मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गडकोट किल्ले एक सांस्कृतिक ठेवा

सार्थबोध ·
गुरुवार. कंपनीतला नेहमीचा दिवस. दुपारच्या जेवणात आमच्या आप्पाने ट्रेकचा विषय काढला. कामाचा ताण खूप होता; कुणाचे काही काम, तर कोण गावी जाणार होता. आम्ही हो-नाही, हो-नाहीला सुरुवात केली. मी, विक्या, वैभ्या, बापू, पप्या, अण्णा, आप्पा ( हायटेक सॉफ्टवेअरमध्ये असलो तरी घरगुती टोपणनावांची प्रथा आम्ही कायम ठेवली आहे.) चर्चेला सुरुवात झाली. पाऊस नुकताच सुरु झाला होता, शनिवार धरून ‘तिकोणा’ गाठायचे ठरले. जेवण आटोपून जागेवर आलो. कोणी गूगलवर नकाशे बघू लागला, कोणी आधी कोण जाऊन आले आहेत त्यांचे फोटो बघू लागला. आता खरी सुरुवात झाली होती. मी खायला काय न्यायचे, पाणी की ताक, इत्यादी गोष्टी बघू लागलो.

चित्रगुप्त 01/11/2013 - 15:38
छान लिहिले आहे. मुख्य म्हणजे अनिष्ट गोष्टींविषयी नुस्ती कुरकुर करत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीत चांगला बदल घडून यावा, म्हणून प्रत्यक्षात काहीतरी करणे महत्वाचे. हे कार्य तुम्ही करत आहात, हे वाचून फार समाधान वाटले.

पैसा 02/11/2013 - 13:07
लिखाण आवडले. असे ट्रेक्स जाणीवपूर्वक जास्त लोकांना घेऊन आयोजित करा. त्यातूनच निदान १० पैकी २ तरी तो वारसा पुढे चालू ठेवतील!

सुहास झेले 03/11/2013 - 08:18
माझा अतिशय आवडता किल्ला.... बाकी हल्लीच्या उत्साही (?) ट्रेकर्स मंडळींबद्दल न बोललेच बरे. ट्रेक म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट झालेत हल्ली... असो अजून काय बोलावे.... :-|

चक्रम हायकर्स चे एक सदस्य श्री अमेय गोखले यांची एक सूचना आपण ट्रेकर मंडळीनी अनुसर्ण्याजोगी आहे ट्रेक चे फोटो टाकताना त्यावर पुढील वाक्य ते कायम टाकतात "keep this place clean No Litter ,No Plastic ,no Wrappers फोटो पाहणाऱ्या पर्यंत हे आवाहन आपोआप पोहोचते.

जॅक डनियल्स 17/11/2013 - 00:27
चांगले विचार आहेत, आणि लेख पण मस्त जमून आला आहे. पण
अन्नपदार्थ शिल्लक राहिल्यास तेथील वन्य प्राण्यांना देता येतात का, ते पाहावे.
हा मुद्दा काही पटला नाही. तसेच हे केल्यामुळे पुढे वन्य प्राण्यांना त्रास होऊ शकतो. निसर्गातून खाद्य कसे मिळवायचे हे प्राण्यांना चांगले माहित असते, आणि तेच त्यांचे नैसर्गिक खाद्य असते. तुम्ही त्यांना लेज चे चिप्स आणि पोळ्या खायला घातल्या तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते किंवा ते आळशी बनू शकतात. अशा ठिकाणी माकडांना, अतिउत्साही लोकं आधी खायला घालतात, आणि मग काही दिवसाने, तिच माकडे लोकांच्या हातून खाद्य हिसकावून घ्यायला लागली की त्यांना पकडायला लोकं बोलवायला लागतात. माझ्या मते तर, वन्य प्राण्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे,उगाच त्यांच्या लाइफ ढवळाढवळ करायला जाऊच नये.

In reply to by जॅक डनियल्स

सार्थबोध 05/12/2013 - 14:58
जॅक डनियल्स , तुमचा मुद्दा योग्य आहे, किंबहुना माझ्याकडून या बाबतीत विस्तृत लिहिणे राहिले आहे, हे आले शक्यतो आम्ही फळे, शेंगा देत असतो माकडांना आणि पक्ष्यांना तांदूळ इत्यदि… लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे

चित्रगुप्त 01/11/2013 - 15:38
छान लिहिले आहे. मुख्य म्हणजे अनिष्ट गोष्टींविषयी नुस्ती कुरकुर करत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीत चांगला बदल घडून यावा, म्हणून प्रत्यक्षात काहीतरी करणे महत्वाचे. हे कार्य तुम्ही करत आहात, हे वाचून फार समाधान वाटले.

पैसा 02/11/2013 - 13:07
लिखाण आवडले. असे ट्रेक्स जाणीवपूर्वक जास्त लोकांना घेऊन आयोजित करा. त्यातूनच निदान १० पैकी २ तरी तो वारसा पुढे चालू ठेवतील!

सुहास झेले 03/11/2013 - 08:18
माझा अतिशय आवडता किल्ला.... बाकी हल्लीच्या उत्साही (?) ट्रेकर्स मंडळींबद्दल न बोललेच बरे. ट्रेक म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट झालेत हल्ली... असो अजून काय बोलावे.... :-|

चक्रम हायकर्स चे एक सदस्य श्री अमेय गोखले यांची एक सूचना आपण ट्रेकर मंडळीनी अनुसर्ण्याजोगी आहे ट्रेक चे फोटो टाकताना त्यावर पुढील वाक्य ते कायम टाकतात "keep this place clean No Litter ,No Plastic ,no Wrappers फोटो पाहणाऱ्या पर्यंत हे आवाहन आपोआप पोहोचते.

जॅक डनियल्स 17/11/2013 - 00:27
चांगले विचार आहेत, आणि लेख पण मस्त जमून आला आहे. पण
अन्नपदार्थ शिल्लक राहिल्यास तेथील वन्य प्राण्यांना देता येतात का, ते पाहावे.
हा मुद्दा काही पटला नाही. तसेच हे केल्यामुळे पुढे वन्य प्राण्यांना त्रास होऊ शकतो. निसर्गातून खाद्य कसे मिळवायचे हे प्राण्यांना चांगले माहित असते, आणि तेच त्यांचे नैसर्गिक खाद्य असते. तुम्ही त्यांना लेज चे चिप्स आणि पोळ्या खायला घातल्या तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते किंवा ते आळशी बनू शकतात. अशा ठिकाणी माकडांना, अतिउत्साही लोकं आधी खायला घालतात, आणि मग काही दिवसाने, तिच माकडे लोकांच्या हातून खाद्य हिसकावून घ्यायला लागली की त्यांना पकडायला लोकं बोलवायला लागतात. माझ्या मते तर, वन्य प्राण्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे,उगाच त्यांच्या लाइफ ढवळाढवळ करायला जाऊच नये.

In reply to by जॅक डनियल्स

सार्थबोध 05/12/2013 - 14:58
जॅक डनियल्स , तुमचा मुद्दा योग्य आहे, किंबहुना माझ्याकडून या बाबतीत विस्तृत लिहिणे राहिले आहे, हे आले शक्यतो आम्ही फळे, शेंगा देत असतो माकडांना आणि पक्ष्यांना तांदूळ इत्यदि… लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे

रोहित

सुहास झेले ·
रात्रीचे ११ वाजलेत. मुंबई-गुजरात महामार्गावरून आमची गाडी सुसाट वेगाने डहाणूच्या दिशेने रस्ता कापत होती. इच्छितस्थळी पोचण्यास अजून किमान ४०-४५ मिनिटे लागणार होती आणि त्यात गाडीतल्या वायरलेसची खर-खर डोक्यात जात होती. मनात भीतीचे काहूर दाटले होते. काय होणार पुढे... काही काही कळत नव्हते. रस्त्यावर रहदारी तुरळक होती, पण प्रसन्नदा गाडी ८०-१०० च्या वेगाने दामटवत होते. आम्ही दोघेही शांत होतो. काय बोलावे सुचेनाच. मी सतत साईड मिररमधून मागे बघत होतो...कोणी पाठलाग तर करत नाही ना..कोणाला काही संशय वगैरे आला असेल का? मी सारखा त्याच विचाराने अस्वस्थ होतो.

