Skip to main content

करुण

आदाब अर्ज है !( २६-०७-११) हार जाने का हौसला है मुझे.........

लेखक अश्फाक यांनी रविवार, 28/03/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया माझ्यासाठी अमुल्य आहेत, प्रतिक्षेत ......... २६-०७-११ ज़िन्दगी से यही गिला है मुझे ! ( गिला = तक्रार ) तू बहुत देर से मिला है मुझे !! हमसफ़र चाहिये हुजूम नहीं ! ( सहप्रवासी हवा गर्दी नको ) इक मुसाफ़िर भी काफ़िला है मुझे !! तू मोहब्बत से कोई चाल तो चल ! हार जाने का हौसला है मुझे !! लब कुशां हूं तो इस यकीन के साथ ! ( लब कुशां = तोंड उघडने ) कत्ल होने का हौसला है मुझे !! दिल धडकता नहीं सुलगता है ! वो जो ख्वाहिश थी, आबला है मुझे!!
काव्यरस

आदाब अर्ज है !

लेखक अश्फाक यांनी शनिवार, 27/03/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसलपाव च्या सन्माननिय सभासदाना नमस्कार , आपले लेखन वाचुन असे लक्शात आले कि गझल आनि शेर-ओ-शायरि बद्दल फार लोकाना जानुन घ्यायाचि इच्छा अस्ते , पन जास्त करुन गझल उर्दु भाशेत असतात आनि ते समजाय्तला कठिन असतात.तरि मि माझ्या परिने शक्य तित्के सोप्या भाशेत रोज काहि तरि नवीन ( भाशान्तर) द्यायचा प्रयत्न करेल .
काव्यरस

रस्ता ओलांडता

लेखक sur_nair यांनी सोमवार, 22/03/2010 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता ओलांडता आठवते चतुर्थीला गणपतीच्या देवळात आईचा हात धरून दर्शन घेताना आठवते अजून तो भरगर्दीतला रस्ता बाबांचा हात धरून ओलांडताना आठवतं अंधुकसं पहिल्यांदा जेव्हा आईनं शाळेत सोडलं होतं आठवतं जेव्हा, माझ्या हट्टाखातर बाबांनी खांद्यावर घेतलं होतं देवळात असो वा रस्ता ओलांडता किती सुरक्षित आहोत वाटायचे खांद्यावर बसून बाबांच्या मला आपण उंच झालो असे भासायचे पुढे वयाने मोठा, देहाने उंच झालो शाळा- कोलेजात जाऊन सुशिक्षित झालो अन रस्ता पार करता करता जाणवले आपण एकटेच फक्त आता पुढे आलो आई बाबा जसे होते तिथेच राहिले रस्त्याच्या त्या दुसरया बाजूला मधेच
काव्यरस

नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 15/03/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
करुण रस म्हटलं आहे, पण तो फारच पाणचट तर्रीसारखा वाटतो. हे काव्य बरोबर साधण्यासाठी उद्विग्नता, विमनस्कता, थकवा, हातबल्य असे अनेक रस मला माझ्या आत्म्यातून पिळून काढून त्यात घालावे लागले. (गदिमांच्या प्रतिभेला वंदन करून. त्यांच्या ताजमहालाला वीट लावण्याचं धार्ष्ट्य केवळ नाडीकथांचा वीट आल्यामुळेच झालं. मूळ कविता खाली दिलेली आहे) नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!
काव्यरस

))तुझ्या रेशमी केसांनी((

लेखक तुका म्हणे यांनी रविवार, 14/03/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ: विजूभाऊचा हा मूळ धागा: http://www.misalpav.com/node/11426#comment-182034 रेशमी केसात तुझ्या जीव माझा गुंतला धुंद या काळ्या बटा, अन प्राण घेई मोगरा का आता गमजा करी? तारका नभातल्या भेटीत पहिल्याच तुझ्या, चंद्रमाही लाजला सोडू कसा हा नाद मी, सांग तू माझ्या फुला, प्रेमात तुझ्या भारावलो, सूर ऐसा लागला होतो खुळा, आहे खुळा, भान न त्याचे मला जादू भरले नैन तुझे हे, ठेवती न माझा मला, कळले मला ग प्रेम ते, उमजले का सांग तुला, जेव्हा तुझ्या हातास अलगद, हात माझा स्पर्शला
काव्यरस

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 14/03/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रेशमी केसांनी : एक सुडंबन विजुभाऊंनी विघडवलेलं सुघडवण्याचा माझा प्रयत्न. मूळ विडंबनाशी एकनिष्ठ राहाण्यासाठी यमक, वृत्त, कवितेचा स्वर व बरेचसे शब्द तेच ठेवलेले आहेत.
काव्यरस

बेघर

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/03/2010 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं या पावसातही तुझ्या आठवणींना लपेटून घेतलं मी कवितेत. हळूच दुडले काही दिवस एकमेकांसोबतचे शाकारली स्वप्नांची कौलं नि पडलो जरासा वाचत मजेत नव्या छपराखाली त्याची वाट बघत चवदार शब्दांचे घुटके घेत पण वाचता वाचता डोळा लागताच हा कोसळून गेला धबाधबा माझी फिरकी घेत. जाग येऊन बेघर झालो पुन्हा नि फुटक्या कौलांचा तो ढीग घेतला पुन्हा कवेत. आता आधी कौलं घालू की वाचन संपवू इतकाच प्रश्न आहे. पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!
काव्यरस

पाठलाग

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 12/03/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग गुंतुनी इश्कांत तुझिया , वैफल्यता मी ल्यायली. दर्द आठवणींचा उरी, झोप नित्त्याची लोपली ! मरण माझे याच देहि याच डोळा पाहिले, पोहोचलो मरणद्वारी परि,यातनांनी ना त्यागले ! होतो पहुडलो शांत येथे, आज मी सरणावरी, आलीस त्रास देण्या पुन्हा, काढीत माग इथवरी ! निरंजन वहालेकर
काव्यरस

भग्न किनारे

लेखक जयवी यांनी बुधवार, 10/03/2010 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
का उदास वाटते नयनी पाणी दाटते असून घोळक्यातही एकलेच वाटते बोलणे नको नको मौन सुखद वाटते विचारही मनी नको रितेच मुक्त वाटते शांत सागरातही भोवरे नवे नवे वादळे जुनी परी भग्न किनारे नवे उजाड माळरान हे गंध, गारवा नको श्रावणातही घना बरसणे तुझे नको जयश्री
काव्यरस

जाणीव

लेखक तुका म्हणे यांनी मंगळवार, 09/03/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेल्यावर शरद चांदणे, कधीच पडले नाही, पुन्हा पहाटे निशिगंधाचे फूल उमलले नाही. तू गेल्यावर पुन्हा मोगरा, तसाच सजला नाही, खिडकी मधुनी चंद्र चोरटा, कधीच दिसला नाही. तू गेल्यावर हरवून गेली, अंधारातील वाट, आकाशातील ताऱ्यानशी मग, पुन्हा न घडली गाठ. तू गेल्यावर पाउस पहिला, कधीच पडला नाही, अन भिजलेला सूर गळ्यातून कधी उमटला नाही. तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा, वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता. तू गेल्यावर वाटे मजला, असे हरवले काही, शोधीत फिरतो इथे तिथे, पण तरी गवसले नाही. - तुका म्हणे
काव्यरस