम्हा बर्याच मुलींना जसे इतके टक्के आणि तितके मार्क यांच्यासाठी घरून दबाव असायचा, तसा तिला नव्हता कारण अठवड्यातून एकदा असे लहानपणापासूनच ती इंग्रजी वाचन, संभाषण वर्गाला तज्ञांकडे जात असे. (त्यावेळी एका तासात इंग्रजी, फाडफाड इंग्रजी असे प्रकार उपलब्ध होते पण तिकडे जात नसे.) त्यामुळे यत्ता दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी अशा दोन्ही विषयात तिने चांगलीच मजल मारली होती. असे असताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा व इंग्रजी असे दोन्ही साधले. इंग्रजी वक्तृत्वस्पर्धा, जी वर्षातून एकदा असायची त्यास तिला आमच्या शाळेतर्फे दरवर्षी पाठवले जायचे. बाकी कोणत्याही, म्हणजे नाचणे, गाणे, मैदानी स्पर्धा, मराठी वक्तॄत्व यामध्ये ती फारशी नसायची व ताणाखाली दबलेलीही नसायची.

असंका 25/11/2015 - 08:57
वा वा वेल्लाभट अगदी सुरेख लेख!! माझ्या मराठी शाळांची अवस्था बघवत नाही आता. एका चुकीच्या भावनेला बळी पडून आपली मातृभाषा आपल्या लोकांकडून दुर्लक्षित होताना बघणं फारच त्रासदायक होतंय.

इडली डोसा 25/11/2015 - 09:52
मुलं कुठल्या माध्यमात शिकतात या पेक्षा पालकांनी मातृभाषा किंवा कोणत्याही इतर भाषेत मुलांनी प्राविण्य मिळवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला हवेत. मा़झ्या माहितीतली एक मुलगी फलटण सारख्या निमशहरी ठिकाणी मराठी माध्यमात शिकुनही उत्तम इंग्रजी बोलते कारण तिच्या आई- बाबांनी तिच्या इंग्रजी संभाषणवर मेहनत घेतली होती. तसेच माझी एक घनिश्ठ मैत्रीण कॉन्व्हेंट मध्ये शिकुन सुद्धा असंख्य मराठी पुस्तके वाचते. मराठी गाणी ऐकते ( हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली अगदी कवी ग्रेस यांची पण) आणि त्यांचे रसग्रहणही करते. तिचाच भाऊ अगदी स्वतःची सही पण सगळीकडे मराठीतच करतो. यात कुठे ते कॉन्व्हेंटमधे शिकले त्याचा काही अडसर आलेला मला तरी दिसलेला नाही. जर मराठी मध्यमात शिकल्यानेच मराठीचे प्रेम वाढेल असे म्हणणे असेल तर मला तरी वाटते त्यात काही तथ्य वाटत नाही. वर पिराने म्हटल्या प्रमाणे मराठी मध्यमात शिकुनही मराठी वाचन - लेखन संभाषण यात दयनीय अवस्था असलेले खुप लोक दिसतात. माझी मुलगी आता ३ वर्षांची होईल आणि 'ट्विंकल- ट्विंकल लिटिल स्टार' जेवढ्या आवडीने म्हणते तेव्ह्ड्याच आवडीने 'मामाच्या गावाला जाऊ या' पण म्हणते. कोणलाही आपल्या भाषेचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडुन काय प्रयत्न करता येतील हेच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात बघितले पाहिजे. मुविंच्या
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.
या प्रतिसादाशी १००% सहमत.

In reply to by माहितगार

वेल्लाभट 24/11/2015 - 11:47
विश्वास मराठीप्रेमाने देण्यापेक्षा, पालकांनी द्यायला हवा. एकमेकांनी एकमेकांना द्यायला हवा. पुढे मोठं झाल्यावर स्वतःच स्वतःला द्यायला हवा.

In reply to by वेल्लाभट

माहितगार 24/11/2015 - 14:21
'म्हणजे नेमके काय ?' ते व्यावहारीक दृष्ट्या व्यक्त न करता येण्यात तर गोची होत नाहीए ना ? नुसत्या म्हणण्याने विश्वास निर्माण होताना दिसत नाहीए नाही तर या धागा लेखास प्रयोजन राहीले नसते म्हणजे विश्वास निर्माण करण्यात व्यावहारीक दृष्ट्या कुठेतरी काही तरी कमी पडते आहे अशी रास्त शंका वाटते.

माध्यमावर फारसं काही अवलंबून नसतं हो! ते पोरांवर अवलंबून असतं.... पोरगं जर हुशार असेल तर माध्यम मराठी असो, हिंदी असो, वा इंग्रजी, ते झळकून उठतंच! आणि ते पोरगं जर ढ ढगातलं असेल तर तुम्ही त्याला अगदी जेकेमध्ये घाला, काऽऽही फरक पडत नाही... हां, आता जर पोराला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला इंग्रजी माध्यमात घालणं माझ्या मते चांगलं. म्हणजे मग त्याची अकरावी, बारावी आणि फर्स्ट इयर जरा सुसह्य होतात!!! पोरांना काय सोपं पडेल याकडे आईबापांनी लक्ष द्यावं. आईबापांचे स्वतःचे दुराभिमान फाट्यावर मारून!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:09
तुमची गल्लत झालेली दिसते. नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच. आणि तरीही हे एकदा वाचाच. http://www.unesco.org/new/en/education/themes/strengthening-education-systems/languages-in-education/multilingual-education/ http://www.unesco.org/education/education_today/ed_today6.pdf http://unesdoc.unesco.org/images/0012/001297/129728e.pdf http://unesdoc.unesco.org/images/0016/001611/161121e.pdf

In reply to by वेल्लाभट

तुमची गल्लत झालेली दिसते.
असं? काय नेमकी गल्लत झाली ते सांगा बॉ!
नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच.
विचार करूनच सांगतोय, आपल्या मुला-मुलींचं भविष्य महत्वाचं की इंग्रजीव्यतिरिक्त माध्यमाचा आग्रह महत्वाचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मात्र व्हर्नाक्युलर माध्यम घेतल्यावर सायन्सला गेलेल्या मुलांचा अकरावी/बारावीमध्ये पिट्ट्या पडतो हे सत्य आहे...
आणि तरीही हे एकदा वाचाच.
युनेस्कोच्या लिंका देऊन तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांत काही साध्य होत नाही हो! १. मुळात विद्यार्थी हुशार हवा, बहुसंख्य तसे नसतात. २. हूशार विद्यार्थ्याला माध्यम कोणतंही असलं तरी यशस्वी करियर करण्यात फारसा अडथळा येत नाही. ३. सायन्सकडे कल असल्यास इंग्रजी माध्यम असल्यास जास्त सोपं पडतं हे माझे मुद्दे. आता करा प्रतिवाद.

In reply to by पिवळा डांबिस

मी तुमच्याशी उगाच हा वादासाठी वाद म्हणून घालत नाहिये. तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. (कॉमर्स/ आर्ट्सची काय परिस्थीती आहे ते मला माहिती नाही म्हणून त्याविषयी काही बोलू शकत नाही) बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते. म्हणून हा चर्चाप्रपंच!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:51
तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
काही अंशी यात तथ्य असलं तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुलगा हुशार असेल तर it does not trouble him much. तो/ती चटकन आत्मसात करतात. टेक्निकल टर्म्स फक्त बदलतात, बाकी इंग्रजी त्याला येत असतंच. आम्ही सोसलं तुम्ही सोसा... असा विचार कुठलाही सुजाण पालक करणार नाही. इंग्रजीत टाकू हा विचार जसा मुलाच्या भल्यासाठी करतात तसाच मराठीत टाकू हाही भल्यासाठीच केलेला विचार आहे. पण भलं नक्की कशात आहे हा प्रश्न आहे.

In reply to by पिवळा डांबिस

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 12:56
बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते.
दुसरे कारण असते की नाही हे माहित नाही पण बहुतांश वेळा पहिले कारण नक्कीच असते. मी पण त्याच सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी खूप काही दिले हे पण नक्कीच. तरीही नव्या काळाची पावले लक्षात घेऊन शाळेने योग्य निर्णय घेतला असे मला वाटते. तो निर्णय घेतला नसता तर काही वर्षांनी शाळा बंद झाली असती अशी भिती वाटते.तसे झाले असते तर अजून वाईट वाटले असते. मला वाटते की शाळेच्या माध्यमापेक्षा विचार कसा करायचा, प्रश्न कसे विचारायचे इत्यादी गोष्टी, ज्याला शिक्षणपध्दती म्हणता येईल ती अधिक महत्वाची आहे.मी शाळेत असताना ही शिक्षणपध्दती भलतीच उच्च दर्जाची होती हे नक्कीच. ती शिक्षणपध्दती तशीच ठेवली किंबहुना आणखी चांगली केली की झाले. मग शाळेचे माध्यम ही दुय्यम गोष्ट आहे. (माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही जास्त शिक्षणसंस्थांचा विद्यार्थी म्हणून राहिलेला आणि त्या अनेक संस्थांपैकी केवळ दोन संस्थांनी खरोखरची व्हॅल्यू अ‍ॅडिशन केली असे मानणारा आणि त्या दोन संस्थांपैकी सरस्वती सेकंडरी स्कूल ही एक आहे असे मानणारा आणि शाळा अजूनही मिस करणारा) ट्रुमन

In reply to by पिवळा डांबिस

sagarpdy 24/11/2015 - 12:12
पोरगं बालवाडीत असताना कसं समजावं हो त्याला कि सायन्स कशाशी खातात ते ? आवड-बिवड नंतरची गोष्ट ! आणि काही फरक पडत नाही भाषा बदलाने. इंग्रजी माध्यमातून येउन ११ वि थोडी सोपी जाते हे खरं, पण पुढे फार फरक पडत नाही.

In reply to by मोगा

वेल्लाभट 24/11/2015 - 12:20
ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली. म्हणून त्यावर लिहिलं.

In reply to by वेल्लाभट

महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली.
ही गोष्ट महत्वाची तर आहेच! पण का? तुम्ही त्या शाळेच्या संचालकांना विचारून पाहिलंत का? काय म्हणतात ते?

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:40
तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो होतो. त्या आधीही जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली होती. तरीही निर्णय झाला शाळेचा. मग बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पालकांना, तिथे गेलो. तिथे त्यांनी जे प्रतिवाद केले ते धाग्यात दिलेत ना! 'वृथा अभिमान, उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी'

In reply to by वेल्लाभट

उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी
कारण प्रत्येक मराठी/भारतीयाला आपला मुलगा/मुलगी इंजिनियरच व्हायला हवा/वी असते ना! :) सुतार, शिक्षक, वार्ताहर वगैरे व्हायला कितीजणांना चालेल? पूर्वी डॉक्टर चालायचं पण आता एमडी होउनही प्रॅक्टिस करण्यातल्या अडचणी दिसल्यापासून ते ही थंडावलंय!!! मला कधीकधी प्रश्न पडतो की वर्षानुवर्ष इतके इंजिनियर्स काढूनही भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं केविलवाणं का? :)

राही 24/11/2015 - 12:37
ही एक लाट असते. कदाचित तात्पुरती, कदाचित टिकाऊ. व्यावहारिक फायदा जेव्हा उरणार नाही तेव्हा ती आपोआप विरून जाईल. मागणी तसा पुरवठा हा नियम आजच्या मार्केट-ड्रिवन समाजव्यवहाराला लागू आहे. त्यातून शिक्षणक्षेत्र कसे सुटेल? आणि वैचारिक आक्रमणाऐवजी वैचारिक मंथन, घुसळण हे शब्द जास्त योग्य वाटतात. भाषा 'हाय लेवल' वाटते याचा अर्थ ग्रांथिक भाषेची व्यवहारभाषेपासून फारकत होते आहे. व्यवहारभाषा ग्रांथिक भाषेला ढकलू पाहाते आहे. आज जर सर्वसामान्य व्यवहाराचे, क्रियाप्रक्रियांचे रूप बदलले असेल तर हे बदल अभिव्यक्त करणारी भाषासुद्धा बदलेलच. संस्कृतीच्या प्रत्येक बदलटप्प्यावर भाषा बदलते. कृषिसंस्कृतीतून यांत्रिक आणि आता डिजिटल संस्कृतीत येताना फार मोठी भाषिक उलथापालथ होणारच. भारतीय द्वीपकल्पात शहरीकरण किंवा सिटीज़ (सिटीस्टेट्स- हा थोडासा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, तरीही) तीन टप्प्यांत झाले असे साधारणपणे म्हणतात. १)हडाप्पन काळ २) ई.स.पू.६००-क्रिस्तोत्तर ३०० (नंद-मौर्य-नाग-शिशुनाग-शुंग-कुशाण-क्षत्रप-गुप्त-सातवाहन-वाकाटक)- हा प्रदीर्घ काळ होता आणि या दरम्यान कितीतरी संस्कृतीबदल, भाषाबदल झाले.३)मुघल ते वसाहतकाळ आणि नंतर. काळाच्या या प्रदीर्घ पटावर भारतीयांच्या राहाण्यासहाण्यात, बोलण्याचालण्यात, वावरण्यात किती बदल झाले असतील याची कल्पनाही अशक्य आहे. नवे व्यवहार अभिव्यक्त करण्यासाठी प्रचलित भाषा कमी पडत असेल तर तिची जागा नव्या संकल्पना आणि त्यांना साजेसे शब्द असलेली भाषा घेणारच. महाराष्ट्र हा भूभाग राहाणार आहे ना? त्यात वसणारे ते महाराष्ट्रीय असणार आहेत ना? मग हे महाराष्ट्रीय जी भाषा बोलतील ती मराठीच असेल. फक्त ती सध्याच्या मराठीसारखी नसेल. कदाचित इंग्लिशमिश्रित असेल, पण अधिक अर्थवाही, अधिक समृद्ध असेल. आणखी एक छोटासा मुद्दा: लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून? मागणी/क्रेझ्/ट्रेंड या महापुराला अडवण्यात अर्थ नसतो. एकदा लोंढा वाहून गेला, की कालान्तराने उरतो तो निवळशंख शांत इतिहासप्रवाह. आपल्याच गतीने वाहाणारा आणि मधल्या प्रलयाची, नासधुशीची आठवणही न ठेवणारा. किंवा केवळ स्मरणरंजनात्मक खुणा ठेवणारा. बाकी सरस्वती शाळेविषयीचे आपले पोटतिडिकीतून आलेले निवेदन आपल्या जागी रास्त आहे. त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.

In reply to by राही

वेल्लाभट 24/11/2015 - 13:53
लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून?
ती तशीही होतेच की इंग्रजीतून शिकल्यावर. सवय म्हणजे सतत बोलण्याची नव्हे. माझं उदाहरण देतो, मी आणि माझा मित्र आमच्या पालकांचा सल्ला मनावर घेऊन संध्याकाळी ठराविक वेळी इंग्रजीत बोलत असू. मुद्दाम. त्याने बोलायची सवय लागली, भीती गेली. अशातच इंग्रजी गाणी, पिक्चर इत्यादींची ओळख झाली. आमच्या एका क्लासच्या बाईंनी मुद्दाम आम्हा विद्यार्थ्यांना बोलवून घरी व्हीसीआर वर इंग्रजी पिक्चर दाखवला होता मला आठवतं. बेन हर पिक्चर होता. त्यामुळे, सवय लावणं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे असे एफर्ट्स घेतले तर फायदा होतो.

गामा पैलवान 24/11/2015 - 13:07
वेल्लाभट, इंग्रजी माध्यम म्हणजे यशाचा हमखास मार्ग असं समीकरण जनतेच्या मनात निर्माण झालं आहे. आपण मराठीप्रेमींना हे मोडीत काढायचंय. इंग्रजीच्या तुलनेने मराठी कुठेही कमी नाही. मराठी माध्यमांतून शिकणाऱ्यांना इंग्रजी बोलण्याचा (हो, फक्त बोलण्याचा) सराव होईल असा काही उपक्रम सुरू करता येईल का? उदाहरणार्थ बोली इंग्रजीचा तास घेणे, इंग्रजी सिनेमा पाहणे, इत्यादि? थोडं अवांतर : तुम्ही सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी आहात हे वाचून आनंद झाला. मी त्या शाळेचा विद्यार्थी नव्हतो, मात्र त्या शाळेशी बऱ्याच सुखद आठवणी निगडीत आहेत. (नाही, त्या शाळेतल्या एकाही पोरींवर लाईन मारलेली नाही.) शैक्षणिक जगाशी संबंधित आठवणी आहेत. या शाळेस इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेसे वाटणे हे क्लेशदायी आहे. आ.न., -गा.पै.

'फाड फाड इंग्रजी बोलणं म्हणजे हुशार माणूस' ह्या गैरसमजातून इंग्रजी माध्यमांनी आपल्याकडे मुळ धरले आहे. मातृभाषेच्या माध्यमातून शिकताना एक दोन विषय इंग्रजीत असावेत असे मला वाटते. जसे, विज्ञान, गणित आणि इंग्रजी इ.इ.इ. बाकी विषय मातृभाषेतच शिकावे/शिकवावे. इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलेही इंग्रजी भाषेत काय तारे तोडतात हेही पाहिले आहे. सगळेच तसे नसतात तरी इंग्रजी माध्यमाचा सर्वांनाच फायदा होतो हा गैरसमज नसावा म्हणून. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये. आपले मराठी पालकच मातृभाषेबद्दल उदासिन दिसून येतात. गुजराथी, दाक्षिणात्य मातृभाषाभिमानी आढळतात. मातृभाषेबद्दलचे प्रेम पालकांनीच आपापल्या पाल्यांना लावले पाहिजे. त्या करीता आधी त्यांना मातृभाषेबद्दल नितांत प्रेम असणे आवश्यक आहे. मराठी बोलणे, वाचणे, ऐकणे हे घरातूनच घडले पाहिजे. पण चित्र तसे दिसत नाही. एखाद्या पाहुण्याने मराठीतून नांव विचारल्यावर मुले फक्त आपले नांव सांगतात. पण 'आडनांव काय?' विचारल्यावर बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आपल्या मुलाला विचार करायला वेळ न देता आई लगेच सांगते, 'अरे! सरनेम सांग अंकलना.' असे त्याला सांगून पाहूण्यांसमोर मुलाची आणि आपली 'लाज(?)' सांभाळायचा प्रयत्न आई करते. दोन सख्ख्या मराठी बहिणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलतात आणि आई म्हणते 'अरे! नाही कळत त्यांना मराठी'. काय बोलणार? मुळात आईवडिलांनाच मातृभाषेची आस नसते आणि मुलांनी इंग्रजीतून केलेल्या संभाषणाचा अभिमान वाटतो. मी मराठीतूनच शिकलो. इंग्रजी एक विषय होता. पण इंग्र॑जी भाषेचा पास होण्याइतपतच अभ्यास केला आणि बोलण्याचा, लिहीण्याचा, वाचण्याचा सराव केला नाही त्याने थोडे नुकसान नक्कीच झाले. पण तो सराव केला तर इंग्रजी माध्यमाची गरज कोणालाच भासू नये. पण आजही, इंग्रजी माध्यंमातून शिकलेल्या माझ्या अनेक मित्रांपेक्षा इंग्रजी संभाषणात, लेखनात मी मागे नाही. कांहीच्या तर चार पाऊले पुढेच आहे. मराठी वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. इंग्रजी माध्यमाचा अनुभव नसल्याकारणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणपद्धतीवर आणि व्यक्तिमत्व विकासावर (भाषे व्यतिरिक्त) भाष्य करू शकत नाही. येत्या २०-२२ वर्षात काळ कसा बदलणार आहे ह्याचा अंदाज येत नसल्यामुळे बहुसंख्य पालक मुलांच्या शिक्षणाबाबत, माध्यमाबाबत जोखिम उचलू इच्छित नसतात. कदाचित, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे (आणि इंग्रजी भाषेचा सराव न केल्याने) त्यांना इंग्रजी संभाषणाबाबत अडचणी येत असाव्यात किंवा तितकासा आत्मविश्वास वाटत नसावा. त्यामुळे आपण मातृभाषेत शिकलो ह्याचे वैषम्य न वाटताही जरा न्यूनगंड नक्कीच वाटत असावा. त्यामुळे अशी 'चूक' ते मुलांच्या बाबतीत करू इच्छित नसावेत.

संदीप डांगे 24/11/2015 - 13:55
ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. पण निमित्तकारणे आपण लेख टाकलात, म्हणून ठिक आहे. 'सरस्वती' ही आम्ही ठाण्यात राहिलो असतो तर एकमेव निवड असती. शाळा असली तरी व्यावसायिक संस्था असल्याने बंद पडण्यापेक्षा काळानुसार बदलणे परिहार्य आहे. कुठल्याही संस्थेचा एकदा मोठा डोलारा झाला की फक्त तत्त्व आणि ध्येयांवर अवलंबून राहून टिकून राहणे होत नाही. काही व्यावसायिक तडजोडी स्विकाराव्याच लागतात. सरस्वती आपले वेगळेपण जपूनच इंग्रजी माध्यम सुरू करत असेल तर स्वागतच आहे. मराठी माध्यमांत शिकायला असणार्‍या पाल्यांच्या पालकांना, प्रवाहासोबत वाहत नसल्याने, सामाजिक दबाव-अपमान-कुत्सित बोलणे सहन करावे लागते, प्रत्येक पालकास हे सहन करणे शक्य होत नाही. त्यामुळे सरस्वतीने हा निर्णय घेतला असावा. युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे. प्राथमिक शिक्षणाला पोटापाण्याच्या कारणापर्यंत ताणणे इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करणार्‍यांना योग्य वाटते. ह्याच मानसिकतेतुन सहा महिन्याच्या मुलांनाही शाळेत टाकण्याच्या हालचाली सुरु असतात. गर्भसंस्कार हे त्याच्याही पुढचे पाऊल. बाकी, प्रत्येक पालक आपल्या पाल्याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र असला तरी सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे असोच.

In reply to by संदीप डांगे

वेल्लाभट 24/11/2015 - 14:10
युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे.
अनुमोदन. मुद्दा फक्त मराठीचा नाहीच आहे मुळी; पण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत म्हणून मराठी. अस्मिता वगैरे राजकीय शब्द झालेत आता.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 13:57
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं.
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये
पेठकर काका - समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? मला खरंच काही कळत नाही . आपण मराठीत शिकलो, मुले इंग्लिश मधे शिकली आणि मराठी पण बोलतात. कदाचित त्यांची मुले इंग्लिश मधे शिकतील आणि मराटीत अजिबात बोलणार नाहीत. ठीक आहे ना. बदल तर होतच असतो. हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 24/11/2015 - 14:14
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही.
ठीक आहे मग. राहिलं! तुम्ही शास्त्रीय पुरावा तपासा; किंवा ज्या संस्थेने हा विचार मांडलाय, (युनेस्को) त्या संस्थेशी संपर्क साधा, विचारा. मी त्या संस्थेची विश्वासार्हता लक्षात घेऊन त्याकडे बघतो. आणि माझी मतं आहेत ती वेगळी; केवळ युनेस्को म्हणते म्हणून लगेच मीही, अशातला भाग नाही.

In reply to by प्रसाद१९७१

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 14:17
हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते.
अशी मनोवृत्ती असलेले लोक प्रचंड डोक्यात जातात राव.
फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?
सहमत आहे

In reply to by प्रसाद१९७१

>>>>समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? काहीच हरकत नाही. देऊ या की बळी. त्यात काय मोठं. अजून कांही पिढ्यांनंतर, शेजारची बाई सुंदर आणि श्रीमंत आहे, सध्या तिलाच सगळे भाव देत आहेत तर आपल्या आईला सोडून तिलाच आई म्हणूया नं. असाही विचार पुढे येईल, काय सांगावे. तेव्हाही काही फरक पडणार नाहीच. >>>> "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. पण असे म्हणणार्‍यांची मते विचारातच का घ्यावीत? तशी ते जबरदस्ती तर करीत नाहीत नं? हसून सोडून द्यावं, राहू दे की त्यांना त्यांच्याच जुनाट काळात खितपत. मी तर म्हणतो अशा जुन्या खोडांना मिसळपाव ह्या संस्थळावरच बंदी घालावी. आणि त्यांचे सद्स्यत्वच रद्द करुन टाकावे म्हणजे ते आपल्या मतांची पिंक इथे टाकू शकणार नाहीत. पाहा जमलं तर. नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? होsss! आवडतं की. जुन्या गाण्यांचे प्रोग्रॅम किती तरी हाऊसफुल्ल असतात. कॉलेज कुमारही जुन्या गाण्यांमध्ये रमतात. (मला तेव्हढा मोठा मुलगा आहे. तो आणि त्याचे मित्र ऐकतात राजकपूरची, देवानंदची गाणी) शिवाय, मनाला रुचेल असे नविन कांही जमत नसल्यामुळे, फ्यूजनच्या नांवाखाली, पुन्हा जुन्या जुन्या गाण्यांनाच 'नविन' म्हणून (थोडे इंग्रजी मिसळून) सादर केले जाते. सर्व तरूणाई त्यावर थिरकताना रोज रोज टिव्हीवर दिसतंच असतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:04
पेठकर काका - स्पेसिफिकली तुमच्या कडुन हे अपेक्षीत नव्हते. तुमच्या सारख्या चाकोरी सोडुन झेप घेऊन कर्तृत्व दाखवणार्‍या माणसानी असे म्हणणे खरोखर च अपेक्षीत नव्हते.

In reply to by प्रसाद१९७१

'हे' म्हणजे काय? कांही चुकीचे बोललो आहे का? माझ्या मूळ प्रतिसादात मी म्हंटले आहेच मराठी शाळेत वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. चाकोरी बाहेर पडण्याचे मूळ ह्या व्यक्तिमत्व विकासाच्या पायाभरणीत आहे. जे मला मराठी शाळेतूनच मिळाले आहे. शिवाय माझ्या सातवी पास (मराठी माध्यम) आईने सतत मागे धोशा लावून सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून, नाटकांमधून भाग घेण्यास भाग पाडण्याच्या संस्कारांमध्ये आहे. असो तो सर्वस्वी वेगळा विषय आहे. इंग्रजी माध्यमांच्या विरोधात मी नाही. पण मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातल्यावर त्यांच्या पालकांवर दुहेरी जबाबदारी येते. इंग्रजी भाषेतून मुलांचा अभ्यास घेणे, त्यांची भाषा (इंग्रजी) शुद्ध आणि ओघवती राखणे आणि त्याच बरोबर मराठी भाषेबद्दलही त्यांच्या मनांत प्रेम रुजविणे. मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर मुलांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास घेणे आणि इंग्रजी संभाषण कलाही त्यांना आत्मसात करायला लावणे ही जबाबदारीही येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

राही 24/11/2015 - 15:10
जुने वाईट ठरत नाही तर ते कालबाह्य ठरते. जुन्या गाण्यांचा एखादा कार्यक्रम हाउस फुल ठरतात पण जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? आणि बळी वगैरे जात असतो असे म्हणायचे झाले तर तो भाषेच्या एतत्कालीन रूपाचा जात असतो. भाषेचा नाही.

In reply to by राही

>>>>जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? आजच्या पिढीला जुने संगित आवडते का? ह्या प्रश्नावर ते माझे उत्तर आहे. त्यामुळे त्यांनाही ते आवडते इतका त्याचा मर्यादित अर्थ आहे. तुमचा प्रश्न वारंवारीतेचा आहे. त्यावर, पूर्वीच्या काळाच्या मानाने, आता करमणूकीचे एव्हढे पर्याय उपलब्ध आहेत की असे कार्यक्रम वारंवार होऊ लागले तर तेव्हढी गर्दी नक्कीच जमणार नाही. पण ही परिस्थिती नव्या संगिताचीही आहे. नवे संगित जरी वरचेवर कार्यक्रमातून सादर केले तरी गर्दी होणार नाही. >>>>पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? मॅटीनी शोज हे कॉलेजच्या वेळात॑ कॉलेज कुमारांना आकर्षित करण्यासाठी केले जात. थिएटर रिकामे ठेवण्याऐवजी एक शो ठेवून कॉलेजकुमार-कुमारींचा मोठा वर्ग आकर्षित करायचा ही व्यावसायिक गणितं असतात. रेग्यूलर शोजला आधुनिक चलनी चित्रपट जे कोणी पाहिलेले नसल्याने जास्त गर्दी खेचतात आणि मॅटीनीला जिथे नोकरी/व्यवसाया मुळे कुटुंब वत्सल प्रेक्षक येत नाही पर्यायाने थिएटर रिकामे जाते. अशा वेळी कॉलेज कुमार/कुमारी. जे कॉलेजच्या वेळात, कॉलेजचे तास बुडवून, विविध कारणांसाठी थिएटर जवळ करतात. घरच्यांना वाटते आपला बाबा/बाबी कॉलेजला गेली आहे. सो सेफ. १२ ते ३ ला मिश्र गर्दी असते. कॉलेज कुमारही असतात आणि श्रमिक वर्गही असतो. इथे तिकीट रेट जास्त असतो. मॅटीनीला निव्वळ कॉलेज कुमार असल्याने त्यांच्या पॉकेटमनीमधे बसेल असे रेट असतात आणि म्हणूनच जुने चित्रपट दाखविले जातात जे चित्रपट लायब्ररी/डिस्ट्रिब्यूटर कडून 'स्वस्तात' मिळतात. ही सर्व व्यावसायिक गणितं आहेत.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 14:00
खरा धोका हिंदी कडुन आहे. हल्ली च्या कॉस्मो युगामुळे पहिली- दुसरीतली मुले एकमेकांशी हिंदीतुन बोलताना बघितली आहेत. हिंदी तर अतिशय भंकस भाषा आहे मराठीच्या तुलनेत सर्वच बाबतीत. त्यापेक्षा इंग्रजी बोललेले बरे. ( किंवा तामिळ )

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:16
एका भाषेचा अभिमान हा असा दुस-या भाषेला भंकस वगैरे म्हणूनच दाखवता येतो हे माहित नव्हतं. कुठलीही भाषा भंकस किंवा हिणकस नसते.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 14:35
एक काम करा बघू . कबीर , रहिम यांच्या दोह्या पासून हिंदी वाचन सुरु करा . मग पुढे मैथिली शरण गुप्त, सहानी , बच्चन इत्यादी वाचा पाहू . टिप : मी हिंदी पुस्तके जास्ती वाचली नाहीत . एक भाषा म्हणून शाळेत आणि नंतर हिंदी महासभेच्या परीक्षा, एवढ्या साठी लागेल ती पुस्तके आणि त्यात येणाऱ्या कथा / कविता वाचलेत . पण एवढ्या कमी वाचनातून हि हिंदी कुठे हि भंकस वाटली नाही . उलट अतिशय सुंदर भाषा वाटली

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:09
मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" वगैरे लिहीले आहे. मला इतकेच दाखवायचे होते की एकाला जे आवडेल ते दुसर्‍याला आवडेल असे नाही. कोणाला इंग्लिश मधुन मुलांना शिकवावेसे वाटले तर शिकवू दे की. कोणाला नाही वाटले तर नको. उगाच मातृभाषेचा अभिमान वगैरे कशाला? कोणाला इंग्रजी मधे शिकुन प्रगती होइल असे वाटत असेल तर वाटू दे की. आपण व्हॅल्यु जजमेंट का करायचे? यनावाला तेच तर करतात ना, मग त्यांना तरी का हसायचे. इथे आपण जिथे जन्मलो तो देश सोडुन दुसरी कडे जातो, तर मातृभाषेचे काय विषेश.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 15:22
एकाला जे आवडेल ते दुसर्याला नाहीच आवडणार. किंवा कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत . पण म्हणून इंग्रजीमधूनच प्रगती होईल हा मुद्दा हि बरोबर ठरत नाही न ? किंवा तुम्ही म्हणता तसं, मला जर हे वाटत असेल कि मराठी /कन्नड / उर्दू किंवा जी काही तुमची आवडीची प्रादेशिक/ राज्यभाषा असेल त्यातून शिकून प्रगती होईल तर त्यात हि चूक काय ? त्याचं व्हॅल्यु जजमेंट का करायचे आपण ? बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:29
बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .
मला वाटते लोक इंग्रजी माध्यमात जातात ते सुद्धा पुढे पैसे मिळवणे सोप्पे जावे म्हणुन.
कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत .
मी ही तेच म्हणतोय. त्याचा भावनिक मुद्दा बनवायची गरज नाही मातृभाषा वगैरे शब्द वापरुन, हेच सांगतोय

हेच सगळं २-३ दा बोलुन झालंय ना..? नाही म्हणजे एका शाळेने इंग्रजी माध्यम सुरु केले ह्यासाठी परत मुळातुन मराठी की इंग्रजी ह्या मुद्द्यावर चर्चा का करावी? तुम्ही तुमच्या लेखात मांडलेले मुद्देच जवळपास सगळ्या चर्चांंमध्ये आले होते. फायनली ज्याला जे योग्य वाटतं तो ते स्वतःच्या पाल्याबाबत करतो. इथे चर्चा करुन कुणाचंही मत बदलेलं नव्हतं. प्रत्येक जण गिगाबायटी प्रतिसाद देऊन आपलीच बाजु योग्य हेच शेवटपर्यंत बोलत राहिला. परत तेच करण्यात नक्की काय हशील? असो.. इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.

सूड 24/11/2015 - 14:35
हेच सगळं सारखं लिहून काय उपयोग वेल्लाकाका? थोडा शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर? आपण शाळांतून शिकून बाहेर पडलो, आपल्याला चारी ठाव सगळं आहे. मराठी माध्यम आहे म्हणताना पोरं येत नसली तर शिक्षकांच्या पोटापाण्याचं काय हो? आपण लाख सांगू शाळा चालू ठेवा, पोटाला चिमटा पडला की अभिमान चुलीवर शिजवता येत नाही हो!! त्यापेक्षा आपल्या परीने जे जमेल ते करावं. काय सांगावं इंग्रजी बोलणार्‍यांत जास्तीची मेजॉरिटी झाल्यावर मग परत मराठीप्रेमाचे उमाळे येतील? तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू आणि नंतर ह्या इंग्रजाळलेल्या पोरांच्या मराठी शिकवण्या घेऊ, काय म्हणता? =))

खटपट्या 24/11/2015 - 14:38
आपण काही ग्रुहीतके मनातुन काढून टाकली पाहीजेत. १) इंग्रजी शाळेत गेला म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलता येते, हा पहीला गैरसमज. माझे बरेच मित्र आहेत जे इंग्रजी शाळेत शिकूनही इंग्रजीतुन बोलताना अडखळतात. २)मराठी शाळेत शिकला म्हणजे इंग्रजीतून फाडफाड बोलताच येणार नाही, हा दुसरा गैरसमज. बरेच मराठी माध्यमातुन शिकलेले मित्र इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा शुध्द आणि फाडफाड इंग्रजी बोलतात. ३)इंग्रजी बोलता येते म्हणजे हुशार, हा तिसरा गैरसमज. माझा मामेभाउ इंग्रजी माध्यमातून शिकला. घरी इंग्रजीचा अजीबात गंध नसल्यामुळे कींवा अन्य काही कारणामुळे आता कोणत्याच भाषेत स्वतःला व्यक्त करु शकत नाही. बाकी लहानपणापासून सरस्वती शाळेतील मुलांशी स्पर्धा करत असल्यामुळे मला त्या शाळेबद्दल खूप आदर होता. त्यामुळे या शाळेने हा निर्णय घेतला हे कळल्यावर थोडी हळहळ वाटली. पण आता शाळा पुढे चालवण्यासाठी पुरेशी मुलेच येत नसतील तर संचालक तरी काय करणार? असो.

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:43
माझे दोन पैसे - मी माहीममध्ये आणि डोंबिवलीत वाढलो. पहिली ते चौथी माहीम आणि मग पाचवी ते दहावी डोंबिवलीत. माझ्या दोन्ही शाळा - लोकमान्य विद्यामंदिर, माहीम आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या मी शिकत असताना आपापल्या भागातल्या अनुक्रमे चांगल्या आणि अग्रगण्य शाळा म्हणून प्रसिद्ध होत्या. पण दोन्हीही शाळांमधल्या माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही स्वतःच्या मुलांना आपल्याच शाळेत घातलेलं नाही. जे तिथून स्थलांतरित झाले त्यांचं सोडा. जे अजूनही तिथेच राहात आहेत - माहीम आणि डोंबिवली इथे - त्यांनी कोणीही आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं नाही आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा - शाळांचा दर्जा खालावलाय असं उत्तर मिळालं. याचा एक अर्थ हा आहे की लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ती एक सेवा म्हणून बघण्याकडे कल आहे आणि जर आम्ही पैसे मोजले आहेत तर आम्हाला या-या गोष्टी मिळायलाच पाहिजेत ही अपेक्षा आहे. दुर्दैवाने मराठी शाळा या अपेक्षेला उतरु शकलेल्या नाहीत किंवा मग त्या या अपेक्षांना उतरणार नाहीत अशी काही कारणाने लोकांची धारणा झालेली आहे. माझ्या भागात बालमोहन विद्यामंदिरासारखी अत्यंत प्रसिद्ध आणि गाजलेली शाळा आहे. त्यांनीही इंग्रजी माध्यम सुरु केलं. त्याला आता अनेक वर्षं झाली. बालमोहनचे अनेक विद्यार्थी माझ्या भागात राहतात. त्यातल्या अनेकांनी आपल्या मुलांना बालमोहनमध्येच घातलेलं आहे पण इंग्रजी माध्यमात. आणि का या प्रश्नाला तेच उत्तर. दर्जा खालावलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता. एक व्यावहारिक सत्य----> "डोंबोली एम.आय.डी.सी.तला वडेवाला, कुठल्याही प्रकारे वरकमाई नसलेल्या, सामान्य पगारदार माणसापेक्षा (कंपनीतले सी.ई.ओ., प्रेसीडेंट वगैरे) कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतो." ज्याच्या बरोबर व्यवहार करायचे आहेत, मग ते आय.टी. फिल्ड मधले क्लायंट असो वा नाट्यगृहातले प्रेक्षक, त्यांची भाषा आत्मसात करता आली आणि तुमचे कार्यशैली (ह्या "कार्यशैली" वर एखादी जिलबी पाडावी का?) जर सर्वोत्तम असेल तर, ह्या जगात कुठल्याही माणसाला, स्वतःची भाकरी स्वतः कमवायला त्रास होत नाही.

नीलमोहर 24/11/2015 - 15:14
इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.
- १००% सहमत. "मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही" - घरातून, पालकांकडून व्यवस्थित लक्ष दिले गेले तर मुले या दोन्ही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून. १०वी पर्यंतचे शिक्षण मराठीत, नंतर अचानक पुढील उच्च शिक्षण इंग्रजीतून घेणे त्यांना कठिण जाते, सर्वच लोक काही अतिहुशार नसतात. हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते. इंग्रजी आता जागतिक भाषा आहे आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे, त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे. माध्यम कोणतेही असो.. शिकणं, स्वतःला घडवणं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. अजून खूप काही लिहीता येईल पण... पुन्हा पुन्हा त्याच त्या चर्चांवर गिगाबायटी प्रतिसाद टाईपण्याचे कष्ट घेणार्‍या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं.

