मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

गच्च मिठी शहारलेली

गणेशा ·
काव्यरस
हळुवार कातरवेळी गच्च मिठी शहारलेली चंदेरी किणार ल्यालेली आकाशी ओढणी रंगबिरंगी तव गालावर रेशमी किरणांची केशरी लाली जांभुळनयनात हरवली गच्च मिठी शहारलेली सोहळा रजनीगंधाचा स्पर्श रेशमी आनंदी .. लाजुनी दडला सूर्य ओठांची निशब्द बोली.. ---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०) * अवांतर : १. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....

एक आठवण

संजयशिवाजीरावगडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
एक आठवण तुझी येता कातरवेळी . काहुर जागवणारी मनातलं अवेळी. साजंकाळी येता तुझी एक आठवण . मन सुन्न होऊन जळणारी आठवण. मनातल्या मनातं रडणारी एक आठवण. मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण. जीव भेदून जाते आठवण तुझी जीवघेणी, देते मज असंख्य वेदना मनी. अशी तुझी ती एक आठवण !! @ संजय गडगे

प्रेम

संजयशिवाजीरावगडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात..

युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी

पाषाणभेद ·
काव्यरस
युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
तो: आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी ||धॄ|| ती: नको नको आता नको, माझा बा आनल काठी तो: नको तू अशी दुर पळू नको नको तू अशी दुर राहू नको दोन प्रेमाच्या फुलामधी तिसरा भुंगा तू आनू नको ती: असं नको करू, जवळ नको येवू माझा भाऊ लागलं आपल्या पाठी तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||१|| तो: ते बघ तुला दिसतंय काय ती: काय? तो: अगं, ते बघ तुला दिसतंय काय एक राघू, त्याची मैना, चोच चोचीत जाय ते बघ...

अंगाई

धनंजय ·
लेखनविषय:
काव्यरस
अंगाई - - - - - आठवतंय ना? मी गाडी चालवताना सावध बसायचास मुठी आवळून - दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून - - - - -

तुला आपलेसे करावे किती ?...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
तुला आपलेसे करावे किती ? जगावे किती ? मी ! मरावे किती ? किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? तुझी याद येते ! तसा तोल जातो सावरून मी ! वावरावे किती ? ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? चांदणे सारखे आज जाळू पहाते तुझे आज नसणे स्मरावे किती ? मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी" परक्या परी -हे झुरावे किती ? मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०

अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
(व्रुत्त पंचचामर... एक लघु आणि एक गुरु या क्रमाने ...अक्षरे योजली आहेत, पहिलाच प्रयत्न आहे.) मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा..... पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... जिवंत मी ! असा कसा?

मन पखरु

अनिल आपटे ·
लेखनविषय:
काव्यरस
मी तिला पाहिलं तिने मला पाहिलं दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि पाकळी होऊन गेलं

किनारा

शैलेन्द्र ·
लेखनविषय:
काव्यरस
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा, तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा. अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा. वनवास या सुखाचा मी विरहात साहीला, स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला, माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा, दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा. होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती, लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती, नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता, ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता. होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.

तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
पसारे तुझे आवरावे कशाला ? स्वत:ला असे सावरावे कशाला ? झोकून देतो मझ्यातला मी तुझ्यातच असे सापडावे कशाला ? जरा सांज होता तुझी याद येते पारव्याने असे गीत गावे कशाला ? तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा तुझ्यातून मी वावरावे कशाला ? तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला दीपकाने असे मंद व्हावे कशाला ? जरा कान देण्या कळी फूल होते भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ? जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला तरीही तिने मुस्कुरावे कशाला ? मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०