पैसा 02/11/2013 - 01:11
शेवटपर्यंत श्वास रोखून वाचत गेले. आमच्या शेजार्‍यांचा एक नातेवाईक मुलगा असा स्पेशल चाईल्ड आहे. आईबापांचं आयुष्य कधी कधी गहाण टाकल्यासारखं होऊन जातं. रोहितला निदान काही काळतरी समजून घेणारे बाबा भेटले असतील असं समजूया. पण तेही म्हातारेच होते. त्यांच्यानंतर? रोहितच्या खर्‍या आईबाबांकडे चांगला पैसा असावा, मग ते त्याला एखाद्या संस्थेतही ठेवू शकले असते नाही का? फार करुण वाटलं वाचताना; पण हा अर्धविराम वाचून (हो... हा या कहाणीचा शेवट नाहीये नक्कीच) थोडं बरंही वाटलं.

सुझे, लेखनशैली श्वास रोखून लेखन वाचायला लावणारी. रोहितला समजून घेणारं मिळालं ही एक गोष्ट आशादायक वाटली. परिचितात एक मुलगी असल्यामुळे अशा मुला-मुलींचं, त्यांच्या पालकांची खूप गोची होती, हे मात्र खरं आहे. लेखन पोहचलं. -दिलीप बिरुटे

सुहास, लेखन अप्रतीम. मला असं काही आजुबाजुला बघताना खुप टेंशनच येतं. माझ्या एक दोन मित्रांकडे तु लिहीलंय्स तसेच प्रौब्लेम्स आहेत. अगदी तु त्या घरच्याच अड्चणी लिहील्यास असे वाट्त होते, वाचताना. मस्त.

भानस 05/11/2013 - 06:32
कथा आवडली. कथेचा फ्लो एकदम मस्त आहे. आमच्या शेजारी असाच एक मुलगा होता. नानाबरोबर त्याने सिनेमात कामही केलीत. बहुतांशी वेळेला तो बरा असे पण अतिशय अनप्रेडिक्टेबल वागणे असते. एका क्षणात मारायला यायचा. आई-बाबा व त्याची, अशी खरे तर सगळ्यांचीच मनःस्थिती फार वाईट. शिवाय या मुलांची शारिरीक वाढ होत असतेच त्यामुळे ताकद व इतरही प्रश्न निर्माण होतात. सगळ्यांच्याच पेशन्सचा कस लागतो हेच खरं. त्यामुळे कधी कोणाचा तोल सुटेल आणि तो कुठल्या टोकाला जाऊन थांबेल याचा अंदाज येणे अशक्य आहे.

कारण मी स्वतः अश्या एका मुलीची मोठी बहिण आहे. पिंकू, माझी पिंकू. आज ती या जगात नाही, पण जेवढी वर्ष ती आमच्या घरात होती तेवढी वर्ष एका वेगळ्या भावबंधनात आम्ही जगलो . आर्थिक अडचण होती त्यामुळे कोणत्या हि संस्थेत आम्ही तिला टाकु शकलो नाही. पण घरच्या घरीच तिची भाषा समजुन, जाणुन तिच्या कलेने आम्ही तिला जपले आणि ती हि आम्हाला एक वेगळे भावविश्व दाखवून गेली.पेशन्सचा कस लागतो मानते, पण तरीही प्रेम या सर्वांवर रामबाण औषध आहे. माझी पिंकू बोलू शकत नव्हती तरी हि हातवारे करून, चेहऱ्यावरून तिच्या मनातले कळुन जायचे मला. लग्न होऊन पहिल्यांदाच माघार पणाला आलेली ताई आपल्याला सोडुन परत जातेय हे कसे कळले असेल तिला? मला मिठी मारून स्वतःच्या भाओजीना दूर सारण्याइतके शहाणपण कसे आले तिला? माझ्या ताईचे बाळ आहे असे न सांगताच कुणा त्रयस्थाला बाळाला हात न लावुन देणे एवढा समजुतदारपणा कसा आला तिच्यात. सुहास भाऊ, डोळ्यात पाणी आणलेत हो तुम्ही.

In reply to by भावना कल्लोळ

बाह्यांगावर नाही तर अंतरंगावर केलेलं पवित्र प्रेम अद्वैताची भावना जागवतं. तू तू राहात नाही मी मी राहात नाही. आपण एकरूप होतो. एकमेकांपासून देहाने दूर झालो, अगदी एखादी व्यक्ती अनंतात विलीन झाली तरी ती आपल्या मनाचा एक कोपरा बनून कायम निकट राहते.

वेल्लाभट 07/11/2013 - 14:48
काहीच्या काही आवडलंय लिखाण. शेवटपर्यंत म्हणजे; थांबताच आलं नाही. बाकी झालेल्या प्रसंगाचं म्हणाल, तर प्रसन्नदा च्या बाबांचं खरंच खूप कौतुक. तुम्ही केलेली अ‍ॅक्टही बरोबर होती. एकंदरित; छान थ्रिलर वाचायला मिळालं, आवडलं.

स्पंदना 08/11/2013 - 04:37
काहीही बोलायच धाडस होत नाही अश्यावेळी. सिंगापुरात एकदा एका दुपारी अभद्र अश्या किंकाळ्या ऐकुन खाली धावले. असाच सतरा अठरा वर्षाचा कोवळा तरुण अन त्याची हतबल आई, बिल्दिंगच्या एका कोपर्‍यात झगडत होते. ती आई पुन्हा पुन्हा त्याच्याकडे धावत होती, अन तो तिला लोटुन देउन स्वतःला मारुन घेत होता. आईच्या डोळ्यातल पाणी अजुनही मला गुदमरवुन टाक्त. हे लिहीण सुद्धा शक्य होत नाही आहे. सगळा स्क्रीन धुस्र होउन गेलाय. त्या अईच पुन्हा पुन्हा त्याच्याकडे धावण की त्यान स्वतःल जखमी करुन घेउ नये...राहू दे.

पैसा 02/11/2013 - 01:11
शेवटपर्यंत श्वास रोखून वाचत गेले. आमच्या शेजार्‍यांचा एक नातेवाईक मुलगा असा स्पेशल चाईल्ड आहे. आईबापांचं आयुष्य कधी कधी गहाण टाकल्यासारखं होऊन जातं. रोहितला निदान काही काळतरी समजून घेणारे बाबा भेटले असतील असं समजूया. पण तेही म्हातारेच होते. त्यांच्यानंतर? रोहितच्या खर्‍या आईबाबांकडे चांगला पैसा असावा, मग ते त्याला एखाद्या संस्थेतही ठेवू शकले असते नाही का? फार करुण वाटलं वाचताना; पण हा अर्धविराम वाचून (हो... हा या कहाणीचा शेवट नाहीये नक्कीच) थोडं बरंही वाटलं.

सुझे, लेखनशैली श्वास रोखून लेखन वाचायला लावणारी. रोहितला समजून घेणारं मिळालं ही एक गोष्ट आशादायक वाटली. परिचितात एक मुलगी असल्यामुळे अशा मुला-मुलींचं, त्यांच्या पालकांची खूप गोची होती, हे मात्र खरं आहे. लेखन पोहचलं. -दिलीप बिरुटे

सुहास, लेखन अप्रतीम. मला असं काही आजुबाजुला बघताना खुप टेंशनच येतं. माझ्या एक दोन मित्रांकडे तु लिहीलंय्स तसेच प्रौब्लेम्स आहेत. अगदी तु त्या घरच्याच अड्चणी लिहील्यास असे वाट्त होते, वाचताना. मस्त.

भानस 05/11/2013 - 06:32
कथा आवडली. कथेचा फ्लो एकदम मस्त आहे. आमच्या शेजारी असाच एक मुलगा होता. नानाबरोबर त्याने सिनेमात कामही केलीत. बहुतांशी वेळेला तो बरा असे पण अतिशय अनप्रेडिक्टेबल वागणे असते. एका क्षणात मारायला यायचा. आई-बाबा व त्याची, अशी खरे तर सगळ्यांचीच मनःस्थिती फार वाईट. शिवाय या मुलांची शारिरीक वाढ होत असतेच त्यामुळे ताकद व इतरही प्रश्न निर्माण होतात. सगळ्यांच्याच पेशन्सचा कस लागतो हेच खरं. त्यामुळे कधी कोणाचा तोल सुटेल आणि तो कुठल्या टोकाला जाऊन थांबेल याचा अंदाज येणे अशक्य आहे.