In reply to by नीलमोहर

वेल्लाभट 24/11/2015 - 15:38
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.
का? आणि हे आपल्याइथेच होतं की इतर इंग्रजेतर भाषिक देशातही होतं?
इंग्रजी आता जागतिक भाषा आहे
हे आपण जितक्या ठामपणे सांगतो, मानतो, आपल्या मुलांची शिक्षणपद्धतीही बदलतो, तितक्या ठामपणे इतर इंग्रजेतर भाषिक देश म्हणतात का?
आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,
माध्यम बदलायला हवंच का? त्या भाषेचे शिक्षण घेऊनही पुरेसं असतं असं नाही वाटत का?
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.
त्यात कमीपणा नाही वाटत; कमीपणा मातृभाषेतून शिकण्यात वाटतो. असो. पुन्हा तीच चर्चा मलाही करायची नाही. पण जसं तुम्हाला गिगाबायटी प्रतिसादकांचं कौतुक वाटतं, तशीच मला 'बाहेरच्या जगात (हे जग तुमच्या घराच्या उंबरठ्यापासून सुरू होतं) इंग्रजी बोलावच लागतं' असं म्हणणा-यांची फार मजा वाटते.

In reply to by नीलमोहर

मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही हे वाक्य नक्की कोणत्या प्रतिसादात आलंय ते माहित नाहीये पण हा सुर नेहमीच लागतो. ह्यावर एक प्रश्न आहे की मराठी माध्यमात शिकणार्‍यांना खरंच मराठी साहित्या बाबत ज्ञान असते का? मी किमान माझ्या वर्गातली अर्धी मुलं उभी करु शकते ज्यांना मराठी साहित्य, व्याकरण ह्याबद्दल काहिही माहिती नाही. बोलताना सुद्धा "मी आली.. मी गेली" ... साधी गोष्ट आहे हो.. माझा इंग्रजी शाळेत जाणारा ३.५ वर्षाचा मुलगा उत्तम मराठी बोलतो आणि कालच "दिल की तपिश" गुणगुणत होता. (तो "सायलेंट हो जा वरना मै व्हॉयलेंट हो जाऊंगा" सुद्धा ऐकवतो..) कोण शिकवतं हे? घरात आपण कसे बोलतो, काय बोलतो ह्यावर खुप काही अवलंबुन आहे. सगळंच कसं शाळेच्या माध्यमावर अवलंबुन असेल? छे बुवा... परत माझी पण गाडी त्याच लायनीवर आली.. खरंय नीमो.. पुन्हा पुन्हा काय तेच बोलायचं?

In reply to by नीलमोहर

संदीप डांगे 24/11/2015 - 15:52
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.
याबद्दल काही विदा? पुरावा? कारण आत्ता २०१० ते २०१५ ह्या काळात जे विद्यार्थी मुलाखती देत असतील त्यांचे प्राथमिक शिक्षण अंदाजे १९९० ते १९९५ यादरम्यान सुरू झाले असावे, तेव्हा इंग्रजी शाळांचे स्तोम अजिबात नव्हते. तेव्हा कॉन्वेंट तुरळक होत्या. इंग्रजीचेही स्तोम माजले नव्हते. इंग्रजीचे स्तोम माजायला साधारण १९९५ सालानंतर सुरुवात झाली. ९१ च्या नीतीबदलानंतर ग्लोबलायझेशनची लाट आली. वायटूकेमुळे मुलं भराभर परदेशात गेली, परदेशातून आयटीचे बूम भारतात आले त्यांना सर्वप्रांतीय, सर्वभाषिक कामगारांना एकत्र काम करणे सोयीचे जावे म्हणून इंग्रजी संवादकौशल्य उत्तम असलेल्यांना निवडले जाऊ लागले. ह्यासर्व कारणामुळे इंग्रजी आवश्यक असा समज सर्वत्र पसरला. २००० सालानंतर मराठी शाळेत मुलांना टाकणारे झपाट्याने कमी झालेत. इंग्लिश स्पीकींगचे बूमही २००० सालानंतर प्रचंड फोफावले. 'आम्हाला इंग्रजी शाळेत का टाकले नाही' हा प्रश्न विचारू शकणारी पीढी आधीच नोकर्‍यांमधे आहे, भविष्यात जी विचारू शकेल ती इंग्रजी शाळेत आहे. त्यामुळे पालकांच्या नावाने ओरडणारे विद्यार्थी नक्की कोठे आहेत याचे कुतूहल आहे. माझे निरिक्षण असे आहे अशी भीती आताच्या बहुसंख्य (पिरातैंना वगळून) पालकांच्याच मनात आहे म्हणून ह्या भीतीलाच ते इंग्रजी शाळेत टाकण्यासाठीचे कारण, ढाल म्हणून वापरतात. तसंच प्रत्यक्ष अनुभवानुसार माझ्या अकोल्यातल्या (मुंबईच्या तुलनेने मागास) शाळेतले साठ टक्के वर्गबंधू मोठ्मोठ्या कंपन्यांमधे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सर्वांचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे, खरंच कोण पालकांना ओरडतंय हा प्रश्न पडलाय.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:19
भाषेला ताकद द्या पैश्याची आणि कर्तृत्वाची, म्हणजे अमराठी लोक पण शिकू लागतील मराठी. पेठकर काकांच्या हॉटेल मधले नोकर १० वाक्य तरी मराठी शिकतीलच ना. असे आरक्षण देऊन पुढे जाता येत नाही.

जेव्हा एखाद्या भाषेच्या वापराने भौतिक प्रगती (आर्थिक फायदा, सामाजिक पत, एकंदरीत उंचावलेला जीवनाचा स्तर, इ) होते ती भाषा लोक जबरदस्ती न करताही, किंबहुना विनातक्रार कष्ट करूनही, स्विकारतात हे जागतिक व सार्वकालीक सत्य आहे. हे शक्य न झाल्यास, जबरदस्तीने अथवा नुसत्या कळकळीने आजवर कोणतीही भाषा वाढलेली नाही. बाकी भाषिक अस्मिता वगैरे शब्द नुसते (बर्‍याचदा राजकारण करण्यासाठीच) बोलायला कामी येतात... भाषेच्या उत्कर्षाला त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असाच इतिहास आहे.

पैसा 24/11/2015 - 22:41
गोव्यात रस्त्यावर शाली विकणार्‍या आणि मासे विकणार्‍या बाया पण कामचलाऊ इंग्लिस बोलतात. देसी लोकांकडेच नव्हे तर फारेनर लोकांकडे. एखाद्या भाषेत बोलणे हा कम्युनिकेशनची आवश्यकता आणि सवय याचा भाग आहे. तुम्ही कोणत्या माध्यमात शिकलात आणि काय शिकलात, का शाळेत गेलाच नाहीत यावर खरे तर काहीच अवलंबून नसते. हां, आम्ही दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली पोरे अकरावीला कॉन्व्हेंटशिक्षित इंग्रजी माध्यमाच्या पोरांबरोबर एकत्र आलो, तेव्हा मास्तर लोक त्या कान्व्हेंटवाल्यांच्या ग्रामरवरून त्यांचा सतत उद्धार करायचे हे आठवते आहे. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत घेतले नसेल तर त्या पोरांना कोणतीच भाषा चांगली नीट अशी येत नाही असे मला तेव्हापासून वाटते. विशेषतः दुसर्‍या भाषांच्याबाबत पाहिले तर घरात मराठी बोलत असताना हिंदी किंवा संस्कृत मराठी माध्यमात समजून घेणे सोपे जाईल, तेवढे इंग्लिश माध्यमात समजणार नाही. एवढे बोलून मी खाली बसते. जयहिंद. (अवांतरः सरस्वती सेकंडरीवाल्यांनी मराठीच्या तुकड्या कमी करून इंग्रजी सुरू केल्यात का? तर जरूर ओरड करायला हरकत नाही. पण त्या जास्तीच्या सुरू केल्या असतील तर तो केवळ व्यापारी निर्णय समजून दुर्लक्ष करावे.)

In reply to by पैसा

वेल्लाभट 24/11/2015 - 22:56
मराठी शाळा चालू ठेवून इंग्रजी सुरू होते आहे. पण त्याचे खरे परिणाम तेंव्हा कळतील जेंव्हा सुमारे ६०००० प्रतिवर्ष फी भरलेल्या सीबीएसई वाल्यांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य दिलं जाईल, आणि मराठी माध्यमातील मुलांना मागे ठेवलं जाईल. ही केवळ माझी भीती आहे. असं होईल असं मी म्हणत नाही; न होवो. पण जर झालं तर मात्र मराठी माध्यमातील पालकांसाठी, मुलांसाठी ते वाईट ठरेल.

pacificready 24/11/2015 - 23:36
ओक काका, तुमचा यूनेस्को बाबतचा मुद्दा आधी मातृभाषेत ज्ञान आत्मसात करावं, तसं करण्यासाठी मातृभाषेत मिळालेलं ज्ञान लवकर आत्मसात होतं असा आहे ना? यामागचं कारण आपल्याला त्या भाषेतल्या संज्ञा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, त्या संज्ञा समजून घेण्यापूर्वी आधी शब्द समजावून घ्या नंतर त्याला visualise करा मग ते समजेल असं काही मातृभाषेत शब्द उच्चारल्याबरोबर करावं लागत नाही (कारण आपल्या स्मृतिपटलावर तो दिसतो) असं काही आहे ना? बाकी भाषा हे व्यक्त होण्याचं एक माध्यम असल्यानं एका मर्यादेपर्यन्त महत्त्व आहेच नि त्याची मर्यादा ओळखण्याचं महत्वही समजून घेतलं गेलं पाहिजे.

In reply to by pacificready

मोगा 25/11/2015 - 07:16
मूळ्ज्ञान जर इंग्रजीतच शिकावे लागेल. लिव्हर , स्प्लीन हे मूळ इंग्रजी भाशीतच शिकावे लागेल. त्याचे मुद्दाम यकृत , प्लीहा करुन त्याच इंग्रजी पुस्तकाचे मराठी रुपांतर करुन ती मराठी बोजड करुन विकास कस होईल?

रेवती 25/11/2015 - 00:06
शाळेनं मराठी माध्यमच ठेवावं की इंग्रजी माध्यम सुरु करावं हा व्यावसायिक निर्णय आहे म्हणून त्यात पडायचे नाही पण इंग्रजी संभाषणाबाबत एका पालकांनी त्यांच्या मुलीबाबत केलेला प्रयोग हे एक उदाहरण माझ्याच वर्गात होते. ती मराठी शाळेत आमच्याबरोबर शिकायची. आम्हा बर्याच मुलींना जसे इतके टक्के आणि तितके मार्क यांच्यासाठी घरून दबाव असायचा, तसा तिला नव्हता कारण अठवड्यातून एकदा असे लहानपणापासूनच ती इंग्रजी वाचन, संभाषण वर्गाला तज्ञांकडे जात असे. (त्यावेळी एका तासात इंग्रजी, फाडफाड इंग्रजी असे प्रकार उपलब्ध होते पण तिकडे जात नसे.) त्यामुळे यत्ता दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी अशा दोन्ही विषयात तिने चांगलीच मजल मारली होती. असे असताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा व इंग्रजी असे दोन्ही साधले. इंग्रजी वक्तृत्वस्पर्धा, जी वर्षातून एकदा असायची त्यास तिला आमच्या शाळेतर्फे दरवर्षी पाठवले जायचे. बाकी कोणत्याही, म्हणजे नाचणे, गाणे, मैदानी स्पर्धा, मराठी वक्तॄत्व यामध्ये ती फारशी नसायची व ताणाखाली दबलेलीही नसायची.

असंका 25/11/2015 - 08:57
वा वा वेल्लाभट अगदी सुरेख लेख!! माझ्या मराठी शाळांची अवस्था बघवत नाही आता. एका चुकीच्या भावनेला बळी पडून आपली मातृभाषा आपल्या लोकांकडून दुर्लक्षित होताना बघणं फारच त्रासदायक होतंय.

इडली डोसा 25/11/2015 - 09:52
मुलं कुठल्या माध्यमात शिकतात या पेक्षा पालकांनी मातृभाषा किंवा कोणत्याही इतर भाषेत मुलांनी प्राविण्य मिळवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला हवेत. मा़झ्या माहितीतली एक मुलगी फलटण सारख्या निमशहरी ठिकाणी मराठी माध्यमात शिकुनही उत्तम इंग्रजी बोलते कारण तिच्या आई- बाबांनी तिच्या इंग्रजी संभाषणवर मेहनत घेतली होती. तसेच माझी एक घनिश्ठ मैत्रीण कॉन्व्हेंट मध्ये शिकुन सुद्धा असंख्य मराठी पुस्तके वाचते. मराठी गाणी ऐकते ( हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली अगदी कवी ग्रेस यांची पण) आणि त्यांचे रसग्रहणही करते. तिचाच भाऊ अगदी स्वतःची सही पण सगळीकडे मराठीतच करतो. यात कुठे ते कॉन्व्हेंटमधे शिकले त्याचा काही अडसर आलेला मला तरी दिसलेला नाही. जर मराठी मध्यमात शिकल्यानेच मराठीचे प्रेम वाढेल असे म्हणणे असेल तर मला तरी वाटते त्यात काही तथ्य वाटत नाही. वर पिराने म्हटल्या प्रमाणे मराठी मध्यमात शिकुनही मराठी वाचन - लेखन संभाषण यात दयनीय अवस्था असलेले खुप लोक दिसतात. माझी मुलगी आता ३ वर्षांची होईल आणि 'ट्विंकल- ट्विंकल लिटिल स्टार' जेवढ्या आवडीने म्हणते तेव्ह्ड्याच आवडीने 'मामाच्या गावाला जाऊ या' पण म्हणते. कोणलाही आपल्या भाषेचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडुन काय प्रयत्न करता येतील हेच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात बघितले पाहिजे. मुविंच्या
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.
या प्रतिसादाशी १००% सहमत.
मराठी शाळाही धरत आहेत इंग्रजीची कास. लोकसत्ता मधे अशा आशयाची बातमी आहे. माझ्याच शाळेची ती बातमी आहे. हे सांगताना खंत वाटते. मी स्वत: सरस्वती सेकंडरी स्कूल चा एक माजी विद्यार्थी असून हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. माझे संपूर्ण शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून, मराठी माध्यमातून झाले आहे. आणि सरस्वती ही शाळा महाराष्ट्रातील अग्रेसर मराठी शाळांपैकी एक आहे ही बाब नेहमीच सुखावते. परंतु इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा शाळेचा निर्णय दु:खद आहे. आज असंही मराठी लोकांवर, मराठी भाषेवर जे वैचारिक आक्रमण सुरू आहे ते चिंताजनक आहे.

कॅनडातील (कनाडा) वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण संधी

विक्रांत ·

मोदक 20/11/2015 - 20:33
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार? जो कोणी करिअर कौन्सिलर आहे त्याची माहिती नेटवर शोधा आणि त्याने फसवलेली उदाहरणे असतील तर तुमच्या भाच्याला दाखवा. बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. संपूर्ण प्रोसेसमध्ये होणार्‍या खर्चाचे आकडे माहिती असतीलच, नसल्यास त्याचीही माहिती काढून द्या. आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो. तुम्ही (पण) पत्रकार आहात का हो? ;) ऑन अ सिरीयस नोट, सल्ला देण्याआधी सर्व माहिती व्यवस्थीत काढलीत आणि तुमच्या अनुभवविश्वातील जिवंत उदाहरणे समोर असतील तर सल्ला न ऐकण्याचे धाडस होईल असे वाटत नाही.

स्रुजा 20/11/2015 - 20:45
१२+३ ला ऑप्शन्स फार कमी आहेत. १२+४ ला ऑप्शन्स आहेत. आयसीआयसीआय चा उपयोग होईल , टोरॉटो मधुन. अर्न अँड लर्न सोपं होईल पण स्कॉलरशिप हवी. कॉमर्स ला तुम्ही उल्लेखलेल्या भागांत भरपूर संधी आहेत, शिवाय आटोवा मध्ये फेडरल गव्हर्नमेंट मध्ये पण आहेत. फेड गव्ह चा जॉब हाय अर्निंग आणि फुल ऑफ पर्क्स समजला जातो. कॅनडातल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षांचा वर्क व्हिसा मिळतो, नीट जॉब मिळाला तर पर्मनंट रेसिडेन्सी देखील मिळते. या दोन्ही स्टॅटस मध्ये हेल्थ केअर असतं, शिवाय इथल्या जॉब मार्केट चा आणि त्याहीपेक्षा स्टॅटस चा बराच फायदा नंतर अमेरिकेत जायचं असेल तर किंवा भारतात परतण्यासाठी पण होतो.

तो कॅनडामध्ये सेटल व्हायच्या दृष्टीने बघत असेल तर बी.कॉम पुर्ण झाल्यावर एम.बी.ए. करायला टोरांटो, ओटवा किंवा कॅलगेरीसारख्या ठिकाणी अ‍ॅडमिशन घेउ शकेल. नंतर वर्क व्हिसा घेउन जॉब करु शकेल व नंतर पी. आर साठी अर्ज करुन पुढे ४ वर्षांनी सिटीझनशिप घेता येइल. या कॉलेजचे सर्व ऑनलाईन अर्ज व माहीती मिळू शकेल. विनिपेगही एक चांगले ठीकाण आहे व तिथले रेड रिव्हर कॉलेज चांगले आहे. http://www.rrc.ca/index.php?pid=5691 राहण्याचा खर्च शेअरिंगमध्ये महीन्याला साधारण ५०० डॉलर्स आणि खाण्याचे १५० डॉलर्स अंदाजे होतील. बस पास ८०-१० डॉलर्स महीन्याचा. एकट्या माणसाला एव्हढे पुरेसे होईल. शक्यतो एजंट्शिवाय स्वतःच माहीती घेउन करा.टोरांटोला महाराष्ट्र मंडळपण आहे. बहुतेक व्हॅन्कुव्हरलापण आहे. http://www.cic.gc.ca/ ही कॅनडा गवर्न्मेंटची साईट बघा. शिवाय व्हिसा वगैरेसाठी http://www.canadavisa.com/canadian-student-permits-and-student-work-permits-for-international-students.html हा ब्लॉग किवा ईतर ब्लॉग रिफर करु शकता.

आदूबाळ 21/11/2015 - 16:08
सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. ■■■■ फायनल? की इंटर/IPCC?

मोदक 20/11/2015 - 20:33
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार? जो कोणी करिअर कौन्सिलर आहे त्याची माहिती नेटवर शोधा आणि त्याने फसवलेली उदाहरणे असतील तर तुमच्या भाच्याला दाखवा. बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. संपूर्ण प्रोसेसमध्ये होणार्‍या खर्चाचे आकडे माहिती असतीलच, नसल्यास त्याचीही माहिती काढून द्या. आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो. तुम्ही (पण) पत्रकार आहात का हो? ;) ऑन अ सिरीयस नोट, सल्ला देण्याआधी सर्व माहिती व्यवस्थीत काढलीत आणि तुमच्या अनुभवविश्वातील जिवंत उदाहरणे समोर असतील तर सल्ला न ऐकण्याचे धाडस होईल असे वाटत नाही.

स्रुजा 20/11/2015 - 20:45
१२+३ ला ऑप्शन्स फार कमी आहेत. १२+४ ला ऑप्शन्स आहेत. आयसीआयसीआय चा उपयोग होईल , टोरॉटो मधुन. अर्न अँड लर्न सोपं होईल पण स्कॉलरशिप हवी. कॉमर्स ला तुम्ही उल्लेखलेल्या भागांत भरपूर संधी आहेत, शिवाय आटोवा मध्ये फेडरल गव्हर्नमेंट मध्ये पण आहेत. फेड गव्ह चा जॉब हाय अर्निंग आणि फुल ऑफ पर्क्स समजला जातो. कॅनडातल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षांचा वर्क व्हिसा मिळतो, नीट जॉब मिळाला तर पर्मनंट रेसिडेन्सी देखील मिळते. या दोन्ही स्टॅटस मध्ये हेल्थ केअर असतं, शिवाय इथल्या जॉब मार्केट चा आणि त्याहीपेक्षा स्टॅटस चा बराच फायदा नंतर अमेरिकेत जायचं असेल तर किंवा भारतात परतण्यासाठी पण होतो.

तो कॅनडामध्ये सेटल व्हायच्या दृष्टीने बघत असेल तर बी.कॉम पुर्ण झाल्यावर एम.बी.ए. करायला टोरांटो, ओटवा किंवा कॅलगेरीसारख्या ठिकाणी अ‍ॅडमिशन घेउ शकेल. नंतर वर्क व्हिसा घेउन जॉब करु शकेल व नंतर पी. आर साठी अर्ज करुन पुढे ४ वर्षांनी सिटीझनशिप घेता येइल. या कॉलेजचे सर्व ऑनलाईन अर्ज व माहीती मिळू शकेल. विनिपेगही एक चांगले ठीकाण आहे व तिथले रेड रिव्हर कॉलेज चांगले आहे. http://www.rrc.ca/index.php?pid=5691 राहण्याचा खर्च शेअरिंगमध्ये महीन्याला साधारण ५०० डॉलर्स आणि खाण्याचे १५० डॉलर्स अंदाजे होतील. बस पास ८०-१० डॉलर्स महीन्याचा. एकट्या माणसाला एव्हढे पुरेसे होईल. शक्यतो एजंट्शिवाय स्वतःच माहीती घेउन करा.टोरांटोला महाराष्ट्र मंडळपण आहे. बहुतेक व्हॅन्कुव्हरलापण आहे. http://www.cic.gc.ca/ ही कॅनडा गवर्न्मेंटची साईट बघा. शिवाय व्हिसा वगैरेसाठी http://www.canadavisa.com/canadian-student-permits-and-student-work-permits-for-international-students.html हा ब्लॉग किवा ईतर ब्लॉग रिफर करु शकता.

आदूबाळ 21/11/2015 - 16:08
सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. ■■■■ फायनल? की इंटर/IPCC?
माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत.

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?

संदीप डांगे ·

मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे १००% सत्य आहे . मी बोटीवर होतो तेव्हा मी माझा मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्ह केला होता आणि मी मिपा चे सदस्यत्व घेतले =))

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 17/07/2015 - 19:29
आमची सौ. म्हणते तुमचे डोके कामातून गेले म्हणून संध्याकाळी आल्यापासून कामधाम सोडून मिपावर ....

स्रुजा 08/07/2015 - 20:50
मला तरी हे थोडं संशयास्पद वाटतंय. २ दिवसात हा वर्क्शॉप संपतो म्हणुन जास्त च वाटतंय. बरं डोळे बंद करुन वॉलेट चा रंग का ओळखायचा? ५ वर्षां पुढची मुलं तसं ही कलर्स ओळखतात च की. एकाग्रता वाढवण्यासाठी वगैरे एक्सरसाईझेस असतात पण सातत्य लागतंच त्यात. हळु हळु सवयी लावणं, अस्थिर स्वभाव असेल तर त्याला थोडं स्थैर्य देणं वगैरे त्यात अभिप्रेत असतं. आणि आता लहान मुलं जात्याच हुशार अस्तात. कुणाचं ग्रास्पिंग चांगलं असतं, कुणाला खेळात रस असतो , कुणाला अजुन कशात आणि पालक सुद्धा इतके जागरुक पणे लक्ष देतात की साधारण २ र्‍या , ३र्‍या वर्षापर्यंत मुलांचे हे कल लगेच कळतात. आणि त्यांचं कौतुक पण सगळीकडुन होत असत, त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकद रॅट रेस मध्ये उतरले की मग या दुव्यांमध्ये लिह्लंय तसं परिक्षेतले मार्क्स आणि मेडिकल मधलं यश वगैरे मधुन हे असले प्रकार जनमाला येत असावेत आणि त्यांना लोकप्रियता पण म्हणुन च मिळत असणार.

अंतु बर्वा 08/07/2015 - 20:54
प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या मामाचा दहा वर्षाचा मुलाने डोळे बंद करुन (मी स्वतः verify केलं डोळे नक्की बंद आहेत ना?) माझ्याकडच्या नोटेवरचा नंबर अचुक सांगितला. मी मोबाईल वरुन डायल केलेला नंबर (कीटोन अक्टिवेटेड असताना) फक्त आवाजावरुन अचुक ओळखला. फळे आणी ईतर पदार्थांचे रंग स्पर्श न करता ओळखले. मामांना याबद्दल विचारले असता कुठल्यातरी शिबीरात शिकल्याचे सांगितले. तसेच आपण मुलाला प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास आग्रह करीत नाही असेही म्हणाले, कारण त्याची इच्छा/मुड नसताना तसे करावयास लावले तर त्याला ते जमत नाही.

द-बाहुबली 08/07/2015 - 21:13
ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते
हे ध्वनी व ब्रेन जिम व्यायाम टाँरंटवरही उपलब्ध्द आहे का ?

चित्रगुप्त 08/07/2015 - 22:30
डोळ्यांवर पट्टी बांधून अनेक जादूगार मंडळी भर रस्त्यातून बाईक चालवणे व अनेक प्रकार करतात, त्यापैकी काही प्रकार वाटतो. इथे जो व्हिडियो दिला आहे, त्यातील मुलीला कागद, नोट वगैरे समोर धरावे लागत असताना दिसते, त्याअर्थी तिला पट्टीतून दिसत असणार असे वाटते. मी स्वतः लहानपणी जादूचे खेळ करायचो, त्यात अगदी अशक्य वाटणार्‍या करामतींच्या मागे अगदी सोपी युक्ती असायची, पण जोवर ती ठाउक नाही, तोवर चमत्कार वाटायचा. अश्या एकाद्या युक्तीचा पैका कमावण्यासाठी रचलेला हा बनाव वाटतो. कुणाच्या परिचयात कोणी जादूचे खेळ करणारा असेल, तर तो बरोबर सांगू शकतो. एक शक्यता संमोहनाची पण वाटते.

चित्रगुप्त 08/07/2015 - 22:40
मुलीच्या डोळ्यांवर विशिष्ट प्रकारची जी पट्टी बांधलेली आहे, त्यात लहानसा स्पीकर/हेडफोन/ असून त्याद्वारे कोणीतरी तिला माहिती पुरवत असेल. लास वेगासच्या मोठमोठ्या जुगारी अड्ड्यातून अश्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात, याबद्दल मोठा कार्यक्रम मागे कोणत्यातरी च्यानेलावर बघितला होता. कोण केंव्हा किती पैसे जिंकतो/हरतो, यावर कसिनोवाल्यांचा पूर्ण ताबा असतो, आणि हे काम अत्याधुनिक तंत्राद्वारे वरील मजल्यावर बसलेले अनेक तंत्रज्ञ करत असतात, असे दाखवले होते. समोरील विमान वा बस, हत्ती इ. वस्तू क्षणार्धात दिसेनाश्या करणे वगैरे करामती या तंत्राने करता येतात.

दोन अडीच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी वॄत्तपत्रांत एक बातमी वाचली होती. छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात इस्राइलहून आलेल्या काही तांत्रिकांनी एकाग्रतेच्या जोरावर काही करामती करून दाखवल्या. जसे धातूचा चमचा हात न लावता केवळ बघत राहून वाकवणे. भुजबळांनी (कशाचा तरी आडोसा करून) कागदावर काय लिहिले असेल ते वाचून दाखवणे. ती बातमी आता शोधताना मिळत नाहीये कारण भुजबळांचा उल्लेख हजारो बातम्यांमध्ये असतो. दीड वर्षांपूर्वी जादूगार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम आमच्या मंडळाने ठेवला होता. अगोदरच्या दिवशी त्यांनी काही साधे प्रयोग आम्हाला दाखवले होते व काहींमध्ये कशी हातचलाखी केली जाते तेही दाखवले होते. धाग्यात उल्लेखलेल्या प्रयोगांच्या मागेही काही हातचलाखीच असणार हे नक्कीच.

मी सुधा हा प्रकार पाह्यला आहें . पण वर वर्णिलेले प्रकार सोडले तर या मुलांची बाकी विषयात काही नेत्रदीपक प्रगति दिसलेली नाही कदाचित अजुन काही काळ जावा लागेल नेटवर शोधले असता दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या ।या विषयातील जाणकाराणी मार्गदर्शन करावे

कंजूस 09/07/2015 - 04:47
तो dynamo नावाचा जादुगार कमालीच्या जादु ( पाण्यावर चालणे,हवेत उडणे ,कारंज्यातील पाण्याचा बर्फ करणे ,कागदाची फुलपाखरे जिवंत करणे इत्यादी ) करतो रस्त्यातच तरी यास मनोरंजन म्हणतो.हिच माणूस भारतात असता तर ? काशीला येऊन गंगेत असंख्य दिवे लावले पण तिकडच्या राख फासून बसलेल्या साधुंनी ढिम्म आश्चर्य दाखवले नाही.

In reply to by कंजूस

Dynamo चा शो जर टीव्ही वर असेल आणि मी तिथे असेन तर तो शो फाट्यावर मारतो. जादु/ हातचलाखी बघण्यात जी मजा आहे ती त्यामागच्या ट्रिक्स समजुन घेण्यामधे नाही. एक प्रेक्षक म्हणुन मला जादुच्या रेसिपीपेक्षा तिची मजा चाखण्यामधे जास्त रस आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यसवायजी 12/07/2015 - 11:57
का नाही? जादूचे प्रकार फारसे बदलत नाहीत. तेच कुठूनतरी काहीतरी बाहेर काढणे, पत्त्याचे खेळ वगैरे. किती वर्षं तेच तेच बघायचं? डोकं चालवून बघितलं, नाहीच जमत. मग आता ट्रिक बघतो. - शाळेत असताना एकदा अं.नि.चा एक शो पाहिला होता. तेंव्हापासून "मॅजिक रिव्हील्ड" पहायला आवडते.

सिरुसेरि 09/07/2015 - 11:42
हा प्रकार कर्णपिशाच्च किंवा टेलीपथीचाही असू शकतो . जादु/ हातचलाखी यांवर आधारीत ख्रिस्तोफर नोलनचा 'द प्रेस्टीज ' हा चित्रपट मस्त आहे .

गवि 09/07/2015 - 11:54
याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.
वॉव.. कशी मिळते याची फ्रँचाईजी? बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता. तिथे मिसळ उत्तम मिळत असल्याने जात असे. तिथेही मिसळ खाण्यात काहीतरी सायंटिफिक आहे असं म्हणत "मिसळ खाण्याच्या अनुभवा"विषयी काही शास्त्रीय किचकट प्रश्न असलेला फॉर्म भरुन घेत होते. आत मेंदूच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि वेगवेगळ्या सीझन्समधे त्याचे वेगवेगळे भाग कसे अ‍ॅक्टिव्हेट होतात यासम काहीतरी होतं. आहे आहे.. हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!

In reply to by गवि

सतिश गावडे 09/07/2015 - 14:30
बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता.
तो पंथ होता का? शाळेत असताना त्यांचे लोक अधून मधून यायचे आणि कसल्या कसल्या मेंदुच्या आकृत्या असलेली पुस्तके विकायचे. तेव्हा ते सारे खरेही वाटायचे.

In reply to by गवि

अस्वस्थामा 09/07/2015 - 14:52
हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!
हे सगळं मोठ्ठं सायन्स का असतं आणि विज्ञान का नसतं असा प्रश्न मला नेहमीच सतावतो.. ;)

तुडतुडी 09/07/2015 - 12:33
हे फक्त लहान मुलांच्याच बाबतीत का ? मोठ्या माणसांच्या बाबतीत का नाही ? आणि ह्याची जाहिरात करण्यासाठी वापरलेली मुले त्यांचीच अस्तिल. त्यांना शिकवल्याप्रमाणे ते करून दाखवत अस्तिल. किवा डोळ्यावर बांधलेली ती पट्टी पारदर्शक असेल . आत मध्ये छोटा कॅमेरा , हेड फोन लपवलेला असू शकतो

संदीप डांगे 09/07/2015 - 16:09
मी आत्ताच त्या मालकाला भेटून आलोय. गेल्या नऊ महिन्यातली प्रगती अविश्वसनीय आहे. मी त्याला म्हटले मला यावर रीसर्च करायचा आहे. तो म्हणाला कधीही या. त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो, जर त्यातल्या एकाही पालकाने म्हटलं की ह्यांनी फसवलंय, हे थोतांड आहे तर मी ही संस्था बंद करून घरी बसेन. तर मंडळी, तिथे येणार्‍या मुलांवर मी माझ्या पद्धतीने रीसर्च करणार आहे. तुमचे काही प्रश्न, कुतूहल, शंका असेल तर कळवा. अभ्यासात अंतर्भूत करेन. 'जे विश्वास ठेवतात त्यांना कुठल्याही कारणाची गरज नाही. जे ठेवत नाहीत त्यांना कुठलेही कारण पुरेसं नसतं'. या वाक्यात नमूद केलेल्या दोन अवस्थांपलिकडे जाऊन काहीतरी करता येण्यासारखं आहे का? या प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 09/07/2015 - 23:35
तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल स्केप्टीक आहात की एका वेगळ्या पद्धतीने त्यांची जाहिरात करत आहात? :)

In reply to by सतिश गावडे

संदीप डांगे 10/07/2015 - 21:42
गावडेसाहेब, असा प्रश्न येईल हे अपेक्षितच होते. मी स्वतःला स्केप्टीक म्हणत नाही. कारण जे कोणी स्केप्टीक/रॅशलिस्ट बघितलेत ते फार अहंकारी आणि 'माझं तेच खरं' असं म्हणणारे असतात. त्यांना कितीही समजावून सांगा ते आपला हेका सोडायला तयारच नसतात, काहीतरी बेसलेस एक्स्प्लेनेशन देत असतात आपल्या "वाटण्याचं". मी तरी असंच बघितलंय, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. मी स्वत:ला अभ्यासक म्हणेल. एखाद्या दाव्यात काय खरं, काय खोटं असं आधीच ठरवून न बघता, सगळ्या बाजूने प्रॉपर विचार करून निष्कर्ष काढणे याला मी महत्त्व देतो. मला या मिड-ब्रेनच्या वर्किंग लॉजिक मधे अजिबात इंटरेस्ट नाही. ते कसं काम करतं, खरं आहे की फसवतात वैगेरेच्या भानगडीत पडून उपयोग नाही. फक्त रीझल्ट आहेत का? आधी आणि नंतर च्या अवस्थांमधे जाणवण्याइतपत फरक आहे का? आणि तो या कोर्समुळेच झालाय का? या तीन प्रश्नांची उत्तरे शोधायचीत. रच्याकने: कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय? मी शोधतोय. तुम्ही पण सांगा. खोटा दावा करून तोंडघशी पडणारे हजारो आहेत. पण उलटं उदाहरण अपवादालातरी असायला पाहिजे की नाही?

In reply to by संदीप डांगे

आनंदी गोपाळ 10/07/2015 - 11:23
फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?
१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

संदीप डांगे 10/07/2015 - 21:32
१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? >> https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method#Process. जी काय माहिती उपलब्ध होईल त्याचे तटस्थपणे संकलन, निरिक्षण व त्यावर प्रयोग करून येणारे परिणाम तटस्थपणे तपासणे. यापेक्षा अजून काय वेगळी पद्धत असेल तर जरूर सांगा मी अंतर्भूत करेन. २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? >> जी मुले कोर्स करून गेलेली आहेत व इथून पुढे हा कोर्स करणार आहेत त्यांचा विदा गोळा करणार, कौटुंबिक माहिती, शालेय प्रगती, इतर सवयी. कोर्स नंतर त्यांच्यात काय फरक पडला, पालकांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्रमैत्रिणींचं मत, शालेय प्रगतीत पडलेला फरक, इत्यादी विषयांचे माहिती संकलन. शिवाय माझ्या स्वतःच्या मुलाला ह्या कोर्सला घालणार आहेच.(तेही फुकटात होईल याची तजवीज करून आलोय) मी फक्त बाहेरून, वरवर अंदाजपंचे दाहोदसे करणारा बुद्धीवादी नाही. गटारात उतरूनच घाण आहे का हे बघायला लागत असते या विचाराचा आहे. माझी कामे सांभाळून जेवढा जमेल तेवढा वेळ यासाठी देणारच आहे. ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? >> तुम्ही करा. जो काय रीपोर्ट तयार होईल तो सगळ्यांसाठी खुला असेल अभ्यासायला. फक्त कुणी नुसतं तार्किक तारे तोडायला नको. कारण त्याचा काय उपयोग नसतो. ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे? >> आम्ही अशा फसवणार्‍यांची बीन-पाण्याने करायला सर्वात पुढे असू. कारण मुले आणि त्यांचे आयुष्य-मन-स्वभाव-इच्छा ह्यांच्या बद्दल आम्ही कमालीचे हळवे आहोत. त्यात कुणीही (अगदी कुणीही बरंका) भंकस करत असेल तर आम्ही त्येनला काय सोडत नाय.

बबन ताम्बे 09/07/2015 - 17:58
यासंबंधी अगदी अशीच आठवण माझ्याकडे आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी एका कंपनीत अ‍ॅप्रेंटीस असतानाची ही आठवण आहे. आम्हाला शिकवायला जे सर होते, ते एकदा म्हणाले की तुम्ही फळ्यावर जे लिहाल ते मी डोळे झाकून पुन्हा लिहू शकतो. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे रुमालाने डोळे बांधले आणि आम्ही फळ्यावर खडूने काहीतरी लिहीले. नंतर सरांच्या हातात खडू दिला.डोळे बांधलेले असताना सरांनी फळ्यावर आम्ही जे लिहीले होते ते तेच लिहीले.आम्ही अत्यंत आश्चर्यचकीत झालो. मग सरांनी खुलासा केला की तुम्ही ज्यावेळी डोळ्यावर रुमाल बांधला, त्यावेळी खरे म्हणजे मी माझ्या पद्ध्तीने तुमच्याकडुन रुमाल बांधून घेतला. मी खाली थोडी गॅप ठेवली होती.आणि तुम्ही जेव्हा लिहीत होतात तेंव्हा मी त्या गॅपमधून बघत होतो. थोडक्यात मला सगळे दिसत होते. वरील व्हीडीओत अनिस ने तेच दाखवले आहे.

In reply to by बबन ताम्बे

द-बाहुबली 09/07/2015 - 18:06
आस्सयं काय... मग मी सुधा ब्रेन अ‍ॅक्टीवेशनची एक ट्रीक दाखवु शकतो. शेजारच्या खोलीतला मुलगा तुमच्या मनातला पत्ता आपोआप ओळखतो असा तो प्रयोग आहे. बाकी हे अ‍ॅक्टीवेशन खरेच झाले तर मज्जाच मज्जा आहे. अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.

In reply to by जडभरत

बॅटमॅन 11/07/2015 - 21:05
त्यासाठी नवीन नवराबायकोच पाहिजेत असं नाही. आय मीन नवीन आणि नवराबायको या दोन्हीही नेसेसरी किंवा सफिशियंट कण्डिषन्स नाहीत.

