मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

मौनाचं वादळ

जयवी ·
लेखनविषय:
काव्यरस
काहीतरी खुपतंय, सलतंय आत कुठंतरी खोलवर दुखतंय आज उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज कुठतरी खोलवर दुखतंय आज जयश्री अंबासकर

कत्तलखाना !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
!जनावरांचे कळप चालत असतात कत्तलखान्याकडे हाडांचे जणू सापळे सरकत असतात ह्या कत्तलखान्याकडे लवथवते विक्राळपण ह्यांच्या डोळ्यातून पाझरत असते तरी सरकत असतात गुरांचे कळप मुकाटपणे नजरेत नसते कसली ओढ घरादाराची तरी ओढली जातात अनामिक ओढीने ह्या जनावरांचे कळप डोळे कोठे लागलेले असतात शून्यात कोठेतरी त्याना येत असतो पाठीवर बसलेल्या काठीचा आवाज नि बेचैन होऊन सरकत असतात झुंडीने अनामिक दिशेला एखादे जनावर मुतते फदाफदा नि हगते जीव घाबरा झाल्यासारखा एखादा कावळा बसतो त्यांच्या शिंगावर शहाजोगपणे मजेने स्वताची हाउस घेत असतो पुरवून जनावरांना नाही वाटत सुख, नाही फुलत रोमांच त्यांच्या कातडीवर कसे हो

नवा दे घाव वेदनांना...........

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
किनारे लोटुनी सारे प्रावाही शांत वाहताना किती गर्दी तुझी आहे? इथे एकांत असताना मुका होईन मी जेव्हा तुझ्या दे त्रास ओठांना चुका मोजू नको माझ्या सजा दे खास ओठांना किती ओशाळले सारे पुरावे न्याय होताना तुझा आभास वावरवा अशी दे स्मृति आठवांना शब्द माझे मागती ती तुझी दे चाल गीतान्ना चन्द्र तू चांदणे मी लाजवू या चांदण्याना झोप माझी वाट पाही अशी दे जाग स्वप्नांना जाणीवा गोठल्या माझ्या नवा दे घाव वेदनांना माझी कविता ..मयुरेश साने..24-July-10

आई...मिटलेला श्वास - ११

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
आई...मिटलेला श्वास -१० अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी मनभृंग पोखरे विचारांच्या भिंती छ्प्पर हरविलेले घरटे विराण रडती अंतरीचे दाटता धुके भासांची स्मरणे मागे दग्ध भाव निर्मिते मायेचे सोवळे धागे -------- शब्दमेघ

बाबा !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
खूप पावसाळे डोक्यावरून गेले मोजू नये ईतकी वर्ष उलटली परंतु तुम्ही माझ्या आठवणीत सतत असता बाबा !! हे शपत कुणाला सांगायला हवे का ?? तुम्ही अचानक निघून गेलात असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !! आह्मी तर लहान होतो नि आईचे तर किती छान दिवस होते हौस-मजेचे आणि तुम्ही एकदम निघून गेलात अचानक !! किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व दुखाचा पहाड कोसळला आई नको त्या वयात म्हातारी झाली पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ?? माझी बायको मुले फक्त तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !! त्यांना काय वाटते ?

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही ! अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही तोडून तसबीरिला - ती एकसंध राही ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही मागुन ही सुखाला - आले न हाती काही दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई? कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10

कशी बदलून जाते ही सुंदर सकाळ !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
कशी मस्त सकाळ उगवत असते हलक्याफुलक्या पिसासारखी .....!! अंगावर कसा गोड काटा फुलवीत बसते ही थंडीची सकाळ बिस्स्मिल्लाखांच्या सनई सारखी कशी वेलांटत येतेय ही सकाळ ....

प्रतिभावंत !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
तो एक प्रतिभावंत कवी होता त्याच्या मनाच्या तळाशी झुळझुळनार्या प्रतिभेचा एक झरा होता कुणास ठाऊक कोणी काय केले ? कसे केले ? कशासाठी केले?? त्याच्या प्रतिभेचा झरा कसा गेला आटून ? अचानक !.नकळत!!

आई... मिटलेला श्वास.. १०

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
भाग ९ :- http://www.misalpav.com/node/15559 नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ---- शब्दमेघ

अधुरी प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा बसता अशा कातर वेळी कानी कोण गुणगुणे गाणी? झोंबताना ह्या कोवळ्या तनुस कोण करते भलतीच मागणी? ज्याने ह्रुदयास पीडा दिली तोच कसा ह्रदयी बसला? कोवळ्या मम तनुस छेडुन यौवन कसे जागवून गेला. कसा मी विसरु त्याला तो रोम रोमात भिनला सारखा तो आठवतो का? जो जखमा देवुन गेला तुझी लागलेली हि आस हा भास कि आभास आहे तु आता माझा नाहि हे मज का उमगत नाहि? केंव्हा सरेल ति माझी काळरात्र घनघोर अंधारी? कधि उजाडणार मम जिवनी ति पहाट सोनेरी? काय सांगु काय बोलु मन माझे था~यावर नाहि दाटुन येते निर नयनि लिहित