कारण मी स्वतः अश्या एका मुलीची मोठी बहिण आहे. पिंकू, माझी पिंकू. आज ती या जगात नाही, पण जेवढी वर्ष ती आमच्या घरात होती तेवढी वर्ष एका वेगळ्या भावबंधनात आम्ही जगलो . आर्थिक अडचण होती त्यामुळे कोणत्या हि संस्थेत आम्ही तिला टाकु शकलो नाही. पण घरच्या घरीच तिची भाषा समजुन, जाणुन तिच्या कलेने आम्ही तिला जपले आणि ती हि आम्हाला एक वेगळे भावविश्व दाखवून गेली.पेशन्सचा कस लागतो मानते, पण तरीही प्रेम या सर्वांवर रामबाण औषध आहे. माझी पिंकू बोलू शकत नव्हती तरी हि हातवारे करून, चेहऱ्यावरून तिच्या मनातले कळुन जायचे मला. लग्न होऊन पहिल्यांदाच माघार पणाला आलेली ताई आपल्याला सोडुन परत जातेय हे कसे कळले असेल तिला? मला मिठी मारून स्वतःच्या भाओजीना दूर सारण्याइतके शहाणपण कसे आले तिला? माझ्या ताईचे बाळ आहे असे न सांगताच कुणा त्रयस्थाला बाळाला हात न लावुन देणे एवढा समजुतदारपणा कसा आला तिच्यात. सुहास भाऊ, डोळ्यात पाणी आणलेत हो तुम्ही.

In reply to by भावना कल्लोळ

बाह्यांगावर नाही तर अंतरंगावर केलेलं पवित्र प्रेम अद्वैताची भावना जागवतं. तू तू राहात नाही मी मी राहात नाही. आपण एकरूप होतो. एकमेकांपासून देहाने दूर झालो, अगदी एखादी व्यक्ती अनंतात विलीन झाली तरी ती आपल्या मनाचा एक कोपरा बनून कायम निकट राहते.

वेल्लाभट 07/11/2013 - 14:48
काहीच्या काही आवडलंय लिखाण. शेवटपर्यंत म्हणजे; थांबताच आलं नाही. बाकी झालेल्या प्रसंगाचं म्हणाल, तर प्रसन्नदा च्या बाबांचं खरंच खूप कौतुक. तुम्ही केलेली अ‍ॅक्टही बरोबर होती. एकंदरित; छान थ्रिलर वाचायला मिळालं, आवडलं.

स्पंदना 08/11/2013 - 04:37
काहीही बोलायच धाडस होत नाही अश्यावेळी. सिंगापुरात एकदा एका दुपारी अभद्र अश्या किंकाळ्या ऐकुन खाली धावले. असाच सतरा अठरा वर्षाचा कोवळा तरुण अन त्याची हतबल आई, बिल्दिंगच्या एका कोपर्‍यात झगडत होते. ती आई पुन्हा पुन्हा त्याच्याकडे धावत होती, अन तो तिला लोटुन देउन स्वतःला मारुन घेत होता. आईच्या डोळ्यातल पाणी अजुनही मला गुदमरवुन टाक्त. हे लिहीण सुद्धा शक्य होत नाही आहे. सगळा स्क्रीन धुस्र होउन गेलाय. त्या अईच पुन्हा पुन्हा त्याच्याकडे धावण की त्यान स्वतःल जखमी करुन घेउ नये...राहू दे.

सत्व

psajid ·
सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणे उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री. दीक्षित यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती. परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोपेमुळे असेल, श्री. दीक्षित तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दीक्षित यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसे पाहून तिला अचंबा वाटला. थोडा वेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्र रूपात त्यांच्या दरवाजात अवतरली. अगदीच नाइलाज झाला, तसे श्री. दीक्षितांनी दरवाजा उघडला.

पैसा 02/11/2013 - 12:47
भावभावनांचे हिंदोळे अगदी छान टिपलेत! उतारवयात कोणाची साथ घ्यावी का हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण एकूण कथा, त्यातलं वातावरण, विचार फारच छान आले आहेत! अधुरी एक कहाणी आवडली! म्हटलं तर शेवट आहे म्हटलं तर नाही!

कथेचा आशय चांगला आहे. पण त्याची मांडणी बर्‍यापैकी चुकल्यासारखी वाटते आहे. अजिबात ओळख नसलेले दोन वृद्ध भेटतात एकत्र गप्पा मारतात इथपर्यंत पटतं पण दोघेही स्वतःशीच प्रामाणिक वाटत नाहित. प्रेम भावना (त्या वयातही) अपवित्र नाही. पण आजपर्यंत आपण आपल्या जोडीदाराच्या आठवणी उराशी बाळगून 'एकटेच' जगलो आहोत म्हणजे खूप मोठा 'त्याग' केला आहे ह्या विचारांमागे अहंभावना जाणवते आहे. आपल्या आयुष्याला आपणच लावलेले हे 'त्यागाचे' बिरुद पुन्हा लग्नाचा विचार जरी केला तरी समाजापुढे मलीन होऊन जाईल आणि तथाकथित 'तपस्येला' गालबोट लागेल ही अनाकलनिय 'भिती' प्रामाणिक प्रेमभावनेला मारून, समाजातील आपल्या 'त्यागी' ह्या भ्रामक प्रतिमेला गोंजारत, स्वतःवरच अन्याय करणारी आहे. इतकी वर्षे, आपल्या उदात्त प्रेमाला हृदयाशी कवटाळून आयुष्य व्यतीत केले आणि आता वृद्धापकाळी जेंव्हा शारीरिक आकर्षण उरत नाही, शारीरिक गरजेचा दबाव मनावर राहात नाही, अशा वेळी दुसर्‍या स्त्री/पुरुषाचे आकर्षण, क्षणैक असले तरी पुनर्भेटीसाठी इतके उतावीळ होणे (लागोपाठ एकमेकांना शोधत ५ दिवस भटकणे इ.इ.) हेच हृदयाशी कवटाळलेल्या 'उदात्त' प्रेमाभावनेला तडा देणारे आहे. त्यात अनैसर्गिक कांहीच नाही. पण नैसर्गिक भावनेचा अस्विकार करून पुन्हा त्या भ्रामक 'उदात्तते'चा मुखवटा धारण करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच नैसर्गिग भावनेशी प्रतारणा करणारा आहे. असो. आपल्या समाजात अजूनही स्त्री, एवढा पुढाकार घेऊन (दूसर्‍या भेटीत), एका परपुरुषाला गृहीत धरून एवढीमोठी लेक्चरबाजी करीत नाही. लेखकाच्या मनांत दोन्ही व्यक्तींच्या मनांतील भावनांची इत्यंभूत माहिती आहे पण कथेतील दोन्ही पात्रे एकमेकांना संपूर्णतः अनोळखी आहेत. पण श्रीमती संगिता जोग श्री. रामचंद्र दिक्षितांना संपूर्ण गृहीत धरून, अगदी न चाचरता, सहजिवनातील फोलपणा मांडतात हे पचण्यास कठीण आहे. कथेत श्रीमती संगिता जोगांनी त्या मागे दिलेली कारणमिमांसा (श्री रामचंद्र दिक्षितांचं मन संवेदनशील आहे आणि त्यांना तळमळत ठेवणं योग्य नाही वगैरे वगैरे) व्यावहारिक वाटत नाही. मुळात कोण होते ते श्री. रामचंद्र दिक्षित श्रीमती संगिता जोगांचे? कोणीच नाही. एकदा त्यांच्या गाण्याला, त्यांच्या कानावरही न पोहोचलेली, दाद दिलेले एक परके गृहस्थ. त्यांना आयुष्यात भेटायचेच नाही असे ठरविले असताना, 'का भेटायचे नाही' ह्याचे स्पष्टीकरण द्यायला, मुद्दाम तिथे त्या सारसबागेत, उतावळ्या 'टिन एजर' सारखे ५ दिवस फेर्‍या घालण्याचे कारणच काय? पुन्हा भेटायचेच नाही, संपला प्रश्न. श्री. रामचंद्र दिक्षित कांही भावव्याकुळ अपपरिपक्व तरूण नव्हते. त्यांचा कांही प्रेमभंग वगैरे झाला नसता की त्यांनी त्या, एक दिवसाच्या, अव्यक्त प्रेमासाठी आत्महत्या वगैरेही केली नसती. पण लेखकाने दोन अनोळखी पात्रांच्या, दोन वेगवेगळ्या भावविश्वांना वेगळे राखून एकमेकांनी हळूवारपणे त्यात प्रवेश करविण्याचा प्रयत्नही केलेला जाणवत नाही. एकाच भेटीत दोघांनाही एकमेकांच्या भावभावनांची एवढी घनिष्ट ओळख, कथेची लांबी मर्यादेत ठेवण्यासाठीच घडवलेली जाणवते आहे. असो. दोघांनाही पहिल्याच भेटीत एकमेकांबद्दल प्रेम वाटलं, आपल्या एकाकी जीवनाचा तिटकारा आला, भेटीत उत्कटता आली आणि अचानक आपण फार मोठी चूक करीत आहोत हेही तितक्याच झटक्यात जाणवून, लगेच पुन्हा एकेकटे राहण्याचे महत्त्व उमगले. कुठली चर्चा नाही, समजवासमजवी नाही, विचारांचे मुद्देसुद मांडणे. नाही, नाही, कुछ जम्या नही।