In reply to by बॅटमॅन

द-बाहुबली 13/07/2015 - 21:26
यावरुन रिलायन्सने प्रोड्युस केलेला जज ड्रेड नामक तद्दन मारधाडपट आठवला... त्यात बायडीचं नक्कि काय अ‍ॅक्टीवेट केलं गेलं यावर भाष्य नाही पण ती... मिडब्रेन एक्टीवेट केल्याप्रमाणे पावर्स राखते.

In reply to by द-बाहुबली

अंतु बर्वा 13/07/2015 - 23:10
आमच्या स्कार्लेट जॉन्सनचा लुसी सुद्धा असाच. फरक एवेढाच की यातलं स्त्री पात्र १००% ब्रेन वापरु लागते (साधारण माणसं फक्त १०% ब्रेनचा वापर करु शकतात या गृहितकावरुन). अवांतरः https://en.wikipedia.org/wiki/Ten_percent_of_the_brain_myth

मी मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशन करून घेतलं तर मला मोठ्मोठ्या लॉटर्‍यांचे नंबर (६+१, ७+१, इ इ) ओळखता येतील काय ? कोणीतरी लवकर सांगा. म्हणजे मला युरोमिलिओनेन आणि युएस मधल्या क्रिसमसच्या जंबो लॉटरी एडिशन्सच्या अगोदर अ‍ॅक्टिवेशन करून घेता येईल !

चित्रगुप्त 10/07/2015 - 00:09
अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.
असेच होण्याची पूर्ण शक्यता आहे. इथे दिलेले व्हिडिओ बघून ते मनगटावर चोळणे, वास घेणे वगैरे निव्वळ नाटक असून पट्टीतुन दिसते, हेच खरे असे वाटले.
त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो,
ताबडतोब ती लिस्ट घ्या आणि त्या सर्वांना भेटा. अर्थात त्यातही काही मखलाशी असेलच, तरी त्यातून काहीतरी कळेलच. लहान मुलांना, विशेषतः शाळकरी मुला -मुलींना या कामी वापरणे हे अश्लाघ्य आहे, (पण ते फार परिणामकारक आहे). "शाळकरी मुली" असल्याचा आभास निर्माण करून कशी फसवणूक केली जाते, याबद्दलचे दुसरे उदाहरण अनेकांना ठाऊक असेल.

In reply to by भीडस्त

चित्रगुप्त 14/07/2015 - 07:05
दिल्लीजवळील 'तुगलकाबाद' या स्टेशनावरून सकाळी पुष्कळ 'बन्जारन' तरुणींचे जथे लोकल ट्रेनीत चढतात आणि कॅनॉट प्लेस जवळील स्टेशनावर उतरतात. तिथे वेणीफणी करून पिशव्यांमधून आणलेले शाळेचे युनिफॉर्म चढवून, एकादी वही, पुस्तक हातात घेऊन मोठमोठ्या तारांकित हॉटेलात रवाना होतात.

५ ते १५ वयाचीच मुले का निवडतात. ह्या वयापेक्षा मोठी का नाही? हि मुले चष्मेवाली असतील तर उत्तमच. कारण ह्या वयात शक्यतो र्‍हस्वदृष्टिचा नंबर असतो. त्यामुळे एकतर मुलाच्या डोळ्यावर चष्मा नाही व डोळ्यावर काळी पट्टी म्हणजे समोरचाही विचार करतो पट्टितून दिसले तरी चष्म्याशिवाय तो वाचू शकणार नाही. र्‍हस्वदृष्टीवाला लांबचे वाचू शकत नसला तरी जवळचे चष्म्याशिवाय वाचू शकतो. जे पालक १५००० - २५००० रु. घालवून फसले ते फसलो असे दाखवत नाही स्वतः खोटं बोलतात व आपल्या मुलांनाही खोटं बोलायला भाग पाडतात. त्यामुळे अशा लोकांची दुकाने जोरदार चालू रहातात. मेंदू जर डोळ्यांशिवाय बघू शकत असेल तर निसर्गाने आपल्याला डोळे कशाला दिले असते. डोळ्यांकडून व कानाकडून आलेले संदेश पुढच्या व मागच्या मेदूकडे वाहून न्यायचे काम मधला मेंदू करतो. डोळे झाकून ठेवल्यावर कोणते संदेश हा मिड ब्रेन वाहून नेणार आहे.

मनीषा 11/07/2015 - 13:45
कुठे चालू आहे हो धुमाकुळ ? मी मागच्या महिन्यात भारतात (पुण्यात) होते. नुक्तीच परत आलेय. मला तर सारं काही शांत शांत दिसलं ? ते असो ... सध्या तुमच्या व्यावसायीक चिंता संपलेल्या अथवा कमी झालेल्या दिसतात . ( संदर्भः आत्महत्या करण्याचा विचार --- वगैरे लिहिलेला तुमचा लेख ) अभिनंदन! आणि अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा !

In reply to by मनीषा

संदीप डांगे 11/07/2015 - 14:17
क्षमा असावी. पुण्यात नाही तर जगात नाही असा नियम आहे हे मला माहिती नव्हतं. काय की आमच्या नाशिकमधे गल्लीबोळात हे इंस्टीट्यूटचे बोर्ड्स दिसतायत. चौकशी करून पाहिले तर भारतात बर्‍याच ठिकाणी ही भुछत्रं उगवलेली दिसली. ह्या संस्था आणि यांचे पितळ उघडे पाडणारे यांचे चाललेले जबरदस्त स्टेजशोजपण बरीच पब्लिसीटी खेचतायत असं आढळलं. याबद्दल वर्तमानपत्रांमधेही बरंच लिहून आलंय. पण तुम्हाला पुण्यात दिसलं नाही म्हणजे तो सगळा माझा भ्रम आहे असं मला आता जाणवलंय... धन्यवाद! असो. वैयक्तिक चौकशी आणि ख्यालीखुशाली विचारण्यासाठी मिसळपाव.कॉमने आपल्या सर्वांना व्य.नि व खरडवहीची सोय दिली आहे हे आपल्यासारख्या जुन्याजाणत्या सदस्यास माहिती नाही हे बघून फारच आश्चर्य वाटले. तसेच नको ते संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत करण्यामागचा उद्देशही कळला नाही.

In reply to by संदीप डांगे

नाव आडनाव 11/07/2015 - 20:57
संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत करण्यामागचा उद्देशही कळला नाही. +१ मलापण तो संदर्भ चुकिचा वाटला. पुण्यात दिसलं नाही मी पुण्यातंच राहतो आणी मागच्या आठवड्यातच पेपरबरोबर एक जाहिरात होती - बहुतेक पिंपळे सौदागर मधे आहे अशी एक संस्था. मी ती जाहिरात फेकून दिली नाहितर इथं दिली असती. आधी पण अश्या जाहिराती पुण्यात बघितलेल्या / वाचलेल्या आहेत.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 11/07/2015 - 22:23
दिलेला संदर्भ इतका टोचला का ? सॉरी बरं का? कुणाच्या वैयक्तीक आयुष्यातील अर्धेमुर्धे संदर्भ घेऊन नस्त्या कॉमेंटस करणं चूकच आहे म्हणा. पण तुम्ही तो लेख इथे बोर्डवरच दिला होता , त्यामुळे वाटलं त्यात लपविण्यासारखं काहीच नसावं ... कारण सगळ्यांनीच त्यावर भरपूर चर्चा केली होती. म्हणून म्हणलं इथेच विचारायला काही हरकत नसावी. पण तुम्ही दुखावलेले दिसता .. म्हणून परत एकदा सॉरी! असो ... पुण्यात नाही तर जगात नाही असं नाही .. ठीक आहे . मग नाशीक मधे आहे म्हणजे देशभर धुमाकुळ? असेलही ... आणि तेही असोच ...

In reply to by नगरीनिरंजन

संदीप डांगे 11/07/2015 - 14:48
धन्यवाद! खरं की खोटं हा प्रश्नच विचारायचा नाही असं काही सांप्रत स्वयंघोषीत बुद्धीवाद्यांनी ठरवून दिलंय. त्याबाहेर सामान्य माणसांना काही प्रश्नच पडू नये व त्यांनी त्यांची उत्तरे स्वतः शोधूच नये असा काहीसा ट्रेंड आहे. मेडीकल सायंस असो वा पॅरानॉर्मल सायन्स असो, अशा कुठल्याही ठिकाणी कुणालाही शंका आली तर त्यांनी प्रश्न न विचारता स्वयंघोषित बुद्धीवादी जे सांगतात ते निमूटपने शिरोधार्य मानायचं असा नियम झालाय जणू. ह्याबाहेर जाऊन कोणी प्रश्न विचारतंय तर आश्चर्य वाटणारच. काही गोष्टी घडणे कसे अजिबात शक्य नाही असा दावा बर्‍याच संशोधनांपूर्वी केल्या गेला होता. ज्यांनी काहीही अभ्यास न करता नुसत्या पुर्वग्रहांवर अवलंबून हे घडणे शक्यच नाही असा शिक्का दिला ते मागेच राहिले. ज्यांना प्रश्न पडले व त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनाच यश मिळाले. यश म्हणजे असे घडणे शक्य आहे की नाही याचे ठाम उत्तर. माझ्या मते प्रश्न पडणे हे मूर्खपणाचे लक्षण नसून प्रश्नच न पडणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. आंधळेपणाने कुठलाही दावा मान्य/अमान्य करणे हा मूर्खपणा आहे. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन 11/07/2015 - 19:04
प्रश्न पडूच नये असे मला म्हणायचे नाही; पण अतिशय ऑबव्हियस बाबतीत प्रश्न पडणे फारच भोळसटपणाचे असून प्रश्न विचारणार्‍याच्या हेतूवरच शंका निर्माण करणारे असू शकते हे तुम्ही पाहिलेच. खाली अनेकांनी नेटवर्क मार्केटिंग वगैरे उदाहरणे दिली आहेत म्हणजे अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडून गेलेल्या असताना 'सामान्य' माणसाला प्रत्येकवेळी तोच प्रश्न पडत असेल तर फेसपाम होणे भाग आहे. असा मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते?

जडभरत 11/07/2015 - 15:27
डांगेसाहेब मला तर हे बोगस वाटतंय! अशा गूढ शक्ती एक दोन तासाच्या सेमिनार मधून प्राप्त होतील? पूर्वी साधू लोक वर्षानुवर्षे तपस्या करायचे अशा शक्ती मिळवायला.

In reply to by टवाळ कार्टा

जगामधे गुढ शक्ती अस्तित्वात असतात मित्रा. एक छोटसं उदाहरण देतो, पुनर्जन्माचं. तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? नसेल असं गृहित धरु. इथे आपल्या मिपावरचं बघ. आयडी मेला रे मेला की दोन दिवसात पुनर्जन्म घेतो. आता बसला विश्वास?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 12/07/2015 - 12:03
खिक्क...पंण मिपाच्या ब्रम्हदेवाला भेटलोय मी...त्यामुळे मिपावर पुन्र्जन्म होतात हे सत्य आहे

In reply to by जडभरत

संदीप डांगे 11/07/2015 - 15:54
टकासाहेब म्हणतायत तशा ह्या गूढ शक्ती अस्तित्वात असायला हव्या ना? नाही का? त्यामुळे जे दावा करतायत त्यांचा तपासून पाहायला काय हरकत आहे? गूढ शक्ती वैगेरे काही नसते हो. जे सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या आवाक्यात नसते पण घडतांना दिसते ते गूढ. जे आवाक्यात आहे आणि समजू शकते ते का गूढ म्हणायचं?

काही शंका. हे कोर्स चालवणार्‍या व्यक्तिंचे वय किती असते? ते वयाच्या कितव्या वर्षी ही विद्या शिकले? हा कोर्स केल्यावर एखाद्या मुलाची अभ्यासातील प्रगती प्लॅसिबो नसेल कशावरुन ?

In reply to by ऋतुराज चित्रे

संदीप डांगे 11/07/2015 - 16:53
अगदी रास्त शंका चित्रेसाहेब, मलाही हेच प्रश्न पडलेत. हे शिकवणारे कुठून येतात, ते कोण आहेत, त्यांना हे कोणी शिकवले आणि एवढे पैसे घेण्यासारखे त्यात काय मोठे आहे इत्यादी. ही सकारात्मक शिकवण देणारी विद्या आहे त्यामुळे प्लॅसिबो म्हणणं जरा गुंतागुंतीचं आहे. मनाला उभारी यावी, एकाग्रता वाढावी, कसलेही भय राहू नये म्हणुन काही क्रिया (जसे स्वसंमोहन वैगेरे) हे लोक करत असतील तर ते नेमकं प्लॅसिबो आहे हे कसं समजायचं? कारण प्लॅसिबो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे खोट्या साधनांद्वारे मिळणारे मानसिक समाधान. इथे थेट मानसिक समाधानच उत्पादन आहे या कोर्सचं. तुमचे प्रश्न मी अंतर्भूत केलेत. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

सदस्यनाम 11/07/2015 - 18:10
डांगे साहेब जमल्यास अजून एक करा. साधारण पणे २००५ ला अ‍ॅबॅकसचे असेच फॅड आलेले. सध्या काय चालूय त्यांचे माहीत नाही पण जवळपास अशाच अशक्य गणिती क्रिया क्षणार्धात करणे. तोंडी मोठ्या आकडेमोडी करणे वगैरे. त्या कोर्सेस चा किती फायदा दहावी बारावी च्या परिक्षेला झाला. अथवा त्या अ‍ॅबॅकस ट्रेनिंग मुळे एखादे करीअर अचिव्ह केले (नवीन अ‍ॅबॅकस ट्रेनिंग सेंटर ऊघड्ण्याखेरीज) याचा शोध घेतला तर बरीच उत्तरे मिळतील.

चित्रगुप्त 11/07/2015 - 17:20
काही हजार रुपये देऊन करण्याचे जे कोर्सेस असतात, त्यात एक सोय(?) दिलेली असते, ती म्हणजे तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ओळखीच्या लोकांनी केलेली घरगुती शिफारस विश्वसनीय वाटते, आणि जास्त जास्त गिर्‍हाईक मिळत जातात. या प्रकारे केले जाणारे अनेक धंदे असतात, त्यात तथाकथित अद्भुत शक्ती वगैरेंपासून लाख रुपयात गादी विकणे (तिला गादी न म्हणता 'कंप्लीट स्लीपिंग सिस्टम' म्हणायचे), अमूक एक मंत्र म्हणून जागृत होणार्‍या अध्यात्मिक शक्ती, असे कित्येक प्रकार असतात. दिल्ली भागात एक प्रकार खूप बोकाळलेला आहे, तो म्हणजे अपेक्षित फायदा झाला की त्यातले अमूक टक्के द्यायचे (किंवा उदाहरणार्थ मुलीचे लग्न ठरणे, नोकरी लागणे, कोर्ट केस जिंकणे वगैरे एका महिन्यात झाले, तर अमूक रक्कम देऊ) ठरावीक मुदतीत फायदा झाला नाही, तर टक्केवारी/रक्कम वाढवत जायची, वगैरे. पैसे शेवटी कुणाला पोहोचतात, हे कडेकोट रहस्य असते. धागाकर्त्याने त्या मुलांच्या पालकांना भेटताना हा मुद्दाही ध्यानात ठेवावा.

तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ही पद्धत गटविलेल्या गिर्‍हाईकाचे (आपल्या धंद्याचा फुकट जाहिरातदार होण्यासाठी) ब्रेन अ‍ॅक्टिवेशन करायला फार उपयुक्त आहे हे मल्टि-लेवल-मार्केटिंगने पुरेपूर सिद्ध केलेले आहे ! ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणसाला अमर थोडेच व्हायचे आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!

डांगे साहेब, हा विषय या ठिकाणी चर्चे साठी निवडल्या बद्दल धन्यवाद. मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे आणि मला असे आढळून आले आहे कि मिसळपाव वर शक्यतो आपले विचार सडेतोड आणि आपल्या प्रतिक्रिया सारासार विचार करून दिलेल्या असतात. असो..., मध्य मेंदू सक्रियिकरन या प्रकाराबद्दल या लेख पूर्वी मला अजिबात काही माहिती नव्हते, या लेखाच्या निमित्ताने या गोष्टी मला समजल्या आणि अंतर्जालावर या बद्दल माहिती चाळली आणि या प्रकाराबद्दल बरेच कुतूहल जागृत झाले. माज्या आसपास शोध घेतला असता अश्या कुठल्याच सौस्थेची इथे शाखा नाही असे समजले. आपल्याला जर खरोखर अश्या विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळाले तर कृपया खालील मुद्दे जरूर विचारात घ्यावेत … १. चौकशी निपक्षपाती पद्धतीने करावी, म्हणजे चौकशी साठी जाताना पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन बाजूला ठेवावा. २. या गोष्टीमध्ये नक्की कुठले विज्ञान आहे हे समजावून घ्यायला हवे. (या सौन्स्था विद्यार्थ्यांच्या पाच ज्ञानेंद्रियांना जागृत करण्याचा दावा करतात (दृष्टी, गंध, स्पर्श, चव, ध्वनी) गंधाने विद्यार्थी रंग ओळखतात तर स्पर्शाने त्या वस्तूचा आकार वगरे वगरे.) ३. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याकडील एखाद्या वस्तूचा (एखादी वस्तू जी फक्त तुम्हालाच माहिती असेल प्रेक्षकांना नाही आणि आयोजकांना तर आजीबात नाही) फक्त रंग ओळखण्यास सांगावे (उदाहरणार्थ खेळाच्या ५२ पत्त्यांमधील एखादा पत्ता), आणि दुसर्यास त्याच वस्तूच्या केवळ स्पर्शाने त्या वरील मजकूर ओळखण्यास सांगावे (या वेळी त्या विद्यार्थ्याने आपल्याकडील वस्तू नाकाजवळ नेता कामा नये) ४. केवळ विशिष्ट वयोगटातील विद्यार्थीच या प्रशिक्षणासाठी पात्र का आहेत यामागचे विज्ञान काय आहे? ५. खरोखर अश्या प्रशिक्षनांमध्ये तथ्य असेल तर जी मुले बौद्धिक दृष्ट्या दुर्बल आहेत (गतिमंद किवा मतीमंद) अश्या मुलांना हे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल का? ६. अश्या पद्धतीने कार्यक्षम केलेला मध्य मेंदू भविष्यात किती वर्षे कार्यक्षम राहील. आपण नक्कीच यातील तथ्य लवकरात लवकर आमच्या समोर मांडाल अशी अपेक्षा करतो, आपल्याला शुभेच्छा धन्यवाद, पुणेकर

In reply to by पुणेकर भामटा

संदीप डांगे 12/07/2015 - 11:04
Thank you. Intention of this thread is awareness only. If we are aware and discussed these kind of things before accidental encounter of such demos - practices, we can be well prepared to counter attack such frauds. And help weak mentality people to stay away from this Who have habit of falling for crooks

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र फेब्रुवारी २०१५ च्या अंकात फसवे मिडब्रेन अशी डॉ प्रदीप पाटील सांगली यांची एक कव्हर स्टोरी आहे.सांगलीत ही असे एक सेंटर चालू झाले होते. त्यात नाशिक येथेही या एम्बीए वाल्यांना आव्हान देण्यात आले होते असे म्हटल आहे. अंनिस कशा पद्धतीने चाचणी घेउ इच्छिते हे लेखात नमूद आहे. तसेच या एमबीए वाल्याना आव्हान पण आहे. संदीपजी हा लेख तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.

Rajesh K 12/07/2015 - 19:21
एक छोटीशी चाचणी करता येईल. जर हि मुले डोळ्यावर पट्टी बांधून नोटेवरचा क्रमांक ओळखतात तर त्यांना मिट्ट काळोखात सुद्धा हे करता यायला हवे. जर पाहायचेच नाही तर प्रकाशाची काय गरज? आणि या नियमामुळे चोरून पाहणे, रुमालाखालून पाहणे, इतर कोणीतरी संकेताने सांगणे या बाबी वजा करता येतील.

तुडतुडी 13/07/2015 - 14:10
संदीप डांगे साहेब .माझ्या ३ शंका आहेत १. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ? २. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ? ३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ? ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते>>> मग हा ध्वनी आपण रेकॉर्ड करून आणि ब्रेन-जिम चा व्यायाम शिकून घेवून आपल्या मुलांचा ब्रेन activate केला तर ? त्यासाठी २०-२५ हजार कशाला घालवायचे ? कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय?>>> नक्की कुठला काळ अपेक्षित आहे ? कारण अगदी प्राचीन काळापासून ची अनेक उदाहरण आहेत .सध्याचं अनिस चंच उदाहरण घ्या कि . त्यांना अध्यात्मिक दृष्ट्या develop असणार्या २ जणांनी आव्हान दिले होते . परंतु अनिस ने ते स्वीकारले नाही. त्यातले १ बहुदा नरेंद्राचार्य महाराज होते . दुसर्याचं नाव आठवत नाही . मी पा वरच कुणीतरी ते सांगितलं होतं मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते>>> खरं आहे. कारण ह्या सिद्धींच्या जोरावर तो काहीही करू शकतो . तसेच ह्या सिद्धी दुसर्यांना दिल्या तर त्याला प्रतिस्पर्धी नाही का निर्माण होणार ?

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 13/07/2015 - 14:29
१. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ? >> याबद्दल अधिक माहिती इथे मिळेलः http://www.shichidamethod.com/faq.html २. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ? >> थर्ड आय, इएसपी, सिक्स्थ सेन्स, ब्लाईंडफोल्ड विजन हे सगळे शब्द त्यांच्या शास्त्रिय संज्ञेच्या योग्य अर्थाशिवाय सर्रास वापरले जातात. त्यात शब्दांच्या भुलभुलैय्यात फसण्यापेक्षा माझा भर रिझल्ट्स वर आहे. ३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ? >>आत्ता तरी माहिती उपलब्ध नाही. चौकशी करून कळवतो. आव्हानः 'मंत्रांद्वारे जीव घेतल्या जाऊ शकत नाही' हा दाव्याला आव्हान देणारा एक कथित तांत्रीक टीवीवर लाइव शोमधे 'मृत्यूंजय मंत्र' वापरून जीव घ्यायचा प्रयत्न करत होता. ह्या पेक्षा हास्यास्पद प्रकार मी अजून तरी पाहीला नाही. आणि जो कोणी रॅशनलिस्ट हा स्टंट करत होता त्याला कोणी खरा तांत्रीक मिळाला नसेल. किंवा खरा तांत्रीक आणण्याची हिंमत झाली नसेल. खरेखोटे देव जाणे!

In reply to by तुडतुडी

जडभरत 13/07/2015 - 15:36
२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?
तुम्ही खरंच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मध्यंतरी मी नेटवर काही व्हीडीओ पाहिले होते तूनळीवर. त्यांचा दावा कुंडलिनी शक्ती जाग्रित करण्याचा होता. मी सदर व्हीडीओ उत्सुकता म्हणून पाहिले व ऐकले थोडाच वेळ. काहीतरी विचित्र प्रकाश व ध्वनींचा खेळ होता. नंतर कंटाळा येऊन बंद केले. दोन दिवस माझं डोकं दुखत होतं. रक्तदाब पण वाढल्यागत झाला. लहान मुलांच्या बाबतीत जर काही वाईट घडले तर कोण जबाबदार?

मजा आला । धाग्यावारील प्रतिसाद पाहून खुप मजा आला :)))) बाकी अशाप्रकारे मार्केटिंग करायची आयडीया भारी आहे ।

In reply to by संदीप डांगे

ते डोळे बांधुन करायचं का डोळे उघडे ठेउन??? =)) (हघ्या. गंमतीमधे लिहिलय)-कॅजॅस्पॅ-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे 14/07/2015 - 11:40
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार... :-)

In reply to by संदीप डांगे

गवि 14/07/2015 - 12:45
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार...
असं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल. बहुतांश गोष्टींबाबत प्रथमदर्शनावरुन आणि सारासार विचारांवरुन निष्कर्ष काढता येतो. एखाद्या गोष्टीचं पाहताक्षणी आश्चर्य वाटलं याचा अर्थ ती गोष्ट शास्त्रशुद्धरित्या तपासत बसण्यायोग्य असतेच असं नव्हे. सदर प्रकाराबाबत वर्णन केलेल्या सर्व घटना या सरळसरळ हातचलाखी आणि साध्यासुध्या तर्काने एक्सप्लेन होत असताना त्या जेन्युईन आहेत की नाहीत यावर अधिक खोलात जाऊन विशेष अभ्यास करण्याची गरज अजिबात वाटत नसल्याचं अनेकांचं मत असल्याने मार्केटिंगची शंका येऊ शकते. तसं अर्थात नसेलही. पुढे कधी समजा, समजा...तुम्ही खुद्द या गोष्टीची एजन्सी घेतलीत तर मात्र या सद्य शंकाकर्त्यांना वेगळं मत मांडता येईल. या गोष्टीमागे "सायन्स" किंवा अन्य काही रास्त तार्किक कारणमीमांसा नसण्याचा एक साधारण पुरावा म्हणजे असा की जर या गोष्टीचा १५-२० हजारात गावोगावी उपलब्ध होण्याइतका प्रचार झाला असेल तर या टप्प्याच्या कितीतरी आगोदर मुख्यप्रवाहातल्या शास्त्रज्ञांनी / वैज्ञानिकांनी याची भरपूर दखल घेऊन त्याला काहीतरी प्रत्यक्ष रुप दिलं असतं. ब्रेकथ्रू ठरु शकणारी कोणतीही थियरी मॉडर्न सायन्समधे स्वतःहून दखल घेऊन पुढे संशोधित केली जाते. गॅलिलिओ, एडिसन, न्यूटन यांचा एकांड्या शिलेदारीचा आणि समाजाला ओरडून ओरडून सत्य पटवून देण्याचा जमाना आता राहिला नाही. आता असे काही मिड ब्रेन अ‍ॅक्टिवेशन असण्याची थोडी जरी शक्यता दिसली तर त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या, (संरक्षणक्षेत्रातल्या, वैद्यकशास्त्राच्या) उड्या पडतील आणि संशोधन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन त्याचं स्वामित्व स्वतःकडे ठेवण्यासाठी चढाओढ लागेल. ज्या प्रयोगात असं काही न होता केवळ फ्रँचाईसी तत्वावर गल्लोगल्ली रीटेल केंद्रं उघडली जातात त्यात शास्त्रीय तथ्य असण्याची शक्यता शून्यवत आहे.

In reply to by सतिश गावडे

आनंदी गोपाळ 16/07/2015 - 21:45
असले प्रतिसाद टंकायला काय लागते? तुम्ही फारच स्केप्टिक आहात बुवा. धागाकर्ते करणार आहेत ते "शास्त्रीय" विश्लेषण येऊ द्या जरा या एम्बीए चे. मग गवि अन त्यांचे तत्वनिष्ठ तर्क कसे तोंडावर आपटतात ते पहाच तुम्ही.

बबन ताम्बे 13/07/2015 - 19:59
बाकी सर्वात टॉपच्या व्हीडीयोत तो चष्मेवाला तरुण मुलगा आणि मुलगी चांगले सुशिक्षीत दिसताहेत.एम. बी.ए. आहेत का काय माहीत नाही.पण आजकाल काही टुकार एम.बी.ए. कॉलेजांमधे लोकांना **त्या बनवायचेच शिक्षण देतात की काय? मागे मला एका चांगली नोकरी असलेल्या आणि इंजिनीअर असलेल्या मित्राने आग्रह करून करून एका पॉश ठिकाणी प्रेजेंटेशनला नेले. एक तरुण एम.बी.ए. एक्झीक्युटीव्ह आकडेवाडी मोडून बिझिनेस मॉडेल समजावत होता. तासभर त्याची बडबड चालू होती. दुसरे काही नाही, ते मल्टी चैन मार्केटींग स्कीम होती. पण ज्यांचे त्यात पैसे अडकले होते, ते उगाचाच त्याच्या हो ला हो आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते (माझ्यासारख्या ब-याच नवीन बक-यांना इम्प्रेस करण्यासाठी). मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे सरळ सरळ थोतांड दिसते आहे. लोकांना मामा बनवून पैसे कमवायचे धंदे. यात वाईट एव्ह्ढेच वाटते की लहान मुलांना यात सामील करून घेऊन त्यांना खोटे बोलायला, दाखवायला भाग पाडले जाते. वरील व्हीडिओत ती लहान मुलगी कार्ड ओळखण्यासाठी हाताला, डोक्याला कार्ड चोळतेय हे चक्क नाटक करतेय हे स्पष्ट दिसतेय.

पुणे तिथे काय उणे.... या धाग्याच्या निमित्ताने अजुन एक माहिती शेअर करु इच्छितो. परवा माझी पत्नी मुलीच्या शाळेत गेली होती. तिथे एक पालक म्हणाली की त्यांनी त्यांच्या मुलीला सुंदर हस्ताक्षराचा क्लास लावला आहे. तीन महिन्याचा कोर्स आणि फी ₹ १५ हजार फक्त !! ३ च महिन्यात ते वळणदार अक्षर आणि तेही वेगाने काढायला शिकवतात अशी माहिती त्यांनी दिली. खरतर एखाद्याचं अक्षर सुंदर आणि वळणदार असणे ही त्या व्यक्तीला मिळालेली नैसर्गिक देणगी असते असे मी मानतो. थोड्याफार सरवाने खराब अक्षर असणारे त्यात थोडी वरची पातळी गाठु शकतात. पण कोर्स वगैरे हे अती झालं. बर त्या बाईसुद्धा कोर्स सुरु केल्यापासुन आमच्या मुलीचं अक्षर सुधारायला लागलयं असा दावा करत होत्या. मला तर यामधे वरील काही सदस्यांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्केटींगच वाटतय.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

खटपट्या 16/07/2015 - 15:49
मला बरेचजण हस्ताक्षर सुधारण्याचे क्लास घे म्हणून गळ घालतायत पण निव्व्ळ याच कारणाने मी ते टाळतोय. वर सांगीतल्याप्रमाणे हस्ताक्षर सुधारणे खूप कठीण वाटतंय. सुलेखन वेगळे आणि हस्ताक्षर वेगळे. चांगल्या सुलेखनकाराचे हस्ताक्षर चांगले असेलच असे नाही. ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते. कोणत्याही क्लास कींवा कोर्स केल्यामुळे ते सुधारलेले नसते. नववी दहावीतल्या मुलांना तर हस्ताक्षर सुधारणेच्या क्लासमधे अजीबात पाठवू नये. कारण हस्ताक्षर सुधारायच्या नादात ते सद्या असलेला वेग हरवून बसतील आणि दहावीच्या परीक्षेत भरपूर लीहावे लागते.

In reply to by खटपट्या

चित्रगुप्त 17/07/2015 - 00:35
ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते
माझ्या बाबतीत तरी असे नव्हते. मी सातवीत असताना रोजनिशी लिहिणे सुरू केले, तेंव्हाचे अक्षर अगदी वाईट आहे, नंतर दासबोधात 'ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर' वगैरे वाचून स्वतःच प्रयत्न करून ते सुधरवून सुंदर केले. अर्थात चित्रकलेमुळे मला ते फार सोपे गेले, फक्त अक्षर सुंदर करण्याचा निश्चय करण्याचाच अवकाश होता. केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे. ज्याला अक्षर सुधरवायचे आहे, त्याने अक्षरांमधे गोलाई आणण्याचा, अक्षरे सुटी-सुटी लिहिण्याचा, आणि अक्षरांची उंची, रुंदी, तिरपेपणा वगैरे एकसारखा राखण्याचा सराव केला, तरी पुरेसे होते. बॉलपेन पेक्षा अर्थातच जुन्या पद्धतीचे फौंटन पेन चांगले.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 17/07/2015 - 21:37
डॉक्टरांच्या संपाचे व्यंगचित्र आठवले. त्यांच्या हातांतील फलकांवर काय लिहिलेय हे वाचता न आल्याने कुणी लक्षच दिले नाही वगैरे वगैरे.

बबन ताम्बे 14/07/2015 - 16:05
त्याने ब-याच शाळांमधे बरेच सेमिनार घेऊन सांगीतले की अक्षर खराब असल्यामुळे ब-याच मुलांना दहावी बारावीच्या परीक्षेत गुण कमी मिळतात. त्याने इव्हन हेही पटवले की आधी पालकांचे अक्षर चांगले हवे. तरच मुलांचे अक्षर सुधरेल. आहे कि नाही एका दगडात दोन पक्षी :-) त्यांचे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे फेबु. वर जोरदार मार्केटींग चालू आहे.

तुडतुडी 15/07/2015 - 17:35
मला mid brain activation चा मेसेज आलाय मोबाईल वर. पुण्यात तीळक रोड ला परवा फ्री सेमिनार आहे . बघूया तरी जावून काय आहे हे . आता पुण्यात सुधा धुमाकूळ सुरु होणार कि काय

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे 15/07/2015 - 17:58
+१०००० जेवढ्या मिपाकरांना जमेल तेवढ्यांनी जावा. पाहीजे तर मिपासाठी खास सेमिनार घ्यायला सांगा त्यांना. दूध का दूध पानी का पानी....

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

अस्वस्थामा 15/07/2015 - 21:51
तीलक रोड
टिळक मार्गाचं तिलक रोड असं मनपाने नामकरण केलं वाटतं. पुण्याचे पण उत्तर भारतीयीकरण शांततेत सुरु झालेय म्हणायचे.. ;)

तुडतुडी 16/07/2015 - 12:42
तीलक रोड>>> खरच चुकलं . माफ करा . टिळक मार्ग बरोबर आहे . मेसेज असा आहे : What is MIDBRAIN ACTIVATION & how it is going to benefit ur child for a lifetime. Attend a free seminar on 17th July 7 pm @MCCIA HALL Tilak Rd, Miscall 9764069900

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 17/07/2015 - 17:09
प्रत्यक्ष सेमिनारला जायची चांगली संधी आहे आज. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर जावं आणि या धाग्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर तिथे उत्तर मिळतायत का बघावी. सेमिनारला जाणार्‍यांनी आल्यावर नविन धागा काढून मत मांडलं तरी चालेल.

गिरकी 16/07/2015 - 16:02
या असल्या सगळ्या गोष्टी मी वयाचे १५ पार केल्यावरच का सापडायला लागल्या बरं :( ते अ‍ॅबॅकस पण तसंच. मोठ्या माणसाना नाही शिकवणार म्हणे. हे काही खरे असेल असं अज्जिबात वाटत नाहिये. पण असेलच तर काही वर्षांत मोठ्यांना पण कसं हुशार करायचं याचा शोध ही मुलेच लावतील. मला जर असं काय काय अंतर-ज्ञान मिळालं तर काय बहार येईल या स्वप्नात हरवून गेलेय. :) बाकी संदीप भाऊ, तुमच्या अभ्यासाचं फलित नक्की सांगा हो.

In reply to by गिरकी

http://www.mirror.co.uk/news/uk-news/mind-boggling-magician-shows-how-6039713 या चित्र फितीमध्ये सुद्धा मुलगा असाच काहीतरी करत आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा काही दिवस थांबून निर्णय घेणे चांगले.

In reply to by तुडतुडी

आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? हि मुले अंधारात अभ्यास करू शकतील त्यामुळे उर्जेची बचत होइल, मुलांच्या वस्तू गहाळ होणार नाही. मुलांना चष्मे लागणार नाही. पोलिसांना श्वानपथक बाळगावे लागनार नाही. ...... असे बरेच फायदे आहेत, पैशाकडे बघु नका.

In reply to by आनंदी गोपाळ

सुबोध खरे 17/07/2015 - 19:58
गोपाळ राव मला एक कळत नाही कि हे मिड ब्रेन कशाला अ‍ॅक्टिव्हेट करायला जात आहेत?फोर ब्रेन( मोठा मेंदू) का अ‍ॅक्टिव्हेट करत नाहीत? ती अ‍ॅक्टिव्हेट करता आला तर मी सुद्धा आईन्स्टाइन सारखा बुद्धिमान होईन कि. नुसती दृष्टी किंवा कर्ण शक्ती सुधारून माणूस कसा हुशार होणार? वेडा किंवा मतीमंद माणूस सुद्धा व्यवस्थित पाहत असतो किंवा ऐकत असतो. म्हणतात ना डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी फक्त काही लोकांनाच असते. किंवा गाणी आम्ही पण ऐकतो पण गाण्यात कुठला सूर चुकला हि श्रवणशक्ती आम्हाला नाही. हे सर्व कार्य मध्य मेंदूचे नाही तर आद्य मेंदू( मोठा मेंदू)चे आहे. तो अ‍ॅक्टिव्हेट करायचा सोडून हे काय चालले आहे? पाईनीयल ग्रंथीला अ‍ॅक्टिव्हेट करतात असे त्यांचे म्हणणे आहे. पण पाईनीयल ग्रंथी शल्यक्रिया करून काढून टाकली तर माणूस ना बहिरा होतो ना आंधळा होतो. मग हे काय? हे शोधताना मला उत्तर सापडले. ते असे आहे http://www.midbrain-activation.com/IncomeOpportunity.html मोठी ईण्ष्टीट्य़ूट काढू. खाऊ पिऊ मजा करू. १२५ कोटी लोकांच्या देशात आपल्या सात पिढ्या चालवू शकतील असा धंदा आहे. येता का? मला सफाईदार मराठी हिंदी आणी इंग्रजी येते. चार असे विविध भाषा बोलणारे घेऊ. हा का ना का

In reply to by टवाळ कार्टा

सदस्यनाम 19/07/2015 - 18:01
ह्या टवाळ नगाला घ्या डॉ. डोळे मिटून गाड्या आणि डुआयडी ओलखतेय. व्हिडिओ मधे घ्यायला पण बेस्ट स्याम्पल है.

मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे १००% सत्य आहे . मी बोटीवर होतो तेव्हा मी माझा मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्ह केला होता आणि मी मिपा चे सदस्यत्व घेतले =))

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 17/07/2015 - 19:29
आमची सौ. म्हणते तुमचे डोके कामातून गेले म्हणून संध्याकाळी आल्यापासून कामधाम सोडून मिपावर ....

स्रुजा 08/07/2015 - 20:50
मला तरी हे थोडं संशयास्पद वाटतंय. २ दिवसात हा वर्क्शॉप संपतो म्हणुन जास्त च वाटतंय. बरं डोळे बंद करुन वॉलेट चा रंग का ओळखायचा? ५ वर्षां पुढची मुलं तसं ही कलर्स ओळखतात च की. एकाग्रता वाढवण्यासाठी वगैरे एक्सरसाईझेस असतात पण सातत्य लागतंच त्यात. हळु हळु सवयी लावणं, अस्थिर स्वभाव असेल तर त्याला थोडं स्थैर्य देणं वगैरे त्यात अभिप्रेत असतं. आणि आता लहान मुलं जात्याच हुशार अस्तात. कुणाचं ग्रास्पिंग चांगलं असतं, कुणाला खेळात रस असतो , कुणाला अजुन कशात आणि पालक सुद्धा इतके जागरुक पणे लक्ष देतात की साधारण २ र्‍या , ३र्‍या वर्षापर्यंत मुलांचे हे कल लगेच कळतात. आणि त्यांचं कौतुक पण सगळीकडुन होत असत, त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकद रॅट रेस मध्ये उतरले की मग या दुव्यांमध्ये लिह्लंय तसं परिक्षेतले मार्क्स आणि मेडिकल मधलं यश वगैरे मधुन हे असले प्रकार जनमाला येत असावेत आणि त्यांना लोकप्रियता पण म्हणुन च मिळत असणार.

