नातं तुझं माझं

लेखनविषय:
काव्यरस
नातं तुझं माझं आठवणींच्या पलिकडलं मनात वसलेलं डॊळ्यात साठलेलं हृदयात साठवलेलं नातं तुझं माझं पाण्यासारखं नितळ गहिरं जस कातळं खोल जस तळं हिरव गार जस मळं नुसत्या नावात न अडकणारं नुसत्या रेषांमधे न सामावणारं नुसत्या आभाळात न मावणारं नुसत्या देहात न राहणारं नातं तुझं माझं प्रसन्ना जीके.

वाचन

लेखनविषय:
काव्यरस
तू आणि तुझं वाचन.... टेबल-लॅम्पच्या प्रकाशात.. कॉम्पुटरच्या जगात नेटवर भटकणारा तू... एका हाताला थंड होत आलेलं जेवण.... दुसर्‍या हाताने पुस्तकाचा फडशा पाडणारा तू... शतपावली करताना मागे बांधलेल्या उजव्या हाताने डाव्या हातातल्या साप्ताहिकाशी सलगी करणारा तू... कधी उताणा तर कधी पोटावर झोपून हलत्या पायांच्या तालावर अंक चाळणारा तू... छातीवर उघडे मासिक वाचनखूण ठेवून वाचता-वाचता निद्रिस्त झालेला तू... प्रवासात मिळेल त्या जागेत अवघडून वर्तमानपत्र हाताळणारा तू....... जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून पानं उलटवणारा तू... .... ..... नाना तर्‍हा.... नाना सवयी....

गणित!

लेखनविषय:
काव्यरस
गर्द अरण्यात शिरताना हंस स्वतःशीच म्हणाला, "शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध - शून्य, अपूर्ण की पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका शून्याकडून पूर्णाकडे झेपावला... *** पंख आवरून उतरताना भूमीवर पाहिलं हंसानं तेव्हा 'शून्या'तही त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत श्वेत-धवल पंख एकाकी उड्डाण केलं तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "शून्य हेच तर पूर्ण!" रचना: केव्हातरी, २००८

'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो

लेखनविषय:
काव्यरस
दिवाळी नंतर आलेल्या विडंबनाच्या बहरात आमचेही एक कण्हेरीचे फूल. प्रेरणा: रंगाकाकांनी पाडलेले हे विडंबन . बाकी मात्रा-बित्रा नियमाप्रमाणे आधीच फाट्यावर मारल्याने त्यात सदर काव्य बसणार नाही याची काळजी घेतलेली आहे.

'गिरी' वाद

लेखनविषय:
काव्यरस
त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला.... ....असं ते म्हणतात. त्यांना 'गांधीगिरी' भावली नाही. आम्ही म्ह्टल, " तुमचा विरोध नक्की कशाला ? " तुम्ही उभं आयुष्य 'गांधीं'च्या मागे 'वाद' लावून जगलात. पण वादाने प्रश्न सुटत नाहीत...... .. ... आम्ही त्यांच्या मागे 'गिरी' उभा करतोय. आधी लोकांना हिमालयाची भव्यता दिसू दे... मग गंगेचे फायदे हळू हळु कळतीलच...............

गाणे आनंदाचे ... !

लेखनविषय:
काव्यरस
तेज दिपांचे उजळुन आले दिप मनींचे झणी प्रकाशले.. तेजाळल्या त्या ज्योतींमधुनी ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!! दिपवाळीच्या आनंदामध्ये आर्त मनांचे विरुनी गेले.. सुख-दु:खाच्या गंधासह मम आयुष्य सुखे गंधावून गेले..!! गाणे मनातले ओठी आले दिपावलीसह फुलून गेले.. सुमन सुगंधी दिपावलीचे दिपांसवे जिवनी दरवळले..!! कानी निनादती तेच तराणे सदैव एक ते आनंदी गाणे.. आले दिन सौख्याचे आले सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!! दिपावली शुभचिंतन ! विशाल.

<प्रवास>

लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा अर्थात कविवर्य मोडक यांचा प्रवास पळवाट म्हणाली, "आलास का! अडाणी आहेसच ठाउक नाही उत्तर तुला. प्रश्नही समजलेला नसतोच, ते येतात तेव्हा आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू होतो, मुळमार्गाकडं दुर्लक्ष होतं..." मूळप्रश्नाच भान राखणं हे तर उमगण, अन्यथा सारेच प्रतिसादी महाधूर्त! "महाधूर्तांच" बरं असतं, वारा बदलतो तसे तेही पण तुझ तसं नसतं म्हणून मी इथेच असते. अडाणीपणा करताना पाय फसतील म्हणून सांगतेय..." लिहताना केव्हा तरी भान सुटलं, वाचा भरकटली आता उपायाखाली केवळ माती अन भीतीच आहे मी पळतोच आहे... 'नाना फडणीसाचा पाय' दागिना मिरवत!

प्रवास

लेखनविषय:
काव्यरस
पायवाट म्हणाली, "सांभाळ! अनवाणीच आहेस ठाऊक नाही मुक्काम तुला. प्रश्न सुरवातीला नसतोच, ते येतात तेव्हा उत्तरांचा शोध सुरू होतो, वाटेकडं दुर्लक्ष होतं..." वाट राखणं हे तर जगणं, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी! "महामार्गाचं बरं असतं, तो बदलतो माझं तसं नसतं मी मातीचीच असते. अनवाणी चालताना पाय मळतील म्हणून सांगतेय..." चालताना केव्हा तरी वाट सुटली, भरकटली आता पायाखाली केवळ माती अन मातीच आहे मी चालतोच आहे... 'मातीचे पाय'चा दागिना मिरवत!

भिंगोरी..

लेखनविषय:
काव्यरस
क्षणांत खाली क्षणांत वरती श्वास झुलतो झुल्यावरी आभासांच्या मागे भिरभिर मन झाले गं भिंगोरी.. खळबळ मनांत धडधड उरांत चाहूल ही हृदयांतरी कधी आकाशी कधी जळाशी पाऊल माझे अधांतरी कशी आवरू कशी सावरू साद घालते कुणीतरी क्षणांत येथे क्षणांत तेथे चित्त नसे थार्‍यावरी किती करावे नवे बहाणे नशा चढावी मनावरी उगा रूसावे उगा हसावे राग लटका कधीतरी ओढ लागुनी स्पंद रूजावे माझ्या उरीचे तुझ्या उरी सोन स्वरांनी गीत सजावे प्रित फ़ुलावी जन्मांतरी - प्राजु

व्याकरण

लेखनविषय:
काव्यरस
तू सांगितलंस म्हणून नात्यांचं व्याकरण समजून घेताना संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" प्राधान्य ठरवण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील!
Subscribe to शांतरस