psajid 07/11/2013 - 11:47
पेठकर काका, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुमच्यासारख्या संवेदनशील आणि जागृत वाचकांनी माझी (मांडणी बिघडलेली) कथा वाचून त्यावर मुद्देसूद कारणमिमांशा केल्याबद्दल आभारी आहे. तुम्ही म्हणतात - "आशय चांगला आहे मात्र मांडणी चुकीची आहे" एक गोष्ट विचारतो जर तुमच्या पर्यंत आशय पोहोचला आहे तर मग विस्कळीत मांडणीमधून तो तुमच्यापर्यंत आला कसा ? मला असे वाटते कि, कोणत्याही कथेचं सूत्र हे आरंभ - मध्य - अंत असे असते. वाचकांना मी सांगू इच्छितो कि, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, ही सत्य घटना नाही आणि काल्पनिक कथेमध्ये कल्पनाविलास आणि वर्तमानाची सांगड घालून भावनात्मक शब्दांची मोट बांधली जाते आणि मलाही कथेचा वेग कायम राखण्यासाठी काही गोष्टी जुळवून आणाव्या लागल्या. कित्येक गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या असूनही आपण हिंदी मराठी किंवा रजनीकांतचे चित्रपट बघतो आणि त्याला दाद देतोच की ! तुम्हाला त्यांचे पहिल्याच भेटीत इतकं मोकळेपणाने बोलणं भावलं नाही मात्र त्यांच्या (दोघांच्याही)भूतकाळातील प्रसंग जे त्यांच्या आयुष्यात आले ते पाहता श्री. दिक्षीतांनी श्रीमती जोग यांच्या गायनाला दिलेली दाद ही त्यांना आपल्या पतीच्या उस्फुर्तपणाची आठवण देते आणि अगदी तसेच पुर्वप्रेमिकेच्या आवाजासारखा आवाज ऐकून दीक्षितांचे भारावून जाणे सहज वाटत नाही का ? आपणही कामाच्या धावपळीत किंवा आयुष्याच्या जोडणीमध्ये थकून जात असतानाच एखादा कॉलेज मधील प्रसंग किंवा प्राथमिक शाळेतील घटना आपल्या डोळ्यासमोर आली तर ती आपल्याला मंद झुळकी सारखी आल्हाददायक वाटते, पुन्हा हवीशी वाटते अगदी तसे प्रसंग कथेमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न होता. मुळात ही कथाच या दोघांच्या गतआयुष्यातील घटनां आणि प्रसंगावरच बेतली आहे. यामध्ये शारीरिक ओढीपेक्षा मानसिक आधाराची गरज एकटेपणावर मात करण्यास मदत करते हे सांगण्याचा आणि आयुष्यभर जे जपले ते तत्व किंवा प्रण मोठं आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि हे करताना कथेचा बाज टिकवून ठेवणे हेही गरजेचे होते. त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता तसे न पटणारे, न भावणारे किंवा न जमणारे प्रसंग कथेमध्ये आले असतील हे मी मान्य करतो. एका प्रसंगामध्ये त्यांच्यातील संवाद घडवणे हे चूक आहे हे ही मान्य मात्र अजून दोन चार भेटी आणि आणखी घडामोडी लिहल्या असत्या तर ही कथा न राहता श्री. बाबा कदमांसारखी कादंबरी झाली असती. तरीही तुमच्या अभ्यासपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुमच्या सूचना आणि टिपणी लक्षात ठेवून पुढील लेखन करीन ! श्री. साजीद पठाण

"आशय चांगला आहे मात्र मांडणी चुकीची आहे" एक गोष्ट विचारतो जर तुमच्या पर्यंत आशय पोहोचला आहे तर मग विस्कळीत मांडणीमधून तो तुमच्यापर्यंत आला कसा ?
एकाकी जीवन जगणार्‍या वृद्धांच्या मनांत कोणाबद्दल प्रेमभावना निर्माण होणे नैसर्गिक आहे. कथेचा हाच 'आशय' चांगला आहे पण त्यावर कथा बेतताना गुंफलेले प्रसंग वास्तवापासून, तार्किकतेपासून फटकून आहेत, सबब मांडणी चुकली आहे. विस्कळीत मांडणीतूनही आशय शोधल्यास तो वाचकांपर्यंत पोहोचणे कठीण नाही. एखाद्याच्या शर्टाचे कापड चांगले असेल पण तो चुकीच्या पद्धतीने शिवला असेल तर 'कापड चांगले आहे' हा आशय लक्षात येतो पण नीट शिवलेला नाही हे वास्तव नजरेआड करता येत नाही. असो.

पैसा 02/11/2013 - 12:47
भावभावनांचे हिंदोळे अगदी छान टिपलेत! उतारवयात कोणाची साथ घ्यावी का हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण एकूण कथा, त्यातलं वातावरण, विचार फारच छान आले आहेत! अधुरी एक कहाणी आवडली! म्हटलं तर शेवट आहे म्हटलं तर नाही!