अंतु बर्वा 08/07/2015 - 20:54
प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या मामाचा दहा वर्षाचा मुलाने डोळे बंद करुन (मी स्वतः verify केलं डोळे नक्की बंद आहेत ना?) माझ्याकडच्या नोटेवरचा नंबर अचुक सांगितला. मी मोबाईल वरुन डायल केलेला नंबर (कीटोन अक्टिवेटेड असताना) फक्त आवाजावरुन अचुक ओळखला. फळे आणी ईतर पदार्थांचे रंग स्पर्श न करता ओळखले. मामांना याबद्दल विचारले असता कुठल्यातरी शिबीरात शिकल्याचे सांगितले. तसेच आपण मुलाला प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास आग्रह करीत नाही असेही म्हणाले, कारण त्याची इच्छा/मुड नसताना तसे करावयास लावले तर त्याला ते जमत नाही.

द-बाहुबली 08/07/2015 - 21:13
ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते
हे ध्वनी व ब्रेन जिम व्यायाम टाँरंटवरही उपलब्ध्द आहे का ?

चित्रगुप्त 08/07/2015 - 22:30
डोळ्यांवर पट्टी बांधून अनेक जादूगार मंडळी भर रस्त्यातून बाईक चालवणे व अनेक प्रकार करतात, त्यापैकी काही प्रकार वाटतो. इथे जो व्हिडियो दिला आहे, त्यातील मुलीला कागद, नोट वगैरे समोर धरावे लागत असताना दिसते, त्याअर्थी तिला पट्टीतून दिसत असणार असे वाटते. मी स्वतः लहानपणी जादूचे खेळ करायचो, त्यात अगदी अशक्य वाटणार्‍या करामतींच्या मागे अगदी सोपी युक्ती असायची, पण जोवर ती ठाउक नाही, तोवर चमत्कार वाटायचा. अश्या एकाद्या युक्तीचा पैका कमावण्यासाठी रचलेला हा बनाव वाटतो. कुणाच्या परिचयात कोणी जादूचे खेळ करणारा असेल, तर तो बरोबर सांगू शकतो. एक शक्यता संमोहनाची पण वाटते.

चित्रगुप्त 08/07/2015 - 22:40
मुलीच्या डोळ्यांवर विशिष्ट प्रकारची जी पट्टी बांधलेली आहे, त्यात लहानसा स्पीकर/हेडफोन/ असून त्याद्वारे कोणीतरी तिला माहिती पुरवत असेल. लास वेगासच्या मोठमोठ्या जुगारी अड्ड्यातून अश्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात, याबद्दल मोठा कार्यक्रम मागे कोणत्यातरी च्यानेलावर बघितला होता. कोण केंव्हा किती पैसे जिंकतो/हरतो, यावर कसिनोवाल्यांचा पूर्ण ताबा असतो, आणि हे काम अत्याधुनिक तंत्राद्वारे वरील मजल्यावर बसलेले अनेक तंत्रज्ञ करत असतात, असे दाखवले होते. समोरील विमान वा बस, हत्ती इ. वस्तू क्षणार्धात दिसेनाश्या करणे वगैरे करामती या तंत्राने करता येतात.

दोन अडीच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी वॄत्तपत्रांत एक बातमी वाचली होती. छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात इस्राइलहून आलेल्या काही तांत्रिकांनी एकाग्रतेच्या जोरावर काही करामती करून दाखवल्या. जसे धातूचा चमचा हात न लावता केवळ बघत राहून वाकवणे. भुजबळांनी (कशाचा तरी आडोसा करून) कागदावर काय लिहिले असेल ते वाचून दाखवणे. ती बातमी आता शोधताना मिळत नाहीये कारण भुजबळांचा उल्लेख हजारो बातम्यांमध्ये असतो. दीड वर्षांपूर्वी जादूगार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम आमच्या मंडळाने ठेवला होता. अगोदरच्या दिवशी त्यांनी काही साधे प्रयोग आम्हाला दाखवले होते व काहींमध्ये कशी हातचलाखी केली जाते तेही दाखवले होते. धाग्यात उल्लेखलेल्या प्रयोगांच्या मागेही काही हातचलाखीच असणार हे नक्कीच.

मी सुधा हा प्रकार पाह्यला आहें . पण वर वर्णिलेले प्रकार सोडले तर या मुलांची बाकी विषयात काही नेत्रदीपक प्रगति दिसलेली नाही कदाचित अजुन काही काळ जावा लागेल नेटवर शोधले असता दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या ।या विषयातील जाणकाराणी मार्गदर्शन करावे

कंजूस 09/07/2015 - 04:47
तो dynamo नावाचा जादुगार कमालीच्या जादु ( पाण्यावर चालणे,हवेत उडणे ,कारंज्यातील पाण्याचा बर्फ करणे ,कागदाची फुलपाखरे जिवंत करणे इत्यादी ) करतो रस्त्यातच तरी यास मनोरंजन म्हणतो.हिच माणूस भारतात असता तर ? काशीला येऊन गंगेत असंख्य दिवे लावले पण तिकडच्या राख फासून बसलेल्या साधुंनी ढिम्म आश्चर्य दाखवले नाही.

In reply to by कंजूस

Dynamo चा शो जर टीव्ही वर असेल आणि मी तिथे असेन तर तो शो फाट्यावर मारतो. जादु/ हातचलाखी बघण्यात जी मजा आहे ती त्यामागच्या ट्रिक्स समजुन घेण्यामधे नाही. एक प्रेक्षक म्हणुन मला जादुच्या रेसिपीपेक्षा तिची मजा चाखण्यामधे जास्त रस आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यसवायजी 12/07/2015 - 11:57
का नाही? जादूचे प्रकार फारसे बदलत नाहीत. तेच कुठूनतरी काहीतरी बाहेर काढणे, पत्त्याचे खेळ वगैरे. किती वर्षं तेच तेच बघायचं? डोकं चालवून बघितलं, नाहीच जमत. मग आता ट्रिक बघतो. - शाळेत असताना एकदा अं.नि.चा एक शो पाहिला होता. तेंव्हापासून "मॅजिक रिव्हील्ड" पहायला आवडते.

सिरुसेरि 09/07/2015 - 11:42
हा प्रकार कर्णपिशाच्च किंवा टेलीपथीचाही असू शकतो . जादु/ हातचलाखी यांवर आधारीत ख्रिस्तोफर नोलनचा 'द प्रेस्टीज ' हा चित्रपट मस्त आहे .

गवि 09/07/2015 - 11:54
याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.
वॉव.. कशी मिळते याची फ्रँचाईजी? बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता. तिथे मिसळ उत्तम मिळत असल्याने जात असे. तिथेही मिसळ खाण्यात काहीतरी सायंटिफिक आहे असं म्हणत "मिसळ खाण्याच्या अनुभवा"विषयी काही शास्त्रीय किचकट प्रश्न असलेला फॉर्म भरुन घेत होते. आत मेंदूच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि वेगवेगळ्या सीझन्समधे त्याचे वेगवेगळे भाग कसे अ‍ॅक्टिव्हेट होतात यासम काहीतरी होतं. आहे आहे.. हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!

In reply to by गवि

सतिश गावडे 09/07/2015 - 14:30
बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता.
तो पंथ होता का? शाळेत असताना त्यांचे लोक अधून मधून यायचे आणि कसल्या कसल्या मेंदुच्या आकृत्या असलेली पुस्तके विकायचे. तेव्हा ते सारे खरेही वाटायचे.

In reply to by गवि

अस्वस्थामा 09/07/2015 - 14:52
हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!
हे सगळं मोठ्ठं सायन्स का असतं आणि विज्ञान का नसतं असा प्रश्न मला नेहमीच सतावतो.. ;)

तुडतुडी 09/07/2015 - 12:33
हे फक्त लहान मुलांच्याच बाबतीत का ? मोठ्या माणसांच्या बाबतीत का नाही ? आणि ह्याची जाहिरात करण्यासाठी वापरलेली मुले त्यांचीच अस्तिल. त्यांना शिकवल्याप्रमाणे ते करून दाखवत अस्तिल. किवा डोळ्यावर बांधलेली ती पट्टी पारदर्शक असेल . आत मध्ये छोटा कॅमेरा , हेड फोन लपवलेला असू शकतो

संदीप डांगे 09/07/2015 - 16:09
मी आत्ताच त्या मालकाला भेटून आलोय. गेल्या नऊ महिन्यातली प्रगती अविश्वसनीय आहे. मी त्याला म्हटले मला यावर रीसर्च करायचा आहे. तो म्हणाला कधीही या. त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो, जर त्यातल्या एकाही पालकाने म्हटलं की ह्यांनी फसवलंय, हे थोतांड आहे तर मी ही संस्था बंद करून घरी बसेन. तर मंडळी, तिथे येणार्‍या मुलांवर मी माझ्या पद्धतीने रीसर्च करणार आहे. तुमचे काही प्रश्न, कुतूहल, शंका असेल तर कळवा. अभ्यासात अंतर्भूत करेन. 'जे विश्वास ठेवतात त्यांना कुठल्याही कारणाची गरज नाही. जे ठेवत नाहीत त्यांना कुठलेही कारण पुरेसं नसतं'. या वाक्यात नमूद केलेल्या दोन अवस्थांपलिकडे जाऊन काहीतरी करता येण्यासारखं आहे का? या प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 09/07/2015 - 23:35
तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल स्केप्टीक आहात की एका वेगळ्या पद्धतीने त्यांची जाहिरात करत आहात? :)

In reply to by सतिश गावडे

संदीप डांगे 10/07/2015 - 21:42
गावडेसाहेब, असा प्रश्न येईल हे अपेक्षितच होते. मी स्वतःला स्केप्टीक म्हणत नाही. कारण जे कोणी स्केप्टीक/रॅशलिस्ट बघितलेत ते फार अहंकारी आणि 'माझं तेच खरं' असं म्हणणारे असतात. त्यांना कितीही समजावून सांगा ते आपला हेका सोडायला तयारच नसतात, काहीतरी बेसलेस एक्स्प्लेनेशन देत असतात आपल्या "वाटण्याचं". मी तरी असंच बघितलंय, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. मी स्वत:ला अभ्यासक म्हणेल. एखाद्या दाव्यात काय खरं, काय खोटं असं आधीच ठरवून न बघता, सगळ्या बाजूने प्रॉपर विचार करून निष्कर्ष काढणे याला मी महत्त्व देतो. मला या मिड-ब्रेनच्या वर्किंग लॉजिक मधे अजिबात इंटरेस्ट नाही. ते कसं काम करतं, खरं आहे की फसवतात वैगेरेच्या भानगडीत पडून उपयोग नाही. फक्त रीझल्ट आहेत का? आधी आणि नंतर च्या अवस्थांमधे जाणवण्याइतपत फरक आहे का? आणि तो या कोर्समुळेच झालाय का? या तीन प्रश्नांची उत्तरे शोधायचीत. रच्याकने: कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय? मी शोधतोय. तुम्ही पण सांगा. खोटा दावा करून तोंडघशी पडणारे हजारो आहेत. पण उलटं उदाहरण अपवादालातरी असायला पाहिजे की नाही?

In reply to by संदीप डांगे

आनंदी गोपाळ 10/07/2015 - 11:23
फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?
१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

संदीप डांगे 10/07/2015 - 21:32
१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? >> https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method#Process. जी काय माहिती उपलब्ध होईल त्याचे तटस्थपणे संकलन, निरिक्षण व त्यावर प्रयोग करून येणारे परिणाम तटस्थपणे तपासणे. यापेक्षा अजून काय वेगळी पद्धत असेल तर जरूर सांगा मी अंतर्भूत करेन. २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? >> जी मुले कोर्स करून गेलेली आहेत व इथून पुढे हा कोर्स करणार आहेत त्यांचा विदा गोळा करणार, कौटुंबिक माहिती, शालेय प्रगती, इतर सवयी. कोर्स नंतर त्यांच्यात काय फरक पडला, पालकांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्रमैत्रिणींचं मत, शालेय प्रगतीत पडलेला फरक, इत्यादी विषयांचे माहिती संकलन. शिवाय माझ्या स्वतःच्या मुलाला ह्या कोर्सला घालणार आहेच.(तेही फुकटात होईल याची तजवीज करून आलोय) मी फक्त बाहेरून, वरवर अंदाजपंचे दाहोदसे करणारा बुद्धीवादी नाही. गटारात उतरूनच घाण आहे का हे बघायला लागत असते या विचाराचा आहे. माझी कामे सांभाळून जेवढा जमेल तेवढा वेळ यासाठी देणारच आहे. ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? >> तुम्ही करा. जो काय रीपोर्ट तयार होईल तो सगळ्यांसाठी खुला असेल अभ्यासायला. फक्त कुणी नुसतं तार्किक तारे तोडायला नको. कारण त्याचा काय उपयोग नसतो. ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे? >> आम्ही अशा फसवणार्‍यांची बीन-पाण्याने करायला सर्वात पुढे असू. कारण मुले आणि त्यांचे आयुष्य-मन-स्वभाव-इच्छा ह्यांच्या बद्दल आम्ही कमालीचे हळवे आहोत. त्यात कुणीही (अगदी कुणीही बरंका) भंकस करत असेल तर आम्ही त्येनला काय सोडत नाय.

बबन ताम्बे 09/07/2015 - 17:58
यासंबंधी अगदी अशीच आठवण माझ्याकडे आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी एका कंपनीत अ‍ॅप्रेंटीस असतानाची ही आठवण आहे. आम्हाला शिकवायला जे सर होते, ते एकदा म्हणाले की तुम्ही फळ्यावर जे लिहाल ते मी डोळे झाकून पुन्हा लिहू शकतो. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे रुमालाने डोळे बांधले आणि आम्ही फळ्यावर खडूने काहीतरी लिहीले. नंतर सरांच्या हातात खडू दिला.डोळे बांधलेले असताना सरांनी फळ्यावर आम्ही जे लिहीले होते ते तेच लिहीले.आम्ही अत्यंत आश्चर्यचकीत झालो. मग सरांनी खुलासा केला की तुम्ही ज्यावेळी डोळ्यावर रुमाल बांधला, त्यावेळी खरे म्हणजे मी माझ्या पद्ध्तीने तुमच्याकडुन रुमाल बांधून घेतला. मी खाली थोडी गॅप ठेवली होती.आणि तुम्ही जेव्हा लिहीत होतात तेंव्हा मी त्या गॅपमधून बघत होतो. थोडक्यात मला सगळे दिसत होते. वरील व्हीडीओत अनिस ने तेच दाखवले आहे.

In reply to by बबन ताम्बे

द-बाहुबली 09/07/2015 - 18:06
आस्सयं काय... मग मी सुधा ब्रेन अ‍ॅक्टीवेशनची एक ट्रीक दाखवु शकतो. शेजारच्या खोलीतला मुलगा तुमच्या मनातला पत्ता आपोआप ओळखतो असा तो प्रयोग आहे. बाकी हे अ‍ॅक्टीवेशन खरेच झाले तर मज्जाच मज्जा आहे. अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.

In reply to by जडभरत

बॅटमॅन 11/07/2015 - 21:05
त्यासाठी नवीन नवराबायकोच पाहिजेत असं नाही. आय मीन नवीन आणि नवराबायको या दोन्हीही नेसेसरी किंवा सफिशियंट कण्डिषन्स नाहीत.

In reply to by बॅटमॅन

द-बाहुबली 13/07/2015 - 21:26
यावरुन रिलायन्सने प्रोड्युस केलेला जज ड्रेड नामक तद्दन मारधाडपट आठवला... त्यात बायडीचं नक्कि काय अ‍ॅक्टीवेट केलं गेलं यावर भाष्य नाही पण ती... मिडब्रेन एक्टीवेट केल्याप्रमाणे पावर्स राखते.

In reply to by द-बाहुबली

अंतु बर्वा 13/07/2015 - 23:10
आमच्या स्कार्लेट जॉन्सनचा लुसी सुद्धा असाच. फरक एवेढाच की यातलं स्त्री पात्र १००% ब्रेन वापरु लागते (साधारण माणसं फक्त १०% ब्रेनचा वापर करु शकतात या गृहितकावरुन). अवांतरः https://en.wikipedia.org/wiki/Ten_percent_of_the_brain_myth

मी मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशन करून घेतलं तर मला मोठ्मोठ्या लॉटर्‍यांचे नंबर (६+१, ७+१, इ इ) ओळखता येतील काय ? कोणीतरी लवकर सांगा. म्हणजे मला युरोमिलिओनेन आणि युएस मधल्या क्रिसमसच्या जंबो लॉटरी एडिशन्सच्या अगोदर अ‍ॅक्टिवेशन करून घेता येईल !

चित्रगुप्त 10/07/2015 - 00:09
अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.
असेच होण्याची पूर्ण शक्यता आहे. इथे दिलेले व्हिडिओ बघून ते मनगटावर चोळणे, वास घेणे वगैरे निव्वळ नाटक असून पट्टीतुन दिसते, हेच खरे असे वाटले.
त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो,
ताबडतोब ती लिस्ट घ्या आणि त्या सर्वांना भेटा. अर्थात त्यातही काही मखलाशी असेलच, तरी त्यातून काहीतरी कळेलच. लहान मुलांना, विशेषतः शाळकरी मुला -मुलींना या कामी वापरणे हे अश्लाघ्य आहे, (पण ते फार परिणामकारक आहे). "शाळकरी मुली" असल्याचा आभास निर्माण करून कशी फसवणूक केली जाते, याबद्दलचे दुसरे उदाहरण अनेकांना ठाऊक असेल.

In reply to by भीडस्त

चित्रगुप्त 14/07/2015 - 07:05
दिल्लीजवळील 'तुगलकाबाद' या स्टेशनावरून सकाळी पुष्कळ 'बन्जारन' तरुणींचे जथे लोकल ट्रेनीत चढतात आणि कॅनॉट प्लेस जवळील स्टेशनावर उतरतात. तिथे वेणीफणी करून पिशव्यांमधून आणलेले शाळेचे युनिफॉर्म चढवून, एकादी वही, पुस्तक हातात घेऊन मोठमोठ्या तारांकित हॉटेलात रवाना होतात.

५ ते १५ वयाचीच मुले का निवडतात. ह्या वयापेक्षा मोठी का नाही? हि मुले चष्मेवाली असतील तर उत्तमच. कारण ह्या वयात शक्यतो र्‍हस्वदृष्टिचा नंबर असतो. त्यामुळे एकतर मुलाच्या डोळ्यावर चष्मा नाही व डोळ्यावर काळी पट्टी म्हणजे समोरचाही विचार करतो पट्टितून दिसले तरी चष्म्याशिवाय तो वाचू शकणार नाही. र्‍हस्वदृष्टीवाला लांबचे वाचू शकत नसला तरी जवळचे चष्म्याशिवाय वाचू शकतो. जे पालक १५००० - २५००० रु. घालवून फसले ते फसलो असे दाखवत नाही स्वतः खोटं बोलतात व आपल्या मुलांनाही खोटं बोलायला भाग पाडतात. त्यामुळे अशा लोकांची दुकाने जोरदार चालू रहातात. मेंदू जर डोळ्यांशिवाय बघू शकत असेल तर निसर्गाने आपल्याला डोळे कशाला दिले असते. डोळ्यांकडून व कानाकडून आलेले संदेश पुढच्या व मागच्या मेदूकडे वाहून न्यायचे काम मधला मेंदू करतो. डोळे झाकून ठेवल्यावर कोणते संदेश हा मिड ब्रेन वाहून नेणार आहे.

मनीषा 11/07/2015 - 13:45
कुठे चालू आहे हो धुमाकुळ ? मी मागच्या महिन्यात भारतात (पुण्यात) होते. नुक्तीच परत आलेय. मला तर सारं काही शांत शांत दिसलं ? ते असो ... सध्या तुमच्या व्यावसायीक चिंता संपलेल्या अथवा कमी झालेल्या दिसतात . ( संदर्भः आत्महत्या करण्याचा विचार --- वगैरे लिहिलेला तुमचा लेख ) अभिनंदन! आणि अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा !

In reply to by मनीषा

संदीप डांगे 11/07/2015 - 14:17
क्षमा असावी. पुण्यात नाही तर जगात नाही असा नियम आहे हे मला माहिती नव्हतं. काय की आमच्या नाशिकमधे गल्लीबोळात हे इंस्टीट्यूटचे बोर्ड्स दिसतायत. चौकशी करून पाहिले तर भारतात बर्‍याच ठिकाणी ही भुछत्रं उगवलेली दिसली. ह्या संस्था आणि यांचे पितळ उघडे पाडणारे यांचे चाललेले जबरदस्त स्टेजशोजपण बरीच पब्लिसीटी खेचतायत असं आढळलं. याबद्दल वर्तमानपत्रांमधेही बरंच लिहून आलंय. पण तुम्हाला पुण्यात दिसलं नाही म्हणजे तो सगळा माझा भ्रम आहे असं मला आता जाणवलंय... धन्यवाद! असो. वैयक्तिक चौकशी आणि ख्यालीखुशाली विचारण्यासाठी मिसळपाव.कॉमने आपल्या सर्वांना व्य.नि व खरडवहीची सोय दिली आहे हे आपल्यासारख्या जुन्याजाणत्या सदस्यास माहिती नाही हे बघून फारच आश्चर्य वाटले. तसेच नको ते संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत करण्यामागचा उद्देशही कळला नाही.

In reply to by संदीप डांगे

नाव आडनाव 11/07/2015 - 20:57
संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत करण्यामागचा उद्देशही कळला नाही. +१ मलापण तो संदर्भ चुकिचा वाटला. पुण्यात दिसलं नाही मी पुण्यातंच राहतो आणी मागच्या आठवड्यातच पेपरबरोबर एक जाहिरात होती - बहुतेक पिंपळे सौदागर मधे आहे अशी एक संस्था. मी ती जाहिरात फेकून दिली नाहितर इथं दिली असती. आधी पण अश्या जाहिराती पुण्यात बघितलेल्या / वाचलेल्या आहेत.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 11/07/2015 - 22:23
दिलेला संदर्भ इतका टोचला का ? सॉरी बरं का? कुणाच्या वैयक्तीक आयुष्यातील अर्धेमुर्धे संदर्भ घेऊन नस्त्या कॉमेंटस करणं चूकच आहे म्हणा. पण तुम्ही तो लेख इथे बोर्डवरच दिला होता , त्यामुळे वाटलं त्यात लपविण्यासारखं काहीच नसावं ... कारण सगळ्यांनीच त्यावर भरपूर चर्चा केली होती. म्हणून म्हणलं इथेच विचारायला काही हरकत नसावी. पण तुम्ही दुखावलेले दिसता .. म्हणून परत एकदा सॉरी! असो ... पुण्यात नाही तर जगात नाही असं नाही .. ठीक आहे . मग नाशीक मधे आहे म्हणजे देशभर धुमाकुळ? असेलही ... आणि तेही असोच ...

In reply to by नगरीनिरंजन

संदीप डांगे 11/07/2015 - 14:48
धन्यवाद! खरं की खोटं हा प्रश्नच विचारायचा नाही असं काही सांप्रत स्वयंघोषीत बुद्धीवाद्यांनी ठरवून दिलंय. त्याबाहेर सामान्य माणसांना काही प्रश्नच पडू नये व त्यांनी त्यांची उत्तरे स्वतः शोधूच नये असा काहीसा ट्रेंड आहे. मेडीकल सायंस असो वा पॅरानॉर्मल सायन्स असो, अशा कुठल्याही ठिकाणी कुणालाही शंका आली तर त्यांनी प्रश्न न विचारता स्वयंघोषित बुद्धीवादी जे सांगतात ते निमूटपने शिरोधार्य मानायचं असा नियम झालाय जणू. ह्याबाहेर जाऊन कोणी प्रश्न विचारतंय तर आश्चर्य वाटणारच. काही गोष्टी घडणे कसे अजिबात शक्य नाही असा दावा बर्‍याच संशोधनांपूर्वी केल्या गेला होता. ज्यांनी काहीही अभ्यास न करता नुसत्या पुर्वग्रहांवर अवलंबून हे घडणे शक्यच नाही असा शिक्का दिला ते मागेच राहिले. ज्यांना प्रश्न पडले व त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनाच यश मिळाले. यश म्हणजे असे घडणे शक्य आहे की नाही याचे ठाम उत्तर. माझ्या मते प्रश्न पडणे हे मूर्खपणाचे लक्षण नसून प्रश्नच न पडणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. आंधळेपणाने कुठलाही दावा मान्य/अमान्य करणे हा मूर्खपणा आहे. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन 11/07/2015 - 19:04
प्रश्न पडूच नये असे मला म्हणायचे नाही; पण अतिशय ऑबव्हियस बाबतीत प्रश्न पडणे फारच भोळसटपणाचे असून प्रश्न विचारणार्‍याच्या हेतूवरच शंका निर्माण करणारे असू शकते हे तुम्ही पाहिलेच. खाली अनेकांनी नेटवर्क मार्केटिंग वगैरे उदाहरणे दिली आहेत म्हणजे अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडून गेलेल्या असताना 'सामान्य' माणसाला प्रत्येकवेळी तोच प्रश्न पडत असेल तर फेसपाम होणे भाग आहे. असा मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते?

जडभरत 11/07/2015 - 15:27
डांगेसाहेब मला तर हे बोगस वाटतंय! अशा गूढ शक्ती एक दोन तासाच्या सेमिनार मधून प्राप्त होतील? पूर्वी साधू लोक वर्षानुवर्षे तपस्या करायचे अशा शक्ती मिळवायला.

In reply to by टवाळ कार्टा

जगामधे गुढ शक्ती अस्तित्वात असतात मित्रा. एक छोटसं उदाहरण देतो, पुनर्जन्माचं. तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? नसेल असं गृहित धरु. इथे आपल्या मिपावरचं बघ. आयडी मेला रे मेला की दोन दिवसात पुनर्जन्म घेतो. आता बसला विश्वास?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 12/07/2015 - 12:03
खिक्क...पंण मिपाच्या ब्रम्हदेवाला भेटलोय मी...त्यामुळे मिपावर पुन्र्जन्म होतात हे सत्य आहे

In reply to by जडभरत

संदीप डांगे 11/07/2015 - 15:54
टकासाहेब म्हणतायत तशा ह्या गूढ शक्ती अस्तित्वात असायला हव्या ना? नाही का? त्यामुळे जे दावा करतायत त्यांचा तपासून पाहायला काय हरकत आहे? गूढ शक्ती वैगेरे काही नसते हो. जे सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या आवाक्यात नसते पण घडतांना दिसते ते गूढ. जे आवाक्यात आहे आणि समजू शकते ते का गूढ म्हणायचं?

काही शंका. हे कोर्स चालवणार्‍या व्यक्तिंचे वय किती असते? ते वयाच्या कितव्या वर्षी ही विद्या शिकले? हा कोर्स केल्यावर एखाद्या मुलाची अभ्यासातील प्रगती प्लॅसिबो नसेल कशावरुन ?

In reply to by ऋतुराज चित्रे

संदीप डांगे 11/07/2015 - 16:53
अगदी रास्त शंका चित्रेसाहेब, मलाही हेच प्रश्न पडलेत. हे शिकवणारे कुठून येतात, ते कोण आहेत, त्यांना हे कोणी शिकवले आणि एवढे पैसे घेण्यासारखे त्यात काय मोठे आहे इत्यादी. ही सकारात्मक शिकवण देणारी विद्या आहे त्यामुळे प्लॅसिबो म्हणणं जरा गुंतागुंतीचं आहे. मनाला उभारी यावी, एकाग्रता वाढावी, कसलेही भय राहू नये म्हणुन काही क्रिया (जसे स्वसंमोहन वैगेरे) हे लोक करत असतील तर ते नेमकं प्लॅसिबो आहे हे कसं समजायचं? कारण प्लॅसिबो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे खोट्या साधनांद्वारे मिळणारे मानसिक समाधान. इथे थेट मानसिक समाधानच उत्पादन आहे या कोर्सचं. तुमचे प्रश्न मी अंतर्भूत केलेत. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

सदस्यनाम 11/07/2015 - 18:10
डांगे साहेब जमल्यास अजून एक करा. साधारण पणे २००५ ला अ‍ॅबॅकसचे असेच फॅड आलेले. सध्या काय चालूय त्यांचे माहीत नाही पण जवळपास अशाच अशक्य गणिती क्रिया क्षणार्धात करणे. तोंडी मोठ्या आकडेमोडी करणे वगैरे. त्या कोर्सेस चा किती फायदा दहावी बारावी च्या परिक्षेला झाला. अथवा त्या अ‍ॅबॅकस ट्रेनिंग मुळे एखादे करीअर अचिव्ह केले (नवीन अ‍ॅबॅकस ट्रेनिंग सेंटर ऊघड्ण्याखेरीज) याचा शोध घेतला तर बरीच उत्तरे मिळतील.

चित्रगुप्त 11/07/2015 - 17:20
काही हजार रुपये देऊन करण्याचे जे कोर्सेस असतात, त्यात एक सोय(?) दिलेली असते, ती म्हणजे तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ओळखीच्या लोकांनी केलेली घरगुती शिफारस विश्वसनीय वाटते, आणि जास्त जास्त गिर्‍हाईक मिळत जातात. या प्रकारे केले जाणारे अनेक धंदे असतात, त्यात तथाकथित अद्भुत शक्ती वगैरेंपासून लाख रुपयात गादी विकणे (तिला गादी न म्हणता 'कंप्लीट स्लीपिंग सिस्टम' म्हणायचे), अमूक एक मंत्र म्हणून जागृत होणार्‍या अध्यात्मिक शक्ती, असे कित्येक प्रकार असतात. दिल्ली भागात एक प्रकार खूप बोकाळलेला आहे, तो म्हणजे अपेक्षित फायदा झाला की त्यातले अमूक टक्के द्यायचे (किंवा उदाहरणार्थ मुलीचे लग्न ठरणे, नोकरी लागणे, कोर्ट केस जिंकणे वगैरे एका महिन्यात झाले, तर अमूक रक्कम देऊ) ठरावीक मुदतीत फायदा झाला नाही, तर टक्केवारी/रक्कम वाढवत जायची, वगैरे. पैसे शेवटी कुणाला पोहोचतात, हे कडेकोट रहस्य असते. धागाकर्त्याने त्या मुलांच्या पालकांना भेटताना हा मुद्दाही ध्यानात ठेवावा.

तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ही पद्धत गटविलेल्या गिर्‍हाईकाचे (आपल्या धंद्याचा फुकट जाहिरातदार होण्यासाठी) ब्रेन अ‍ॅक्टिवेशन करायला फार उपयुक्त आहे हे मल्टि-लेवल-मार्केटिंगने पुरेपूर सिद्ध केलेले आहे ! ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणसाला अमर थोडेच व्हायचे आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!

डांगे साहेब, हा विषय या ठिकाणी चर्चे साठी निवडल्या बद्दल धन्यवाद. मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे आणि मला असे आढळून आले आहे कि मिसळपाव वर शक्यतो आपले विचार सडेतोड आणि आपल्या प्रतिक्रिया सारासार विचार करून दिलेल्या असतात. असो..., मध्य मेंदू सक्रियिकरन या प्रकाराबद्दल या लेख पूर्वी मला अजिबात काही माहिती नव्हते, या लेखाच्या निमित्ताने या गोष्टी मला समजल्या आणि अंतर्जालावर या बद्दल माहिती चाळली आणि या प्रकाराबद्दल बरेच कुतूहल जागृत झाले. माज्या आसपास शोध घेतला असता अश्या कुठल्याच सौस्थेची इथे शाखा नाही असे समजले. आपल्याला जर खरोखर अश्या विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळाले तर कृपया खालील मुद्दे जरूर विचारात घ्यावेत … १. चौकशी निपक्षपाती पद्धतीने करावी, म्हणजे चौकशी साठी जाताना पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन बाजूला ठेवावा. २. या गोष्टीमध्ये नक्की कुठले विज्ञान आहे हे समजावून घ्यायला हवे. (या सौन्स्था विद्यार्थ्यांच्या पाच ज्ञानेंद्रियांना जागृत करण्याचा दावा करतात (दृष्टी, गंध, स्पर्श, चव, ध्वनी) गंधाने विद्यार्थी रंग ओळखतात तर स्पर्शाने त्या वस्तूचा आकार वगरे वगरे.) ३. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याकडील एखाद्या वस्तूचा (एखादी वस्तू जी फक्त तुम्हालाच माहिती असेल प्रेक्षकांना नाही आणि आयोजकांना तर आजीबात नाही) फक्त रंग ओळखण्यास सांगावे (उदाहरणार्थ खेळाच्या ५२ पत्त्यांमधील एखादा पत्ता), आणि दुसर्यास त्याच वस्तूच्या केवळ स्पर्शाने त्या वरील मजकूर ओळखण्यास सांगावे (या वेळी त्या विद्यार्थ्याने आपल्याकडील वस्तू नाकाजवळ नेता कामा नये) ४. केवळ विशिष्ट वयोगटातील विद्यार्थीच या प्रशिक्षणासाठी पात्र का आहेत यामागचे विज्ञान काय आहे? ५. खरोखर अश्या प्रशिक्षनांमध्ये तथ्य असेल तर जी मुले बौद्धिक दृष्ट्या दुर्बल आहेत (गतिमंद किवा मतीमंद) अश्या मुलांना हे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल का? ६. अश्या पद्धतीने कार्यक्षम केलेला मध्य मेंदू भविष्यात किती वर्षे कार्यक्षम राहील. आपण नक्कीच यातील तथ्य लवकरात लवकर आमच्या समोर मांडाल अशी अपेक्षा करतो, आपल्याला शुभेच्छा धन्यवाद, पुणेकर

In reply to by पुणेकर भामटा

संदीप डांगे 12/07/2015 - 11:04
Thank you. Intention of this thread is awareness only. If we are aware and discussed these kind of things before accidental encounter of such demos - practices, we can be well prepared to counter attack such frauds. And help weak mentality people to stay away from this Who have habit of falling for crooks

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र फेब्रुवारी २०१५ च्या अंकात फसवे मिडब्रेन अशी डॉ प्रदीप पाटील सांगली यांची एक कव्हर स्टोरी आहे.सांगलीत ही असे एक सेंटर चालू झाले होते. त्यात नाशिक येथेही या एम्बीए वाल्यांना आव्हान देण्यात आले होते असे म्हटल आहे. अंनिस कशा पद्धतीने चाचणी घेउ इच्छिते हे लेखात नमूद आहे. तसेच या एमबीए वाल्याना आव्हान पण आहे. संदीपजी हा लेख तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.

Rajesh K 12/07/2015 - 19:21
एक छोटीशी चाचणी करता येईल. जर हि मुले डोळ्यावर पट्टी बांधून नोटेवरचा क्रमांक ओळखतात तर त्यांना मिट्ट काळोखात सुद्धा हे करता यायला हवे. जर पाहायचेच नाही तर प्रकाशाची काय गरज? आणि या नियमामुळे चोरून पाहणे, रुमालाखालून पाहणे, इतर कोणीतरी संकेताने सांगणे या बाबी वजा करता येतील.

तुडतुडी 13/07/2015 - 14:10
संदीप डांगे साहेब .माझ्या ३ शंका आहेत १. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ? २. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ? ३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ? ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते>>> मग हा ध्वनी आपण रेकॉर्ड करून आणि ब्रेन-जिम चा व्यायाम शिकून घेवून आपल्या मुलांचा ब्रेन activate केला तर ? त्यासाठी २०-२५ हजार कशाला घालवायचे ? कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय?>>> नक्की कुठला काळ अपेक्षित आहे ? कारण अगदी प्राचीन काळापासून ची अनेक उदाहरण आहेत .सध्याचं अनिस चंच उदाहरण घ्या कि . त्यांना अध्यात्मिक दृष्ट्या develop असणार्या २ जणांनी आव्हान दिले होते . परंतु अनिस ने ते स्वीकारले नाही. त्यातले १ बहुदा नरेंद्राचार्य महाराज होते . दुसर्याचं नाव आठवत नाही . मी पा वरच कुणीतरी ते सांगितलं होतं मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते>>> खरं आहे. कारण ह्या सिद्धींच्या जोरावर तो काहीही करू शकतो . तसेच ह्या सिद्धी दुसर्यांना दिल्या तर त्याला प्रतिस्पर्धी नाही का निर्माण होणार ?

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 13/07/2015 - 14:29
१. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ? >> याबद्दल अधिक माहिती इथे मिळेलः http://www.shichidamethod.com/faq.html २. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ? >> थर्ड आय, इएसपी, सिक्स्थ सेन्स, ब्लाईंडफोल्ड विजन हे सगळे शब्द त्यांच्या शास्त्रिय संज्ञेच्या योग्य अर्थाशिवाय सर्रास वापरले जातात. त्यात शब्दांच्या भुलभुलैय्यात फसण्यापेक्षा माझा भर रिझल्ट्स वर आहे. ३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ? >>आत्ता तरी माहिती उपलब्ध नाही. चौकशी करून कळवतो. आव्हानः 'मंत्रांद्वारे जीव घेतल्या जाऊ शकत नाही' हा दाव्याला आव्हान देणारा एक कथित तांत्रीक टीवीवर लाइव शोमधे 'मृत्यूंजय मंत्र' वापरून जीव घ्यायचा प्रयत्न करत होता. ह्या पेक्षा हास्यास्पद प्रकार मी अजून तरी पाहीला नाही. आणि जो कोणी रॅशनलिस्ट हा स्टंट करत होता त्याला कोणी खरा तांत्रीक मिळाला नसेल. किंवा खरा तांत्रीक आणण्याची हिंमत झाली नसेल. खरेखोटे देव जाणे!

In reply to by तुडतुडी

जडभरत 13/07/2015 - 15:36
२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?
तुम्ही खरंच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मध्यंतरी मी नेटवर काही व्हीडीओ पाहिले होते तूनळीवर. त्यांचा दावा कुंडलिनी शक्ती जाग्रित करण्याचा होता. मी सदर व्हीडीओ उत्सुकता म्हणून पाहिले व ऐकले थोडाच वेळ. काहीतरी विचित्र प्रकाश व ध्वनींचा खेळ होता. नंतर कंटाळा येऊन बंद केले. दोन दिवस माझं डोकं दुखत होतं. रक्तदाब पण वाढल्यागत झाला. लहान मुलांच्या बाबतीत जर काही वाईट घडले तर कोण जबाबदार?

