मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता मला वाटते भिती

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

अत्रुप्त आत्मा ·
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;) गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे माझ्या माळ्यावरी.. आ.. त, करं-कचून बांधलेले..! आलो होतो देवळात मी काहि अभिषेकांसाठी फक्त वर्षाचे "झाले किती???" पाचशे पाचशे शोषिती रक्त अडिच लाखा चा दगड लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला बाकीच्यांचे निर्माल्य काहि.. शे-कोटिंचा पाचोळा! ================ मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु

( काळा असे कुणाचा)

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे. काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची? चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा रांगेत राहणेही विपरीत होत आहे ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे! - स्वामी संकेतानंद

(पडुन आहे नोट अजुनी)

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे? एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे? अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे? सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू? उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे? बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे? उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे? - स्वामी संकेतानंद

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

(फेंदारलेल्या मिशा....)

नाखु ·
लेखनविषय:
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात