Skip to main content

करुण

एकाकी वाट

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 20/12/2009 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ****************
काव्यरस

शनिवारचा उतारा - (कृष्ण-ए-कमळ)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 19/12/2009 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे घ्या वाचकहो, शेवटी न राहवून एक विडंबन पाडलंच. प्रेरणा कृष्णकमळ मादक बंदरी रूप घाबरवी सोबत रसोई छंद फंद जन हे टवाळ मेंदूही गहाळ दंगा न कल्लोळ दंग दंग सजल गरळ निबंध बरळ न कोणी सरळ अंगी कळा अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे
काव्यरस

बुधवारची कविता: (वाढदिवस - ३)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 17/12/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामात व्यग्र असल्याने बरेच दिवसानी मिपावर आलो आणि हे सुचले. आमची प्रेरणा ओळखलीच असेल. ही बुधवारी सदरे, पाडण्यात वेळ गेला बाटली ठरे कपाटी, गिळण्यात वेळ गेला उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे परतता मिपावर, गणतीत वेळ गेला लावून ठोकशाही अवांतर चेपताना पडली कधीन रोशनी अंधारात तोल गेला का बुधवारी न येते मज भान चढल्याचे नशा उतरली परंतु गुरवारी वेळ गेला सरसावूनी लेखणी कविता विडंबताना पेशवाच राहीलो अन् गव्हर्नर कोणी झाला
काव्यरस

शनिवारचा उतारा - दुविधा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 12/12/2009 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
काव्यरस

(सवयीने मंद)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 09/12/2009 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा माझ्या मंदपणाची! टवाळीची साद घालून जाणारे विविध लेखकूंचे एकोळी धागे... काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ काही अस्ताव्यस्त काही सुस्त काही दळण तेच तेच दळणारे फक्त कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ... तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...
काव्यरस

जगलो जरी मी खुप.

लेखक टुकुल यांनी सोमवार, 07/12/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता. जगलो जरी मी खुप परी ते जगणे नव्हते, विद्वतेचा किताब घेवुन हात कधीच थांबले होते पडलो न कुणाच्या कामी तो शब्दांचा बाजार होता, त्या बाजारातच माझ्या व्यक्तिमत्वाचा र्‍हास होता. परी न दाखवली मी कुणा नाराजी असुनी या अंतरी, माझ्या पिलांनीच माझी फसगत केली सारी, परी जीव गुंतला त्यात जरी झाले मजला परके, ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा करावयास मन माझे हलके, जातानाही नाही सुटतील हे बंध रेशमाचे, या मायेच्या कपड्याला, शिवणारे हात विणकर्‍याचे.. जगलो जरी मी खुप.................
काव्यरस

शेवट

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 03/12/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का दुस्वास करावा..जाता जाता? चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली मागमूस याचा न उरावा..जाता जाता दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
काव्यरस

खंत.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/12/2009 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
२६-११-२००८ नंतर त्यावेळचे गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला , आणि आज १ वर्षानी परत तेच गृहमंत्री आहेत ! निर्लज्जपणाचा यापेक्षा दुसरा दाखला कुठे असेल? आणि हेच दिलासा देणार की अशोक कामते यांच्या बाबत चौकशी केली जाईल..... या परिस्थितीचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न..... खंत..... आसवांचे केव्हढे उपकार झाले , मारेकरी कणवेस साक्षीदार झाले ! ( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !) जाधवांचे दु:ख जाणावे कसे? साथ ते सोडून .....दावेदार झाले ! ( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आण
काव्यरस

<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 30/11/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे. अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.) ============== दिसलीस तू.. भेटलीस तू.. थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन) थांबला जणू रस्ता तेवढा जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू ! भासलीस तू कापरापरी, काजळी जणू.. काळजावरी लखलखती भिंगे ढापणी सांगती तुझी बातमी खरी न स्मित मोजके, न बोलणे कमी नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या.. जे मनात ते, बोललो कुठे? होत राहिले हेच नेहमी.. ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे.. आळसावणे.. डुलकणे तुझे.. त्या कळा कुठे?