मजा आला । धाग्यावारील प्रतिसाद पाहून खुप मजा आला :)))) बाकी अशाप्रकारे मार्केटिंग करायची आयडीया भारी आहे ।

In reply to by संदीप डांगे

ते डोळे बांधुन करायचं का डोळे उघडे ठेउन??? =)) (हघ्या. गंमतीमधे लिहिलय)-कॅजॅस्पॅ-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे 14/07/2015 - 11:40
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार... :-)

In reply to by संदीप डांगे

गवि 14/07/2015 - 12:45
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार...
असं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल. बहुतांश गोष्टींबाबत प्रथमदर्शनावरुन आणि सारासार विचारांवरुन निष्कर्ष काढता येतो. एखाद्या गोष्टीचं पाहताक्षणी आश्चर्य वाटलं याचा अर्थ ती गोष्ट शास्त्रशुद्धरित्या तपासत बसण्यायोग्य असतेच असं नव्हे. सदर प्रकाराबाबत वर्णन केलेल्या सर्व घटना या सरळसरळ हातचलाखी आणि साध्यासुध्या तर्काने एक्सप्लेन होत असताना त्या जेन्युईन आहेत की नाहीत यावर अधिक खोलात जाऊन विशेष अभ्यास करण्याची गरज अजिबात वाटत नसल्याचं अनेकांचं मत असल्याने मार्केटिंगची शंका येऊ शकते. तसं अर्थात नसेलही. पुढे कधी समजा, समजा...तुम्ही खुद्द या गोष्टीची एजन्सी घेतलीत तर मात्र या सद्य शंकाकर्त्यांना वेगळं मत मांडता येईल. या गोष्टीमागे "सायन्स" किंवा अन्य काही रास्त तार्किक कारणमीमांसा नसण्याचा एक साधारण पुरावा म्हणजे असा की जर या गोष्टीचा १५-२० हजारात गावोगावी उपलब्ध होण्याइतका प्रचार झाला असेल तर या टप्प्याच्या कितीतरी आगोदर मुख्यप्रवाहातल्या शास्त्रज्ञांनी / वैज्ञानिकांनी याची भरपूर दखल घेऊन त्याला काहीतरी प्रत्यक्ष रुप दिलं असतं. ब्रेकथ्रू ठरु शकणारी कोणतीही थियरी मॉडर्न सायन्समधे स्वतःहून दखल घेऊन पुढे संशोधित केली जाते. गॅलिलिओ, एडिसन, न्यूटन यांचा एकांड्या शिलेदारीचा आणि समाजाला ओरडून ओरडून सत्य पटवून देण्याचा जमाना आता राहिला नाही. आता असे काही मिड ब्रेन अ‍ॅक्टिवेशन असण्याची थोडी जरी शक्यता दिसली तर त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या, (संरक्षणक्षेत्रातल्या, वैद्यकशास्त्राच्या) उड्या पडतील आणि संशोधन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन त्याचं स्वामित्व स्वतःकडे ठेवण्यासाठी चढाओढ लागेल. ज्या प्रयोगात असं काही न होता केवळ फ्रँचाईसी तत्वावर गल्लोगल्ली रीटेल केंद्रं उघडली जातात त्यात शास्त्रीय तथ्य असण्याची शक्यता शून्यवत आहे.

In reply to by सतिश गावडे

आनंदी गोपाळ 16/07/2015 - 21:45
असले प्रतिसाद टंकायला काय लागते? तुम्ही फारच स्केप्टिक आहात बुवा. धागाकर्ते करणार आहेत ते "शास्त्रीय" विश्लेषण येऊ द्या जरा या एम्बीए चे. मग गवि अन त्यांचे तत्वनिष्ठ तर्क कसे तोंडावर आपटतात ते पहाच तुम्ही.

बबन ताम्बे 13/07/2015 - 19:59
बाकी सर्वात टॉपच्या व्हीडीयोत तो चष्मेवाला तरुण मुलगा आणि मुलगी चांगले सुशिक्षीत दिसताहेत.एम. बी.ए. आहेत का काय माहीत नाही.पण आजकाल काही टुकार एम.बी.ए. कॉलेजांमधे लोकांना **त्या बनवायचेच शिक्षण देतात की काय? मागे मला एका चांगली नोकरी असलेल्या आणि इंजिनीअर असलेल्या मित्राने आग्रह करून करून एका पॉश ठिकाणी प्रेजेंटेशनला नेले. एक तरुण एम.बी.ए. एक्झीक्युटीव्ह आकडेवाडी मोडून बिझिनेस मॉडेल समजावत होता. तासभर त्याची बडबड चालू होती. दुसरे काही नाही, ते मल्टी चैन मार्केटींग स्कीम होती. पण ज्यांचे त्यात पैसे अडकले होते, ते उगाचाच त्याच्या हो ला हो आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते (माझ्यासारख्या ब-याच नवीन बक-यांना इम्प्रेस करण्यासाठी). मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे सरळ सरळ थोतांड दिसते आहे. लोकांना मामा बनवून पैसे कमवायचे धंदे. यात वाईट एव्ह्ढेच वाटते की लहान मुलांना यात सामील करून घेऊन त्यांना खोटे बोलायला, दाखवायला भाग पाडले जाते. वरील व्हीडिओत ती लहान मुलगी कार्ड ओळखण्यासाठी हाताला, डोक्याला कार्ड चोळतेय हे चक्क नाटक करतेय हे स्पष्ट दिसतेय.

पुणे तिथे काय उणे.... या धाग्याच्या निमित्ताने अजुन एक माहिती शेअर करु इच्छितो. परवा माझी पत्नी मुलीच्या शाळेत गेली होती. तिथे एक पालक म्हणाली की त्यांनी त्यांच्या मुलीला सुंदर हस्ताक्षराचा क्लास लावला आहे. तीन महिन्याचा कोर्स आणि फी ₹ १५ हजार फक्त !! ३ च महिन्यात ते वळणदार अक्षर आणि तेही वेगाने काढायला शिकवतात अशी माहिती त्यांनी दिली. खरतर एखाद्याचं अक्षर सुंदर आणि वळणदार असणे ही त्या व्यक्तीला मिळालेली नैसर्गिक देणगी असते असे मी मानतो. थोड्याफार सरवाने खराब अक्षर असणारे त्यात थोडी वरची पातळी गाठु शकतात. पण कोर्स वगैरे हे अती झालं. बर त्या बाईसुद्धा कोर्स सुरु केल्यापासुन आमच्या मुलीचं अक्षर सुधारायला लागलयं असा दावा करत होत्या. मला तर यामधे वरील काही सदस्यांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्केटींगच वाटतय.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

खटपट्या 16/07/2015 - 15:49
मला बरेचजण हस्ताक्षर सुधारण्याचे क्लास घे म्हणून गळ घालतायत पण निव्व्ळ याच कारणाने मी ते टाळतोय. वर सांगीतल्याप्रमाणे हस्ताक्षर सुधारणे खूप कठीण वाटतंय. सुलेखन वेगळे आणि हस्ताक्षर वेगळे. चांगल्या सुलेखनकाराचे हस्ताक्षर चांगले असेलच असे नाही. ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते. कोणत्याही क्लास कींवा कोर्स केल्यामुळे ते सुधारलेले नसते. नववी दहावीतल्या मुलांना तर हस्ताक्षर सुधारणेच्या क्लासमधे अजीबात पाठवू नये. कारण हस्ताक्षर सुधारायच्या नादात ते सद्या असलेला वेग हरवून बसतील आणि दहावीच्या परीक्षेत भरपूर लीहावे लागते.

In reply to by खटपट्या

चित्रगुप्त 17/07/2015 - 00:35
ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते
माझ्या बाबतीत तरी असे नव्हते. मी सातवीत असताना रोजनिशी लिहिणे सुरू केले, तेंव्हाचे अक्षर अगदी वाईट आहे, नंतर दासबोधात 'ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर' वगैरे वाचून स्वतःच प्रयत्न करून ते सुधरवून सुंदर केले. अर्थात चित्रकलेमुळे मला ते फार सोपे गेले, फक्त अक्षर सुंदर करण्याचा निश्चय करण्याचाच अवकाश होता. केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे. ज्याला अक्षर सुधरवायचे आहे, त्याने अक्षरांमधे गोलाई आणण्याचा, अक्षरे सुटी-सुटी लिहिण्याचा, आणि अक्षरांची उंची, रुंदी, तिरपेपणा वगैरे एकसारखा राखण्याचा सराव केला, तरी पुरेसे होते. बॉलपेन पेक्षा अर्थातच जुन्या पद्धतीचे फौंटन पेन चांगले.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 17/07/2015 - 21:37
डॉक्टरांच्या संपाचे व्यंगचित्र आठवले. त्यांच्या हातांतील फलकांवर काय लिहिलेय हे वाचता न आल्याने कुणी लक्षच दिले नाही वगैरे वगैरे.

बबन ताम्बे 14/07/2015 - 16:05
त्याने ब-याच शाळांमधे बरेच सेमिनार घेऊन सांगीतले की अक्षर खराब असल्यामुळे ब-याच मुलांना दहावी बारावीच्या परीक्षेत गुण कमी मिळतात. त्याने इव्हन हेही पटवले की आधी पालकांचे अक्षर चांगले हवे. तरच मुलांचे अक्षर सुधरेल. आहे कि नाही एका दगडात दोन पक्षी :-) त्यांचे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे फेबु. वर जोरदार मार्केटींग चालू आहे.

तुडतुडी 15/07/2015 - 17:35
मला mid brain activation चा मेसेज आलाय मोबाईल वर. पुण्यात तीळक रोड ला परवा फ्री सेमिनार आहे . बघूया तरी जावून काय आहे हे . आता पुण्यात सुधा धुमाकूळ सुरु होणार कि काय

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे 15/07/2015 - 17:58
+१०००० जेवढ्या मिपाकरांना जमेल तेवढ्यांनी जावा. पाहीजे तर मिपासाठी खास सेमिनार घ्यायला सांगा त्यांना. दूध का दूध पानी का पानी....

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

अस्वस्थामा 15/07/2015 - 21:51
तीलक रोड
टिळक मार्गाचं तिलक रोड असं मनपाने नामकरण केलं वाटतं. पुण्याचे पण उत्तर भारतीयीकरण शांततेत सुरु झालेय म्हणायचे.. ;)

तुडतुडी 16/07/2015 - 12:42
तीलक रोड>>> खरच चुकलं . माफ करा . टिळक मार्ग बरोबर आहे . मेसेज असा आहे : What is MIDBRAIN ACTIVATION & how it is going to benefit ur child for a lifetime. Attend a free seminar on 17th July 7 pm @MCCIA HALL Tilak Rd, Miscall 9764069900

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 17/07/2015 - 17:09
प्रत्यक्ष सेमिनारला जायची चांगली संधी आहे आज. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर जावं आणि या धाग्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर तिथे उत्तर मिळतायत का बघावी. सेमिनारला जाणार्‍यांनी आल्यावर नविन धागा काढून मत मांडलं तरी चालेल.

गिरकी 16/07/2015 - 16:02
या असल्या सगळ्या गोष्टी मी वयाचे १५ पार केल्यावरच का सापडायला लागल्या बरं :( ते अ‍ॅबॅकस पण तसंच. मोठ्या माणसाना नाही शिकवणार म्हणे. हे काही खरे असेल असं अज्जिबात वाटत नाहिये. पण असेलच तर काही वर्षांत मोठ्यांना पण कसं हुशार करायचं याचा शोध ही मुलेच लावतील. मला जर असं काय काय अंतर-ज्ञान मिळालं तर काय बहार येईल या स्वप्नात हरवून गेलेय. :) बाकी संदीप भाऊ, तुमच्या अभ्यासाचं फलित नक्की सांगा हो.

In reply to by गिरकी

http://www.mirror.co.uk/news/uk-news/mind-boggling-magician-shows-how-6039713 या चित्र फितीमध्ये सुद्धा मुलगा असाच काहीतरी करत आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा काही दिवस थांबून निर्णय घेणे चांगले.

In reply to by तुडतुडी

आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? हि मुले अंधारात अभ्यास करू शकतील त्यामुळे उर्जेची बचत होइल, मुलांच्या वस्तू गहाळ होणार नाही. मुलांना चष्मे लागणार नाही. पोलिसांना श्वानपथक बाळगावे लागनार नाही. ...... असे बरेच फायदे आहेत, पैशाकडे बघु नका.

In reply to by आनंदी गोपाळ

सुबोध खरे 17/07/2015 - 19:58
गोपाळ राव मला एक कळत नाही कि हे मिड ब्रेन कशाला अ‍ॅक्टिव्हेट करायला जात आहेत?फोर ब्रेन( मोठा मेंदू) का अ‍ॅक्टिव्हेट करत नाहीत? ती अ‍ॅक्टिव्हेट करता आला तर मी सुद्धा आईन्स्टाइन सारखा बुद्धिमान होईन कि. नुसती दृष्टी किंवा कर्ण शक्ती सुधारून माणूस कसा हुशार होणार? वेडा किंवा मतीमंद माणूस सुद्धा व्यवस्थित पाहत असतो किंवा ऐकत असतो. म्हणतात ना डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी फक्त काही लोकांनाच असते. किंवा गाणी आम्ही पण ऐकतो पण गाण्यात कुठला सूर चुकला हि श्रवणशक्ती आम्हाला नाही. हे सर्व कार्य मध्य मेंदूचे नाही तर आद्य मेंदू( मोठा मेंदू)चे आहे. तो अ‍ॅक्टिव्हेट करायचा सोडून हे काय चालले आहे? पाईनीयल ग्रंथीला अ‍ॅक्टिव्हेट करतात असे त्यांचे म्हणणे आहे. पण पाईनीयल ग्रंथी शल्यक्रिया करून काढून टाकली तर माणूस ना बहिरा होतो ना आंधळा होतो. मग हे काय? हे शोधताना मला उत्तर सापडले. ते असे आहे http://www.midbrain-activation.com/IncomeOpportunity.html मोठी ईण्ष्टीट्य़ूट काढू. खाऊ पिऊ मजा करू. १२५ कोटी लोकांच्या देशात आपल्या सात पिढ्या चालवू शकतील असा धंदा आहे. येता का? मला सफाईदार मराठी हिंदी आणी इंग्रजी येते. चार असे विविध भाषा बोलणारे घेऊ. हा का ना का

In reply to by टवाळ कार्टा

सदस्यनाम 19/07/2015 - 18:01
ह्या टवाळ नगाला घ्या डॉ. डोळे मिटून गाड्या आणि डुआयडी ओलखतेय. व्हिडिओ मधे घ्यायला पण बेस्ट स्याम्पल है.
मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे. दुवा १ दुवा २

तुम्हाला आवडलेले शिक्षक

माहितगार ·

In reply to by माहितगार

माहितगार 04/09/2017 - 11:48
मिपाकर मित्रांनो, हा धागा लेख काढून मध्ये एक वर्ष गेले आहे. तेव्हा या वर्षीही थोड्या प्रतिसादांच्या अपेक्षेने हि धागा चर्चा पुन्हा एकदा वर काढतो आहे.

माझे सगळ्यात आवडते शिक्षक माझे बाबा, तसे पाहता त्यांच्यावर एक लेख लिहिता येईल वेगळा पण इथे काही काही निवडक आठवणी सांगव्या वाटल्या म्हणुन हा लेखन प्रपंच. आमचे वडील ज्या हाईस्कूल अन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन निवृत्त झाले तेव्हाचा एक किस्सा, कोणीतरी मोठे पाहुणे येणार होते त्यांच्यासमोर चमकोगिरी करायला शाळेच्या मैनेजमेंट ने पुर्ण मंच व्यापुन टाकले अन बाबांना स्वतः हेडमास्टर असुन बसायला ही जागा नव्हती तेव्हा बाबा शांतपणे स्वागत द्वारी पाहुण्यांचे स्वागत करायला उभे राहिले जाऊन, तो कार्यक्रम पहायला गेलेला मी आधीच 'तीन दिवसा पासुन काय एकच शर्ट घालताय' म्हणुन त्यांच्यावर भड़कलो होतो त्यात हे स्टेज पुराण झाले तेव्हा मी स्वागत द्वारा जवळ असलेल्या बाबांजवळ गेलो अन माझी धुसफुस व्यक्त केली ती अशी 'काय बाबा तुम्ही फारच साधे बुआ असेकसे कुठला कोण शाळा व्यवस्थापन चा माणुस येऊन साक्षात मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसतो अन हा शर्ट बदला आता' 'शांत हो, अन गंमत बघ!' बाबा कार्यक्रमाला थोडा वेळ होता व खुपसे विद्यार्थी अजुन येत होते बाबा सगळीकडे नजर ठेऊन उभे मी त्यांच्या शेजारी उभा इतक्यात एक पाचवी चा असावा असा एक पिटुकला धीट पोरगा आला मी बाबांच्या शेजारी उभा राहून पाहत होतो, तो हळूच आला अन लहान पोरे ज्या टिपिकल पद्धतीने वडीलधाऱ्या लोकांचा शर्ट ओढ़तात तसा ओढला अन दाद देता झाला 'सर परवा किनै तुम्हाला मी टीवी मधे पाहिले (लोकल केबल टीवी बातम्या) अन तुम्ही किनै तुमच्या मिश्या अन ह्या निळ्या शर्ट मधे खुप मस्त दिसत होते सर एकदम स्मार्ट' अन तुरुतुरु निघुन गेला खजील झालेल्या माझ्याकडे पाहत बाबा दिलखुलास हसले अन म्हणाले 'मास्टराची संपत्ती फ़क्त त्याचे विद्यार्थी असतात मला ह्या एका क्षणात तसल्या हजार मंचाचा मान ते आदर्श शिक्षक सगळे मिळाले रे सुकी कागदं अन कोटावर बिल्ले काय करायचेत? माझ्याकडे साक्षात् ईश्वर येतो अश्या रुपात स्तुती करायला' मी पुढे काही ऐकू ही शकलो नाही अन बघुही शकलो नाही माझे आवडते शिक्षक म्हणुन माझे बाबा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माहितगार 05/09/2015 - 11:48
सर परवा किनै तुम्हाला मी टीवी मधे पाहिले (लोकल केबल टीवी बातम्या) अन तुम्ही किनै तुमच्या मिश्या अन ह्या निळ्या शर्ट मधे खुप मस्त दिसत होते सर एकदम स्मार्ट' अन तुरुतुरु निघुन गेला
मस्तच !

बबन ताम्बे 04/09/2015 - 18:50
आमच्या काळी प्राथमिक शिक्षक हे बहुतांशी मारकुटेच होते. एक तर गणित जमायचे नाही, आणि पाठीत रट्टे पडल्यानंतर तर अजीबात समजायचे नाही. :-)

In reply to by बबन ताम्बे

माहितगार 05/09/2015 - 11:46
छडी लागे छम छम ... मला वाटते बिएड डिएड या शिक्षक कौशल्य विकास प्रक्रीयेमुळे आताच्या काळात धप्पाकुटीचे प्रमाण बरेच कमी झाले असावे. तरीही यू अ‍ॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख वाचकाभिमुख अभिवृत्ती चे कौशल्य विकसीत करण्यासाठी केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे सर्वांसाठीच अधिक प्रयत्नांची गरज असावी.

In reply to by बबन ताम्बे

नाव आडनाव 05/09/2015 - 23:13
एक तर गणित जमायचे नाही, आणि पाठीत रट्टे पडल्यानंतर तर अजीबात समजायचे नाही. :) माझ्या सासर्‍यांचं नाव पण बबन आहे आणि ते गणित विषया बद्दल असंच सांगतात :) ते म्हणतात "जो पर्यंत गणितात आकडे होते तोपर्यंत सगळं कळायचं. जसं - राम कडे ३ मोसंब्या होत्या, त्यातल्या दोन श्यामला दिल्या, तर किती राहिल्या? पण जेंव्हा पासून व्हेरिएबल (?) आले, तेंव्हा पासून सारं समजायचं बंदच झालं. जसं - राम कडे क्ष मोसंब्या होत्या, त्यातल्या दोन श्यामला दिल्या, राम कडे १ राहिली तर त्याच्या कडे आधी किती होत्या. मला क्ष मोसंब्या, य आंबे आणि ज्ञ अमूक-तमूक हे काहीच कळत नसायचं आणि रोज मार खायचो. नंतर इतिहास आवडायला लागला आणि इतिहासाचा प्राध्यापक झालो :)"

In reply to by नाव आडनाव

बबन ताम्बे 07/09/2015 - 11:41
तुमच्या साबुंशी सहमत आहे :-) माझा इंग्रजी एम.ए. झालेला मित्रही म्हणतो, काय ते (च्यायला) (अ+ब)^२ चे सुत्र पाठ नाही म्हणून मार खाल्ला होता. आयुष्यात नंतर एकदाही त्याचा उपयोग झाला नाही.

In reply to by बबन ताम्बे

माहितगार 07/09/2015 - 13:02
मला वाटत सध्याच्या पिढीला सोप्या गणिताचा वेगळा पर्याय आता उपलब्ध करून दिला गेला आहे. "आयुष्यात नंतर एकदाही त्याचा उपयोग झाला नाही." हे आपण सहज बोलून जातो, भावना समजून घेतानाच माझा उद्देश शब्द छल करण्याचा नाही पण यात काही तार्कीक उणीव राहून जाते असे वाटते आहे. उपयोगाचा प्रयत्न केल्या नंतर प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणणे वेगळे. (ह.घ्या.) सांगण्याचा उद्देश हा अनुभव कोणत्याही विषयाबाबत व्यक्ती परत्वे बदलता असू शकतो एवढेच.

In reply to by माहितगार

बबन ताम्बे 07/09/2015 - 14:30
असे म्हणायचे होते. बाकी गणितामुळे (जरी भावी आयुष्यात त्यातले बरेचसे वापरले नाही तरी) तर्कबुद्धी, विश्लेषण क्षमता वाढते याबद्द्ल दुमत नाही. शालेय जीवनात जरी गणितावरून शिक्षकांचा मार खावा लागला, तरी पुढे गणित हा माझा आवडता विषय होता हे जाताजाता नमूद करावेसे वाटते. :-)

In reply to by बबन ताम्बे

माहितगार 07/09/2015 - 14:47
फिजीकल मार एक गोष्ट झाली, समजवता देऊन येऊ न शकणारे शिक्षक भेटणे ही सुद्धा शिक्षाच खरी तेच चांगल समजावून देता येणारे शिक्स्।अक अथवा प्रोत्साहन देणारे शिक्षक भेटले की तोच विषय पाहता पाहता आवडीचा होऊन जातो

जानु 04/09/2015 - 21:14
आम्हाला ईयत्ता पाचवी नंतर ईंग्रजी विषयासाठी शिसोदे सर होते. सकाळी ६ वाजता क्लास असायचा. सर कधी ६ नंतर आलेले मला आठवले नाही. आम्ही सकाळी उठायला कंटाळा करायचो. सर मुलांना कधी उशीरा आला म्हणुन रागावले नाही. आणि शिकवायला एकदम मस्त. आजही पॅसिव्ह व्हॉईस, अ‍ॅक्टीव व्हॉईस ईंग्रजी व्याकरण त्यांच्या मुळेच. उदाहरणे जेव्हा लिहुन द्यायचे तेव्हा मोठा फळा भरुन जायचा. एवढी उदाहरणे असायची की ते लिहुन आणि वाचुनच काम व्हायचे.

चित्रगुप्त 05/09/2015 - 06:39
१९६९ ते १९७५ हा काळ मी इंदुरच्या आर्टस्कूल मधे चित्रकला शिकलो. त्या काळात मला जे शिक्षक लाभले, त्यापैकी कै. चंद्रेश सक्सेना यांचा माझ्या जीवनावर फार मोठा परिणाम घडून आला. त्यांचेविषयी आणि एकंदरित त्या काळाविषयी आठवणी हा माझ्यासाठी अमूल्य खजिनाच आहे: १९६८ मध्ये सतरा वर्षांचा असताना एकदा स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेलो, बरोबर चांदोबातून बघून काढलेली, आणि तेंव्हाच्या साधना, मुमताज वगैरे नट्यांची चित्रे होती. प्रिन्सिपल किरकिरे होते, ते म्हणाले की तुमचा हात चांगला आहे, पण आता ही अशी बघून चित्रे काढायची नाहीत, अमुक इतकी फी भरून प्रवेश मिळेल. उद्यापासून या. मग काय, आनंदाला उधाण आले. लगेच जाणे सुरु केले. आर्टस्कूलचा हा काळ अविस्मरणीय आनंदाचा होता. पैसा जेमतेमच असायचा, पण भरपूर उत्साह, शक्ती होती, आणि आपण आयुष्यात नक्की काहीतरी थोर करणार आहोत, ही काहीशी भाबडी आशा, किंबहुना खात्रीच. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहेत, ही आशा माणसाला गुंतवून ठेवत असते. आर्ट स्कूल च्या पहिल्या वर्षी बहुतकरून स्टिललाईफ रंगवायची असत. शिवाय व्हीनस वगैरे पुतळे होते, त्यावरून मनुष्याकृती बनवणे शिकायचे, हुबेहूब रेखाटन करून कागदी स्टंप ने शेडींग करायचे. एक चित्र करायला संपूर्ण एक आठवडा असे. शिक्षक दिवसातून एखादा चक्कर मारून आमचे काम बघून जात. कधी थोडेसे तोंडी मार्गदर्शन करीत, किंवा आमच्या चित्रांवर करेक्शन देत. त्यावेळी त्यांच्या जराश्या कामातून चित्रात घडून येणारे बदल आश्चर्यकारक वाटत. उदाहरणार्थ स्टिल लाईफ करताना आम्ही चिनीमातीची भांडी, कापड, वगैरे जसेच्या तसे रंगवण्याचा कसोशीने प्रयत्न करायचो, परंतु दुबे सरांनी जेंव्हा भांड्यांच्या खालच्या बाजूच्या फटीतून दिसणारा मागचा प्रकाश ब्रशच्या एकदोन फटकारयातून दाखवला, तेंव्हा चित्र एकदम जिवंत झाले. सक्सेना सर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'कान्पोझीशान' साठी प्रो. चंद्रेश सक्सेना यांच्या आठवडाभराच्या वर्गाला जायचे होते. त्यांच्याविषयी असलेला आदरयुक्त दबदबा ऐकून होतो. इतर वर्गांप्रमाणे त्यांच्या वर्गात अजागळपणे पसरलेले लाकडी 'डाँकी' नव्हते. खाली मोठी सतरंजी व त्यावर सुमारे एक फूट उंचीचे प्रशस्त टेबल होते. भिंतींवर बेंद्रे, डीजे जोशी यांची चित्रे व्यवस्थित टांगलेली, लाकडी कपाटात निवडक पुस्तके, सगळीकडे कमालीची स्वच्छता. सक्सेना सर मुंबईला जे जे मध्ये, नंतर शांतीनिकेतन ला नंदलाल बसूंकडे शिकून आलेले होते. सर अतिशय व्यवस्थित व शिस्तप्रिय. चित्रकारांची राहणी, त्यांचे रंगसामान वगैरे अगदी टीपटाप असले पाहिजे, ब्रशचे पितळी फेरूल नेहमी चकाकत असले पाहिजे, ब्रश चकचकीत पितळी नळकान्ड्यात ठेवायचे, रोज सर्व ब्रश साबणाने धुवून मगच घरी जायचे, पॅलेट वर ठराविक क्रमाने रंग काढायचे, एप्रन घालून काम करायचे, वगैरे आदर्श स्वतःच्या उदाहरणातून आमच्या समोर मांडायचे. तर त्या पहिल्या दिवशी त्यांनी जे भाषण दिले, त्याने माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली. उदाहरणार्थ, 'स्त्रियांकडे बघू नये' अशी साधुसंतांची शिकवण ऐकत आलेलो होतो, तर सरांनी सांगितले, की घरी काय बसता, घाटावर जा, तिथे आंघोळ करत असलेल्यांची स्त्रियांची स्केचेस करा, वगैरे... किंवा चित्रकलेचे शिक्षण तुम्ही उपजीविकेसाठी म्हणून घेऊ नका, तर या अभ्यासातून लाभणार्या सौदर्यदृष्टीचा उपयोग आयुष्यात प्रत्येक क्षणी करा. तुमचा भवताल, वस्तू, तुमचे अवघे जीवन सुंदर करा.... चित्रकाराने कसे राहावे, काय करावे, चित्रकलेचे महत्व, असे सर्व काही त्या भाषणात होते. आम्ही सर्व विद्यार्ही अगदी भारून गेलो. माझी मरगळ, निरुत्साह, संकोच, सर्व काही जणु जळून गेले, आणि उत्साहाने, चैतन्याने मी कामाला लागलो. आज पंचेचाळीस वर्षानंतर सुध्धा मी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो... पुढे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आर्ट स्कूलला गेलो होतो, पाहतो तर काय, सर शाळेच्या एकूण एक फर्निचरला स्वतः हाताने पॉलिश करत बसले होते. म्हणाले, आता शाळा सुरु झाल्यावर मुले येतील, तेंव्हा त्यांना सर्व काही व्यवस्थित, नीटनेटके दिसायला हवे ... आर्टस्कूल संपूर्णपणे सरकारी होते, त्यामुळे अश्या कामासाठी पैसा मंजूर करवणे वगैरे फार त्रासाचे असे, त्यामुळे सर हे सर्व स्वखर्चाने, स्वतःच्या मेहनतीने करत होते... मी खूपच भारावून गेलो... आम्हाला स्टिललाईफ मध्ये फळांची चित्रे काढण्यासाठी ते स्वखर्चाने अगदी रसरशीत महागडी फळे आणत... नोकरी म्हणून नव्हे, तर एक पवित्र कार्य म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना ते घडवत होते... आर्ट स्कूलचा काळ भराभर उलटत होता. पोर्टेट, निसर्गचित्रण, पर्स्पेक्टिव्ह, शरीरशास्त्र, काम्पोझीशन, मूर्तीकला, ग्राफिक प्रिंट, असे विषय होते. सर्व विषयात मला निसर्गचित्रण सर्वात प्रिय. त्यासाठी पहाटे पासून पेस्टल, तैलरंग, जलरंग वगैरेचे सामान, ईझल वगैरे घेऊन दूर दूर सायकलने जायचे, एखादा स्पॉट आवडला कि तिथे बसून चित्रे रंगवायची. सक्सेना सर म्हणायचे कि एकाच साच्यात अडकू नका, वेगवेगळी माध्यमे वापरून काम करा. मग जलरंग, तैलरंग, याबरोबरच आम्ही लाकूड घासण्याच्या रेजमाल वर ओईल पेस्टल ने चित्रे काढणे वगैरे प्रयोग करायचो. आर्टस्कूलची वेळ संपल्यावर आम्ही तीन-चार विद्यार्थी सक्सेना सरांबरोबरच बाहेर पडायचो. आपापली सायकल हातात धरून पायीच आमची मिरवणूक निघे. सर आम्हाला इंदुरातल्या जुन्या गल्ल्यांमधून फिरवायचे, आणि चित्रकलेच्या दृष्टीकोणातून समोर दिसणार्‍या विविध दृष्यांमधले सौंदर्य उलगडून दाखवायचे. ते सर्व बघून-ऐकून आम्ही कमालीचे भारून जात असू. वर्षातून दोन-तीनदा शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन व्हायचे. ते दोन तीन दिवस आम्हाला खूपच शिकायला मिळायचे. रात्री दीड-दोन पर्यंत काम करून आम्ही प्रदर्शन लावायचो. त्यावेळी त्या सर्व चित्रांवर सर विवेचन करायचे, शिवाय चित्रांचे माउंटिंग, फ्रेमिंग कसे करायचे, योग्य तितकी जागा मधे सोडून चित्रे कशी प्रदर्शित करायची, अश्या गोष्टीही शिकायला मिळत. या सर्व गोष्टींचा मला पुढील जीवनात खूपच उपयोग झाला. खरेतर त्याकाळी आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला किरकिरे सरांनी तैलरंगाचे सर्व सामान, हॉग हेयर ब्रश वगैरे आणायला सांगितले. (हॉग म्हणजे काय, हे घरी जाऊन शब्दकोशात बघितले, तर 'अंड बडवलेला डुक्कर' असा अर्थ दिलेला होता) हे ब्रश, रंग महाग होते, मोठी पंचाईत झाली. मग स्वस्ताचे पावडर कलर, बेल तेल आणून खलबत्त्यात घोटून तैलरंग बनवले, आणि गायीच्या शेपटीचे केस कापून ब्रश बनवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी हे सामान वापरून पोर्ट्रेट करू लागलो, ते बघून किरकिरे सरांनी विचारले कि घरून पैसे मिळत नाहीत का वगैरे....त्याकाळी निदान इंदुरात तरी चित्रे विकली जाणे वगैरे ऐकीवातही नव्हते. यातून पैसा मिळू शकतो वा मिळावा, हे काही मनात नसायचे. आम्ही आपले झपाटल्यासारखे चित्र रंगवत असायचो. सक्सेनासरांखेरीज माझे त्या काळातील मार्गदर्शक म्हणजे इंदुरातील त्याकाळचे प्रसिद्ध चित्रकार विष्णु चिंचाळकर. ऊर्फ 'गुरुजी'. ते अतिशय उत्कृष्ट चित्रकार तर होतेच, पण विशेष म्हणजे त्यांचेकडे सर्वाना मुक्तद्वार असायचे. कुणीही केंव्हाही गेले, तरी ते आपुलकीने बोलत, तासन तास गप्पा करत. त्याकाळी ते प्रत्यक्ष पेंटिंगपेक्षा, निसर्गात सापडणार्‍या वा मानव निर्मित लहान-सहान वस्तूंतील सौदर्य उकलून दाखवणार्‍या अतिशय सुंदर रचना करत. त्याना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांची ती निर्मिती बघून आणि त्यावर चालणारे त्यांचे भाष्य ऐकून अगदी भारून जात असे, आणि जगाकडे बघण्याचा एक अगदी नवीन, आनंददायक असा दृष्टीकोन घेऊन परत जात असे. गुरुजींच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप त्यांच्या त्या लहान-लहान रचनांमधून दिसून येत असली, तरी मला आपले वाटत रहायचे, की त्यांनी मोठमोठी तैलचित्रे रंगवावीत... गुरुजी एवढे मोठे, प्रसिध्द चित्रकार, पण त्यांची राहणी अगदी साधी, वागणूक विनम्र आणि प्रेमळ. ...ते दिवस आणि माझे ते शिक्षक मला अजूनही अगदी रोज आठवतात... सक्सेना सरांचे एक चित्रः .

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 05/09/2015 - 13:03
अर्थातच. हा स्वतंत्र धागाच व्हायला पाहिजे. असे दुर्मिळ शिक्षण अन असे दुर्मिळ गुरुवर्य. अप्रतिम असे वर्णन अन त्याला प्रत्येक बारकाव्याच्या स्मरणशक्तीचे वरदान. आज शिक्षक दिनानिमित्त साष्टांग दंडवत घ्या गुरुवर.

माहितगार 05/09/2015 - 11:28
चित्रगुप्त तुमची आठवण आवडली. या दुव्यावरील बातमीतील आणि तुमचे शिक्षक चंद्रेश सक्सेना एकच का वेगवेगळे. (दोन्ही एकच असतील तर आणखी थोडी सामुग्री जोडून मराठी आणि हिंदी विकिपीडियावर त्यांच्या बद्दल छोटासा लेखही होऊ शकेल.) प्रचेतस म्हणतात तसे वेगळ्या धागा लेखाच्या स्वरुपात तुम्हाला अजूनही जरासे विस्तारण्याचा मौका मिळेल. पु.ले.शु.

अजया 05/09/2015 - 12:01
चित्रगुप्तांच्या आठवणी आवडल्या.चिंचाळकर गुरुजींबद्दल पुलंनी कुठे तरी कुमारांसोबतच्या मैफिलीबद्दल लिहिताना लिहिलंय बहुधा.त्यांच्यावरच कोणत्यातरी दिवाळी अंकात लेखही वाचला होता.

नाखु 05/09/2015 - 12:15
शाळेत फक्त शिक्षक न राहता पालकच झालेले सगळे शिक्षक्गण हे वंदनीय आणि खरंच अनुपम होते. त्यात आमच्या ८ वी तील वर्गशिक्षीका लिमये बाई आणि ९ वी तील न म जोशी हे खास. मिमये बाई गणीताबरोबरच संस्कृतही शिकवत असत. अगदी तन्मयतेने.शाळा निम्न मध्यमवर्गीय पालक असलेल्या बालकांची तरी शाळेचे कल्पक शि़क्षक आणि दूरदर्शी तडफदार आणि ध्येयवादी मुख्याध्यापक आदरणीय भिलवडकर सर यांनी वेग-वेगळे उप्क्रम राबविले. पुण्यात बंद इमारतीतला (शाळेतला) पहिला जलतरण तलाव आमच्याच शाळेतला. शाळेच्या गल्लीला ज्यांचे नाव दिले आहे ते ल.ग.देशपांडे यांनी पदरमोड करून स्व्खरचाने स्लाईड प्रोजेक्टर शाळेत आणला होता (सन १९८०) त्या वर त्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या स्लाईड्स दाखवून सटीप माहीती देत असत (आता जरी हे काल्बाह्य वाटतं असल तरी त्या काळी बरेच खर्चीक आणि दुरापास्तच होते) त्या व्यासंगापोटी देशपांडे सरांनी सह्याद्रीच्या काना कोपर्यात फेर्‍या केल्या आणि मुलांसाठी, शाळेसाठी हा माहीती खजीना मिळविला. भिलवडकर सर शाळेला इतके समर्पीत होते की संपूर्ण सेवा कालावधीमध्ये फक्त २-३ वेळाच रजा घेतली होती (स्वतःचे लग्नसमयी आणि त्यांचे वडीलांचा देहांत झाला त्या दिवशी) त्यांच्या निधनानंतर सकाळ मध्ये दखल या सदरात त्रिदलचे डॉ.सतीश देसाई (पूण्यभूषण पुरस्कार फेम आणि आम्च्या शालेचे माजी विद्यार्थी) यांनी गौरवले़ख ही लिहिला होता. मागी काही वर्षात प्रापंचीक धबडग्यात पूर्ण विस्म्रुतीत गेलेल्या आठवणी तुकड्या तुकड्यात(विस्कळीत) आठवल्या त्या इथे टंकल्या. मला आणि आणि माझ्या सारख्या शेकडो विद्यार्थ्यांना स्वावलंबन सचोटीचे ज्ञान देणार्या गुरुवर्यांचे आभार आणि त्यांना अभिवादन. गोपाळ हायस्कूल सदाशीव पेठ माजी विद्यार्थी नाखु

In reply to by नाखु

माहितगार 05/09/2015 - 12:56
भिलवडकर सर .....डॉ.सतीश देसाई .... यांनी गौरवले़ख ही लिहिला होता...
लेख साधारणतः कोणत्या वर्षी आला असेल ? गोपाळ हायस्कूल बद्दलही आंजावर पुरेशी माहिती दिसत नाही. काही दुवे उपलब्ध असल्यास द्यावेत.

In reply to by माहितगार

नाखु 05/09/2015 - 14:32
दरम्यान. शाळा संचालकांच्या अंतर्गत दुफळी-बेदीलीने रयास गेली आत अगदी नाम मात्र चालू आहे. या लेखाचे कात्रण मला माझ्या शालेय मित्राने दाखवले होते साधारण १२-१५ वर्षांपूर्वी दाखवीले होते. त्याला संपर्क करून बघतो.

In reply to by नाखु

माहितगार 05/09/2015 - 14:41
शाळा संचालकांच्या अंतर्गत दुफळी-बेदीलीने रयास गेली आत अगदी नाम मात्र चालू आहे.
बाहेरून रेस्टॉरंटच नाव तेच असांव, पण म्यानेजमेंट बदललं की पदार्थ आणि सेवेतही अंतर येते, माझ रेस्टॉरंट उदाहरण अगदीच मॅच होत नाही पण बर्‍याच संस्थांच होत असं उलट एखादी संस्था माणसे बदलून टिकुन कशी राहते हा अजूनही उत्तर न सापडलेला संशोधनाचा विषय असावा.