कथेचा आशय चांगला आहे. पण त्याची मांडणी बर्‍यापैकी चुकल्यासारखी वाटते आहे. अजिबात ओळख नसलेले दोन वृद्ध भेटतात एकत्र गप्पा मारतात इथपर्यंत पटतं पण दोघेही स्वतःशीच प्रामाणिक वाटत नाहित. प्रेम भावना (त्या वयातही) अपवित्र नाही. पण आजपर्यंत आपण आपल्या जोडीदाराच्या आठवणी उराशी बाळगून 'एकटेच' जगलो आहोत म्हणजे खूप मोठा 'त्याग' केला आहे ह्या विचारांमागे अहंभावना जाणवते आहे. आपल्या आयुष्याला आपणच लावलेले हे 'त्यागाचे' बिरुद पुन्हा लग्नाचा विचार जरी केला तरी समाजापुढे मलीन होऊन जाईल आणि तथाकथित 'तपस्येला' गालबोट लागेल ही अनाकलनिय 'भिती' प्रामाणिक प्रेमभावनेला मारून, समाजातील आपल्या 'त्यागी' ह्या भ्रामक प्रतिमेला गोंजारत, स्वतःवरच अन्याय करणारी आहे. इतकी वर्षे, आपल्या उदात्त प्रेमाला हृदयाशी कवटाळून आयुष्य व्यतीत केले आणि आता वृद्धापकाळी जेंव्हा शारीरिक आकर्षण उरत नाही, शारीरिक गरजेचा दबाव मनावर राहात नाही, अशा वेळी दुसर्‍या स्त्री/पुरुषाचे आकर्षण, क्षणैक असले तरी पुनर्भेटीसाठी इतके उतावीळ होणे (लागोपाठ एकमेकांना शोधत ५ दिवस भटकणे इ.इ.) हेच हृदयाशी कवटाळलेल्या 'उदात्त' प्रेमाभावनेला तडा देणारे आहे. त्यात अनैसर्गिक कांहीच नाही. पण नैसर्गिक भावनेचा अस्विकार करून पुन्हा त्या भ्रामक 'उदात्तते'चा मुखवटा धारण करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच नैसर्गिग भावनेशी प्रतारणा करणारा आहे. असो. आपल्या समाजात अजूनही स्त्री, एवढा पुढाकार घेऊन (दूसर्‍या भेटीत), एका परपुरुषाला गृहीत धरून एवढीमोठी लेक्चरबाजी करीत नाही. लेखकाच्या मनांत दोन्ही व्यक्तींच्या मनांतील भावनांची इत्यंभूत माहिती आहे पण कथेतील दोन्ही पात्रे एकमेकांना संपूर्णतः अनोळखी आहेत. पण श्रीमती संगिता जोग श्री. रामचंद्र दिक्षितांना संपूर्ण गृहीत धरून, अगदी न चाचरता, सहजिवनातील फोलपणा मांडतात हे पचण्यास कठीण आहे. कथेत श्रीमती संगिता जोगांनी त्या मागे दिलेली कारणमिमांसा (श्री रामचंद्र दिक्षितांचं मन संवेदनशील आहे आणि त्यांना तळमळत ठेवणं योग्य नाही वगैरे वगैरे) व्यावहारिक वाटत नाही. मुळात कोण होते ते श्री. रामचंद्र दिक्षित श्रीमती संगिता जोगांचे? कोणीच नाही. एकदा त्यांच्या गाण्याला, त्यांच्या कानावरही न पोहोचलेली, दाद दिलेले एक परके गृहस्थ. त्यांना आयुष्यात भेटायचेच नाही असे ठरविले असताना, 'का भेटायचे नाही' ह्याचे स्पष्टीकरण द्यायला, मुद्दाम तिथे त्या सारसबागेत, उतावळ्या 'टिन एजर' सारखे ५ दिवस फेर्‍या घालण्याचे कारणच काय? पुन्हा भेटायचेच नाही, संपला प्रश्न. श्री. रामचंद्र दिक्षित कांही भावव्याकुळ अपपरिपक्व तरूण नव्हते. त्यांचा कांही प्रेमभंग वगैरे झाला नसता की त्यांनी त्या, एक दिवसाच्या, अव्यक्त प्रेमासाठी आत्महत्या वगैरेही केली नसती. पण लेखकाने दोन अनोळखी पात्रांच्या, दोन वेगवेगळ्या भावविश्वांना वेगळे राखून एकमेकांनी हळूवारपणे त्यात प्रवेश करविण्याचा प्रयत्नही केलेला जाणवत नाही. एकाच भेटीत दोघांनाही एकमेकांच्या भावभावनांची एवढी घनिष्ट ओळख, कथेची लांबी मर्यादेत ठेवण्यासाठीच घडवलेली जाणवते आहे. असो. दोघांनाही पहिल्याच भेटीत एकमेकांबद्दल प्रेम वाटलं, आपल्या एकाकी जीवनाचा तिटकारा आला, भेटीत उत्कटता आली आणि अचानक आपण फार मोठी चूक करीत आहोत हेही तितक्याच झटक्यात जाणवून, लगेच पुन्हा एकेकटे राहण्याचे महत्त्व उमगले. कुठली चर्चा नाही, समजवासमजवी नाही, विचारांचे मुद्देसुद मांडणे. नाही, नाही, कुछ जम्या नही।

psajid 07/11/2013 - 11:47
पेठकर काका, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुमच्यासारख्या संवेदनशील आणि जागृत वाचकांनी माझी (मांडणी बिघडलेली) कथा वाचून त्यावर मुद्देसूद कारणमिमांशा केल्याबद्दल आभारी आहे. तुम्ही म्हणतात - "आशय चांगला आहे मात्र मांडणी चुकीची आहे" एक गोष्ट विचारतो जर तुमच्या पर्यंत आशय पोहोचला आहे तर मग विस्कळीत मांडणीमधून तो तुमच्यापर्यंत आला कसा ? मला असे वाटते कि, कोणत्याही कथेचं सूत्र हे आरंभ - मध्य - अंत असे असते. वाचकांना मी सांगू इच्छितो कि, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, ही सत्य घटना नाही आणि काल्पनिक कथेमध्ये कल्पनाविलास आणि वर्तमानाची सांगड घालून भावनात्मक शब्दांची मोट बांधली जाते आणि मलाही कथेचा वेग कायम राखण्यासाठी काही गोष्टी जुळवून आणाव्या लागल्या. कित्येक गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या असूनही आपण हिंदी मराठी किंवा रजनीकांतचे चित्रपट बघतो आणि त्याला दाद देतोच की ! तुम्हाला त्यांचे पहिल्याच भेटीत इतकं मोकळेपणाने बोलणं भावलं नाही मात्र त्यांच्या (दोघांच्याही)भूतकाळातील प्रसंग जे त्यांच्या आयुष्यात आले ते पाहता श्री. दिक्षीतांनी श्रीमती जोग यांच्या गायनाला दिलेली दाद ही त्यांना आपल्या पतीच्या उस्फुर्तपणाची आठवण देते आणि अगदी तसेच पुर्वप्रेमिकेच्या आवाजासारखा आवाज ऐकून दीक्षितांचे भारावून जाणे सहज वाटत नाही का ? आपणही कामाच्या धावपळीत किंवा आयुष्याच्या जोडणीमध्ये थकून जात असतानाच एखादा कॉलेज मधील प्रसंग किंवा प्राथमिक शाळेतील घटना आपल्या डोळ्यासमोर आली तर ती आपल्याला मंद झुळकी सारखी आल्हाददायक वाटते, पुन्हा हवीशी वाटते अगदी तसे प्रसंग कथेमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न होता. मुळात ही कथाच या दोघांच्या गतआयुष्यातील घटनां आणि प्रसंगावरच बेतली आहे. यामध्ये शारीरिक ओढीपेक्षा मानसिक आधाराची गरज एकटेपणावर मात करण्यास मदत करते हे सांगण्याचा आणि आयुष्यभर जे जपले ते तत्व किंवा प्रण मोठं आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि हे करताना कथेचा बाज टिकवून ठेवणे हेही गरजेचे होते. त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता तसे न पटणारे, न भावणारे किंवा न जमणारे प्रसंग कथेमध्ये आले असतील हे मी मान्य करतो. एका प्रसंगामध्ये त्यांच्यातील संवाद घडवणे हे चूक आहे हे ही मान्य मात्र अजून दोन चार भेटी आणि आणखी घडामोडी लिहल्या असत्या तर ही कथा न राहता श्री. बाबा कदमांसारखी कादंबरी झाली असती. तरीही तुमच्या अभ्यासपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुमच्या सूचना आणि टिपणी लक्षात ठेवून पुढील लेखन करीन ! श्री. साजीद पठाण

"आशय चांगला आहे मात्र मांडणी चुकीची आहे" एक गोष्ट विचारतो जर तुमच्या पर्यंत आशय पोहोचला आहे तर मग विस्कळीत मांडणीमधून तो तुमच्यापर्यंत आला कसा ?
एकाकी जीवन जगणार्‍या वृद्धांच्या मनांत कोणाबद्दल प्रेमभावना निर्माण होणे नैसर्गिक आहे. कथेचा हाच 'आशय' चांगला आहे पण त्यावर कथा बेतताना गुंफलेले प्रसंग वास्तवापासून, तार्किकतेपासून फटकून आहेत, सबब मांडणी चुकली आहे. विस्कळीत मांडणीतूनही आशय शोधल्यास तो वाचकांपर्यंत पोहोचणे कठीण नाही. एखाद्याच्या शर्टाचे कापड चांगले असेल पण तो चुकीच्या पद्धतीने शिवला असेल तर 'कापड चांगले आहे' हा आशय लक्षात येतो पण नीट शिवलेला नाही हे वास्तव नजरेआड करता येत नाही. असो.

तालीम

शिवोऽहम् ·
बजरंगा म्हन्त्यात मला. तालमीजवळ खोली हाय आमची. म्हंजी मी आन् थोरली भन रहायलोय न्हवं का! नरसिंगपुरास्नं आलोया हितं कोल्लापुरात. टेशनाजवळ आमचा मावळा सांजंच्या टायमाला भाजी इकाय् येतोय, तेच्या वळकीनं ही खोली धरलिया. भनीला पतकी डाक्टरांच्यात काम मिळालंया म्हून बरं. दीसभर दवाखाना झाडती-पुसती. लऽय मोट्टंमोट्टं लोक येत्यात थितं, पोर व्हईना म्हनताना! गावाकडं आसलं काय आसतं तर समद्यांनी खुळ्यात काढला असता की “मर्दा! आरं नवी बाईल आनशिला का डाक्टराफुडं जाशिला!” पर पोरगं झालं का आयबाप समद्यास्नी बक्षिशीबी देत्यात लऽय कायतर. भनीलाबी मिळतंया कवा-कवा! तसं बरं हाय म्हनायचं हितं.