माहितगार 05/09/2015 - 12:42
@ चित्रगुप्त चिंचाळकर गुरुजींबद्दल त्यांच्या मुलाने लिहिलेल्या आठवणी आंजावर दिसत आहेत. बाकीपण आठव्णी दिसत आहेत. विकिपीडियावर लेख येण्यासाठी ज्ञानकोशीय उल्लेखनीयताही दिसते. पण त्यादृष्टीने माहितीची जरा कमी अद्याप भासते. पूर्णनाव जन्म मृत्यू इत्यादींच्या नोंदी शोधताना अधिकाधीक ज्ञानकोशीय माहिती गोळा होते. विष्णु चिंचाळकर यांचे पूर्ण नाव मिळाल्यास विकिपीडियाच्या दृष्टीने बरे पडेल. तुर्तास स्‍कूल ऑफ फाईन आर्टस, इंदूर या नावाने मराठी विकिपीडियावर एकोळी लेख चालू केला आहे. त्या लेखाच्या विस्तारात आपला सहभाग लाभावा ही विनंती.

माहितगार 05/09/2015 - 13:01
चिंचाळकर नावावरून आठवले जनार्दन हरी चिंचाळकर, नावाचे कुणी मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते गृहस्थ याम्च्या बद्दलही मराठी विकिपीडियास माहिती हवी आहे.

दिव्यश्री 05/09/2015 - 13:08
नाशिबाणे आजपर्यंत सगळे उत्तमोत्तम शिक्षक लाभले . त्यासगळ्यातुण अमके आवडले असे निवडणे मला तरी शक्य णाही . अगदी आईबाबांपासून ते प्यांटवाल-सासुसासार्यांपर्यंत सगळेच आधी एक उत्तम माणूस मग शिक्षक असे लाभले. मला आयुष्यभर विद्यार्थिनी बनूण रहायला आवडेल . आजपर्यंत जे कोणी भेटले अगदी मिपाकरसुद्धा प्रत्येकाकडून काहीतरी चांगले शिकता आले. सगळ्याना धन्यवाद . समस्त मिपाकराना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा .

मित्रहो 05/09/2015 - 19:44
आता शाळेतल्या शिक्षकांविषयी फार आठवत नाही. अमरावतीला अभियांत्रिकी कॉलेजमधे असताना डॉ. बी. एन. जाजू किंवा जाजूसर म्हणजे त्या काळी सर्व विद्यार्थांसाठी आदर्श शिक्षक आणि आमच्यासारख्यांसाठी आजही आदर्श. विद्यार्थांमधे प्रचंड लोकप्रिय व्यक्तीमत्व. आम्ही कॉलेजात असताना सर अभिमानाने सांगत की आता मी दुसरी पिढी शिकवतोय. आमच्याच वर्गातील एका मुलाचे वडील आधी सरांचे विद्यार्थी होते. मी कॉलेज संपल्यावर चिपळूणला इंटरव्यूला गेलो होतो. इंटरव्यू घेणाऱ्याने विचारले तुझा आवडता विषय कोणता मी सांगितले आय. सी. इंजिन. त्या व्यक्तीने लगेच माझे कॉलेज बघितले आणि म्हटले 'तुम्ही जाजू सरांचे विद्यार्थी. नशीबवान मंडळी. तुम्हाला या विषयावर काही विचारायलाच नको.' सरांची काही वाक्ये अजूनही आठवतात. 'जे पुस्तकात दिले तेच मी शिकविले तर माझा उपयोग काय? तुम्हाला समोरच्या कॉलेजात झूलॉजी शिकायला पाठविले तरी तुम्ही त्यात पण फर्स्ट क्लासमधे पास व्हाल.' 'माझ्या वर्गात जर कुणाला झोप आली तर हा त्या विद्यार्थ्याचा नाही माझा दोष आहे.' 'आयुष्यात अनुभव घ्याा पैसा, प्रगती सगळे आपसुकच येइल.' काही शिक्षक तुमची भेट न होताही शिकवून जातात. कॉलेजला द्वितीय की तृतीय वर्षाला असताना कुणाचे तरी लेक्चर होते. आमच्या डोक्यात इंजिनियरींग कॉलेजची हवा गेली होती. जगात साऱे मूर्ख आणि आपण फार हुषार असेच वाटत होते. टाइमपास करायचा म्हणून मी तिथे गेलो. अपेक्षा होती नेहमीसारखे पोडीयम असेल, माइक असतील, त्या काळच्या काळ्या स्लाइड आणि ते प्रोजेक्टर वगेरे असेल. तो व्यक्ती तिथे उभे राहून बोलत असेल आपण मागे बसून टाइमपास करु. तेंव्हा मागल्या बेंचावर जाउन बसलो. समोर कुणीच नव्हते, ना स्लाइड होत्या, ना कोणी व्यक्ती तिथे होता. आवाज येत होता म्हणून आवाजाच्या दिशेने बघितले तर तो व्यक्ती आमच्या बाजूला मागे उभा होता. दोन तास सतत विद्यार्थामधे फिरुन तो व्यक्ती आम्हाला सुपर कॉंपुटर विषयी सांगत होता. सहज टाइमपास करायला गेलेला मी त्या दोन तासात भारावून गेलो. कदाचित कॉंपुटरची आवड तेंव्हा निर्माण झाली असेल. अर्थातच त्या व्यक्तीचे नांव होते डॉ. विजय भाटकर. मला प्रत्यक्षात कधी डॉ. भाटकरांसोबत काम करायची संधी आली नाही. माझ्या कंपनीत आम्ही कॉलेज फ्रेशर मुलगा माझ्या टिममधे घेतला होता. त्याला काय काम द्यावे हा विचार करीत होतो. एकच काम होते पण ते काम कठीण होते आणि हा फ्रेशर. माझ्या मॅनेजरने सांगितले 'दे दो उसको. उसे बताना नही कि काम कठीण है. भाटकर साहाब कहते थे काम को काम रखो उसे आसान, मुश्किल ये तुम्हारा लेबल मत लगाओ. जो भा है उसे सिखने दो.' ती दोन वर्षे भाटकर साहाब कहते थे हे बऱ्याचदा ऐकले. अप्रत्यक्षरीत्या या साऱ्याचा कुठेतरी आमच्यावरही परिणाम झाला. शेवटी शिक्षकांच्या बाबतीत आमचे एक सर म्हणायचे तेच खरे. "I don't teach you, I try to give you sense of world so that you keep learning throughout your life." असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शिक्षण देउन मला शिकवनाऱ्या साऱ्या शिक्षकांना सादर प्रणाम.

In reply to by मित्रहो

गवर्नमेंट इंजीनियरिंग,अमरावती??? एक दुरुस्ती सुचवतो राग मानु नका ते "भाटकर" नाही "भटकर" आहेत.

आदूबाळ 05/09/2015 - 20:34
नाडगौडा सर कॉमर्सला आलेल्या पोराचं अकाऊंट्स कच्चं असेल तर अगदीच छीथू व्हायची पाळी. वर्गातले जवळजवळ सगळे मोठमोठ्या कारखाना-टाईप क्लासेसना जात असत. आम्हां चार मित्रांना मात्र कोणत्या पुण्यक्षणी नाडगौडा सरांकडे क्लास लावायची बुद्धी झाली कोणास ठाऊक! नाडगौडा सर आमच्याच कॉलेजचे उपमुख्याध्यापक. पैसे मिळवण्याचा हेतू क्लास घेण्यात नसावा, कारण इतर कारखाना-क्लासेसच्या तुलनेत निम्मीच फी होती. "शिकवण्याची कला" अशी काही गोष्ट असेल तर ती विषयप्रवेशाच्या - बेसिक्स शिकवण्याच्या - काळात सर्वात जास्त प्रमाणात लागत असावी. अकरावीच्या पोरांना डबल एंट्री सिस्टिम आणि जर्नल एंट्र्या वगैरे शिकवणं सीए फायनलला डिफर्ड टॅक्स आणि डेरिव्हेटिव्हज वगैरे शिकवण्यापेक्षा नक्कीच अवघड असावं. ज्ञान अंगी बाणतं, इंटर्नलाईज होतं, आणि आधी शिकलेल्या गोष्टींचा पायर्‍यांसारखा वापर करून पुढचं शिक्षण सोपं पडतं. पण मुळात या पायर्‍या बांधणारे थोरच. कोणतीही घाई न करता, पर्फॉर्मन्स प्रेशर न टाकता सर धीमे धीमे शिकवत. "थ्री गोल्डन रूल्स" शिकवल्यावर ते म्हणाले, "हे तीन नियम एकदा तुम्हाला समजले की जगातलं कोणतंही अकाऊंटिंग अवघड नाही" - आणि ते खरंच आहे. "व्यवहार ऐकला की डोक्यात जर्नल एंट्री तयार झाली पाहिजे" हे अजूनही डोक्यात वाजतं, आणि प्रथम जर्नल एंट्री डोळ्यांसमोर येते. याचा पुढे खूप फायदा झाला. बारावीत एकप्रकारची मिडियॉक्रिटी आली होती. आपल्याला काही जमणार नाही, जेमतेम पास होणार, मोठी स्वप्नं कशाला बघायची, वगैरे त्या दिवसांतले विचार. त्याला तडा द्यायचं काम प्रथम सरांनी केलं. "ज्याला फक्त बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार येतो त्यालाही अडुसष्ट मार्क मिळू शकतात. तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत." असं ते सांगत. (क्लासमध्ये पुण्यातल्या एका प्रसिद्ध परिवारातला एक मध्यमवयीन माणूस येत असे. काही केल्या तो अकाऊंट्समध्ये पास होत नव्हता म्हणून त्याने शिक्षण अर्धवट सोडलं होतं. आमच्याबरोबर तोही - बरोब्बर अडुसष्ट मार्क मिळवून - पास झाला. त्याने लाडवाएवढे पेढे वाटले होते!) बारावीच्या रिझल्टच्या दिवशी या मिडियॉक्रिटी मनोवृत्तीचे बळी आम्ही दोन मित्र स्टेप-इनमध्ये बसलो होतो, आणि शंभर मार्क मिळाल्याची बातमी घेऊन सर इथेतिथे फोन करत आम्हाला शोधत होते...

In reply to by आदूबाळ

आदूबाळासाहेब, अहो हेच खरे शिक्षक! आम्ही तर साइंस घेऊन फसलेले जीव सालां साहित्य किंवा कायदा अन इतिहास वगैरे आवडतो हे कळायला ५ वर्षे लावुन बीएससी व्हावे लागले आम्हाला!! बाकी स्टेपइन बद्दल काय बोलावे!! सिविल सर्विसेज चा एटेम्पट फेल गेला की आम्ही तिथे पड़ीक राहत असू! तुम्ही म्हणता तसलेच विचार! "सालां झक मारली अन हे बेभरवश्याचे स्पर्धापरीक्षा वाले अवलक्षण आठवले" वगैरे बोलत टेबलभर बियर च्या बाटल्या जमस्तोवर बसायचे! (तरी बरे स्वकष्टार्जित खरी कमाई अन खाऊ च्या पैश्यातुन दारु भागत असे त्या काळी)

बोका-ए-आझम 07/09/2015 - 12:11
शाळा-कॉलेजच्या शिक्षकांविषयी फारशी आपुलकी, का कुणास ठाऊक पण वाटली नाही. पण पोस्ट ग्रॅज्युएशन करताना असे जबरदस्त शिक्षक लाभले की सगळी कसर भरून निघाली. पोलिटिकल कम्युनिकेशन हा एक विषय होता. त्याचं सिलॅबस वाचून तो जरा बोअर वाटत होता पण शांतिश्री पंडित मॅडमनी तो इतका इंटरेस्टिंग करुन शिकवला की त्यांच्या शेवटच्या लेक्चरला आम्ही त्यांना तुम्ही पोर्शन का संपवला असं भरल्या डोळ्यांनी विचारलं होतं. एमबीए करत असताना डाॅ.वेणुगोपाल यांनी जसं Sales and Distribution Management शिकवलं, त्याच्या १% जरी मी शिकवू शकलो तरी खूप झालं. आणि सर्वात शेवटी मला १० वीला क्लासमध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या लवलेकर मॅडम. अत्यंत कडक शिस्तीच्या पण तितकीच छान विनोदबुध्दी असलेल्या मॅडमनी इंग्लिशबद्दलचा न्यूनगंड मनातून कायमचा काढून टाकला. हे तिघंही शिक्षक माझ्या मते शिक्षणकलेच्या क्षेत्रातले असामान्य कलावंत होते. त्यांचे आभार मानण्याची औपचारिकता पाळण्याऐवजी मी त्यांच्या ऋणात राहणंच पसंत करीन.

In reply to by माहितगार

माहितगार 04/09/2017 - 11:48
मिपाकर मित्रांनो, हा धागा लेख काढून मध्ये एक वर्ष गेले आहे. तेव्हा या वर्षीही थोड्या प्रतिसादांच्या अपेक्षेने हि धागा चर्चा पुन्हा एकदा वर काढतो आहे.

माझे सगळ्यात आवडते शिक्षक माझे बाबा, तसे पाहता त्यांच्यावर एक लेख लिहिता येईल वेगळा पण इथे काही काही निवडक आठवणी सांगव्या वाटल्या म्हणुन हा लेखन प्रपंच. आमचे वडील ज्या हाईस्कूल अन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन निवृत्त झाले तेव्हाचा एक किस्सा, कोणीतरी मोठे पाहुणे येणार होते त्यांच्यासमोर चमकोगिरी करायला शाळेच्या मैनेजमेंट ने पुर्ण मंच व्यापुन टाकले अन बाबांना स्वतः हेडमास्टर असुन बसायला ही जागा नव्हती तेव्हा बाबा शांतपणे स्वागत द्वारी पाहुण्यांचे स्वागत करायला उभे राहिले जाऊन, तो कार्यक्रम पहायला गेलेला मी आधीच 'तीन दिवसा पासुन काय एकच शर्ट घालताय' म्हणुन त्यांच्यावर भड़कलो होतो त्यात हे स्टेज पुराण झाले तेव्हा मी स्वागत द्वारा जवळ असलेल्या बाबांजवळ गेलो अन माझी धुसफुस व्यक्त केली ती अशी 'काय बाबा तुम्ही फारच साधे बुआ असेकसे कुठला कोण शाळा व्यवस्थापन चा माणुस येऊन साक्षात मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसतो अन हा शर्ट बदला आता' 'शांत हो, अन गंमत बघ!' बाबा कार्यक्रमाला थोडा वेळ होता व खुपसे विद्यार्थी अजुन येत होते बाबा सगळीकडे नजर ठेऊन उभे मी त्यांच्या शेजारी उभा इतक्यात एक पाचवी चा असावा असा एक पिटुकला धीट पोरगा आला मी बाबांच्या शेजारी उभा राहून पाहत होतो, तो हळूच आला अन लहान पोरे ज्या टिपिकल पद्धतीने वडीलधाऱ्या लोकांचा शर्ट ओढ़तात तसा ओढला अन दाद देता झाला 'सर परवा किनै तुम्हाला मी टीवी मधे पाहिले (लोकल केबल टीवी बातम्या) अन तुम्ही किनै तुमच्या मिश्या अन ह्या निळ्या शर्ट मधे खुप मस्त दिसत होते सर एकदम स्मार्ट' अन तुरुतुरु निघुन गेला खजील झालेल्या माझ्याकडे पाहत बाबा दिलखुलास हसले अन म्हणाले 'मास्टराची संपत्ती फ़क्त त्याचे विद्यार्थी असतात मला ह्या एका क्षणात तसल्या हजार मंचाचा मान ते आदर्श शिक्षक सगळे मिळाले रे सुकी कागदं अन कोटावर बिल्ले काय करायचेत? माझ्याकडे साक्षात् ईश्वर येतो अश्या रुपात स्तुती करायला' मी पुढे काही ऐकू ही शकलो नाही अन बघुही शकलो नाही माझे आवडते शिक्षक म्हणुन माझे बाबा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माहितगार 05/09/2015 - 11:48
सर परवा किनै तुम्हाला मी टीवी मधे पाहिले (लोकल केबल टीवी बातम्या) अन तुम्ही किनै तुमच्या मिश्या अन ह्या निळ्या शर्ट मधे खुप मस्त दिसत होते सर एकदम स्मार्ट' अन तुरुतुरु निघुन गेला
मस्तच !

बबन ताम्बे 04/09/2015 - 18:50
आमच्या काळी प्राथमिक शिक्षक हे बहुतांशी मारकुटेच होते. एक तर गणित जमायचे नाही, आणि पाठीत रट्टे पडल्यानंतर तर अजीबात समजायचे नाही. :-)

In reply to by बबन ताम्बे

माहितगार 05/09/2015 - 11:46
छडी लागे छम छम ... मला वाटते बिएड डिएड या शिक्षक कौशल्य विकास प्रक्रीयेमुळे आताच्या काळात धप्पाकुटीचे प्रमाण बरेच कमी झाले असावे. तरीही यू अ‍ॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख वाचकाभिमुख अभिवृत्ती चे कौशल्य विकसीत करण्यासाठी केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे सर्वांसाठीच अधिक प्रयत्नांची गरज असावी.

In reply to by बबन ताम्बे

नाव आडनाव 05/09/2015 - 23:13
एक तर गणित जमायचे नाही, आणि पाठीत रट्टे पडल्यानंतर तर अजीबात समजायचे नाही. :) माझ्या सासर्‍यांचं नाव पण बबन आहे आणि ते गणित विषया बद्दल असंच सांगतात :) ते म्हणतात "जो पर्यंत गणितात आकडे होते तोपर्यंत सगळं कळायचं. जसं - राम कडे ३ मोसंब्या होत्या, त्यातल्या दोन श्यामला दिल्या, तर किती राहिल्या? पण जेंव्हा पासून व्हेरिएबल (?) आले, तेंव्हा पासून सारं समजायचं बंदच झालं. जसं - राम कडे क्ष मोसंब्या होत्या, त्यातल्या दोन श्यामला दिल्या, राम कडे १ राहिली तर त्याच्या कडे आधी किती होत्या. मला क्ष मोसंब्या, य आंबे आणि ज्ञ अमूक-तमूक हे काहीच कळत नसायचं आणि रोज मार खायचो. नंतर इतिहास आवडायला लागला आणि इतिहासाचा प्राध्यापक झालो :)"

In reply to by नाव आडनाव

बबन ताम्बे 07/09/2015 - 11:41
तुमच्या साबुंशी सहमत आहे :-) माझा इंग्रजी एम.ए. झालेला मित्रही म्हणतो, काय ते (च्यायला) (अ+ब)^२ चे सुत्र पाठ नाही म्हणून मार खाल्ला होता. आयुष्यात नंतर एकदाही त्याचा उपयोग झाला नाही.

In reply to by बबन ताम्बे

माहितगार 07/09/2015 - 13:02
मला वाटत सध्याच्या पिढीला सोप्या गणिताचा वेगळा पर्याय आता उपलब्ध करून दिला गेला आहे. "आयुष्यात नंतर एकदाही त्याचा उपयोग झाला नाही." हे आपण सहज बोलून जातो, भावना समजून घेतानाच माझा उद्देश शब्द छल करण्याचा नाही पण यात काही तार्कीक उणीव राहून जाते असे वाटते आहे. उपयोगाचा प्रयत्न केल्या नंतर प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणणे वेगळे. (ह.घ्या.) सांगण्याचा उद्देश हा अनुभव कोणत्याही विषयाबाबत व्यक्ती परत्वे बदलता असू शकतो एवढेच.

In reply to by माहितगार

बबन ताम्बे 07/09/2015 - 14:30
असे म्हणायचे होते. बाकी गणितामुळे (जरी भावी आयुष्यात त्यातले बरेचसे वापरले नाही तरी) तर्कबुद्धी, विश्लेषण क्षमता वाढते याबद्द्ल दुमत नाही. शालेय जीवनात जरी गणितावरून शिक्षकांचा मार खावा लागला, तरी पुढे गणित हा माझा आवडता विषय होता हे जाताजाता नमूद करावेसे वाटते. :-)

In reply to by बबन ताम्बे

माहितगार 07/09/2015 - 14:47
फिजीकल मार एक गोष्ट झाली, समजवता देऊन येऊ न शकणारे शिक्षक भेटणे ही सुद्धा शिक्षाच खरी तेच चांगल समजावून देता येणारे शिक्स्।अक अथवा प्रोत्साहन देणारे शिक्षक भेटले की तोच विषय पाहता पाहता आवडीचा होऊन जातो

जानु 04/09/2015 - 21:14
आम्हाला ईयत्ता पाचवी नंतर ईंग्रजी विषयासाठी शिसोदे सर होते. सकाळी ६ वाजता क्लास असायचा. सर कधी ६ नंतर आलेले मला आठवले नाही. आम्ही सकाळी उठायला कंटाळा करायचो. सर मुलांना कधी उशीरा आला म्हणुन रागावले नाही. आणि शिकवायला एकदम मस्त. आजही पॅसिव्ह व्हॉईस, अ‍ॅक्टीव व्हॉईस ईंग्रजी व्याकरण त्यांच्या मुळेच. उदाहरणे जेव्हा लिहुन द्यायचे तेव्हा मोठा फळा भरुन जायचा. एवढी उदाहरणे असायची की ते लिहुन आणि वाचुनच काम व्हायचे.

चित्रगुप्त 05/09/2015 - 06:39
१९६९ ते १९७५ हा काळ मी इंदुरच्या आर्टस्कूल मधे चित्रकला शिकलो. त्या काळात मला जे शिक्षक लाभले, त्यापैकी कै. चंद्रेश सक्सेना यांचा माझ्या जीवनावर फार मोठा परिणाम घडून आला. त्यांचेविषयी आणि एकंदरित त्या काळाविषयी आठवणी हा माझ्यासाठी अमूल्य खजिनाच आहे: १९६८ मध्ये सतरा वर्षांचा असताना एकदा स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेलो, बरोबर चांदोबातून बघून काढलेली, आणि तेंव्हाच्या साधना, मुमताज वगैरे नट्यांची चित्रे होती. प्रिन्सिपल किरकिरे होते, ते म्हणाले की तुमचा हात चांगला आहे, पण आता ही अशी बघून चित्रे काढायची नाहीत, अमुक इतकी फी भरून प्रवेश मिळेल. उद्यापासून या. मग काय, आनंदाला उधाण आले. लगेच जाणे सुरु केले. आर्टस्कूलचा हा काळ अविस्मरणीय आनंदाचा होता. पैसा जेमतेमच असायचा, पण भरपूर उत्साह, शक्ती होती, आणि आपण आयुष्यात नक्की काहीतरी थोर करणार आहोत, ही काहीशी भाबडी आशा, किंबहुना खात्रीच. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहेत, ही आशा माणसाला गुंतवून ठेवत असते. आर्ट स्कूल च्या पहिल्या वर्षी बहुतकरून स्टिललाईफ रंगवायची असत. शिवाय व्हीनस वगैरे पुतळे होते, त्यावरून मनुष्याकृती बनवणे शिकायचे, हुबेहूब रेखाटन करून कागदी स्टंप ने शेडींग करायचे. एक चित्र करायला संपूर्ण एक आठवडा असे. शिक्षक दिवसातून एखादा चक्कर मारून आमचे काम बघून जात. कधी थोडेसे तोंडी मार्गदर्शन करीत, किंवा आमच्या चित्रांवर करेक्शन देत. त्यावेळी त्यांच्या जराश्या कामातून चित्रात घडून येणारे बदल आश्चर्यकारक वाटत. उदाहरणार्थ स्टिल लाईफ करताना आम्ही चिनीमातीची भांडी, कापड, वगैरे जसेच्या तसे रंगवण्याचा कसोशीने प्रयत्न करायचो, परंतु दुबे सरांनी जेंव्हा भांड्यांच्या खालच्या बाजूच्या फटीतून दिसणारा मागचा प्रकाश ब्रशच्या एकदोन फटकारयातून दाखवला, तेंव्हा चित्र एकदम जिवंत झाले. सक्सेना सर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'कान्पोझीशान' साठी प्रो. चंद्रेश सक्सेना यांच्या आठवडाभराच्या वर्गाला जायचे होते. त्यांच्याविषयी असलेला आदरयुक्त दबदबा ऐकून होतो. इतर वर्गांप्रमाणे त्यांच्या वर्गात अजागळपणे पसरलेले लाकडी 'डाँकी' नव्हते. खाली मोठी सतरंजी व त्यावर सुमारे एक फूट उंचीचे प्रशस्त टेबल होते. भिंतींवर बेंद्रे, डीजे जोशी यांची चित्रे व्यवस्थित टांगलेली, लाकडी कपाटात निवडक पुस्तके, सगळीकडे कमालीची स्वच्छता. सक्सेना सर मुंबईला जे जे मध्ये, नंतर शांतीनिकेतन ला नंदलाल बसूंकडे शिकून आलेले होते. सर अतिशय व्यवस्थित व शिस्तप्रिय. चित्रकारांची राहणी, त्यांचे रंगसामान वगैरे अगदी टीपटाप असले पाहिजे, ब्रशचे पितळी फेरूल नेहमी चकाकत असले पाहिजे, ब्रश चकचकीत पितळी नळकान्ड्यात ठेवायचे, रोज सर्व ब्रश साबणाने धुवून मगच घरी जायचे, पॅलेट वर ठराविक क्रमाने रंग काढायचे, एप्रन घालून काम करायचे, वगैरे आदर्श स्वतःच्या उदाहरणातून आमच्या समोर मांडायचे. तर त्या पहिल्या दिवशी त्यांनी जे भाषण दिले, त्याने माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली. उदाहरणार्थ, 'स्त्रियांकडे बघू नये' अशी साधुसंतांची शिकवण ऐकत आलेलो होतो, तर सरांनी सांगितले, की घरी काय बसता, घाटावर जा, तिथे आंघोळ करत असलेल्यांची स्त्रियांची स्केचेस करा, वगैरे... किंवा चित्रकलेचे शिक्षण तुम्ही उपजीविकेसाठी म्हणून घेऊ नका, तर या अभ्यासातून लाभणार्या सौदर्यदृष्टीचा उपयोग आयुष्यात प्रत्येक क्षणी करा. तुमचा भवताल, वस्तू, तुमचे अवघे जीवन सुंदर करा.... चित्रकाराने कसे राहावे, काय करावे, चित्रकलेचे महत्व, असे सर्व काही त्या भाषणात होते. आम्ही सर्व विद्यार्ही अगदी भारून गेलो. माझी मरगळ, निरुत्साह, संकोच, सर्व काही जणु जळून गेले, आणि उत्साहाने, चैतन्याने मी कामाला लागलो. आज पंचेचाळीस वर्षानंतर सुध्धा मी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो... पुढे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आर्ट स्कूलला गेलो होतो, पाहतो तर काय, सर शाळेच्या एकूण एक फर्निचरला स्वतः हाताने पॉलिश करत बसले होते. म्हणाले, आता शाळा सुरु झाल्यावर मुले येतील, तेंव्हा त्यांना सर्व काही व्यवस्थित, नीटनेटके दिसायला हवे ... आर्टस्कूल संपूर्णपणे सरकारी होते, त्यामुळे अश्या कामासाठी पैसा मंजूर करवणे वगैरे फार त्रासाचे असे, त्यामुळे सर हे सर्व स्वखर्चाने, स्वतःच्या मेहनतीने करत होते... मी खूपच भारावून गेलो... आम्हाला स्टिललाईफ मध्ये फळांची चित्रे काढण्यासाठी ते स्वखर्चाने अगदी रसरशीत महागडी फळे आणत... नोकरी म्हणून नव्हे, तर एक पवित्र कार्य म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना ते घडवत होते... आर्ट स्कूलचा काळ भराभर उलटत होता. पोर्टेट, निसर्गचित्रण, पर्स्पेक्टिव्ह, शरीरशास्त्र, काम्पोझीशन, मूर्तीकला, ग्राफिक प्रिंट, असे विषय होते. सर्व विषयात मला निसर्गचित्रण सर्वात प्रिय. त्यासाठी पहाटे पासून पेस्टल, तैलरंग, जलरंग वगैरेचे सामान, ईझल वगैरे घेऊन दूर दूर सायकलने जायचे, एखादा स्पॉट आवडला कि तिथे बसून चित्रे रंगवायची. सक्सेना सर म्हणायचे कि एकाच साच्यात अडकू नका, वेगवेगळी माध्यमे वापरून काम करा. मग जलरंग, तैलरंग, याबरोबरच आम्ही लाकूड घासण्याच्या रेजमाल वर ओईल पेस्टल ने चित्रे काढणे वगैरे प्रयोग करायचो. आर्टस्कूलची वेळ संपल्यावर आम्ही तीन-चार विद्यार्थी सक्सेना सरांबरोबरच बाहेर पडायचो. आपापली सायकल हातात धरून पायीच आमची मिरवणूक निघे. सर आम्हाला इंदुरातल्या जुन्या गल्ल्यांमधून फिरवायचे, आणि चित्रकलेच्या दृष्टीकोणातून समोर दिसणार्‍या विविध दृष्यांमधले सौंदर्य उलगडून दाखवायचे. ते सर्व बघून-ऐकून आम्ही कमालीचे भारून जात असू. वर्षातून दोन-तीनदा शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन व्हायचे. ते दोन तीन दिवस आम्हाला खूपच शिकायला मिळायचे. रात्री दीड-दोन पर्यंत काम करून आम्ही प्रदर्शन लावायचो. त्यावेळी त्या सर्व चित्रांवर सर विवेचन करायचे, शिवाय चित्रांचे माउंटिंग, फ्रेमिंग कसे करायचे, योग्य तितकी जागा मधे सोडून चित्रे कशी प्रदर्शित करायची, अश्या गोष्टीही शिकायला मिळत. या सर्व गोष्टींचा मला पुढील जीवनात खूपच उपयोग झाला. खरेतर त्याकाळी आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला किरकिरे सरांनी तैलरंगाचे सर्व सामान, हॉग हेयर ब्रश वगैरे आणायला सांगितले. (हॉग म्हणजे काय, हे घरी जाऊन शब्दकोशात बघितले, तर 'अंड बडवलेला डुक्कर' असा अर्थ दिलेला होता) हे ब्रश, रंग महाग होते, मोठी पंचाईत झाली. मग स्वस्ताचे पावडर कलर, बेल तेल आणून खलबत्त्यात घोटून तैलरंग बनवले, आणि गायीच्या शेपटीचे केस कापून ब्रश बनवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी हे सामान वापरून पोर्ट्रेट करू लागलो, ते बघून किरकिरे सरांनी विचारले कि घरून पैसे मिळत नाहीत का वगैरे....त्याकाळी निदान इंदुरात तरी चित्रे विकली जाणे वगैरे ऐकीवातही नव्हते. यातून पैसा मिळू शकतो वा मिळावा, हे काही मनात नसायचे. आम्ही आपले झपाटल्यासारखे चित्र रंगवत असायचो. सक्सेनासरांखेरीज माझे त्या काळातील मार्गदर्शक म्हणजे इंदुरातील त्याकाळचे प्रसिद्ध चित्रकार विष्णु चिंचाळकर. ऊर्फ 'गुरुजी'. ते अतिशय उत्कृष्ट चित्रकार तर होतेच, पण विशेष म्हणजे त्यांचेकडे सर्वाना मुक्तद्वार असायचे. कुणीही केंव्हाही गेले, तरी ते आपुलकीने बोलत, तासन तास गप्पा करत. त्याकाळी ते प्रत्यक्ष पेंटिंगपेक्षा, निसर्गात सापडणार्‍या वा मानव निर्मित लहान-सहान वस्तूंतील सौदर्य उकलून दाखवणार्‍या अतिशय सुंदर रचना करत. त्याना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांची ती निर्मिती बघून आणि त्यावर चालणारे त्यांचे भाष्य ऐकून अगदी भारून जात असे, आणि जगाकडे बघण्याचा एक अगदी नवीन, आनंददायक असा दृष्टीकोन घेऊन परत जात असे. गुरुजींच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप त्यांच्या त्या लहान-लहान रचनांमधून दिसून येत असली, तरी मला आपले वाटत रहायचे, की त्यांनी मोठमोठी तैलचित्रे रंगवावीत... गुरुजी एवढे मोठे, प्रसिध्द चित्रकार, पण त्यांची राहणी अगदी साधी, वागणूक विनम्र आणि प्रेमळ. ...ते दिवस आणि माझे ते शिक्षक मला अजूनही अगदी रोज आठवतात... सक्सेना सरांचे एक चित्रः .

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 05/09/2015 - 13:03
अर्थातच. हा स्वतंत्र धागाच व्हायला पाहिजे. असे दुर्मिळ शिक्षण अन असे दुर्मिळ गुरुवर्य. अप्रतिम असे वर्णन अन त्याला प्रत्येक बारकाव्याच्या स्मरणशक्तीचे वरदान. आज शिक्षक दिनानिमित्त साष्टांग दंडवत घ्या गुरुवर.

माहितगार 05/09/2015 - 11:28
चित्रगुप्त तुमची आठवण आवडली. या दुव्यावरील बातमीतील आणि तुमचे शिक्षक चंद्रेश सक्सेना एकच का वेगवेगळे. (दोन्ही एकच असतील तर आणखी थोडी सामुग्री जोडून मराठी आणि हिंदी विकिपीडियावर त्यांच्या बद्दल छोटासा लेखही होऊ शकेल.) प्रचेतस म्हणतात तसे वेगळ्या धागा लेखाच्या स्वरुपात तुम्हाला अजूनही जरासे विस्तारण्याचा मौका मिळेल. पु.ले.शु.

अजया 05/09/2015 - 12:01
चित्रगुप्तांच्या आठवणी आवडल्या.चिंचाळकर गुरुजींबद्दल पुलंनी कुठे तरी कुमारांसोबतच्या मैफिलीबद्दल लिहिताना लिहिलंय बहुधा.त्यांच्यावरच कोणत्यातरी दिवाळी अंकात लेखही वाचला होता.

नाखु 05/09/2015 - 12:15
शाळेत फक्त शिक्षक न राहता पालकच झालेले सगळे शिक्षक्गण हे वंदनीय आणि खरंच अनुपम होते. त्यात आमच्या ८ वी तील वर्गशिक्षीका लिमये बाई आणि ९ वी तील न म जोशी हे खास. मिमये बाई गणीताबरोबरच संस्कृतही शिकवत असत. अगदी तन्मयतेने.शाळा निम्न मध्यमवर्गीय पालक असलेल्या बालकांची तरी शाळेचे कल्पक शि़क्षक आणि दूरदर्शी तडफदार आणि ध्येयवादी मुख्याध्यापक आदरणीय भिलवडकर सर यांनी वेग-वेगळे उप्क्रम राबविले. पुण्यात बंद इमारतीतला (शाळेतला) पहिला जलतरण तलाव आमच्याच शाळेतला. शाळेच्या गल्लीला ज्यांचे नाव दिले आहे ते ल.ग.देशपांडे यांनी पदरमोड करून स्व्खरचाने स्लाईड प्रोजेक्टर शाळेत आणला होता (सन १९८०) त्या वर त्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या स्लाईड्स दाखवून सटीप माहीती देत असत (आता जरी हे काल्बाह्य वाटतं असल तरी त्या काळी बरेच खर्चीक आणि दुरापास्तच होते) त्या व्यासंगापोटी देशपांडे सरांनी सह्याद्रीच्या काना कोपर्यात फेर्‍या केल्या आणि मुलांसाठी, शाळेसाठी हा माहीती खजीना मिळविला. भिलवडकर सर शाळेला इतके समर्पीत होते की संपूर्ण सेवा कालावधीमध्ये फक्त २-३ वेळाच रजा घेतली होती (स्वतःचे लग्नसमयी आणि त्यांचे वडीलांचा देहांत झाला त्या दिवशी) त्यांच्या निधनानंतर सकाळ मध्ये दखल या सदरात त्रिदलचे डॉ.सतीश देसाई (पूण्यभूषण पुरस्कार फेम आणि आम्च्या शालेचे माजी विद्यार्थी) यांनी गौरवले़ख ही लिहिला होता. मागी काही वर्षात प्रापंचीक धबडग्यात पूर्ण विस्म्रुतीत गेलेल्या आठवणी तुकड्या तुकड्यात(विस्कळीत) आठवल्या त्या इथे टंकल्या. मला आणि आणि माझ्या सारख्या शेकडो विद्यार्थ्यांना स्वावलंबन सचोटीचे ज्ञान देणार्या गुरुवर्यांचे आभार आणि त्यांना अभिवादन. गोपाळ हायस्कूल सदाशीव पेठ माजी विद्यार्थी नाखु

In reply to by नाखु

माहितगार 05/09/2015 - 12:56
भिलवडकर सर .....डॉ.सतीश देसाई .... यांनी गौरवले़ख ही लिहिला होता...
लेख साधारणतः कोणत्या वर्षी आला असेल ? गोपाळ हायस्कूल बद्दलही आंजावर पुरेशी माहिती दिसत नाही. काही दुवे उपलब्ध असल्यास द्यावेत.

In reply to by माहितगार

नाखु 05/09/2015 - 14:32
दरम्यान. शाळा संचालकांच्या अंतर्गत दुफळी-बेदीलीने रयास गेली आत अगदी नाम मात्र चालू आहे. या लेखाचे कात्रण मला माझ्या शालेय मित्राने दाखवले होते साधारण १२-१५ वर्षांपूर्वी दाखवीले होते. त्याला संपर्क करून बघतो.

In reply to by नाखु

माहितगार 05/09/2015 - 14:41
शाळा संचालकांच्या अंतर्गत दुफळी-बेदीलीने रयास गेली आत अगदी नाम मात्र चालू आहे.
बाहेरून रेस्टॉरंटच नाव तेच असांव, पण म्यानेजमेंट बदललं की पदार्थ आणि सेवेतही अंतर येते, माझ रेस्टॉरंट उदाहरण अगदीच मॅच होत नाही पण बर्‍याच संस्थांच होत असं उलट एखादी संस्था माणसे बदलून टिकुन कशी राहते हा अजूनही उत्तर न सापडलेला संशोधनाचा विषय असावा.

माहितगार 05/09/2015 - 12:42
@ चित्रगुप्त चिंचाळकर गुरुजींबद्दल त्यांच्या मुलाने लिहिलेल्या आठवणी आंजावर दिसत आहेत. बाकीपण आठव्णी दिसत आहेत. विकिपीडियावर लेख येण्यासाठी ज्ञानकोशीय उल्लेखनीयताही दिसते. पण त्यादृष्टीने माहितीची जरा कमी अद्याप भासते. पूर्णनाव जन्म मृत्यू इत्यादींच्या नोंदी शोधताना अधिकाधीक ज्ञानकोशीय माहिती गोळा होते. विष्णु चिंचाळकर यांचे पूर्ण नाव मिळाल्यास विकिपीडियाच्या दृष्टीने बरे पडेल. तुर्तास स्‍कूल ऑफ फाईन आर्टस, इंदूर या नावाने मराठी विकिपीडियावर एकोळी लेख चालू केला आहे. त्या लेखाच्या विस्तारात आपला सहभाग लाभावा ही विनंती.