बॅटमॅन 01/11/2013 - 14:40
केवळ नि:शब्द!!!!!!!!!!!! _/\_ फार जब्री. अस्सल दक्षिण महाराष्ट्रीय फ्लेवर आणण्यात तुमचा हात क्वचितच कुणी धरेल. फारच आवडले.

बहुगुणी 01/11/2013 - 16:46
शेवटचं 'मामा' होण्याचं वर्णन लाजवाब! आणि कथेतले युवराज पाटील, सतपाल, वस्ताद आंदळकर, गुरू हनुमान हे सर्व संदर्भ माहितीचे असल्याने कथा आणखी ओळखीची वाटली. फारच सुंदर लिखाण आहे, जियो!

फार फार सुंदर लेखन. भाषेला पक्का कोल्हापुरी गावरान बाज आणि दादू चौगुले, युवराज पाटील, मारूती माने, सतपाल सिंह, चंदगीराम वगैरे वगैरे अगदी ओळखिची नांवं. एकदा वाचायला सुरुवात केली ते शेवटपर्यंत एका दमात संपविलं. धष्ट्पुष्ट पहिलवानाच्या मनाचा संवेदनशील हळुवार कोपरा शब्दाशब्दातून अनुभवला. बिचार्‍याच्या बहिणीचं काय होतं ह्या काळजीने मन व्यापून राहिलं होतं पण शेवटी पहिलवान 'मामा' बनले आणि जीव भांड्यात पडला. दर्जेदार लिखाण आहे. अभिनंद्न.

शिवोऽहम् 04/11/2013 - 16:25
सर्वांना धन्यवाद! कुस्तीतली मोठमोठी नावं आपल्याला माहिती असतात; त्यांच्याबद्दल थोडं का होईना माहिती असतं. पण यशस्वी पैलवान बोटावर मोजण्याइतकेच. बरेचसे शिकाऊ, उमेदवार पैलवान मेहनत करतात पण त्यांना फार प्रतिकुल परिस्थितीत हा छंद जोपासावा लागतो. शेकडा ९५ गळती निश्चित. आमच्या कंपनीच्या कॅब सर्विस मध्ये असेच एक मामा आहेत, वस्ताद दिनानाथसिंह यांच्या हाताखाली मेहनत केलेले. आता तब्येत उतरली आहे पण मोडलेले कान आणि रुंद मनगटं लपुन रहात नाहित. माझा एक मित्रही असाच हौशी कुस्तीगीर होता, पण वडिलांच्या व्यसनापाई रद्दीच्या दुकानात गठ्ठे उचलु लागला. अशा या उपेक्षित क्लासवर एक झोत टाकावा म्हटलं.. बाकी कुस्ती, कोल्हापुर, तिथली अरभाट आणि चिल्लर माणसे हा विषय हा बॅकड्रॉप समजावा.

psajid 07/11/2013 - 12:36
लय भारी लिहलंय. अगदी पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा येणारा वास मनसोक्त आणि भरभरून घ्यावा असं वाटलं. माझे गाव दह्यारी आहे आणि दह्यारी आणि कुस्ती यांचे अतूट बंधन आहे. कारण माझ्या गावाने ह्या महाराष्ट्राला पहिला "महाराष्ट्र केसरी" चा बहुमान मिळवून दिला आहे. श्री. दिनकर (पाटील) दह्यारी हे कुस्तीच्या इतिहासातील पहिले महाराष्ट्र केसरी होते हे तुमच्या कंपनीच्या कॅब वरील ड्राइव्हर मामा सांगतील. श्री. दिनकर दह्यारी यांचे बंधू श्री. काका दह्यारी हे सुद्धा "उपमहाराष्ट्र केसरी" होते. ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे. हे दोघेही भाऊ कोल्हापूरच्या तालमी मध्येच खेळत होते. तुम्ही या कथेतून पुन्हा गतकाळात घेऊन गेलात तुमचे आभार आणि अभिनंदन !

स्पंदना 11/11/2013 - 13:07
कोल्हापुरी माणस अशीच बघा. वागताना वाटतील आडदांड खर आतन जणु मातीच ढेकूळ. अलगद इरघळत्यात पाण्यात पडल्यावानी मायेन, खर उनाचा तडका बसल तशी जादाच कडक होत जात्यात आमच्या भागाची माणस. मस्त लिखाण शिवोऽहम! सुरेख!

अस्सल गावराण कथा. काय फर्डा लेखक आहे. मानलं ब्वॉ. कथेवर पकड ठेवत रंग आणला आहे. सुरुवातीपासून शेवटा पर्यंत खिळवून ठेवलेत.

रुपी 23/01/2018 - 23:39
एक नंबर! भारी लिहिलंय.. लेखनशैली आणि भाषेचा बाज अगदी मस्त जमलाय. ही कथा वर आणणार्‍यांचे आभार!

अर्धवटराव 24/01/2018 - 14:51
भले शाब्बास. अवांतरः हे कानात सुपारी फोडणे काय प्रकरण आहे ? खरच कानात सुपारी फोडतात का? आणि कशी? पैलवानी दृष्टीने त्याचा फायदा काय ?

In reply to by अर्धवटराव

शिवोऽहम् 30/01/2018 - 10:06
खरंतर कानात सुपारी वगैरे काही फोडत नाहीत, पण तसं म्हणतात. कुस्ती शिकताना, खडाखडी करताना पहिलवान एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेताना प्रतिस्पर्ध्याच्या कानांवर थपडा मारतात त्यामुळे कान हळूहळू निबर होऊन सुजू लागतो आणि असे कान असणे हे पहिलवानांसाठी मोठे भूषण मानले जाते.

बॅटमॅन 01/11/2013 - 14:40
केवळ नि:शब्द!!!!!!!!!!!! _/\_ फार जब्री. अस्सल दक्षिण महाराष्ट्रीय फ्लेवर आणण्यात तुमचा हात क्वचितच कुणी धरेल. फारच आवडले.

बहुगुणी 01/11/2013 - 16:46
शेवटचं 'मामा' होण्याचं वर्णन लाजवाब! आणि कथेतले युवराज पाटील, सतपाल, वस्ताद आंदळकर, गुरू हनुमान हे सर्व संदर्भ माहितीचे असल्याने कथा आणखी ओळखीची वाटली. फारच सुंदर लिखाण आहे, जियो!

फार फार सुंदर लेखन. भाषेला पक्का कोल्हापुरी गावरान बाज आणि दादू चौगुले, युवराज पाटील, मारूती माने, सतपाल सिंह, चंदगीराम वगैरे वगैरे अगदी ओळखिची नांवं. एकदा वाचायला सुरुवात केली ते शेवटपर्यंत एका दमात संपविलं. धष्ट्पुष्ट पहिलवानाच्या मनाचा संवेदनशील हळुवार कोपरा शब्दाशब्दातून अनुभवला. बिचार्‍याच्या बहिणीचं काय होतं ह्या काळजीने मन व्यापून राहिलं होतं पण शेवटी पहिलवान 'मामा' बनले आणि जीव भांड्यात पडला. दर्जेदार लिखाण आहे. अभिनंद्न.

शिवोऽहम् 04/11/2013 - 16:25
सर्वांना धन्यवाद! कुस्तीतली मोठमोठी नावं आपल्याला माहिती असतात; त्यांच्याबद्दल थोडं का होईना माहिती असतं. पण यशस्वी पैलवान बोटावर मोजण्याइतकेच. बरेचसे शिकाऊ, उमेदवार पैलवान मेहनत करतात पण त्यांना फार प्रतिकुल परिस्थितीत हा छंद जोपासावा लागतो. शेकडा ९५ गळती निश्चित. आमच्या कंपनीच्या कॅब सर्विस मध्ये असेच एक मामा आहेत, वस्ताद दिनानाथसिंह यांच्या हाताखाली मेहनत केलेले. आता तब्येत उतरली आहे पण मोडलेले कान आणि रुंद मनगटं लपुन रहात नाहित. माझा एक मित्रही असाच हौशी कुस्तीगीर होता, पण वडिलांच्या व्यसनापाई रद्दीच्या दुकानात गठ्ठे उचलु लागला. अशा या उपेक्षित क्लासवर एक झोत टाकावा म्हटलं.. बाकी कुस्ती, कोल्हापुर, तिथली अरभाट आणि चिल्लर माणसे हा विषय हा बॅकड्रॉप समजावा.

psajid 07/11/2013 - 12:36
लय भारी लिहलंय. अगदी पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा येणारा वास मनसोक्त आणि भरभरून घ्यावा असं वाटलं. माझे गाव दह्यारी आहे आणि दह्यारी आणि कुस्ती यांचे अतूट बंधन आहे. कारण माझ्या गावाने ह्या महाराष्ट्राला पहिला "महाराष्ट्र केसरी" चा बहुमान मिळवून दिला आहे. श्री. दिनकर (पाटील) दह्यारी हे कुस्तीच्या इतिहासातील पहिले महाराष्ट्र केसरी होते हे तुमच्या कंपनीच्या कॅब वरील ड्राइव्हर मामा सांगतील. श्री. दिनकर दह्यारी यांचे बंधू श्री. काका दह्यारी हे सुद्धा "उपमहाराष्ट्र केसरी" होते. ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे. हे दोघेही भाऊ कोल्हापूरच्या तालमी मध्येच खेळत होते. तुम्ही या कथेतून पुन्हा गतकाळात घेऊन गेलात तुमचे आभार आणि अभिनंदन !

स्पंदना 11/11/2013 - 13:07
कोल्हापुरी माणस अशीच बघा. वागताना वाटतील आडदांड खर आतन जणु मातीच ढेकूळ. अलगद इरघळत्यात पाण्यात पडल्यावानी मायेन, खर उनाचा तडका बसल तशी जादाच कडक होत जात्यात आमच्या भागाची माणस. मस्त लिखाण शिवोऽहम! सुरेख!

अस्सल गावराण कथा. काय फर्डा लेखक आहे. मानलं ब्वॉ. कथेवर पकड ठेवत रंग आणला आहे. सुरुवातीपासून शेवटा पर्यंत खिळवून ठेवलेत.

रुपी 23/01/2018 - 23:39
एक नंबर! भारी लिहिलंय.. लेखनशैली आणि भाषेचा बाज अगदी मस्त जमलाय. ही कथा वर आणणार्‍यांचे आभार!

अर्धवटराव 24/01/2018 - 14:51
भले शाब्बास. अवांतरः हे कानात सुपारी फोडणे काय प्रकरण आहे ? खरच कानात सुपारी फोडतात का? आणि कशी? पैलवानी दृष्टीने त्याचा फायदा काय ?

In reply to by अर्धवटराव

शिवोऽहम् 30/01/2018 - 10:06
खरंतर कानात सुपारी वगैरे काही फोडत नाहीत, पण तसं म्हणतात. कुस्ती शिकताना, खडाखडी करताना पहिलवान एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेताना प्रतिस्पर्ध्याच्या कानांवर थपडा मारतात त्यामुळे कान हळूहळू निबर होऊन सुजू लागतो आणि असे कान असणे हे पहिलवानांसाठी मोठे भूषण मानले जाते.

The Lake house

स्पंदना ·
अ‍ॅलेक्स त्याच्या घरी जायला निघालेला. रस्ता एकाकी, दाट झाडीतून जाणारा. रस्ता नव्हेच, जंगलातली एक मातीची, जरा रुंद अशी गाडीवाट. फोन वाजतो अन फोनवर हॉस्पिटलमधून त्याच्या वडिलांची डॉक्टर; त्याला त्यांच्या मृत्यूची बातमी कळवते. नेमकी त्याचवेळेला, त्याचे वडील आपल्याच हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट होते हे कळल्याने कुतुहल चाळवलेली डॉक्टर केट हॉस्पिटलच्या जुन्या फायली काढुन अलेक्सच्या वडिलांचे रेकॉर्ड पहाते. त्यात अ‍ॅडमिशनच्या दुसर्‍याच दिवशी झालेला त्यांचा मृत्यू वाचुन ती हादरते. त्यांचं नुकतच प्रसिद्ध झालेले वास्तुशास्त्रावरचे पुस्तक ती गडबडीने खरेदी करुन अ‍ॅलेक्सला पाठववून देते.

पैसा 02/11/2013 - 12:38
सँड्रा बुलॉकसाठी बघावा असं वाटतंय. पण ही काळाला पडलेल्या निरगाठीची गोष्ट कमालीची वेधक वाटते आहे.

दिपोटी 05/11/2013 - 13:19
वेगळं कथानक आहे. परिचयाबद्दल धन्यवाद! जमेल तेव्हा चित्रपट पाहीनच. - दिपोटी

रुपी 18/08/2017 - 23:11
छान ओळख! माझाही थोडा गोंधळ झालाय वाचताना. कधी पाहायला मिळाला तर नक्कीच बघेन.

पैसा 02/11/2013 - 12:38
सँड्रा बुलॉकसाठी बघावा असं वाटतंय. पण ही काळाला पडलेल्या निरगाठीची गोष्ट कमालीची वेधक वाटते आहे.

दिपोटी 05/11/2013 - 13:19
वेगळं कथानक आहे. परिचयाबद्दल धन्यवाद! जमेल तेव्हा चित्रपट पाहीनच. - दिपोटी

रुपी 18/08/2017 - 23:11
छान ओळख! माझाही थोडा गोंधळ झालाय वाचताना. कधी पाहायला मिळाला तर नक्कीच बघेन.

मन म्हणते आहे

psajid ·
काळाच्या घावाने फरफटत जावे, धडपडून उठावे मन म्हणते आहे !! ती सोनेरी क्षणे जिवास ओलावे, डोळ्यात गुंतावे मन म्हणते आहे !! जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !! तुला शौक सुगंधाचा विश्व गंधाळुनी यावे, चंदनासवे झिजावे मन म्हणते आहे !! भ्रमराचे ओठ अन कळीने खुलावे, गीत होऊन जगावे मन म्हणते आहे !! रात्रीस धास्तावले ते तुझ्या नजरेचे काजवे, पहाट बनून जावे मन म्हणते आहे !! - साजीद यासीन पठाण (९९७०५७५७६६) मु : दह्यारी. तालुका : पलूस, जिल्हा : सांगली ( महाराष्ट्र )

चौकटराजा 02/11/2013 - 04:52
मला आवडली कविता . फार बरे वाटले वाचून . पहाटच्या प्रहरी बोचरी असे थंडी उब साजिद्च्या कवितेची मन म्हणते आहे !

प्यारे१ 02/11/2013 - 23:32
मस्त कविता. अवांतरः कराड कुंडल रस्त्यावरची ही भन्नाट नावांची गावं गावांची नावं दुधारी, दह्यारी, ताकारी, लोण्यारी, तुपारी... (ताकारीला काका असतात, कुंडलला दुसरे काका. वडलांचे मावसभाऊ)

psajid 07/11/2013 - 12:04
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! प्यारे जी यांच्या अवांतरवर - तुमचं अगदी खरं आहे सांगली जिल्ह्यात कराड - तासगाव रोड वरती ह्या दुधारी, ताकारी, तुपारी, दह्यारी, घोगाव आणि लागुनच दुधोंडी या नावाची गावे आहेत. मला माझ्या आजी ने त्याविषयी एक इतिहास सांगितला होता तो साधारण असा आहे कि, आमच्या गावाच्या उत्तरेला महादेवाचे अर्थात सागरेश्वराचे तीर्थस्थान आहे पूर्वी इथे एक योगपुरुष साधू राहत होते त्या साधू महाराजांना वरील गावातील लोकांनी कुणी दुधाचा कुणी तुपाचा कुणी दह्याचा कुणी ताकाचा अभिषेक घातला त्यामुळे त्या गावांची नावे अशी वैशिष्टपूर्ण पडली आहेत.

चौकटराजा 02/11/2013 - 04:52
मला आवडली कविता . फार बरे वाटले वाचून . पहाटच्या प्रहरी बोचरी असे थंडी उब साजिद्च्या कवितेची मन म्हणते आहे !