माहितगार 05/09/2015 - 13:01
चिंचाळकर नावावरून आठवले जनार्दन हरी चिंचाळकर, नावाचे कुणी मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते गृहस्थ याम्च्या बद्दलही मराठी विकिपीडियास माहिती हवी आहे.

दिव्यश्री 05/09/2015 - 13:08
नाशिबाणे आजपर्यंत सगळे उत्तमोत्तम शिक्षक लाभले . त्यासगळ्यातुण अमके आवडले असे निवडणे मला तरी शक्य णाही . अगदी आईबाबांपासून ते प्यांटवाल-सासुसासार्यांपर्यंत सगळेच आधी एक उत्तम माणूस मग शिक्षक असे लाभले. मला आयुष्यभर विद्यार्थिनी बनूण रहायला आवडेल . आजपर्यंत जे कोणी भेटले अगदी मिपाकरसुद्धा प्रत्येकाकडून काहीतरी चांगले शिकता आले. सगळ्याना धन्यवाद . समस्त मिपाकराना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा .

मित्रहो 05/09/2015 - 19:44
आता शाळेतल्या शिक्षकांविषयी फार आठवत नाही. अमरावतीला अभियांत्रिकी कॉलेजमधे असताना डॉ. बी. एन. जाजू किंवा जाजूसर म्हणजे त्या काळी सर्व विद्यार्थांसाठी आदर्श शिक्षक आणि आमच्यासारख्यांसाठी आजही आदर्श. विद्यार्थांमधे प्रचंड लोकप्रिय व्यक्तीमत्व. आम्ही कॉलेजात असताना सर अभिमानाने सांगत की आता मी दुसरी पिढी शिकवतोय. आमच्याच वर्गातील एका मुलाचे वडील आधी सरांचे विद्यार्थी होते. मी कॉलेज संपल्यावर चिपळूणला इंटरव्यूला गेलो होतो. इंटरव्यू घेणाऱ्याने विचारले तुझा आवडता विषय कोणता मी सांगितले आय. सी. इंजिन. त्या व्यक्तीने लगेच माझे कॉलेज बघितले आणि म्हटले 'तुम्ही जाजू सरांचे विद्यार्थी. नशीबवान मंडळी. तुम्हाला या विषयावर काही विचारायलाच नको.' सरांची काही वाक्ये अजूनही आठवतात. 'जे पुस्तकात दिले तेच मी शिकविले तर माझा उपयोग काय? तुम्हाला समोरच्या कॉलेजात झूलॉजी शिकायला पाठविले तरी तुम्ही त्यात पण फर्स्ट क्लासमधे पास व्हाल.' 'माझ्या वर्गात जर कुणाला झोप आली तर हा त्या विद्यार्थ्याचा नाही माझा दोष आहे.' 'आयुष्यात अनुभव घ्याा पैसा, प्रगती सगळे आपसुकच येइल.' काही शिक्षक तुमची भेट न होताही शिकवून जातात. कॉलेजला द्वितीय की तृतीय वर्षाला असताना कुणाचे तरी लेक्चर होते. आमच्या डोक्यात इंजिनियरींग कॉलेजची हवा गेली होती. जगात साऱे मूर्ख आणि आपण फार हुषार असेच वाटत होते. टाइमपास करायचा म्हणून मी तिथे गेलो. अपेक्षा होती नेहमीसारखे पोडीयम असेल, माइक असतील, त्या काळच्या काळ्या स्लाइड आणि ते प्रोजेक्टर वगेरे असेल. तो व्यक्ती तिथे उभे राहून बोलत असेल आपण मागे बसून टाइमपास करु. तेंव्हा मागल्या बेंचावर जाउन बसलो. समोर कुणीच नव्हते, ना स्लाइड होत्या, ना कोणी व्यक्ती तिथे होता. आवाज येत होता म्हणून आवाजाच्या दिशेने बघितले तर तो व्यक्ती आमच्या बाजूला मागे उभा होता. दोन तास सतत विद्यार्थामधे फिरुन तो व्यक्ती आम्हाला सुपर कॉंपुटर विषयी सांगत होता. सहज टाइमपास करायला गेलेला मी त्या दोन तासात भारावून गेलो. कदाचित कॉंपुटरची आवड तेंव्हा निर्माण झाली असेल. अर्थातच त्या व्यक्तीचे नांव होते डॉ. विजय भाटकर. मला प्रत्यक्षात कधी डॉ. भाटकरांसोबत काम करायची संधी आली नाही. माझ्या कंपनीत आम्ही कॉलेज फ्रेशर मुलगा माझ्या टिममधे घेतला होता. त्याला काय काम द्यावे हा विचार करीत होतो. एकच काम होते पण ते काम कठीण होते आणि हा फ्रेशर. माझ्या मॅनेजरने सांगितले 'दे दो उसको. उसे बताना नही कि काम कठीण है. भाटकर साहाब कहते थे काम को काम रखो उसे आसान, मुश्किल ये तुम्हारा लेबल मत लगाओ. जो भा है उसे सिखने दो.' ती दोन वर्षे भाटकर साहाब कहते थे हे बऱ्याचदा ऐकले. अप्रत्यक्षरीत्या या साऱ्याचा कुठेतरी आमच्यावरही परिणाम झाला. शेवटी शिक्षकांच्या बाबतीत आमचे एक सर म्हणायचे तेच खरे. "I don't teach you, I try to give you sense of world so that you keep learning throughout your life." असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शिक्षण देउन मला शिकवनाऱ्या साऱ्या शिक्षकांना सादर प्रणाम.

In reply to by मित्रहो

गवर्नमेंट इंजीनियरिंग,अमरावती??? एक दुरुस्ती सुचवतो राग मानु नका ते "भाटकर" नाही "भटकर" आहेत.

आदूबाळ 05/09/2015 - 20:34
नाडगौडा सर कॉमर्सला आलेल्या पोराचं अकाऊंट्स कच्चं असेल तर अगदीच छीथू व्हायची पाळी. वर्गातले जवळजवळ सगळे मोठमोठ्या कारखाना-टाईप क्लासेसना जात असत. आम्हां चार मित्रांना मात्र कोणत्या पुण्यक्षणी नाडगौडा सरांकडे क्लास लावायची बुद्धी झाली कोणास ठाऊक! नाडगौडा सर आमच्याच कॉलेजचे उपमुख्याध्यापक. पैसे मिळवण्याचा हेतू क्लास घेण्यात नसावा, कारण इतर कारखाना-क्लासेसच्या तुलनेत निम्मीच फी होती. "शिकवण्याची कला" अशी काही गोष्ट असेल तर ती विषयप्रवेशाच्या - बेसिक्स शिकवण्याच्या - काळात सर्वात जास्त प्रमाणात लागत असावी. अकरावीच्या पोरांना डबल एंट्री सिस्टिम आणि जर्नल एंट्र्या वगैरे शिकवणं सीए फायनलला डिफर्ड टॅक्स आणि डेरिव्हेटिव्हज वगैरे शिकवण्यापेक्षा नक्कीच अवघड असावं. ज्ञान अंगी बाणतं, इंटर्नलाईज होतं, आणि आधी शिकलेल्या गोष्टींचा पायर्‍यांसारखा वापर करून पुढचं शिक्षण सोपं पडतं. पण मुळात या पायर्‍या बांधणारे थोरच. कोणतीही घाई न करता, पर्फॉर्मन्स प्रेशर न टाकता सर धीमे धीमे शिकवत. "थ्री गोल्डन रूल्स" शिकवल्यावर ते म्हणाले, "हे तीन नियम एकदा तुम्हाला समजले की जगातलं कोणतंही अकाऊंटिंग अवघड नाही" - आणि ते खरंच आहे. "व्यवहार ऐकला की डोक्यात जर्नल एंट्री तयार झाली पाहिजे" हे अजूनही डोक्यात वाजतं, आणि प्रथम जर्नल एंट्री डोळ्यांसमोर येते. याचा पुढे खूप फायदा झाला. बारावीत एकप्रकारची मिडियॉक्रिटी आली होती. आपल्याला काही जमणार नाही, जेमतेम पास होणार, मोठी स्वप्नं कशाला बघायची, वगैरे त्या दिवसांतले विचार. त्याला तडा द्यायचं काम प्रथम सरांनी केलं. "ज्याला फक्त बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार येतो त्यालाही अडुसष्ट मार्क मिळू शकतात. तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत." असं ते सांगत. (क्लासमध्ये पुण्यातल्या एका प्रसिद्ध परिवारातला एक मध्यमवयीन माणूस येत असे. काही केल्या तो अकाऊंट्समध्ये पास होत नव्हता म्हणून त्याने शिक्षण अर्धवट सोडलं होतं. आमच्याबरोबर तोही - बरोब्बर अडुसष्ट मार्क मिळवून - पास झाला. त्याने लाडवाएवढे पेढे वाटले होते!) बारावीच्या रिझल्टच्या दिवशी या मिडियॉक्रिटी मनोवृत्तीचे बळी आम्ही दोन मित्र स्टेप-इनमध्ये बसलो होतो, आणि शंभर मार्क मिळाल्याची बातमी घेऊन सर इथेतिथे फोन करत आम्हाला शोधत होते...

In reply to by आदूबाळ

आदूबाळासाहेब, अहो हेच खरे शिक्षक! आम्ही तर साइंस घेऊन फसलेले जीव सालां साहित्य किंवा कायदा अन इतिहास वगैरे आवडतो हे कळायला ५ वर्षे लावुन बीएससी व्हावे लागले आम्हाला!! बाकी स्टेपइन बद्दल काय बोलावे!! सिविल सर्विसेज चा एटेम्पट फेल गेला की आम्ही तिथे पड़ीक राहत असू! तुम्ही म्हणता तसलेच विचार! "सालां झक मारली अन हे बेभरवश्याचे स्पर्धापरीक्षा वाले अवलक्षण आठवले" वगैरे बोलत टेबलभर बियर च्या बाटल्या जमस्तोवर बसायचे! (तरी बरे स्वकष्टार्जित खरी कमाई अन खाऊ च्या पैश्यातुन दारु भागत असे त्या काळी)

बोका-ए-आझम 07/09/2015 - 12:11
शाळा-कॉलेजच्या शिक्षकांविषयी फारशी आपुलकी, का कुणास ठाऊक पण वाटली नाही. पण पोस्ट ग्रॅज्युएशन करताना असे जबरदस्त शिक्षक लाभले की सगळी कसर भरून निघाली. पोलिटिकल कम्युनिकेशन हा एक विषय होता. त्याचं सिलॅबस वाचून तो जरा बोअर वाटत होता पण शांतिश्री पंडित मॅडमनी तो इतका इंटरेस्टिंग करुन शिकवला की त्यांच्या शेवटच्या लेक्चरला आम्ही त्यांना तुम्ही पोर्शन का संपवला असं भरल्या डोळ्यांनी विचारलं होतं. एमबीए करत असताना डाॅ.वेणुगोपाल यांनी जसं Sales and Distribution Management शिकवलं, त्याच्या १% जरी मी शिकवू शकलो तरी खूप झालं. आणि सर्वात शेवटी मला १० वीला क्लासमध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या लवलेकर मॅडम. अत्यंत कडक शिस्तीच्या पण तितकीच छान विनोदबुध्दी असलेल्या मॅडमनी इंग्लिशबद्दलचा न्यूनगंड मनातून कायमचा काढून टाकला. हे तिघंही शिक्षक माझ्या मते शिक्षणकलेच्या क्षेत्रातले असामान्य कलावंत होते. त्यांचे आभार मानण्याची औपचारिकता पाळण्याऐवजी मी त्यांच्या ऋणात राहणंच पसंत करीन.
नमस्कार, मिपावरील माझ्या मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी धाग्यास मिळालेल्या प्रतिसादांसाठी आभार. या नव्या धागालेखाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील आवडलेल्या (आणि कदाचित न आवडलेल्या) शिक्षकांबद्दल आठवणीतील काही प्रसंग अथवा माहिती आणि ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले भाग्य प्राप्त झाले त्यांनी अशा शिक्षकांबद्दलही आठवणी आणि माहिती लिहावी.

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासाची माहिती हवी

माहितगार ·
नेमेची येतो पावसाळा तसे महाराष्ट्रातील शाळा कॉलेजांच्या अ‍ॅडमीशनांचा हंगाम पालकांसाठी नम्रतेने रांगेत उभे टाकून कापले जाणारे खिश्यांचा अनुभव घेत मागे पडला आहे विद्यार्थी नव्या उमेदीने वर्गात (आणि क्लासांमध्ये) हजेरी लावू लागला आहे.

सल्ला पाहीजे

जयंत माळी ·

सोडणं अत्यावश्यक आहे का? तु कुठे कमी पडतो आहेस ह्याचा विचार केला आहेस का? अगदी सोडायचचं असेल तर मग बी.एस.सी. बी.सी.एस. हे मेनस्ट्रीम ऑप्शन आहेत. तुझ्या आवडीनिवडी काय आहेत?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जी मंडळी बॅकलॉग क्लिअर करतात तीही आपल्यासारखीच हाडामासाचीच माणसं असतात. असाच विचार करून मी माझे एमसीए वर्ष वाया न घालवता चांगल्या गुणांनी वेळेत पूर्ण केले. P&C (Probablilities & Combinatories) हा दुसर्‍या सेमचा पेपर शेवटून दुसर्‍या सेमला क्लिअर केला (४थ्या प्रयत्नात). माझ्या शिक्षण प्रवासाबाबत येथे लिहिले आहे. माझ्याहून अधिक अवलिया माणसांची उदाहरणे वाचण्यासाठी माझ्याउगा काहितरीच यांच्या खरडवह्यांमध्ये डोकवावे.

कपिलमुनी 09/06/2015 - 20:09
१. नापास झाला आहेस ? २. या शाखेची आवड नाही म्हणून ? ३. लोग क्या कहेंगे ? ४. घरच्यांनी घातला म्हणून आलोय ! ५. झेपत नाहीये ?

दत्ताजी शिंदे या शूर मराठा सरदाराचे 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे मृत्यूसमयीचे उद्गार हे आम्हा एमसीएच्या विद्यार्थ्यांचे अखंड प्रेरणास्थान होते. एमसीएला प्रवेश घेतल्यावर कॉलेज सुरु होण्याच्या एक दिवस आधी तिथल्या होस्टेलला पोचलो तर बातमी कळली की आमच्या सिनियर बॅचने दुसर्‍या सेम मध्ये शून्य टक्के निकाल लावला आहे. त्या दिवसापासून पुढची तीन वर्षे मी अन माझे बहुतांश सहाध्यायी प्रेशर कुकरमधले आयुष्य जगलो. एमसीएला सहा सेमिस्टर असतात मार्कलिस्टमध्ये दर वेळी ६ विषयांचे गुण अ‍ॅड होत राहतात. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट थेट सहाव्या (शेवटच्याच सेमिस्टरला) पाहायला मिळाली. Statistics (विशेषकरून वर उल्लेखलेला P&C हा विषय) सुरुवातीला खूप अवघड वाटत होते. दोन अटेम्प्टस झाल्यावर कळू लागले तेव्हा तिसर्‍या वेळी फॉर्मुले पाठ नसल्याने गचकलो. चौथ्या वेळी उत्तरपत्रिका मिळाल्यावर महत्प्रयासाने पाठ केलेले फॉर्मुले शेवटच्या रफ पानावर लिहून काढले होते. जेणे करून प्रश्न सोडवताना गोंधळ उडणार नाही. नववीपासून पाठांतर जमत नसल्याने बरेच शैक्षणिक नुकसान झाले फक्त वर्ष वाया गेले नव्हते. स्वतःच्या आळसावर अन भितीवर मात करून आव्हानाला थेट सामोरे गेल्यानेच तावून सुलाखून बाहेर पडलो. धाग्यात खूपच त्रोटक पणे लिहिले असल्याने नेमकेपणाने काही सांगू शकत नाही. पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीच नाही. आव्हानाचा यशस्वीपणे सामना केल्यास आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाची पुंजी जमा होते.

नमस्कार जयंत. हा माझा स्वानुभव. वर्ष २००२-२००३. मी बारावीपर्यंत स्वतःला तथाकथित हुशार समजणारा मुलगा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात नापास झालो. पहिली सेम - ५ पैकी ५ विषयात फेल. मेकॅनिक्स - ५ मार्क, बीईई - १० मार्क, अप्लाईड सायन्स - ३४, मॅथ्स - ३१, सी प्रोग्रामिंग - २७. दुसर्‍या सेमला १० पेपर दिले आणि ४ च क्लिअर झाले. ५ केटी रुलमुळे वर्ष वाया जाणार हे निश्चित झाले. घरी आलो. बराच विचार करुन बापाला सांगितले की मी शिक्षण सोडणार. कांदे-बटाटे विकणारा अड्त्या होईन किंवा दुधाची डेअरी काढेन. बापाचा सल्ला - आणखीन एक वर्ष कसून प्रयत्न कर. नाहीच जमलं तर बिनधास्त पणे बटाटे विक. मी अडवणार नाही. मी सल्ला ऐकला आणि २००७ मधे प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो. आमच्या कॉलेजमधे कँपस इंटर्व्हू होत नसत. तरीही २३ ऑगस्टला निकाल लागला आणि २७ ऑगस्टला नोकरी मिळालीसुद्धा. गेल्या ७-८ वर्षात बर्‍यापैकी व्यावसायिक यश मिळवले आहे. पुढचे ठाउक नाही. माझ्या माहितीत २-३ ड्रॉप लागूनदेखील नंतर प्रचंड यश मिळवल्याची उदाहरणे आहेत. आणखीनेक प्रश्न स्वतःलाच विचार. हे क्षेत्र सोडून दुसरीकडे गेलास आणि तिथेही अपयश आले तर तेही सोडून देणार का ? अप्स अ‍ॅन्ड डाउन्स इज पार्ट ऑफ द गेम.

In reply to by अप्पा जोगळेकर

चिनार 10/06/2015 - 09:27
थोड्याफार फरकाने माझेपण अप्पा साहेबंसारखेच झाले. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट शेवटल्या वर्षाला पाहायला मिळाली. फक्त मला जास्तीचे वर्ष लागले नाही आणि मी engineering सोडण्याचा कधीच विचार केला नाही. गेल्या ७-८ वर्षात मी सुद्धा बर्यापैकी प्रगती केली आहे. दुसरी काही आवड असल्यास engineering जरूर सोडावे. पण जमत नाही हा विचार करून सोडू नये. एक नक्की सांगेल की engineering पूर्ण केल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठे न कुठे नोकरी जरूर मिळते.

In reply to by चिनार

नाखु 10/06/2015 - 09:35
दोघांचेही अभिनंदन. शिकताना चुकतो तोच प्रयत्नार्थी चुकांतून शिकतो तोच विद्यार्थी चुकांबद्दल इतरांना सावध करतो तो साथी आनंदीत नाखुस

जर तुम्हाला इंटरेस्ट असेल इंजीनियरिंग मधे किंवा वाटत असेल की या फील्ड मधे तुम्ही काही करू शकता तर बिलकुल सोडू नका......आणि जर नसेल तर नका करू.....

In reply to by स्वप्निल पेटकर

तु उत्तम कन्सल्टंट बनु शकशील. आत्ताचं दहावी झालास ना? ह्या करियर पाथकडे पण लक्ष दे हो.

जुइ 09/06/2015 - 22:25
मी वाणिज्य शाखेची पदवी घेऊन मग संगणक व्यवस्थापन घेतले उच्च शिक्षणासाठी. त्यावेळी असेच खूप जड गेले हे शिक्षण आणि त्याबरोबर विषय राहणे इत्यादी या सर्व गोष्टी झाल्या. शेवटी असा विचार केला की हे काही रॉकेट सायन्स नव्हे इतरांना जमू शकते आपल्यालाही जमेल. मग मात्र नेटाने अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण केला. आता मा. त क्षेत्रात चांगला कामाचा अनुभव गाठीशी आहे.

लालगरूड 09/06/2015 - 22:56
सेम माझ्या सारखे झाले आहे. मी पन 2013 ल 12 वी दिली . physics chemestry maths काही येत नव्हते. पुन्हा fy डिप्लोमा घेतला. जिद्दीने अभ्यास करून all clear झालो. आज result लागला 80% पडले शिवाय प्रथम क्रमांक... जिद्द नको सोडू भाऊ तुला काय अडचण आहे ते सांग

या जगात पडला नाही असा माणूस नाही. जो पडल्यावर उठून उभा राहतो, कपड्यांवरची माती झटकतो आणि परत धावू लागतो तो यशस्वी होतो. इंजिनियरींगची अजिबात आवड नाही, पण घरच्यांच्या अथवा मित्रांच्या दबावाने इंजिनियरींग गेला असशील तर जरूर वाट बदल... पण नविन आवडती वाट कोणती ते आधी ठरवून, आणि त्या वाटेवरच्या प्रवासाचा नीट आराखडा बनवून मग तसे कर. एखाद्या चांगल्या व्यवसाय समुपदेशकाचा सल्लाही उपयोगी पडू शकेल.

माझ्या मते एखाद वेळी नापास झालो म्हणुन ईंजिनीअरींग सोडणारा माणुस फक्त खालील व्यवसायांसारखे काहीतरी करु शकतो. तुम्हाला बाकी काहीच जमणार नाही. उगाच वरचे फुकटचे सल्ले ऐकुन वेळ वाया घालवू नका. १. वडापावची गाडी टाकणे, २. रेल्वे स्टेशन,एस्टी स्टँडवर हमाली करणे, ३. रस्त्यावर / देवळाजवळा भिक मागणे, ४. जुना पुराणा डबा बाटली भंगारची हतगाडी लावणे, ५. कचराकुंड्यांमधल प्लॅस्टीक किंवा लोखंडाच्या वस्तु गोळा करुन भंगारवाल्यांना विकणे, ६. हातभट्टी बनवणे व विकणे, दारुचे फुगे पोचवणे ७. एखाद्या नगरसेवकाचा पंटर म्हणुन हप्ते गोळाकरत गावभर बोंबलत फिरणे, ८. बस रेल्वे किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारणे, ९. घरफोड्या करणे, १०. रात्री बेरात्री एकट्या दुकट्या माणसाला चाकु दाखवुन लुबाडणे ११. दुचाकी मधले पेट्रोल चोरणे, १२. रस्त्यावरुन चालणार्‍या बायकांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या हिसकावणे, १३. कारच्या काचा फोडून आतले कारटेप व इतर मौल्यवान चिजवस्तु पळवणे १४. मार्केट यार्डातल्या सडक्या / फेकलेल्या भाज्या गोळा करुन विकणे १५. दुध पिशवीतले दुध काढुन पाणी भरणे व पिशवी परत सील करणे १६. सिग्नल वर गजरे / सांताक्लॉजच्या टोप्या / गुलाबाची फुले ई. विकणे १७. सिग्नल ला उभ्या असलेली कार स्वतःच्या शर्टाने पुसणे व मग कारवाल्या कडे दिनवाणे बघत त्याच्या काचेवर टकटक करुन भुक लागली अशा खुणा करत पैसे मागणे. १८. एखाद्या प्रसिध्द देवळाच्या बाहेर उभे राहुन जाणार्‍या येणार्‍यांना गंध / टिळा इ. लावणे व त्यांच्या समोर थाळी वाजवणे. १९. आळंदी, पंढरपुर, नाशिक येथे रहात असलात तर नदिमधे चाळणी टाकत नदीमधली वाळु चाळणे व लोकांनी नदित टाकलेले पैसे गोळा करणे. २०. रेल्वे मधे डोळ्याला काळा गॉगल लावुन हातात लाल पांढरी काठी घेउन मान वाकडी करत "इट्ट्ला ऑज्युब तुजे सॉरकॉर" अशी गाणी म्हणत फिरणे २१. वरचे काहीच जमले नाही तर लग्न करणे. बायकोला कामाला लावणे व तिच्या पैशाने दारु पिउन तिला रोज शिवीगाळ व मारहाण करणे. तज्ञ मिपाकर या यादित भर घालतीलच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नापास होणार्यास हो ईतके मार्ग उपलब्ध आहेत हे बघुन थक्क झालो !!! आमच्या वेळी पिताश्रींचे जोडे खाणे आणि चूपचाप परत जोमाने अभ्यासाला लागणे हाच एक पर्याय होता. दुसर्यांदा नापास झाल्यावर पिताश्रींनी पार्श्वभागावर लत्ताप्रहार करुन पर्याय क्र. 2 या व्यवसायात जबरदस्तीने ढकलले असते. या भीतीनेच आम्ही नापास होऊ शकलो नाही. एकुण काय हल्लीची पिढी भाग्यवान आहे.......

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अजया 10/06/2015 - 16:37
अजून काही करिअर मार्गदर्शन: -सोसायट्यांचे पाण्याचे मिटर चोरणे. -गटारांवरची लोखंडी झाकणं चोरुन विकणे. -कारचा लोगो पळवणे.यात चहापाणी बिडीकाडी सुटेल. -टोलनाक्यावर उभे राहुन पळणार्या गाड्या अडवणे. -सिग्नलवर अफू घातलेले मूल घेऊन उभे राहाणे. -सोनाराच्या दुकानाबाहेरच्या गटारात चाळणी घेऊन काहीतरी शोधणे. -कच-याच्या घंटागाडीवर राजाच्या ऐटीत कच-यावर बसुन गावभर फिरणे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, हा प्रतिसाद पटला नाही. धागाकर्त्यासारखे स्वतःच्या अपयशाबद्दल त्यातून जात असताना लिहायचे धाडस फार कमी लोक दाखवू शकतात. त्याने मदतच मागितली आहे काही वाईट काम केलेले नाही. नर्मविनोदी शैलीने एखाद्याची थोडीफार खेचणे समजू शकतो. पण हे म्हणजे अतीच झाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझा प्रतिसाद जर तुम्हाला विनोदी वगेरे वाटला असेल तर ते मा़झे अपयश आहे हे मी कबुल करतो. सदर प्रतिसाद हा लेखकाची खेचण्यासाठी दिलेला नसून त्याची कानउघाडणी करण्यासाठीच लिहीला होता. माझ्या प्रतिसादाच्या प्रत्येक वाक्यात उपरोध / उपहास ठासून भरलेला आहे. अशा प्रकारे जाहिर पणे मार्गदर्शन मागण्याचा प्रकार म्हणजे केवळ सहानुभूती मिळवण्या साठी केलेला एक प्रयत्न आहे. इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्‍या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते, हे लेखकाला माहित नव्हते असे समजणे फारच बाळबोध ठरेल. याउपरही पहिल्याच अपयशानंतर जर लेखक हातपाय गाळून शाखा बदलायचा विचार करत असेल तर अशा माणसाला काय बरे सल्ला द्यावा? अशांना दोन थपडा देउन परत अभ्यासाला लावणे गरजेचे असते आणि मी माझ्या प्रतिसादामधून तोच प्रयत्न केला आहे असे मला प्रामाणिक पणे वाटते. (टवाऴया कुठे कराव्या याची जाणिव असलेला) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जे काही लिहिले होते ते थोडक्यात अन प्रतिकात्मक स्वरूपात लिहायला हवे होते असे म्हणायचे होते. ते नेमकेपणाने सांगू शकलो नाही हे माझे अपयश. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड दिल्यामुळे माणसाला जो आत्मविश्वास मिळतो तो भविष्यातल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी फारच मोलाच असतो याबाबत सहमत. अजुनही कामाच्या ठिकाणी प्रथमदर्शनी अत्यंत क्लिष्ट वाटणारी फंक्श्नॅलिटी कोडिंगद्वारे इंप्लिमेंट करायची असते तेव्हा चार अटेम्प्ट मध्ये आपण P&C क्लिअर करू शकतो तर ही गोष्टही नक्कीच करू शकतो हा आत्मविश्वास बळ देतो. - शिक्षणाने इंजिनिअर नसलेला रंगा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सतिश गावडे 12/06/2015 - 18:24
इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्‍या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते
याच कारणासाठी प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार वगळता इतर क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकिच्या पदवीधराला प्राधान्य दिले जाते.

In reply to by सतिश गावडे

संदीप डांगे 13/06/2015 - 00:43
अच्छा तर जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य ह्याची इतर कुठल्याही क्षेत्रातल्या पदवीधराने परिक्षा दिलेली नसते. तुमचे विधान जरा चमत्कारिक नाही का वाटत? असो.

In reply to by टवाळ कार्टा

चिगो 13/06/2015 - 21:26
बाकी इंजिनीअर्स त्यांच्या 'इंजिनीअरींग'बद्दल फारच म्हणजे फारच 'टच्ची' असतात, हा अनुभव आहे.. आणि हेच लोक '४०ची किंमत फक्त एक इंजिनीअरच जाणू शकतो' वाला तो व्हॉट्सअ‍ॅपवरचा जोक फिरवत असतात, हेपण एक निरीक्षण..

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिगो 13/06/2015 - 22:54
४० मार्क की किमत आप क्या जानो चिगोबाबु =))
आमचं ४५ की काय होतं पासिंग.. त्यामुळं ४०वर लक्ष नसायचं हो. तशीही बरीच वर्षं झाली आता.. वयपण झालंय अंमळ.. ;-)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

४० मार्क की किमत आम्हालाही चांगलीच ठाऊक आहे. आमचेही पासिंग मार्क्स ४०च असायचे पण ते ८० मार्कांच्या पेपरात. केस स्टडीजचे प्रश्न असलेल्या पेपरमध्ये ३६ मार्क मिळून बॅक आला की खूप वैताग वाटायचा. माझ्या एका अनुभवात दुसर्‍या प्रयत्नात पहिल्या वेळ इतका चांगला न सोडवूनही ४४ मार्क्स मिळाले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

सतिश गावडे 14/06/2015 - 21:05
इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत. त्यामुळे इतक्या सार्‍या काहिश्या कुजकट वाटणार्‍या प्रतिसादांचं काही वाटलं नाही. :) रंगाभाऊ, हा प्रतिसाद व्यक्तिशः तुम्हाला नाही. उपप्रतिसाद देण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचं फक्त शेपुट पकडलंय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांची शेपटी आमच्या डोक्यास जोडलेली आहे.
अफाट वाक्य आहे हे... त्यांची नाडी xxxx xxxx जोडलेली आहे असे काहीसे विडंबन झकास होईल...

In reply to by सतिश गावडे

संदीप डांगे 14/06/2015 - 23:35
इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत. इंजिनीयरिंग केलेल्यांना, इंजिनीअर नसणार्‍या इतरांनी काय केलं हे कसं समजू शकतं? की इंजिनीअरींग केल्यावर सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आपोआप येतं असं काही आहे का? मला काहीही कुजकट टोमणे वैगेरे मारायचे नाही. आपण केलं तेच भारी, बाकीच्यांना काय सहज पदव्या मिळतात असा सूर तुमच्या, कॅप्टन आणि टकाच्या प्रतिसादात आहे. तुम्ही इंजिनीअरींगची पदवी बी.एस.सी. बीकॉम, बी.ए. लोकांशी कंपेअर करू नये असं वाटतं. याशिवाय जगात इतरही अनेक सुपरटेक्निकल क्षेत्रं आहेत जिथे तुम्ही नमूद केलेलं धैर्य चिकाटी वैगेरे सगळं लागतं आणि शिकणार्‍याला अंगी बाणवावं लागतं. आणि ते इंजिनीअर किंवा डॉक्टर नसतात. मी बर्‍याच शहरांमधून फिरलोय. प्रत्येक शहरात राहणारा तिथला स्थानिक जो कधी शहर सोडून बाहेर गेला नाही तो आपल्या ट्रॅफिकच्या गोंधळाबद्दल हेच वाक्य म्हणतो, "इथे तुम्ही गाडी चालवली तर जगाच्या पाठीवर कुठंही चालवण्याची क्षमता तुमच्यात आहे असं समजा". इंजिनीअर लोकांचही असंच झालंय का? ढासळणार्‍या धैर्याची पातळी उंचावून धरण्यासाठी असेल तर ठिक आहे. पण इतरांसोबत कंपेअर करू नका असं म्हणणं जरा अतिच होतंय.

In reply to by संदीप डांगे

मी प्रतिसादामधे आधीचं लिहिलं आहे की मला कुठल्याही शाखेच्या पदवीला किंवा पदविकेला तुच्छ लेखायचं नाही. प्रत्येक शाखा आपल्या विशेष कौशल्याने अर्थव्यवस्थेचा कणा मजबुत करत असते. इंजिनिअरिंग ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते. असं क्रॉसब्रँचिंग बाकीच्या विद्याशाखांमधे कमी प्रमाणात आढळतं एवढचं म्हणायचं आहे. वाद नको.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे 15/06/2015 - 10:08
वाद नकोच आहे. फक्त सरधोपट विधानांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. असो. ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते. हेच माझ्याही क्षेत्रात होतंच. किंबहुना असं नाही राहिलं तर एका झटक्यात करीअर संपतं.

In reply to by संदीप डांगे

दुसर्‍या शाखांच्या पदवीधरांना तुच्छ लेखायचा वगैरे प्रयत्न करत नाहीये कारण प्रत्येक शाखा अर्थव्यवस्थेचा कणा आपल्या विशेष कौशल्यांनी मजबुत करत असते. पण एक गोष्ट मात्र अगदी विशेष फरकानी जाणवते ती म्हणजे "कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन मेकिंग एबिलिटी". हि आणि अ‍ॅप्टिट्युड हा इंजिनिअरिंग पदवीधरांमधे जास्त प्रमाणामधे असतो. ज्याची बाकीच्या विद्याशाखांना वेगळी तयारी करुन घ्यायला लागते तो गुण इंजिनिअरिंगमधे आपोआप विकसित होत जातो. हा फरक मिटवणेबल असतो. पण त्याला कष्टाची तयारी पाहिजे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा प्रतिसाद आवडला नाही. विनोद/ उपरोध म्हणुन एक वेळ समजु शकतो. पण करिअरसारख्या आयुष्य घडवु बिघडवु शकणार्‍या मुद्द्यावर असं नको.

In reply to by इरसाल

चिनार 16/06/2015 - 09:47
ह्यावेळी सांभाळून घ्या इरसाल भाऊ.. आधीच , "इतके रुमाल का लागतात ते तुमच्या युवराजांना विचारा" असा सल्ला देण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे मी !!

सिरुसेरि 10/06/2015 - 16:14
"मी ENGINEERING सोडतोय" -- यावर स्टीव वॉ म्हणाला असता - ' तु तर वर्ल्ड्कपच सोडतोयस ' . बाकी , ENGINEERING कडे केवळ नोकरीची संधी म्हणुन न बघता , त्या पदवी अभ्यासक्रमामुळे वेगवेगळे विषय शिकण्याची संधी म्हणुन बघ व कार्यरत हो .

सतिश गावडे 10/06/2015 - 16:26
शिक्षण संपल्यानंतर नोकरी करणे हाच उद्देश असेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण सर्वात उत्तम. नोकरीच्या जेव्हढ्या संधी अभियांत्रिकिच्या शिक्षणामुळे उपलब्ध होतात तेव्हढ्या संधी जगाच्या पाठीवर इतर कुठल्याच शिक्षणाने मिळत नाहीत. केटी, ब्याकलोग, मार्क्स वगैरे लोक पहिल्या नोकरीतच विचारतात. ती एकदा मिळाली की नंतर काळं कुत्रंही या गोष्टी विचारत नाही. फक्त नोकरी बदलताना आपण शिक्षनाने इंजिनियर आहोत हे सिद्ध करण्यासाठी पदवीचा कागद व्हेरिफ़िकेशनसाठी द्यावा लागतो एव्हढंच. सांगण्याचा उद्देश हा की पुढे जाऊन नोकरीच करायची असेल तर केटया घेत, नापास होत का होईना, पण शिक्षन पुर्ण करा.

आनंदी गोपाळ 10/06/2015 - 16:58
त्या बिचार्‍या १९-२० वर्षांच्या पोराला काय काय सल्ले द्यायलात रे बाबानो... जयंता, नापास झालास ही अडचण सोडून इतर काही प्रॉब्लेम आहेत का रे? फी भरायची अडचण वगैरे? तसे असेल तर मोकळं लिही, घरचीच मंडळी आहे सगळी इथे.

नाव आडनाव 10/06/2015 - 17:54
मित्रा, तुला इंजीनिअरिंग अजिबात आवडत नसेल / घरचांनी बळजबरी अ‍ॅडमिशन घ्यायला लावलं असेल तर गोष्ट वेगळी. पण नापास झाला हे एकंच कारण असलं तर अजिबात सोडू नको. माझ्या बॅचला आम्ही ७ जण नापास न होता इंजीनिअर झालो, पण आता १० वर्षानंतर बघितलं तर ह्या ७ जणांपेक्षा बाकीच्या बऱ्याच मित्रांना, जे नापास झाले होते, चांगला पगार आहे, चांगल्या नोकऱ्या आहेत. पहिल्या नोकरीनंतर कोणाला तुझ्या मार्कांचं काय पडलेलं नसतं. इंजीनिअरिंग ब्रांच चा तुला प्रॉब्लेम वाटत असला तर त्यातही तुला ४ वर्षाच्या डिग्री नंतर ऑप्शन आहेतच. तुला सोफ्टवेअर चा ऑप्शन आहे. टी.ई.एस. (टेक्निकल एन्ट्री स्कीम), बरेच कोर्सेस आहेत ज्या साठी ४ वर्षांची डिग्री लागते. अजून बरेच ऑप्शन आहेत. लोक काय बोलतील असं वाटत असेल तर ते तर एकदम सोडून दे, लै दिवस नाही लक्षात रहात लोकांच्या :) ४ वर्षानंतर चांगली नोकरी लागली तर ती लक्षात राहील नक्की.

बबन ताम्बे 10/06/2015 - 20:10
ते वाचताहेत ना हे सगळं? ओके. माझ्याकडून दोन शब्द. तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच असेल तर... १. पहील्या वर्षी नापास झालात म्हणून नाउमेद होऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे. जो विषय अवघड जात असेल त्याचा क्लास लावा. २. चांगल्या मित्रां बरोबर रहाणे. लेक्चर बंक मारणा-या मित्रांची संगत सोडून देणे. ३.नियमीत अभ्यास करणे. पुस्तक हातात घेतल्यानंतर , झोप अथवा कंटाळा येत असेल तर निग्रहपुर्वक त्यावर मात करणे. वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला/औषधे घेणे. ४. सर्वात महत्वाचे - एकदा केलीली चूक पुन्हा न करणे. ५. उत्तम गुण मिळाले तर कदाचीत कँपस इन्टेर्व्हुमधेच सीलेक्ट व्हाल. नाही झाले तरीही इंजीनियर्सला अजूनही डीमांड आहे. तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच नसेल तर, १. अनिच्छेने इंजीनीयरींग करून पुढची ऐन उमेदीची वर्षे, पैसा वाया न घालवता आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेणे. २. आवडीच्या क्षेत्रात मात्र झोकून देऊन उत्क्रूष्टरीत्या शिक्षण पुर्ण करणे.