प्यारे१ 02/11/2013 - 23:32
मस्त कविता. अवांतरः कराड कुंडल रस्त्यावरची ही भन्नाट नावांची गावं गावांची नावं दुधारी, दह्यारी, ताकारी, लोण्यारी, तुपारी... (ताकारीला काका असतात, कुंडलला दुसरे काका. वडलांचे मावसभाऊ)

psajid 07/11/2013 - 12:04
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! प्यारे जी यांच्या अवांतरवर - तुमचं अगदी खरं आहे सांगली जिल्ह्यात कराड - तासगाव रोड वरती ह्या दुधारी, ताकारी, तुपारी, दह्यारी, घोगाव आणि लागुनच दुधोंडी या नावाची गावे आहेत. मला माझ्या आजी ने त्याविषयी एक इतिहास सांगितला होता तो साधारण असा आहे कि, आमच्या गावाच्या उत्तरेला महादेवाचे अर्थात सागरेश्वराचे तीर्थस्थान आहे पूर्वी इथे एक योगपुरुष साधू राहत होते त्या साधू महाराजांना वरील गावातील लोकांनी कुणी दुधाचा कुणी तुपाचा कुणी दह्याचा कुणी ताकाचा अभिषेक घातला त्यामुळे त्या गावांची नावे अशी वैशिष्टपूर्ण पडली आहेत.

एक कोपरा

वेल्लाभट ·
एक कोपरा असा जिथे की मांडियला संसार एक कोपरा जिथे मिळाला ह्र्दयाला आधार धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार त्या दिवशी तो राव भयाने व्याकुळलेला दिसला शोधित होता एक कोपरा होऊनिया लाचार घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती असावा परि एक कोपरा जुळती जेथ विचार विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार त्या गर्दीतच मला उमगले या जगताचे सार एक कोपरा माझा आणिक माझ्यातुन साकार उजळून गेल्या जगी अपूर्व शोध कशाचा घेशी एक कोपरा जिथे मिळावा हक्काचा अंधार २५-२-१३ अपूर्व ओक.

psajid 07/11/2013 - 15:32
"विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार" हा जीवनाचं सार सांगणारा शेर खूप आवडला ! वाह ! क्या बात है !

psajid 07/11/2013 - 15:32
"विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार" हा जीवनाचं सार सांगणारा शेर खूप आवडला ! वाह ! क्या बात है !

पिग वॉर (The Pig War)

किलमाऊस्की ·
जगातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रणशिंग फुंकलं गेलंय. एक गोळी सुटण्याचा अवकाश. कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. युद्ध नक्की कशासाठी? आजवर जगात विविध कारणांमुळे युद्धं झाली आहेत. पण कधी ऐकलंय दोन बलाढ्य राष्ट्रं लढाईसाठी सुसज्ज झालेली ती एका डुकरामुळे? हो! अमेरिकेच्या इतिहासात 'पिग वॉर' नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन बलाढ्य महासत्तांनी सान व्हान बेटांवर एका डुकरामुळे रणशिंग फुंकलं होतं.

मदनबाण 01/11/2013 - 14:56
वा... इतिहासा बद्धल नविन माहिती मिळाली ! एका डुकारासाठी युद्ध करायची तयारी ठेवणारे हो दोन्ही देश आजच्या घडीला अत्यंत महत्वपूर्ण संबंध ठेवुन आहेत. आपल्या हिंदुस्थानाचे सैनिक मात्र एखादा बकरा हलाल करावा तसे कापले जात आहेत आणि रोज नविन जवानांची आहुती हा देश अर्पण करतो आहे याची मनस्वी चीड वाटते.अनेक थोर महापुरुष आणि योद्ध्यांच्या गाथा ज्या देशात अभिमानाने गायल्या जातात त्याच देशात इतके बलिदान देउन सुद्धा लोकांचे रक्त अजुन उसळत कसे नाही ? असा प्रश्न मात्र मला रोज पडतो आणि त्याचे उत्तर मात्र काही सापडत नाही. :(

पैसा 02/11/2013 - 12:35
आता हास्यास्पद वाटतंय. पण तेव्हा नक्कीच हिरीरीने भांडण झालं असणार! लेख नेहमीप्रमाणे झक्क!

अतिशय रंजक, उत्कंठावर्धक सामाजिक आणि राजकिय घटनांचे विविध पदर असलेले ऐतिहासिक नाट्य मोजक्या शब्दात शब्दबद्ध केलं आहे. आवडलं.

लेख आवडला.
जर अमेरिकन अविवाहित पुरुष/स्त्री या भागात घर बांधून राहणार असेल, तर ३२० स्क्वेअर फुटाची जागा, तर विवाहित जोडप्यांना ६४० स्क्वेअर फुटाची जागा विनामोबदला देण्याची तरतूद करण्यात आली होती.
३२० स्क्वेअर फूट नाही - ३२० एकर!!

विनोद१८ 04/11/2013 - 23:54
अतिशय सुन्दर व अभ्यासपूर्ण लेख....*good* एका डुकरामुळे निर्माण झालेला सीमाप्रश्ण कायमचा निकालात निघाला एकदाचा. सहजच मनात विचार आला आपल्या काश्मिरचा सीमाप्रश्ण सोडविण्यासाठी कोणाचा बळी द्यावा लागेल ? डुकराचा, बोकडाचा कि आणखी कुणाचा.....व किती ?? विनोद१८

किलमाऊस्की 05/11/2013 - 00:30
वसईचे किल्लेदार ,मुक्त विहारि ,मदनबाण ,प्यारे१ ,पैसा ,सुहास झेले ,प्रभाकर पेठकर,अनन्न्या ,राजेश घासकडवी, विनोद१८ - मनःपूर्वक धन्यवाद !

In reply to by एस

इरसाल 13/11/2013 - 16:03
आणी सहमत. प्रत्येक्वेळी जरी प्रतिसाद दिला नाही तरी तुमचे लेखन हे वाचतोच वाचतो.

मदनबाण 01/11/2013 - 14:56
वा... इतिहासा बद्धल नविन माहिती मिळाली ! एका डुकारासाठी युद्ध करायची तयारी ठेवणारे हो दोन्ही देश आजच्या घडीला अत्यंत महत्वपूर्ण संबंध ठेवुन आहेत. आपल्या हिंदुस्थानाचे सैनिक मात्र एखादा बकरा हलाल करावा तसे कापले जात आहेत आणि रोज नविन जवानांची आहुती हा देश अर्पण करतो आहे याची मनस्वी चीड वाटते.अनेक थोर महापुरुष आणि योद्ध्यांच्या गाथा ज्या देशात अभिमानाने गायल्या जातात त्याच देशात इतके बलिदान देउन सुद्धा लोकांचे रक्त अजुन उसळत कसे नाही ? असा प्रश्न मात्र मला रोज पडतो आणि त्याचे उत्तर मात्र काही सापडत नाही. :(

पैसा 02/11/2013 - 12:35
आता हास्यास्पद वाटतंय. पण तेव्हा नक्कीच हिरीरीने भांडण झालं असणार! लेख नेहमीप्रमाणे झक्क!

अतिशय रंजक, उत्कंठावर्धक सामाजिक आणि राजकिय घटनांचे विविध पदर असलेले ऐतिहासिक नाट्य मोजक्या शब्दात शब्दबद्ध केलं आहे. आवडलं.

लेख आवडला.
जर अमेरिकन अविवाहित पुरुष/स्त्री या भागात घर बांधून राहणार असेल, तर ३२० स्क्वेअर फुटाची जागा, तर विवाहित जोडप्यांना ६४० स्क्वेअर फुटाची जागा विनामोबदला देण्याची तरतूद करण्यात आली होती.
३२० स्क्वेअर फूट नाही - ३२० एकर!!

विनोद१८ 04/11/2013 - 23:54
अतिशय सुन्दर व अभ्यासपूर्ण लेख....*good* एका डुकरामुळे निर्माण झालेला सीमाप्रश्ण कायमचा निकालात निघाला एकदाचा. सहजच मनात विचार आला आपल्या काश्मिरचा सीमाप्रश्ण सोडविण्यासाठी कोणाचा बळी द्यावा लागेल ? डुकराचा, बोकडाचा कि आणखी कुणाचा.....व किती ?? विनोद१८

किलमाऊस्की 05/11/2013 - 00:30
वसईचे किल्लेदार ,मुक्त विहारि ,मदनबाण ,प्यारे१ ,पैसा ,सुहास झेले ,प्रभाकर पेठकर,अनन्न्या ,राजेश घासकडवी, विनोद१८ - मनःपूर्वक धन्यवाद !

In reply to by एस

इरसाल 13/11/2013 - 16:03
आणी सहमत. प्रत्येक्वेळी जरी प्रतिसाद दिला नाही तरी तुमचे लेखन हे वाचतोच वाचतो.