भीमराव 12/06/2015 - 11:11
भावा सोडायचच ठरवलं आहेस तर एक चान्स घेऊनच सोड. तु आत्ता १ च वर्ष वाय. डी. आहेस. सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे. तु नक्की पास होशिल. मि सोता फष्ट येर वाय.डी होतो पन नंतर परतेक वर्षी आल क्लेर विथ आबाव्ह ६० झालो ते हाच मंत्र वापरुन. आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो. भावा एकदाच नेटानं भिड परत, येश वाट बघतय दोन पावलावर.

In reply to by भीमराव

सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे आता ह्ये पन म्हाईत नसनारा म्हंजी मग त्यो विंजीनेरीगला का आला हो? ह्या असल्या गोष्टी त्यास्नी बारावीत कुनी सांगीतल्या नस्नार का ? आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय. उगा तसल्या गोष्टींची आट्वन करुन्श्यान दिऊ नगा. आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो. च्यायला, ह्या असल्या गोष्टी मास्तरं सांगत न्हाईत व्ह्य पयल्या लेक्चरामंदी ?

In reply to by सामान्यनागरिक

टवाळ कार्टा 12/06/2015 - 14:54
आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय.
या बाबत आधीच्या पिढीतल्या लोकांना काय अर्थ माहित होता?

भीमराव 12/06/2015 - 15:02
@ कोमन म्यान ते हायच वो पन हाजुक यक वेळ आठवन करुन दिली, उजळणी म्हणुन. विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात. आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा

In reply to by भीमराव

टवाळ कार्टा 12/06/2015 - 15:26
विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात.
असेच्च वागायचे असेल तर नक्को करू इंजिनीअरींग...पुर्ण करायला खूप त्रास सुध्धा होईल आणि डोक्यात सुध्धा काहीही जाणार नाही...नावापुरते इंजिनीअर होशील
आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा
लोक काय बोलतात याला फाट्यावर मारायचे...सबमिशन वेळेत पूर्ण करण्यासारखे नाही दुसरे...जेव्हा दुसरे रात्र रात्र जागून सबमिशन पूर्ण करत असतात तेव्हा आपण तंगड्या पसरून लोळत पडलेलो असतो...इंटर्नल मध्ये कमी लागते तो बोनस

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 12/06/2015 - 17:55
तो "खाटुक कमॉन" चा अपभ्रंश आहे !!!!! सरावाने दोन्ही क मधील एका क (चा) मोड ऊडाला !!! हा का ना का !! बॅट्या दुखावला नाहीस ना रे ! आजकाल दुखावण्याची साथ आली आहे रे म्हणून विचार ना ! आला पावसाळा ! आरोग्य संभाळा !! घोष वाक्य नाखुस

In reply to by नाखु

बॅटमॅन 12/06/2015 - 18:32
ठ्ठो =)) =)) =)) नाखुस, तुमच्यावर रागवून चालेल कसं? रहायचंय म्हटलं आम्हांला इथं!

In reply to by बॅटमॅन

नाखु 15/06/2015 - 09:28
काळजी नसावी मी स्वघोषीत प्रवक्ता * नाही त्या मुळे माझ्याकडून तुला कसलाही धोका+मोका नाही. धन्यवाद चिर्कुट नाखुस
*याचा सोदाहरण अर्थ गावडेसर लिखित "मिपा अर्थ्-अनर्थ मीमांसा आणि पदरमोड" या थोर ग्रंथात पान क्रं ५६ वर आहे

In reply to by टवाळ कार्टा

बबन ताम्बे 12/06/2015 - 17:01
हो, पण तुमची शंका व्हॅलीड आहे. एका माहीतीतल्या पंटरचे इंजिनीयरींगचे इयर डाऊन मुलीत गुंतल्यामुळेच झाले आहे. आता "गुंतल्यामुळे" या शब्दावर कोटी करायचा मोह टाळा . :-)

In reply to by असंका

सतिश गावडे 14/06/2015 - 21:07
स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याआधी एकदा त्याचं अधिकृत चरित्र वाचावं. ते वाचल्यानंतर वाचणार्‍याचं मत बदलण्याची खुप शक्यता असते.

मिपाकर मृत्युन्जय यांच्या मला आलेल्या खरडीमुळे हे विचार मनात आले. ते इथे मांडावेसे वाटले. मिपावर कुणी माहिती, मार्गदर्शन, मदत मागितली तर प्रतिसाद देणारे केवळ त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवूनच उत्तरे देतात असे नाही. याच धाग्यावर मी अन अनेकांनी लिहिलेले प्रतिसाद शिक्षण प्रवासात धक्के खाणार्‍या प्रत्येकाला प्रेरणा देऊ शकतात. एखाद्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा आपल्या पूर्वीही इतरांना अशाच ठेचा लागल्या आहेत अन त्यातून ते शहाणे होवून निघाले आहेत ही बाब नक्कीच हिंमत वाढवणारी ठरते. मिपाचे मिपाकर असलेले अन नसलेले वाचक पाहता अशा चर्चा किमान शेकडो किंवा कधी कधी हजारो लोक वाचत असतात. माझ्या ओळखीचे अनेक लोक बर्‍याच वर्षांपासून मिपा वाचतात आवडलेलं इतरांना सूचवतात. कदाचित त्यांनी आजवर मराठीतून एक वाक्यही टंकलं नसेल पण वाचनखंड मात्र पडत नसतो. परंतु बहुधा काही जण केवळ धागाकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून प्रतिक्रिया देतात असेही दिसते. मी नवा असताना माझा तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता? हा अन काही महिन्यांपूर्वीचा मी उपवर तरुण असतो तर या काथ्याकुटांवरील काही प्रतिसाद वाचून असे वाटते की त्या प्रतिसादकांचे असे मत आहे की केवळ धागाकर्त्यालाच उर्जाबचत करायची आहे अन स्वतःचा विवाह जुळवायचा आहे :-) .

आम्हाला अकरावीच्या इंग्रजीसाठी युवकभारती या पाठ्यपुस्तकात स्व. खुशवंतसिंह यांचा टेकिंग स्टडिज सिरियसली हा पाठ होता. आपल्या नर्मविनोदी शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गांभीर्य वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांच्या आजीचे त्यांच्याबद्दलचे इंग्लंडवरून शिकून परत आल्यानंतरचे हिंदीतले वाक्य होते.
क्या पास करके आया पता नही पर टाइम बहुत पास करके आया है!

सोडणं अत्यावश्यक आहे का? तु कुठे कमी पडतो आहेस ह्याचा विचार केला आहेस का? अगदी सोडायचचं असेल तर मग बी.एस.सी. बी.सी.एस. हे मेनस्ट्रीम ऑप्शन आहेत. तुझ्या आवडीनिवडी काय आहेत?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जी मंडळी बॅकलॉग क्लिअर करतात तीही आपल्यासारखीच हाडामासाचीच माणसं असतात. असाच विचार करून मी माझे एमसीए वर्ष वाया न घालवता चांगल्या गुणांनी वेळेत पूर्ण केले. P&C (Probablilities & Combinatories) हा दुसर्‍या सेमचा पेपर शेवटून दुसर्‍या सेमला क्लिअर केला (४थ्या प्रयत्नात). माझ्या शिक्षण प्रवासाबाबत येथे लिहिले आहे. माझ्याहून अधिक अवलिया माणसांची उदाहरणे वाचण्यासाठी माझ्याउगा काहितरीच यांच्या खरडवह्यांमध्ये डोकवावे.

कपिलमुनी 09/06/2015 - 20:09
१. नापास झाला आहेस ? २. या शाखेची आवड नाही म्हणून ? ३. लोग क्या कहेंगे ? ४. घरच्यांनी घातला म्हणून आलोय ! ५. झेपत नाहीये ?

दत्ताजी शिंदे या शूर मराठा सरदाराचे 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे मृत्यूसमयीचे उद्गार हे आम्हा एमसीएच्या विद्यार्थ्यांचे अखंड प्रेरणास्थान होते. एमसीएला प्रवेश घेतल्यावर कॉलेज सुरु होण्याच्या एक दिवस आधी तिथल्या होस्टेलला पोचलो तर बातमी कळली की आमच्या सिनियर बॅचने दुसर्‍या सेम मध्ये शून्य टक्के निकाल लावला आहे. त्या दिवसापासून पुढची तीन वर्षे मी अन माझे बहुतांश सहाध्यायी प्रेशर कुकरमधले आयुष्य जगलो. एमसीएला सहा सेमिस्टर असतात मार्कलिस्टमध्ये दर वेळी ६ विषयांचे गुण अ‍ॅड होत राहतात. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट थेट सहाव्या (शेवटच्याच सेमिस्टरला) पाहायला मिळाली. Statistics (विशेषकरून वर उल्लेखलेला P&C हा विषय) सुरुवातीला खूप अवघड वाटत होते. दोन अटेम्प्टस झाल्यावर कळू लागले तेव्हा तिसर्‍या वेळी फॉर्मुले पाठ नसल्याने गचकलो. चौथ्या वेळी उत्तरपत्रिका मिळाल्यावर महत्प्रयासाने पाठ केलेले फॉर्मुले शेवटच्या रफ पानावर लिहून काढले होते. जेणे करून प्रश्न सोडवताना गोंधळ उडणार नाही. नववीपासून पाठांतर जमत नसल्याने बरेच शैक्षणिक नुकसान झाले फक्त वर्ष वाया गेले नव्हते. स्वतःच्या आळसावर अन भितीवर मात करून आव्हानाला थेट सामोरे गेल्यानेच तावून सुलाखून बाहेर पडलो. धाग्यात खूपच त्रोटक पणे लिहिले असल्याने नेमकेपणाने काही सांगू शकत नाही. पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीच नाही. आव्हानाचा यशस्वीपणे सामना केल्यास आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाची पुंजी जमा होते.

नमस्कार जयंत. हा माझा स्वानुभव. वर्ष २००२-२००३. मी बारावीपर्यंत स्वतःला तथाकथित हुशार समजणारा मुलगा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात नापास झालो. पहिली सेम - ५ पैकी ५ विषयात फेल. मेकॅनिक्स - ५ मार्क, बीईई - १० मार्क, अप्लाईड सायन्स - ३४, मॅथ्स - ३१, सी प्रोग्रामिंग - २७. दुसर्‍या सेमला १० पेपर दिले आणि ४ च क्लिअर झाले. ५ केटी रुलमुळे वर्ष वाया जाणार हे निश्चित झाले. घरी आलो. बराच विचार करुन बापाला सांगितले की मी शिक्षण सोडणार. कांदे-बटाटे विकणारा अड्त्या होईन किंवा दुधाची डेअरी काढेन. बापाचा सल्ला - आणखीन एक वर्ष कसून प्रयत्न कर. नाहीच जमलं तर बिनधास्त पणे बटाटे विक. मी अडवणार नाही. मी सल्ला ऐकला आणि २००७ मधे प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो. आमच्या कॉलेजमधे कँपस इंटर्व्हू होत नसत. तरीही २३ ऑगस्टला निकाल लागला आणि २७ ऑगस्टला नोकरी मिळालीसुद्धा. गेल्या ७-८ वर्षात बर्‍यापैकी व्यावसायिक यश मिळवले आहे. पुढचे ठाउक नाही. माझ्या माहितीत २-३ ड्रॉप लागूनदेखील नंतर प्रचंड यश मिळवल्याची उदाहरणे आहेत. आणखीनेक प्रश्न स्वतःलाच विचार. हे क्षेत्र सोडून दुसरीकडे गेलास आणि तिथेही अपयश आले तर तेही सोडून देणार का ? अप्स अ‍ॅन्ड डाउन्स इज पार्ट ऑफ द गेम.

In reply to by अप्पा जोगळेकर

चिनार 10/06/2015 - 09:27
थोड्याफार फरकाने माझेपण अप्पा साहेबंसारखेच झाले. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट शेवटल्या वर्षाला पाहायला मिळाली. फक्त मला जास्तीचे वर्ष लागले नाही आणि मी engineering सोडण्याचा कधीच विचार केला नाही. गेल्या ७-८ वर्षात मी सुद्धा बर्यापैकी प्रगती केली आहे. दुसरी काही आवड असल्यास engineering जरूर सोडावे. पण जमत नाही हा विचार करून सोडू नये. एक नक्की सांगेल की engineering पूर्ण केल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठे न कुठे नोकरी जरूर मिळते.

In reply to by चिनार

नाखु 10/06/2015 - 09:35
दोघांचेही अभिनंदन. शिकताना चुकतो तोच प्रयत्नार्थी चुकांतून शिकतो तोच विद्यार्थी चुकांबद्दल इतरांना सावध करतो तो साथी आनंदीत नाखुस

जर तुम्हाला इंटरेस्ट असेल इंजीनियरिंग मधे किंवा वाटत असेल की या फील्ड मधे तुम्ही काही करू शकता तर बिलकुल सोडू नका......आणि जर नसेल तर नका करू.....

In reply to by स्वप्निल पेटकर

तु उत्तम कन्सल्टंट बनु शकशील. आत्ताचं दहावी झालास ना? ह्या करियर पाथकडे पण लक्ष दे हो.

जुइ 09/06/2015 - 22:25
मी वाणिज्य शाखेची पदवी घेऊन मग संगणक व्यवस्थापन घेतले उच्च शिक्षणासाठी. त्यावेळी असेच खूप जड गेले हे शिक्षण आणि त्याबरोबर विषय राहणे इत्यादी या सर्व गोष्टी झाल्या. शेवटी असा विचार केला की हे काही रॉकेट सायन्स नव्हे इतरांना जमू शकते आपल्यालाही जमेल. मग मात्र नेटाने अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण केला. आता मा. त क्षेत्रात चांगला कामाचा अनुभव गाठीशी आहे.

लालगरूड 09/06/2015 - 22:56
सेम माझ्या सारखे झाले आहे. मी पन 2013 ल 12 वी दिली . physics chemestry maths काही येत नव्हते. पुन्हा fy डिप्लोमा घेतला. जिद्दीने अभ्यास करून all clear झालो. आज result लागला 80% पडले शिवाय प्रथम क्रमांक... जिद्द नको सोडू भाऊ तुला काय अडचण आहे ते सांग

या जगात पडला नाही असा माणूस नाही. जो पडल्यावर उठून उभा राहतो, कपड्यांवरची माती झटकतो आणि परत धावू लागतो तो यशस्वी होतो. इंजिनियरींगची अजिबात आवड नाही, पण घरच्यांच्या अथवा मित्रांच्या दबावाने इंजिनियरींग गेला असशील तर जरूर वाट बदल... पण नविन आवडती वाट कोणती ते आधी ठरवून, आणि त्या वाटेवरच्या प्रवासाचा नीट आराखडा बनवून मग तसे कर. एखाद्या चांगल्या व्यवसाय समुपदेशकाचा सल्लाही उपयोगी पडू शकेल.

माझ्या मते एखाद वेळी नापास झालो म्हणुन ईंजिनीअरींग सोडणारा माणुस फक्त खालील व्यवसायांसारखे काहीतरी करु शकतो. तुम्हाला बाकी काहीच जमणार नाही. उगाच वरचे फुकटचे सल्ले ऐकुन वेळ वाया घालवू नका. १. वडापावची गाडी टाकणे, २. रेल्वे स्टेशन,एस्टी स्टँडवर हमाली करणे, ३. रस्त्यावर / देवळाजवळा भिक मागणे, ४. जुना पुराणा डबा बाटली भंगारची हतगाडी लावणे, ५. कचराकुंड्यांमधल प्लॅस्टीक किंवा लोखंडाच्या वस्तु गोळा करुन भंगारवाल्यांना विकणे, ६. हातभट्टी बनवणे व विकणे, दारुचे फुगे पोचवणे ७. एखाद्या नगरसेवकाचा पंटर म्हणुन हप्ते गोळाकरत गावभर बोंबलत फिरणे, ८. बस रेल्वे किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारणे, ९. घरफोड्या करणे, १०. रात्री बेरात्री एकट्या दुकट्या माणसाला चाकु दाखवुन लुबाडणे ११. दुचाकी मधले पेट्रोल चोरणे, १२. रस्त्यावरुन चालणार्‍या बायकांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या हिसकावणे, १३. कारच्या काचा फोडून आतले कारटेप व इतर मौल्यवान चिजवस्तु पळवणे १४. मार्केट यार्डातल्या सडक्या / फेकलेल्या भाज्या गोळा करुन विकणे १५. दुध पिशवीतले दुध काढुन पाणी भरणे व पिशवी परत सील करणे १६. सिग्नल वर गजरे / सांताक्लॉजच्या टोप्या / गुलाबाची फुले ई. विकणे १७. सिग्नल ला उभ्या असलेली कार स्वतःच्या शर्टाने पुसणे व मग कारवाल्या कडे दिनवाणे बघत त्याच्या काचेवर टकटक करुन भुक लागली अशा खुणा करत पैसे मागणे. १८. एखाद्या प्रसिध्द देवळाच्या बाहेर उभे राहुन जाणार्‍या येणार्‍यांना गंध / टिळा इ. लावणे व त्यांच्या समोर थाळी वाजवणे. १९. आळंदी, पंढरपुर, नाशिक येथे रहात असलात तर नदिमधे चाळणी टाकत नदीमधली वाळु चाळणे व लोकांनी नदित टाकलेले पैसे गोळा करणे. २०. रेल्वे मधे डोळ्याला काळा गॉगल लावुन हातात लाल पांढरी काठी घेउन मान वाकडी करत "इट्ट्ला ऑज्युब तुजे सॉरकॉर" अशी गाणी म्हणत फिरणे २१. वरचे काहीच जमले नाही तर लग्न करणे. बायकोला कामाला लावणे व तिच्या पैशाने दारु पिउन तिला रोज शिवीगाळ व मारहाण करणे. तज्ञ मिपाकर या यादित भर घालतीलच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नापास होणार्यास हो ईतके मार्ग उपलब्ध आहेत हे बघुन थक्क झालो !!! आमच्या वेळी पिताश्रींचे जोडे खाणे आणि चूपचाप परत जोमाने अभ्यासाला लागणे हाच एक पर्याय होता. दुसर्यांदा नापास झाल्यावर पिताश्रींनी पार्श्वभागावर लत्ताप्रहार करुन पर्याय क्र. 2 या व्यवसायात जबरदस्तीने ढकलले असते. या भीतीनेच आम्ही नापास होऊ शकलो नाही. एकुण काय हल्लीची पिढी भाग्यवान आहे.......

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अजया 10/06/2015 - 16:37
अजून काही करिअर मार्गदर्शन: -सोसायट्यांचे पाण्याचे मिटर चोरणे. -गटारांवरची लोखंडी झाकणं चोरुन विकणे. -कारचा लोगो पळवणे.यात चहापाणी बिडीकाडी सुटेल. -टोलनाक्यावर उभे राहुन पळणार्या गाड्या अडवणे. -सिग्नलवर अफू घातलेले मूल घेऊन उभे राहाणे. -सोनाराच्या दुकानाबाहेरच्या गटारात चाळणी घेऊन काहीतरी शोधणे. -कच-याच्या घंटागाडीवर राजाच्या ऐटीत कच-यावर बसुन गावभर फिरणे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, हा प्रतिसाद पटला नाही. धागाकर्त्यासारखे स्वतःच्या अपयशाबद्दल त्यातून जात असताना लिहायचे धाडस फार कमी लोक दाखवू शकतात. त्याने मदतच मागितली आहे काही वाईट काम केलेले नाही. नर्मविनोदी शैलीने एखाद्याची थोडीफार खेचणे समजू शकतो. पण हे म्हणजे अतीच झाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझा प्रतिसाद जर तुम्हाला विनोदी वगेरे वाटला असेल तर ते मा़झे अपयश आहे हे मी कबुल करतो. सदर प्रतिसाद हा लेखकाची खेचण्यासाठी दिलेला नसून त्याची कानउघाडणी करण्यासाठीच लिहीला होता. माझ्या प्रतिसादाच्या प्रत्येक वाक्यात उपरोध / उपहास ठासून भरलेला आहे. अशा प्रकारे जाहिर पणे मार्गदर्शन मागण्याचा प्रकार म्हणजे केवळ सहानुभूती मिळवण्या साठी केलेला एक प्रयत्न आहे. इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्‍या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते, हे लेखकाला माहित नव्हते असे समजणे फारच बाळबोध ठरेल. याउपरही पहिल्याच अपयशानंतर जर लेखक हातपाय गाळून शाखा बदलायचा विचार करत असेल तर अशा माणसाला काय बरे सल्ला द्यावा? अशांना दोन थपडा देउन परत अभ्यासाला लावणे गरजेचे असते आणि मी माझ्या प्रतिसादामधून तोच प्रयत्न केला आहे असे मला प्रामाणिक पणे वाटते. (टवाऴया कुठे कराव्या याची जाणिव असलेला) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जे काही लिहिले होते ते थोडक्यात अन प्रतिकात्मक स्वरूपात लिहायला हवे होते असे म्हणायचे होते. ते नेमकेपणाने सांगू शकलो नाही हे माझे अपयश. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड दिल्यामुळे माणसाला जो आत्मविश्वास मिळतो तो भविष्यातल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी फारच मोलाच असतो याबाबत सहमत. अजुनही कामाच्या ठिकाणी प्रथमदर्शनी अत्यंत क्लिष्ट वाटणारी फंक्श्नॅलिटी कोडिंगद्वारे इंप्लिमेंट करायची असते तेव्हा चार अटेम्प्ट मध्ये आपण P&C क्लिअर करू शकतो तर ही गोष्टही नक्कीच करू शकतो हा आत्मविश्वास बळ देतो. - शिक्षणाने इंजिनिअर नसलेला रंगा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सतिश गावडे 12/06/2015 - 18:24
इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्‍या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते
याच कारणासाठी प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार वगळता इतर क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकिच्या पदवीधराला प्राधान्य दिले जाते.

In reply to by सतिश गावडे

संदीप डांगे 13/06/2015 - 00:43
अच्छा तर जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य ह्याची इतर कुठल्याही क्षेत्रातल्या पदवीधराने परिक्षा दिलेली नसते. तुमचे विधान जरा चमत्कारिक नाही का वाटत? असो.

In reply to by टवाळ कार्टा

चिगो 13/06/2015 - 21:26
बाकी इंजिनीअर्स त्यांच्या 'इंजिनीअरींग'बद्दल फारच म्हणजे फारच 'टच्ची' असतात, हा अनुभव आहे.. आणि हेच लोक '४०ची किंमत फक्त एक इंजिनीअरच जाणू शकतो' वाला तो व्हॉट्सअ‍ॅपवरचा जोक फिरवत असतात, हेपण एक निरीक्षण..

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिगो 13/06/2015 - 22:54
४० मार्क की किमत आप क्या जानो चिगोबाबु =))
आमचं ४५ की काय होतं पासिंग.. त्यामुळं ४०वर लक्ष नसायचं हो. तशीही बरीच वर्षं झाली आता.. वयपण झालंय अंमळ.. ;-)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

४० मार्क की किमत आम्हालाही चांगलीच ठाऊक आहे. आमचेही पासिंग मार्क्स ४०च असायचे पण ते ८० मार्कांच्या पेपरात. केस स्टडीजचे प्रश्न असलेल्या पेपरमध्ये ३६ मार्क मिळून बॅक आला की खूप वैताग वाटायचा. माझ्या एका अनुभवात दुसर्‍या प्रयत्नात पहिल्या वेळ इतका चांगला न सोडवूनही ४४ मार्क्स मिळाले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

सतिश गावडे 14/06/2015 - 21:05
इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत. त्यामुळे इतक्या सार्‍या काहिश्या कुजकट वाटणार्‍या प्रतिसादांचं काही वाटलं नाही. :) रंगाभाऊ, हा प्रतिसाद व्यक्तिशः तुम्हाला नाही. उपप्रतिसाद देण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचं फक्त शेपुट पकडलंय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांची शेपटी आमच्या डोक्यास जोडलेली आहे.
अफाट वाक्य आहे हे... त्यांची नाडी xxxx xxxx जोडलेली आहे असे काहीसे विडंबन झकास होईल...

In reply to by सतिश गावडे

संदीप डांगे 14/06/2015 - 23:35
इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत. इंजिनीयरिंग केलेल्यांना, इंजिनीअर नसणार्‍या इतरांनी काय केलं हे कसं समजू शकतं? की इंजिनीअरींग केल्यावर सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आपोआप येतं असं काही आहे का? मला काहीही कुजकट टोमणे वैगेरे मारायचे नाही. आपण केलं तेच भारी, बाकीच्यांना काय सहज पदव्या मिळतात असा सूर तुमच्या, कॅप्टन आणि टकाच्या प्रतिसादात आहे. तुम्ही इंजिनीअरींगची पदवी बी.एस.सी. बीकॉम, बी.ए. लोकांशी कंपेअर करू नये असं वाटतं. याशिवाय जगात इतरही अनेक सुपरटेक्निकल क्षेत्रं आहेत जिथे तुम्ही नमूद केलेलं धैर्य चिकाटी वैगेरे सगळं लागतं आणि शिकणार्‍याला अंगी बाणवावं लागतं. आणि ते इंजिनीअर किंवा डॉक्टर नसतात. मी बर्‍याच शहरांमधून फिरलोय. प्रत्येक शहरात राहणारा तिथला स्थानिक जो कधी शहर सोडून बाहेर गेला नाही तो आपल्या ट्रॅफिकच्या गोंधळाबद्दल हेच वाक्य म्हणतो, "इथे तुम्ही गाडी चालवली तर जगाच्या पाठीवर कुठंही चालवण्याची क्षमता तुमच्यात आहे असं समजा". इंजिनीअर लोकांचही असंच झालंय का? ढासळणार्‍या धैर्याची पातळी उंचावून धरण्यासाठी असेल तर ठिक आहे. पण इतरांसोबत कंपेअर करू नका असं म्हणणं जरा अतिच होतंय.

In reply to by संदीप डांगे

मी प्रतिसादामधे आधीचं लिहिलं आहे की मला कुठल्याही शाखेच्या पदवीला किंवा पदविकेला तुच्छ लेखायचं नाही. प्रत्येक शाखा आपल्या विशेष कौशल्याने अर्थव्यवस्थेचा कणा मजबुत करत असते. इंजिनिअरिंग ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते. असं क्रॉसब्रँचिंग बाकीच्या विद्याशाखांमधे कमी प्रमाणात आढळतं एवढचं म्हणायचं आहे. वाद नको.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे 15/06/2015 - 10:08
वाद नकोच आहे. फक्त सरधोपट विधानांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. असो. ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते. हेच माझ्याही क्षेत्रात होतंच. किंबहुना असं नाही राहिलं तर एका झटक्यात करीअर संपतं.

In reply to by संदीप डांगे

दुसर्‍या शाखांच्या पदवीधरांना तुच्छ लेखायचा वगैरे प्रयत्न करत नाहीये कारण प्रत्येक शाखा अर्थव्यवस्थेचा कणा आपल्या विशेष कौशल्यांनी मजबुत करत असते. पण एक गोष्ट मात्र अगदी विशेष फरकानी जाणवते ती म्हणजे "कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन मेकिंग एबिलिटी". हि आणि अ‍ॅप्टिट्युड हा इंजिनिअरिंग पदवीधरांमधे जास्त प्रमाणामधे असतो. ज्याची बाकीच्या विद्याशाखांना वेगळी तयारी करुन घ्यायला लागते तो गुण इंजिनिअरिंगमधे आपोआप विकसित होत जातो. हा फरक मिटवणेबल असतो. पण त्याला कष्टाची तयारी पाहिजे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा प्रतिसाद आवडला नाही. विनोद/ उपरोध म्हणुन एक वेळ समजु शकतो. पण करिअरसारख्या आयुष्य घडवु बिघडवु शकणार्‍या मुद्द्यावर असं नको.

In reply to by इरसाल

चिनार 16/06/2015 - 09:47
ह्यावेळी सांभाळून घ्या इरसाल भाऊ.. आधीच , "इतके रुमाल का लागतात ते तुमच्या युवराजांना विचारा" असा सल्ला देण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे मी !!

सिरुसेरि 10/06/2015 - 16:14
"मी ENGINEERING सोडतोय" -- यावर स्टीव वॉ म्हणाला असता - ' तु तर वर्ल्ड्कपच सोडतोयस ' . बाकी , ENGINEERING कडे केवळ नोकरीची संधी म्हणुन न बघता , त्या पदवी अभ्यासक्रमामुळे वेगवेगळे विषय शिकण्याची संधी म्हणुन बघ व कार्यरत हो .

सतिश गावडे 10/06/2015 - 16:26
शिक्षण संपल्यानंतर नोकरी करणे हाच उद्देश असेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण सर्वात उत्तम. नोकरीच्या जेव्हढ्या संधी अभियांत्रिकिच्या शिक्षणामुळे उपलब्ध होतात तेव्हढ्या संधी जगाच्या पाठीवर इतर कुठल्याच शिक्षणाने मिळत नाहीत. केटी, ब्याकलोग, मार्क्स वगैरे लोक पहिल्या नोकरीतच विचारतात. ती एकदा मिळाली की नंतर काळं कुत्रंही या गोष्टी विचारत नाही. फक्त नोकरी बदलताना आपण शिक्षनाने इंजिनियर आहोत हे सिद्ध करण्यासाठी पदवीचा कागद व्हेरिफ़िकेशनसाठी द्यावा लागतो एव्हढंच. सांगण्याचा उद्देश हा की पुढे जाऊन नोकरीच करायची असेल तर केटया घेत, नापास होत का होईना, पण शिक्षन पुर्ण करा.

आनंदी गोपाळ 10/06/2015 - 16:58
त्या बिचार्‍या १९-२० वर्षांच्या पोराला काय काय सल्ले द्यायलात रे बाबानो... जयंता, नापास झालास ही अडचण सोडून इतर काही प्रॉब्लेम आहेत का रे? फी भरायची अडचण वगैरे? तसे असेल तर मोकळं लिही, घरचीच मंडळी आहे सगळी इथे.

नाव आडनाव 10/06/2015 - 17:54
मित्रा, तुला इंजीनिअरिंग अजिबात आवडत नसेल / घरचांनी बळजबरी अ‍ॅडमिशन घ्यायला लावलं असेल तर गोष्ट वेगळी. पण नापास झाला हे एकंच कारण असलं तर अजिबात सोडू नको. माझ्या बॅचला आम्ही ७ जण नापास न होता इंजीनिअर झालो, पण आता १० वर्षानंतर बघितलं तर ह्या ७ जणांपेक्षा बाकीच्या बऱ्याच मित्रांना, जे नापास झाले होते, चांगला पगार आहे, चांगल्या नोकऱ्या आहेत. पहिल्या नोकरीनंतर कोणाला तुझ्या मार्कांचं काय पडलेलं नसतं. इंजीनिअरिंग ब्रांच चा तुला प्रॉब्लेम वाटत असला तर त्यातही तुला ४ वर्षाच्या डिग्री नंतर ऑप्शन आहेतच. तुला सोफ्टवेअर चा ऑप्शन आहे. टी.ई.एस. (टेक्निकल एन्ट्री स्कीम), बरेच कोर्सेस आहेत ज्या साठी ४ वर्षांची डिग्री लागते. अजून बरेच ऑप्शन आहेत. लोक काय बोलतील असं वाटत असेल तर ते तर एकदम सोडून दे, लै दिवस नाही लक्षात रहात लोकांच्या :) ४ वर्षानंतर चांगली नोकरी लागली तर ती लक्षात राहील नक्की.

बबन ताम्बे 10/06/2015 - 20:10
ते वाचताहेत ना हे सगळं? ओके. माझ्याकडून दोन शब्द. तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच असेल तर... १. पहील्या वर्षी नापास झालात म्हणून नाउमेद होऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे. जो विषय अवघड जात असेल त्याचा क्लास लावा. २. चांगल्या मित्रां बरोबर रहाणे. लेक्चर बंक मारणा-या मित्रांची संगत सोडून देणे. ३.नियमीत अभ्यास करणे. पुस्तक हातात घेतल्यानंतर , झोप अथवा कंटाळा येत असेल तर निग्रहपुर्वक त्यावर मात करणे. वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला/औषधे घेणे. ४. सर्वात महत्वाचे - एकदा केलीली चूक पुन्हा न करणे. ५. उत्तम गुण मिळाले तर कदाचीत कँपस इन्टेर्व्हुमधेच सीलेक्ट व्हाल. नाही झाले तरीही इंजीनियर्सला अजूनही डीमांड आहे. तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच नसेल तर, १. अनिच्छेने इंजीनीयरींग करून पुढची ऐन उमेदीची वर्षे, पैसा वाया न घालवता आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेणे. २. आवडीच्या क्षेत्रात मात्र झोकून देऊन उत्क्रूष्टरीत्या शिक्षण पुर्ण करणे.

भीमराव 12/06/2015 - 11:11
भावा सोडायचच ठरवलं आहेस तर एक चान्स घेऊनच सोड. तु आत्ता १ च वर्ष वाय. डी. आहेस. सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे. तु नक्की पास होशिल. मि सोता फष्ट येर वाय.डी होतो पन नंतर परतेक वर्षी आल क्लेर विथ आबाव्ह ६० झालो ते हाच मंत्र वापरुन. आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो. भावा एकदाच नेटानं भिड परत, येश वाट बघतय दोन पावलावर.

In reply to by भीमराव

सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे आता ह्ये पन म्हाईत नसनारा म्हंजी मग त्यो विंजीनेरीगला का आला हो? ह्या असल्या गोष्टी त्यास्नी बारावीत कुनी सांगीतल्या नस्नार का ? आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय. उगा तसल्या गोष्टींची आट्वन करुन्श्यान दिऊ नगा. आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो. च्यायला, ह्या असल्या गोष्टी मास्तरं सांगत न्हाईत व्ह्य पयल्या लेक्चरामंदी ?

In reply to by सामान्यनागरिक

टवाळ कार्टा 12/06/2015 - 14:54
आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय.
या बाबत आधीच्या पिढीतल्या लोकांना काय अर्थ माहित होता?

भीमराव 12/06/2015 - 15:02
@ कोमन म्यान ते हायच वो पन हाजुक यक वेळ आठवन करुन दिली, उजळणी म्हणुन. विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात. आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा

In reply to by भीमराव

टवाळ कार्टा 12/06/2015 - 15:26
विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात.
असेच्च वागायचे असेल तर नक्को करू इंजिनीअरींग...पुर्ण करायला खूप त्रास सुध्धा होईल आणि डोक्यात सुध्धा काहीही जाणार नाही...नावापुरते इंजिनीअर होशील
आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा
लोक काय बोलतात याला फाट्यावर मारायचे...सबमिशन वेळेत पूर्ण करण्यासारखे नाही दुसरे...जेव्हा दुसरे रात्र रात्र जागून सबमिशन पूर्ण करत असतात तेव्हा आपण तंगड्या पसरून लोळत पडलेलो असतो...इंटर्नल मध्ये कमी लागते तो बोनस

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 12/06/2015 - 17:55
तो "खाटुक कमॉन" चा अपभ्रंश आहे !!!!! सरावाने दोन्ही क मधील एका क (चा) मोड ऊडाला !!! हा का ना का !! बॅट्या दुखावला नाहीस ना रे ! आजकाल दुखावण्याची साथ आली आहे रे म्हणून विचार ना ! आला पावसाळा ! आरोग्य संभाळा !! घोष वाक्य नाखुस

In reply to by नाखु

बॅटमॅन 12/06/2015 - 18:32
ठ्ठो =)) =)) =)) नाखुस, तुमच्यावर रागवून चालेल कसं? रहायचंय म्हटलं आम्हांला इथं!

In reply to by बॅटमॅन

नाखु 15/06/2015 - 09:28
काळजी नसावी मी स्वघोषीत प्रवक्ता * नाही त्या मुळे माझ्याकडून तुला कसलाही धोका+मोका नाही. धन्यवाद चिर्कुट नाखुस
*याचा सोदाहरण अर्थ गावडेसर लिखित "मिपा अर्थ्-अनर्थ मीमांसा आणि पदरमोड" या थोर ग्रंथात पान क्रं ५६ वर आहे

In reply to by टवाळ कार्टा

बबन ताम्बे 12/06/2015 - 17:01
हो, पण तुमची शंका व्हॅलीड आहे. एका माहीतीतल्या पंटरचे इंजिनीयरींगचे इयर डाऊन मुलीत गुंतल्यामुळेच झाले आहे. आता "गुंतल्यामुळे" या शब्दावर कोटी करायचा मोह टाळा . :-)

In reply to by असंका

सतिश गावडे 14/06/2015 - 21:07
स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याआधी एकदा त्याचं अधिकृत चरित्र वाचावं. ते वाचल्यानंतर वाचणार्‍याचं मत बदलण्याची खुप शक्यता असते.

मिपाकर मृत्युन्जय यांच्या मला आलेल्या खरडीमुळे हे विचार मनात आले. ते इथे मांडावेसे वाटले. मिपावर कुणी माहिती, मार्गदर्शन, मदत मागितली तर प्रतिसाद देणारे केवळ त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवूनच उत्तरे देतात असे नाही. याच धाग्यावर मी अन अनेकांनी लिहिलेले प्रतिसाद शिक्षण प्रवासात धक्के खाणार्‍या प्रत्येकाला प्रेरणा देऊ शकतात. एखाद्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा आपल्या पूर्वीही इतरांना अशाच ठेचा लागल्या आहेत अन त्यातून ते शहाणे होवून निघाले आहेत ही बाब नक्कीच हिंमत वाढवणारी ठरते. मिपाचे मिपाकर असलेले अन नसलेले वाचक पाहता अशा चर्चा किमान शेकडो किंवा कधी कधी हजारो लोक वाचत असतात. माझ्या ओळखीचे अनेक लोक बर्‍याच वर्षांपासून मिपा वाचतात आवडलेलं इतरांना सूचवतात. कदाचित त्यांनी आजवर मराठीतून एक वाक्यही टंकलं नसेल पण वाचनखंड मात्र पडत नसतो. परंतु बहुधा काही जण केवळ धागाकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून प्रतिक्रिया देतात असेही दिसते. मी नवा असताना माझा तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता? हा अन काही महिन्यांपूर्वीचा मी उपवर तरुण असतो तर या काथ्याकुटांवरील काही प्रतिसाद वाचून असे वाटते की त्या प्रतिसादकांचे असे मत आहे की केवळ धागाकर्त्यालाच उर्जाबचत करायची आहे अन स्वतःचा विवाह जुळवायचा आहे :-) .

आम्हाला अकरावीच्या इंग्रजीसाठी युवकभारती या पाठ्यपुस्तकात स्व. खुशवंतसिंह यांचा टेकिंग स्टडिज सिरियसली हा पाठ होता. आपल्या नर्मविनोदी शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गांभीर्य वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांच्या आजीचे त्यांच्याबद्दलचे इंग्लंडवरून शिकून परत आल्यानंतरचे हिंदीतले वाक्य होते.
क्या पास करके आया पता नही पर टाइम बहुत पास करके आया है!
माझी 12 वी 2013 ला झाली नंतर मी ENGINEERING ला प्रवेश घेतला पण प्रथम वर्षात नापास झालो. मी ENGINEERING सोडतोय कृपया इतर काही संधीचे मार्गदर्शन करावे